Home Blog Page 92

महात्मा गौतम बुध्द आणि त्यांची विचारधारा

 


    आज वौशाखी पोर्णिमा, अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, अंहिसेचा संदेश देणाज्या तथागत महात्मा गौतम बुध्दाचा जन्मदिवस. वौशाखी पोर्णिमेला बौध्द धर्मात अतिशय महत्त्व आहे. या पोर्णिमे दिवशी बुध्दाचा जन्म झाला. याच दिवशी बुध्दाला बोधीचा, सत्याचा साक्षात्कार झाला आणि याच पोर्णिमेला कुशी नगर येथे बुध्दाचे महापरिनिर्वाण झाले. जगाच्या पाठीवर कोणत्याही महामानवाच्या जीवनात असा योग आल्याचे माझ्या वाचनात नाही.
    गौतमबुध्द हे प्रभावशाली व्यक्तिमत्वाचे विद्वान, तत्त्वज्ञ, प्रभावी वाद-विवाद पट्टू, दयाशील, समतावादी होते. सौंदर्य महालात असते. सौजन्य मातीच्या घरात दिसते अशी त्यांची धारणा होती. बुध्द अहिंसावादी, विनयशील व नम्र असल्यामुळे अंहिसेने हिंसेला व अक्रोधाने क्रोधाला जिंकावे यावर त्यांचा गाढ विश्वास होता. त्यांची विद्ववता व नम्रता पाहून एक पाश्चमात्य विचारवंत आपल्या आत्मचरित्रात म्हणतो की, ‘मानवाच्या गुरुमध्ये एवढी वौशिष्टे असणे संभवत नाही. गौतम बुध्द उच्चकुलीन राजपूत्र असूनही त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी व दु:खाचे कारण शोधण्यासाठी राजवौभव, धनदौलत, राजमहाल, नात्या-गोत्याचा त्याग केला. कर्णमधूर वाणी, मोहक वक्र्तृत्व त्यामुळे बुध्द विश्वासनीय व पुजनीय गुरुचा गुरु आहेत.
    गौतम बुध्दाची मानवतेची शिकवण आजही जगातील प्रत्येक मानव घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रेरणादायी आहे. बुध्द म्हणतात मानसाचे जीवन दु:खमय शोकमय असून वार्धक्य व मृत्यु दु:खातच होतो. मोह, इच्छा, आसक्ती ही एका दु:खातून दुसरे दु:ख निर्माण करीत असते. शरीर, इंद्रिय, स्पर्श, वेदना, भावना ही दु:ख निर्मितीची कारणे आहेत. ही इच्छा नाश करण्यासाठी दु:खाची कारणे नष्ट करुन निर्वाण प्राप्त करता येते. दु:ख विरहित शांतता प्राप्तीसाठी अंधश्रध्दा व भ्रामक कल्पना वज्र्य करावी. सत्याचा डोळसपणे स्विकार करुन जीवन मंगलमय करण्याचा संकल्प करावा. आपले बोलणे, सत्य, मधूर, प्रेमळ, दयाळू असावे ते खोटे, कठोर, चछोर नसावे. निंदनीय बोलण्यासाठी वाणीचा दुरुपयोग करु नये. मानवाने सदाचाराचे वर्तन ठेवावे. हिंसा, चोरी, व्याभिचार, दुष्कृत्य वज्र्य करुन योग्य मार्गाने उदरनिर्वाह करावा. मादक द्रव्य किंवा दारुचे सेवन करु नये. आपल्या मनातील दृष्ट प्रवृत्ती काढून मनात सत्तप्रवृत्ती कसल्याही प्रलोभनाने मनात मोह, इच्छा आसक्ती निर्माण होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगावी. मन शुध्द ठेवल्याने मनात एकाग्रता निर्माण होवून दु:खाचा सर्वनाश होतो व निर्वाण प्राप्त होते.
