Home Blog Page 90

कोतवाल संवर्गाच्या पदभरती संदर्भात सुधारीत मार्गदर्शन

 



राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेला कोतवाल संवर्ग हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही. कोतवाल संवर्गाकरीता दिनांक ०७ मे, १९५९ च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरतांना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत नियम व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि, आता शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरतांना मौखिक परीक्षा / मुलाखत न घेण्याबाबतचे धोरण ठरविले आहे. तसेच शासनाने सरळसेवा भरतीसाठी नामनिर्देशनाव्दारे पदभरती करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदुनामावलीची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. सबब, सदरच्या बाबी विचारात घेता, कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील अनुक्रमांक (४) व (५) मध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन निर्णय घेतला आहे.

कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे ५० प्रश्न असावेत. त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात यावी.

नामनिर्देशनाव्दारे पदभरती करतांना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतूदींची अंमलबजावणी करावी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करावे.

महसूल व वन विभागाच्या संदर्भीय शासन निर्णय दिनांक ०५ सप्टेंबर, २०१३ च्या शासन निर्णयातील उर्वरित तरतूदींमध्ये कोणताही फेरबदल केला नसून सदरच्या तरतूदी जशाच्या तशाच लागू राहतील.

नंदगाव ता.तुळजापूर येथील गावामध्ये आढळली मरनागिण ( उद मांजर)

 


नंदगाव (शाम नागीले) तुळजापूर तालुक्यातील  नंदगावामध्ये दुर्मिळ प्रजातीचा प्राणी आढळला ज्याला येथील स्थानिक लोक मरनागिण या नावाने संबोधत होते घटनास्थळी ज्यावेळेस प्राणी मित्र व सर्पमित्र संजूबाबा यांनी त्या प्राण्याला पकडुन सुरक्षित पर्यावरणात सोडण्याचे काम यशस्वी रित्या केले.

     या बाबत सविस्तर वृत्त असे कि, तुळजापूर तालुक्यातील  नंदगावामध्ये दुर्मिळ प्रजातीचा प्राणी आढळला ज्याला येथील स्थानिक लोक मरनागिण या नावाने संबोधत होते घटनास्थळी ज्यावेळेस प्राणी मित्र व सर्पमित्र संजूबाबा यांनी त्या प्राण्याला पकडुन सुरक्षित पर्यावरणात सोडण्याचे काम यशस्वी रित्या केले त्यांच्याशी या प्राण्याबद्दल संवाद साधताना त्यांनी सांगितले की या प्राण्याला उद मांजर  किंवा पान मांजर या नावाने ओळखले जाते अतिशय सुंदर असा प्राणी आहे आणि मुख्य म्हणजे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा प्राणी स्मशानातील  मेलेले मुडदे उकरून खातात किंवा लहान मुलांना मारून पाठीवर टाकून घेऊन जातात पण या सर्व अफवांचे खंडन करत सर्पमित्र संजूबाबा यांनी सांगितले की या सर्व अफवा आहेत आणि या प्राण्यांचे मुख्य खाद्य फळे व भाज्या आहेत आणि हा पाण्याच्या जवळ रहात असल्यामुळे मासे हे त्याचे आवडीचे खाद्य आहे. सामान्य नागरिकांमध्ये या प्राण्याबद्दल अपुरी माहिती असल्यामुळे या प्राण्यांना मारले जाते आणि जादूटोणा करण्यासाठी त्याची अवैध शिकारी करण्यामुळे आज या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आहे आणि लोकांमध्ये या प्राण्यांबद्दल जागृत करणे गरजेचे आहे.

दैनिक जनमत १७ मे २०२३ E paper

 

मंत्रिमंडळ निर्णय दि १६ मे (संक्षिप्त स्वरूपात)




👉 आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये. मानधनात भरीव वाढ. 


👉 अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय.


👉 इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ.


👉 मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण.

➡️ सततचा पाऊस हा नैसर्गिकआपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

शंखी गोगलगाय या वर्षी रोखू या …!!



शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या येणाऱ्या हंगामात सोयाबीन आणि इतर पिकांवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या लातूर येथील कृषी विद्यावेत्ता विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.डॉ. अरुण गुडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ही माहिती दिली आहे.

शंखी गोगलगाय ही किड निशाचर असून रात्रीच्या वेळी सोयाबीन पिकाच्या रोपावस्थेत पिकांचे नुकसान करते. 

एकात्मिक नियंत्रण :-

  1. उन्हाळ्यात करावयाची कामे :

• उन्हाळ्यात खोल नांगरट करून घ्यावी जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी वरील थरात येऊन कडक उन्हाच्या मदतीने नष्ट होतील.

2. प्रतिबंधात्मक उपाययोजना :

•सोयाबीनच्या पेरणीनंतर पूर्ण शेताभोवती (बांधाच्या आतल्या बाजूने) 05 सेमी रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढून घ्यावा.

•सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच बांधाच्या आतल्या साईडने मेटाल्डीहाईड 2.5% (स्नेलकिल) या औषधाच्या पेलेटला कट करून बारीक गोळ्यात रुपांतर करावे आणि संपूर्ण शेताच्या भोवती (बांधाच्या आतल्या साईडने) 5 ते 7 फुट अंतरावर एक गोळी टाकावी.

• स्नेलकिल हे औषध गोगलगायींना आकर्षून घेते आणि गोगलगायीने या गोळीला चाटल्यानंतर 4 ते 5 तासांनी गोगलगायीच्या आतला स्त्राव बाहेर येऊन ती नियंत्रणात येते.

3. सोयाबीनच्या उगवणीनंतर :

बांधाव्यतिरिक्त आत शेतामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला असेल तर प्रत्येक चार ओळीनंतर ओळीच्या बाजूने 5 फुट अंतरावर स्नेलकिल औषधाच्या गोळ्या टाकाव्यात.

4. सोयाबीन रोपावस्थेत असताना :

रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग किंवा सुतळी बारदाना पाण्यात भिजवून प्रति एकरी दहा ठिकाणी ठेवावा.

सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान ढिगाखाली किंवा बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.

गोगलगाय नियंत्रणासाठी सामुहिक मोहीम राबवणे आवश्यक.  

सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन : 

हा रोग विषाणूजन्ये असून या रोगाची सुरुवात रोगट बियाण्याद्वारे होते आणि पुढील प्रसार ( एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत ) पांढऱ्या माशीमुळे होतो.

रोगाची लक्षणे :

सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात.

• फुले आणि शेंगा कमी लागतात.

• शेंगा पिवळ्या पडून दाना भरत नाही.

• उपाययोजना :

1. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड टाळावी.

2. सोयाबीनची लागवड बीबीएफ किंवा पट्टा पद्धतीने करावी.

3. वेळोवेळी पिकाचे किड व रोगासाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.

4. पिवळा मोझॅक प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून येताच ती उपटून टाकावीत आणि शेताबाहेर खड्डा करून त्यात गाडून टाकावीत.

5. सोयाबीन पिकात पिवळ्या कलरचे चिकट सापळे एकरी 8 ते 10 याप्रमाणे लावावेत.

6. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिकावर लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून थायोमिथोक्झाम 25% हे किटकनाशक 40 ग्रॅम प्रति एकरी फवारावे. 

तूर पिकातील मर व फायटोप्थोरा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन :   

पेरणीपूर्वी किंवा पेरणी करताना घ्यावयाची काळजी :

1.   पिक फेरपालट करणे आवश्यक आहे.

2.   कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती जशा BDN – 711, BDN – 716, आणि गोदावरी या आधुनिक जातीचा  

वापर करावा.

3.  पेरणीपूर्वी कार्बोक्झीन 37.5 + थायरम 37.5 (व्हिटाव्हॅक्स पावर) 04 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे पहिली   

    बीजप्रक्रिया तर पेरणीच्या दिवशी बायोमिक्स / ट्रायकोडर्मा 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे दुसरी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. 

