धाराशिव – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे गाव असलेल्या तेर मधून भाजपाच्या उमेदवारांना माघार घ्यावी लागली आहे. तेर पंचायत समिती गणातून भाजपच्या चिन्हावर उमेदवार होता मात्र त्याला माघार घ्यावी लागली असल्याने पंचायत समितीसाठी ईव्हीएम वर कमळ नसणार आहे. सुरेखा बाळासाहेब कदम यांना भाजपकडून ए फॉर्म देण्यात आला होता तर तनुजा अजित कदम यांना बी फॉर्म देण्यात आला होता मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही अर्ज मागे घेतल्याने तेर पंचायत समिती गणातून भाजपचा उमेदवार नाही.
तेर पंचायत समिती गणात भाजपला आता अपक्षाला संधी द्यावी लागणार असून सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणाऱ्या भाजपकडे तेर पंचायत समिती गणात उमेदवार नसणे ही मोठी नामुष्की आहे. हजारो कार्यकर्ते लढण्यासाठी तयार असताना एका गणात राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपच्या अधिकृत उमेदवारांवर माघार घेण्याची वेळ येत असेल तर हा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय असल्याचे बोलले जात आहे.
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटोच्या जोरावर ब्लॅकमेल; लव्ह जिहादचा आरोप, नराधम पोलिसांच्या ताब्यात
- धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत छुप्या युतीत ठिणगी? भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत गोंधळ!
- सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे इतिवृत्त गायब? धाराशिव नगरपरिषदेत पारदर्शकतेचा बोजवारा?आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्याचा फुगा फुटला!
- परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा; २४ तासांत टोळी जेरबंद, गुन्हे शाखेची कामगिरी
- टेक्सटाईल पार्कवरून आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा यू -टर्न?;
कौडगावसाठी डिफेन्स हबचे नवे आश्वासन, जुन्या बाटलीत नवी दारू!