    गौतम बुध्द म्हणतात, प्रज्ञा, शील, करुणा ही त्रिसुत्री बुध्दधम्माचा आधारस्तंभ व गाभा आहे. प्रज्ञा ही लोककल्याणासाठीची विद्ववता असून शील हे या प्रज्ञेचे सौभाग्य आहे. त्यांच्या जोडीला करुणा हवीच आहे. दु:खी पिडीताबद्दल दया कळवळा आवश्यकच आहे. म्हणून जन्माने उच्च, निच्च ठरत नसून कर्माने ठरतो. त्यासाठी मानसाने सत्यकर्मासाठी सदाचारी बनले पाहिजे. वेदाचे अध्ययन, उपासना, स्वर्ग, नर्क, धर्मविधी, यज्ञवौकल्य, उपास-तापास या बाबींना बौध्द धर्मात अजिबात स्थान नाही. तर बौध्द धर्माने वर्ण, वर्ग, जाती, विषमता नाकारुन समता व समानतेला केंद्र बिंदू मानले आहे. उच्च-निच्च, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत सर्व समान आहेत. नद्या समुद्रात विलीन झाल्यानंतर त्यांचे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, तसेच बौध्द धर्माचे आहे.
    गौतम बुध्दाने जगातील मानव जातीला मंगलमय सुखी जीवन जगण्यासाठी शांती, अहिंसा, समता, दयाशीलते बरोबरच दैनंदिन जीवनासाठी साधी सोपी संहिता विषद केलेली आहे. ती संहिता प्रत्येक नागरिकांनी आचरणात आणणे आवश्यक आहे. हिंसा (प्राणीहत्या) करु नये, वाणीने कठोर बोलू नये, दुसज्याचा द्वेष करु नये, दुसज्याच्या संपतीचा लोभ धरु नये, दूराचारी विचार मनात आणू नये, दुरगुणापासून अलिप्त राहून दु:खी, पिडीत, संकटग्रस्त व्यक्तीला मदत करावी. मनात सकारात्मक विचार ठेवून नितीमत्तेने वर्तन करावे. पिडीतांची सेवा करावी, आई-वडील व वृध्दांची सेवा करावी, जीवनात सतत सदाचाराचे तत्व आचरणात आणावे. इतरांचे चांगले गुण आत्मसात करावे, आपल्यातील दुर्गूण दोष दूर करावे. त्यामुळे बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिद समाजात खज्या अर्थाने रुजेल आणि शांततामय मार्गाचा जीवनाचा सर्वांगीण विकास होईल.
    बौध्द धर्म हा विज्ञानाचे अधिष्ठान असलेला मुळ भारतीय धर्म असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करुन 14 ऑक्टोंबर 1956 ला आपल्या लाखो अनुयायासह बौध्द धर्माची दिक्षा घेतली. त्यावेळी बौध्द धर्माचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अनुयायांना 22 प्रतिज्ञाची आचारसंहिता दिलेली आहे. त्यातील पंचशील आष्टांग मार्ग आणि 10 परिमिता याच्या आचरणा बाबत गेल्या 65 वर्षात आपली वाटचाल कशी होत आहे याचे आत्मचिंतन करणे आवश्यक वाटते. आज सामाजिक, शौक्षणिक, आर्थिक स्तर उंचावला असला तरी अंदाजे प्रमाण 30 % प्रमाणात आहे. उर्वरीत समाज हालाखीचे जीवन जगत आहे. त्यांचा आर्थिक, शौक्षणिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शासना सोबतच प्रगत बौध्द अनुयायांनी पुढे येवून प्रयत्नशील राहण्याची सामाजिक बांधिलकी नाही का ? समाजात स्त्री-पुरुष समानता मानली जात आहे. परंतू मुलगी कितीही उच्चशिक्षीत असली आणि कायद्याने बंदी असूनही मुलीकडून हुंडा घेतला जातो. मुलगा नौकरदार जर असेल तर तो सोन्याच्या रुपाने तो स्विकारला जातो. मंगल परिणय झाल्यानंतर वधू-वरांना कुलदैवताच्या दर्शनाला पाठवले जाते. मंगल परिणय व अन्य उत्सवात मद्यप्राशन करुन अनुयायी नाचतात. याला बौध्द धर्मात मान्यता आहे का ? याचा आपण कधी विचार करणार आहोत. आपण बुध्द अनुयायी म्हणून आज बुध्द जयंतीच्या मंगलदिनी संकल्प करु या की आपले मंगलपरिणय व अन्य सोहळे साजरे करताना महात्मा गौतम बुध्दाचे तत्त्वज्ञान व विचारधारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र समाज परिवर्तनाचे विचार सतत ध्यानी, मनी ठेवून ते काटेकोरपणे आचरणात आणू या आणि आचारसंहितेप्रमाणेच वाटचाल करुया.

