धाराशिव – ऑपरेशन सिंदूर राजकीय प्रदर्शनाचा भाग होऊ शकत नाही मात्र अचानक सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिल्याने महायुतीत मोर्चेबांधणी सुरू असून त्यात तिरंगा रॅली काढून दोन्ही पक्षांनी आपापला सवता सुभा केला आहे.
धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेकडून २२ मे रोजी तिरंगा रॅली काढली तर आज २३ मे रोजी भाजपकडून धाराशिव शहरात रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी तुळजापूर शहरात भाजपने रॅली काढून जिल्ह्यात स्वबळाचा अप्रत्यक्ष नारा देण्यात आल्याने रॅलीच्या निमित्ताने महायुतीतील राजकीय एकोपा संपला असून सवता सुभा सुरू झाला आहे. तर महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीत तुर्तास सन्नाटा आहे. राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांची संख्या भरपूर असली तरी रस्त्यावरची ताकद मात्र तोकडी असल्याने अशी रॅली आयोजित केली अन् प्रतिसाद मिळाला नाही तर नाचक्की होण्यापेक्षा शांत राहण्यात त्यांनी स्वारस्य मानले.
या रॅली मध्ये दोन्ही पक्षांनी आपापले झेंडे वापरले नसले तरी नेत्यांचा सहभाग पहाता कोणत्या पक्षाची रॅली आहे हे स्पष्टपणे दिसते.
दोन्ही पक्षांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद देखील मिळाला मात्र महायुतीतील घटकपक्षांनी एकत्र येत या रॅली काढल्या असत्या तर त्याची भव्य दिव्यता आणखी चांगली झाली असती असे बोलले जात आहे.
सध्या पावसाळी वातावरण आणि निवडणुकांना असलेला अवधी पाहता रणनीती ठरण्यास भरपूर काळ शिल्लक असल्याने महायुतीत पुन्हा एकोपा राहतो की मोठा भाऊ भाजप पुन्हा जिल्ह्यातील राजकारणात वरचढ ठरतो हे येणारा काळच सांगेल.
- निकृष्ट बियाणे, खते व कीटकनाशकांवरील तक्रारींवर तात्काळ कारवाईसाठी सरकारकडून तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना
- विठुनामाच्या गजरात भूम नगरीत आषाढी पालखीचे जल्लोषात स्वागत
- मुख्याधिकारी वसुधा फड यांना बडतर्फ करण्याची RPI (डे) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- दारूच्या नशेत शिक्षक शाळेत हजर; चिंचपूर (बु) ग्रामस्थांत संताप, शिक्षण खात्याकडे तक्रार,
- धाराशिव पोलिसांची मोठी कामगिरी : १७ गुन्ह्यांतील कुख्यात आरोपी ‘कुक्या’ अखेर गजाआड