धाराशिव – शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासोबतच कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडीही नियमित येत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
याबाबत नागरिकांनी मा. मुख्याधिकारी, यांना निवेदन दिले आहे. “आम्ही धाराशिव शहरात राहतो, राजस्थानच्या वाळवंटात नाही. नगरपालिकेला नियमित नळपट्टी भरत असताना पाणीपुरवठा का होत नाही?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तसेच प्रभागात घंटागाडी येत नसल्याबद्दलही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. “घंटागाडी येण्यासाठी अटारी बॉर्डर आडवी आहे का?” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी तात्काळ कचरा संकलन सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
सदर सुविधा तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
हे निवेदन प्रशांत बापू साळुंके, सुधीर बंडगर, महेंद्र शिंदे, अजित बाकले यांच्यासह प्रभागातील नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.
- टेक्सटाईल पार्कवरून आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा यू -टर्न?;
कौडगावसाठी डिफेन्स हबचे नवे आश्वासन, जुन्या बाटलीत नवी दारू! - पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी जेरबंद; ५ आरोपींसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
- तासगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी
- ना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आला ना शहरातील परिस्थिती बदलली, आ. राणाजगजितसिंह पाटील यांची सत्ता पहिल्या 100 दिवसात सपशेल अपयशी
- “प्रशासकीय मान्यतेतील घोडेबाजार?” आमदार कैलास पाटील यांच्या तक्रारीने आला चव्हाट्यावर