दिलीप प. कांबळे

+919922568587

हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी – सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे सचिव ॲड. हर्षीत खंडार

 

जिल्हा रस्ता सुरक्षा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून सूचना

सोलापूर, दि. ४ (प्रतिनिधी) :- दुचाकी वाहनांच्या वाढत्या अपघात संख्येचा विचार करता, हेल्मेटसक्ती तसेच चारचाकी वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी सीट बेल्ट सक्तीची कडक अंमलबजावणी करावी. याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे सचिव तथा कायदेशीर सल्लागार ॲड. हर्षीत खंडार यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, परिविक्षाधीन आयपीएस नौमी साटम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे आणि संतोष कुलकर्णी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पंढरपूरचे प्रकल्प संचालक आय. व्ही. नारायणकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, महामार्ग सुरक्षा पथकाचे रंजन सावंत आदि उपस्थित होते.

ॲड. हर्षीत खंडार म्हणाले, दुचाकी वाहनांचे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी. अधिकाधिक नागरिकांचा रस्ते सुरक्षा अभियानात सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.

सुरक्षा कवच उपक्रमाचे कौतुक

उपप्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या सुरक्षा कवच उपक्रमाचे ॲड. हर्षीत खंडार यांनी कौतुक करून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचा संस्कार रुजण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. तसेच, या उपक्रमाची व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करावी, असे ते म्हणाले.

प्रारंभी जिल्ह्यातील सर्व महामार्ग, महत्त्वाची देवस्थाने, शहर व ग्रामीण भागातील जास्त अपघात होणारी ठिकाणे, मागील तीन वर्षात झालेल्या अपघातांची संख्या इत्यादी बाबींची माहिती देवून त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना व विविध उपक्रमांचे सादरीकरण मोटर वाहन निरीक्षक सागर पाटील यांनी केले.

यावेळी विजय गायकवाड, वाय. बी. वेळापुरे, एम. ओ. मदान, ए. जी. सायकर तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक जनमत ०५ मे २०२३ E paper

आठ फुट लांब धामीणीवर दवाखान्यात केले उपचार

दहिफळ (योगराज पांचाळ)
      कळंब तालुक्यातील सापनाई येथे सुरेश पाटील यांच्या शेतात नांगरणी चालू असताना आठ फुट लांब धामीण नांगराच्या फाळाला आडकली ती गंभीर जखमी झाली.शेतकरी पाटील यांनी सर्पमित्र अनंत माने यांना फोन करून सांगितले.घटनास्थळी येऊन धामीण पकडून तीला दहिफळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेहण्यात  आले.आठ फुट लांब असणाऱ्या धामीणीवर प्रथमोपचार सेवक जगताप यांनी केले.
     एका सापावर पहिल्यांदाच उपचार करण्यात आले आहेत.साप माणसाचा शत्रू नसुन मित्र आहे.शेतातील पिकाचे उंदरापासुन साप संरक्षण करतो.विनाकारण तो माणसाला चावत नाही.साप दिसला तर संपर्क करा असे आवाहन सर्पमित्र अनंत माने यांनी केले आहे.  ९४०३७३४९२४ या नंबरवर संपर्क साधावा.

धाराशिव जिल्ह्याकरिता दिनांक ०५ ते ०९ मे, २०२३ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश स्वछ ते अंशतः ढगाळ राहून दिनांक ०५ व ०६ मे, २०२३ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. 

मराठा वनवास‎ यात्रेला सलगरा ग्रामपंचायतचा जाहीर पाठिंबा

 


सलगरा,दि.४ (प्रतिक भोसले) 

घटनात्मक ५०% च्या आतील ओबीसीमधूनच‎ मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या‎ मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने‎ तुळजापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत ‘मराठा वनवास‎ यात्रा’ काढण्यात येणार आहे. या वनवास यात्रेस सलगरा (दि.) ग्रामपंचायतने जाहीर पाठिंबा दिला आहे. 

सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या ६ मे २०२३ रोजी तुळजापूर येथून ‘मराठा वनवास यात्रा’ निघणार आहे. मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी या वनवास यात्रेचे नियोजन केले गेले आहे. ही यात्रा तुळजापूर ते मुंबई मंत्रालय अशी पायी चालत जाणार आहे. ६ जून २०२३ रोजी सर्व मराठा बांधव मुंबई मध्ये पोचतील असे नियोजन ठरले आहे. आणि त्यात हजारो बांधव सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.


या मराठा वनवास यात्रेला आणि मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला मौजे सलगरा दिवटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांनी एकमताने मंजूर केले आहे. आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने व तसेच गावातील सर्व जातीपातीच्या नागरिकांच्या वतीने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सर्व ते सहकार्य यापुढेही करण्यात येईल. असे ग्रामपंचायतने काढलेल्या पत्रात म्हटले आहे. 


