तासगांव एम.आय.डी.सी.त जपान व अमेरिका गुंतवणुकी संदर्भात स्वरासे पत्र मुख्यमंत्र्यांनी दिला ग्रीन सिग्नल
तासगाव प्रतिनिधी
मातीला अंतर देऊ नका,माती तुम्हाला अंतर देणार नाही,हे स्वर्गीय लोकनेते,माजी गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांचे शब्द आजही तासगाव-
कवठेमहांकाळच्या मातीला नवी दिशा देत आहेत.आबांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजी आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील व विद्यमान आमदार आमदार रोहितदादांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून आज एमआयडीसीच्या पर्यावरणपूरक आणि आर्थिक विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल पडले.
मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’, ₹1,100 कोटींची गुंतवणूक निश्चित
माजी आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील व आमदार रोहित आर. आर.पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन एमआयडीसी संदर्भात सविस्तर मांडणी केली. मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीला संपूर्ण पाठबळाची ग्वाही देत ‘ग्रीन सिग्नल’दिला.या बैठकीचे सर्वात मोठे फलित म्हणजे दोन बलाढ्य कंपन्यांनी सुमारे ₹1,100 कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्य पत्रे सादर केली आहेत.
या बैठकीस डॉ.पारीख (इंडो-अमेरिका चेंबर्स ऑफ कॉमर्स) व श्री. पुराणिक (जपान इकॉनॉमिक्स अँड ट्रेड कमिटी) यांचे डेलिगेशन्स विशेष उपस्थित होते.’लोकांची एमआयडीसी’आता थेट जगाशी जोडली जाणार आहे.अमेरिका व जपान येथे महाराष्ट्रातील डेलिगेशन्स घेऊन तासगाव MIDC चे प्रेझेंटेशन्स करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आबांच्या स्वप्नासाठी गेली अनेक वर्षे आम्ही लढतोय,आज त्या प्रयत्नांना यश येताना पाहून उर अभिमानाने भरून येतो,अशी भावना आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केली.
आबांचा साधेपणा, रोहितदादांची गरुड भरारी
स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांची लोकमानसातली विचारसरणी आजही दिशादर्शक आहे.कधी पदाचा बडेजाव नाही,कधी अहंकार नाही.शेतकरी,वंचित, भूमिहीन यांच्या बांधावर,झोपडीत जाऊन त्यांनी जनतेची सुख-दुःखे जाणून घेतली.हाच साधेपणाचा,जनसेवेचा कित्ता आमदार रोहित पाटील तंतोतंत चालवत आहेत.
लहान वयात मोठी झेप : बेरोजगारीवर थेट घाव
वयाने लहान असूनही कामाच्या बाबतीत आमदार रोहित पाटील गरुड भरारी घेत आहेत. मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळावे,या एकमेव उद्देशाने आबांनी एमआयडीसीसाठी अथक प्रयत्न केले. तोच ध्यास उराशी बाळगून रोहितदादा आज मिशन एमआयडीसी’यशस्वी करत आहेत.वरिष्ठ पातळीवरूनही त्यांना खंबीर पाठबळ मिळत असल्याने मतदारसंघातील बेरोजगारीवर आता थेट घाव बसणार आहे.
जनतेतून प्रचंड पाठबळ : आमचा दादा,कामाचा दादा
आबांच्या पश्चातही पाटील घराण्यावर जनतेने तेवढाच विश्वास ठेवला.रोहितदादांच्या कामाची पद्धत, लोकांमध्ये मिसळणे, प्रश्न सोडवण्याची तळमळ यामुळे जनतेतून त्यांना भरपूर पाठबळ मिळत आहे. आमचा दादा,कामाचा दादा अशी भावना आज तरुणाईतून व्यक्त होत आहे.ही केवळ एमआयडीसी नाही,तर ‘आबांचं स्वप्न आणि रोहितदादांचा संकल्प’ आहे. स्थानिक हातांना जागतिक स्वप्नांची जोड मिळणार आहे.