जुलै / ऑगस्ट महिन्यात घ्यावयाची काळजी :

1. तूर पिकात जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात ज्यावेळी जमिनीत चांगला ओलावा असेल तेव्हा ट्रायकोडर्मा 04 किलो किंवा बायोमिक्स 04 लिटर प्रति एकरी 200 लिटर पाण्यातून ड्रेंचींग (आळवणी) द्यावी.

सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यात घ्यावयाची काळजी (सोयाबीनच्या काढणीनंतर) :

1.तूर पिकात खोडावर फायटोप्थोरा ब्लाईटचे राखेरी कलरचे ठिपके दिसताच मिटॅलॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% (रिडोमिल गोल्ड) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी. 


आणखी वाचा

उन्हाळी खोल नांगरणीचे महत्त्व

१५ हजाराची लाच स्वीकारणारा वाशी येथील परिरक्षण भुमापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

  


धाराशिव -जमिनीची अकृषिक अतितातडी मोजणी करण्यासाठी १५ हजाराची लाच स्वीकारणारा वाशी येथील परिरक्षण भुमापक नामे सुनील श्रीराम रामदासी , वय 55 वर्षे, परिरक्षण भुमापक ( निमतानदार), भूमी अभिलेख कार्यालय वाशी, ज़िल्हा उस्मानाबाद ( वर्ग -3) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. 

याबाबत हकीकत अशी की,तक्रारदार यांनी त्यांच्या नावाने असलेल्या जमिनीची अकृषिक अतितातडी मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, वाशी येथे अर्ज दाखल करून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चलन भरलेले होते. तक्रारदार यांच्या जमिनीच्या मोजणीसाठी  नोटीस काढून त्यांच्या जमिनीची अतितातडी मोजणी करून देण्यासाठी यातील आलोसे सुनील श्रीराम रामदासी, वय 55 वर्षे, परिरक्षण भुमापाक ( निमतानदार), भूमी अभिलेख कार्यालय वाशी यांनी  पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 20000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 15000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने  आरोपी रामदासी यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा उस्मानाबाद  येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा. कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064


आणखी वाचा

वडापाव चा शोध कोणी लावला?

उन्हाळी खोल नांगरणीचे महत्त्व

Dainik Janmat E paper 15 may 2023

Dainik Janmat E paper 15 may 2023

 

आता दर महिन्याच्या तिस-या मंगळवारी फेरफार अदालत


आता दर महिन्याच्या तिस-या मंगळवारी फेरफार अदालत

16 मे पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी, सहभाग नोंदवण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे आवाहन


उस्मानाबाद,दि,12(जिमाका):- एक महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या फेरफार निकाली काढण्याच्या अनुषंगाने जिल्हयाभरात मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी भरविण्यात येईल. तेव्हा सर्व संबंधित शेतकऱ्यांनी फेरफार अदालतमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

सर्व सामान्यांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार  निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि.11 मे 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून त्यामध्ये एक महिन्याचे वर प्रलंबित असलेल्या साध्या विवादग्रस्त फेरफरांची संख्या निश्चित करून दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी फेरफार अदालत तहसिल आणि मंडळ स्तरावर आयोजित करण्यात यावी.तसेच महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास त्याच्या लगतच्या दुसऱ्या दिवशी फेरफार अदालत आयोजित करावी असे निर्देश देण्यात आले आहे.

या फेरफार अदालत मोहिमेची मे महिन्याच्या तिसऱ्या मंगळवार दि.16 मे 2023 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे.जिल्हयातील सर्व तहसिल मुख्यालयी- सर्व मंडळ मुख्यालयी नायब तहसिलदार.मंडळ अधिकारी-अ का यांच्या उपस्थिती सदर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 

नोंदणीकृत व अनोंदणीकृत साध्या नोंदी 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आणि विवादग्रस्त नोंदी 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाही यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे पर्यवेक्षण करणार आहेत. 

        जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या महसूल विभागातील मंडळ मुख्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी फेरफार आदालत आयोजित केली जाणार. फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र सादर करुन आपल्या नोंदी निर्गत कराव्यात, असे आवाहनही  जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी केले आहे.