धाराशिव – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे गाव असलेल्या तेर मधून भाजपाच्या उमेदवारांना माघार घ्यावी लागली आहे. तेर पंचायत समिती गणातून भाजपच्या चिन्हावर उमेदवार होता मात्र त्याला माघार घ्यावी लागली असल्याने पंचायत समितीसाठी ईव्हीएम वर कमळ नसणार आहे. सुरेखा बाळासाहेब कदम यांना भाजपकडून ए फॉर्म देण्यात आला होता तर तनुजा अजित कदम यांना बी फॉर्म देण्यात आला होता मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही अर्ज मागे घेतल्याने तेर पंचायत समिती गणातून भाजपचा उमेदवार नाही.
तेर पंचायत समिती गणात भाजपला आता अपक्षाला संधी द्यावी लागणार असून सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणाऱ्या भाजपकडे तेर पंचायत समिती गणात उमेदवार नसणे ही मोठी नामुष्की आहे. हजारो कार्यकर्ते लढण्यासाठी तयार असताना एका गणात राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपच्या अधिकृत उमेदवारांवर माघार घेण्याची वेळ येत असेल तर हा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय असल्याचे बोलले जात आहे.
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
- एजंट-दलालांकडे कागदपत्रे देऊ नका; शिधापत्रिका व शासकीय सेवांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करा : तहसीलदार मृणाल जाधव यांचे आवाहन
- आमची लढाई आरएसएससोबत नाही; काँग्रेसच्या उमेदवाराचे अजब विधान
- विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
