वाशी (प्रतिनिधी):
वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचा मांजरा नदीला आलेल्या महा भयंकर पुरामुळे संपर्क तुटला असून मोबाईल द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, फक्राबाद गावातील सहा घरांत पाणी शिरले असून प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी कोणाशीही संपर्कात नाहीं. त्यामुळे फक्राबाद गावातील नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जीव मुठीत धरून हे नागरिक आपल्या कुटुंबासमवेत गावात राहत आहेत.लवकरात लवकर आम्हाला सुरक्षित स्थळी हलवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