 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच दि.६ मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेस सुरुवात होईल. ही यात्रा गावागावात मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करीत दि.६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळादिनी जवळपास ५०० किलोमीटर पायी चालत जात मुंबई मध्ये पोहोचणार आहे. ५०% च्या आतले ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, यंदाचा छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळा आपले मराठा बांधव आझाद मैदानावरच साजरा करतील. त्या नंतर मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत‎ हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होत नाही, अधिकृत ‘जी आर’ निघत नाही, तोपर्यंत मुंबईतच ठाण मांडून बसणार, कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. आता पर्यंत लेखी आश्वासने फार झाली, आता प्रत्यक्ष‎ आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. असे पदाधिकारी एका आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

येत्या ६ तारखेला मराठा वनवास यात्रा तुळजापूर येथून निघणार आहे. चळवळीतील शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पहाडी आवाजात जंगी पोवाड्यांचा कार्यक्रम सकाळी ०९ वा.सु. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर होईल. अनेक गावांतील भजनी मंडळे, हलगी पथक, संभळ वादक, वासुदेव, ढोल पथक देखील सर्व आम्हाला सोडण्यासाठी येणार आहेत. वनवासाला निघालेल्या लोकांना पाठवण्याची ती सुद्धा एक पद्धत आहे. ज्या प्रमाणे प्रभू श्री राम वनवासाला निघाल्या नंतर त्यांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने अयोध्या वासिय उपस्थित होते. अगदी त्याच प्रमाणे वनवासाला निघालेल्या मराठा समाजातील बांधवांना, तरुणांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने समाज उपस्थित राहील. वाटेत देखील प्रत्येक गावातील ग्रामस्थ आमच्या राहण्याची – जेवणाची सोय करत आहेत. जागोजागी जनजागृती करत ही वनवास यात्रा मुंबईत पोचेल. पहिल्यांदाच निघालेल्या या वनवास यात्रेमुळे महाराष्ट्राला एका वैभवशाली परंपरेची प्रत्यक्ष माहिती होऊन जाईल. असे सुध्दा पदाधिकारी बोलताना म्हणाले.

कर्नाटकातील मतदानासाठी महाराष्ट्रातील सिमेलगतच्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत


कर्नाटकातील मतदानासाठी महाराष्ट्रातील सिमेलगतच्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत

 


धाराशिव –

आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्वीकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ ( भाग – २) मधील नियम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/ आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

 भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे कर्नाटक विधानसभा क्षेत्रांमध्ये दिनांक १० मे, २०२३ रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणूकीमध्ये कर्नाटक राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या (सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड) जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. तथापि, त्यांची नावे कर्नाटक राज्यांतील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने आदेश दिले आहेत.


1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार / अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.


1) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)


II) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.

(IV) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.

धाराशिवमध्ये राज्यस्तरीय वकिल परिषद; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांची उपस्थिती


‘गतिमान न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण’ विषयावर मंथन


 धाराशिव, दि. 3 – महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद, जिल्हा विधीज्ञ मंडळ व सर्व तालुका विधीज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय वकिल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 5 मे रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार्‍या या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. राज्यस्तरीय वकिल परिषदेसाठी राज्यभरातील तीन हजार वकिल बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील जिल्हा न्यायालय परिसरात असलेल्या मधुकर मोरे विधीज्ञ ग्रंथालयात बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर मुंडे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले, ज्येष्ठ विधीज्ञ राम गरड, अ‍ॅड. ललीत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अ‍ॅड. मिलींद पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दिवंगत विधीज्ञ व्यंकटराव नळदुर्ग, अ‍ॅड. नरसिंगराव काटीकर, कलिमोद्दीन सिद्दीकी, मल्लिकार्जून तोडकरी आदींनी विविध क्षेत्रात काम करून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. अशा धाराशिव जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीत पहिल्यांदाच राज्यस्तरीय वकिल परिषद आयोजनाचा मान जिल्ह्याला मिळाला आहे. आधुनिक काळात न्यायव्यवस्थाही आधुनिक आणि गतिमान होत आहे. त्यामुळे लोकांना कमी कालावधीत न्याय मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे राज्यस्तरीय वकिल परिषदेतील चर्चासत्रासाठी ‘गतिमान न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती अरूण पेडनेकर, ई-कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाणा, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग, राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन कुमार मिश्रा, माजी न्यायमूर्ती व्ही. के. जाधव, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुपारच्या सत्रात  कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘गतिमान न्यायासाठी न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण’ या विषयावर चर्चा सत्र होणार आहे. यात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती अरूण पेडनेकर, सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीचे माजी उपाध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, सायबर सुरक्षा संस्थेचे अध्यक्ष डॉ. हारॉल्ड डी.कास्टा, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. संग्राम देसाई हे चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर 3.15 ते 4.30 या वेळेत खुले चर्चासत्र व ज्येष्ठ विधीज्ञांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनिल सिंग व अ‍ॅडव्होकेट ऑफ जनरल डॉ. बिरेंद्र सराफ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील वकिल बांधव सहभागी असणार आहेत. या परिषदेस वकिल बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलींद पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. संग्राम देसाई, सदस्य अ‍ॅड. जयंत जायभावे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मुंडे यांच्यासह वकिल परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.