Home Blog Page 72

आयान-बाणगंगा साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2022-2023 चा दुसरा हप्ता प्र.मे.टन रक्कम रु 75/- प्रमाणे शेतक-यांचे बॅक खात्यात जमा – संचालक सचिन सिनगारे

 



परंडा (भजनदास गुडे ) आयान मल्टीट्रेड एल्.एल.पी.संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम  2022-2023 करिता गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकरी यांच्या बॅक खात्यावर प्र.मे.टन रक्कम रु 75/- प्रमाणे दुसरा हप्ता जमा केला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने प्रसिद्वीपत्रकाद्वारे दिली आहे.

      आयान-बाणगंगा या साखर कारखान्यांने गाळप हंगाम 2022-2023 मध्ये 481636.249 मे टन उसाचे गाळप केले असून 10.94 % साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याने 2022-2023 करिता गळीतास आलेल्या ऊसासाठी पहिला हप्ता प्र.मे.टन रक्कम रु 2350/- प्रमाणे यापूर्वीच समंधीत शेतकऱ्यांना वेळेत अदा केला आहे.आत्ता “बैलपोळा सणाचे” औचित्य साधुन गळीत हंगाम 2022-2023 मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचे दुस-या हप्त्यापोटी प्र.मे.टन रक्कम रु 75/- प्रमाणे ऊसबिल ऊस ऊत्पादक शेतक-यांचे “भाऊसाहेब बिराजदार ना.सह.बँक” शाखा परंडा व भूम शाखेत शेतकऱ्याच्य बॅक खातेवर तसेच इतर विभागातील शेतकऱ्यांनी दिलेल्या बॅक खातेवर जमा केलेले आहे.तरी सर्व शेतकरी बांधवांनी बॅंकेतून आपापल्या ऊसबिलाची रक्कम घेऊन जाणे.तसेच हंगाम 2023-2024 करिता तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण झाले असून तोडणी वाहतूक ठेकदारांना ॲडव्हान्सचे वाटप सुध्दा केलेले आहे.तसेच गाळप हंगाम 2023-2024 सुरू करनेच्या दृष्टीने कारखाना गाळप क्षमता विस्तार वाढीची व दुरुस्तीची कामे पूर्ण झालेली आहेत.त्यानुसार गाळप हंगाम 2023-2024 मध्ये कारखाना वाढीव क्षमतेने चालणार असुन हंगाम वेळेत सुरू करणार आहोत.तसेच  गाळप हंगाम 2023-2024 मध्ये कारखान्याचे जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उदीष्ट आहे.तरी गतवर्षीप्रमाणे हंगाम 2023-2024 मध्ये सुध्दा ऊस उत्पादक शेतकरी बंधूनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन आयान मल्टीट्रेड एल.एल.पी चे संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे. 

    यावेळी बाणगंगा कारखान्याचे चेअरमन मा.आ.राहुल भैय्या मोटे, व्हा.चेअरमन,महादेव आबा खैरे व सर्व संचालक मंडळ, जनरल मॅनेजर संतोष तोंडले, मुख्य शेती अधिकारी विठ्ठल मोरे, चीफ इंजिनिअर राजेशकुमार शिंदे,डिस्टीलरी मॅनेजर हनुमंत जगताप,चीफ अकौंटट विशाल सरवदे,सिव्हील इंजिनियर बंडगर, स्टोअर किपर नानासाहेब जाधव तसेच कारखान्याचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

         यावेळी बाणगंगा साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ. राहुल भैय्या मोटे व सर्व संचालक मंडळ यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार व आयान मल्टीट्रेडचे  संचालक सचिन सिनगारे यांचे आभार मानले. 


आयान-बाणगंगा साखर कारखान्याने गाळप हंगाम 2018-2019 पासून ते गाळप हंगाम 2022-2023 पर्यंत नेहमी या भागातील कारखान्यापेक्षा चांगला ऊस दर दिलेला असुन ऊस उत्पादक शेतकरी यांचे हित जोपासनारा साखर कारखाना आहे.आयान-बाणगंगा साखर कारखान्याचा वजन काटा अगदी तंतोतंत असुन याबाबत ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतुक ठेकेदार यांनी नेहेमी समाधान व्यक्त केलेले आहे. गाळप हंगाम 2023-2024 करिता कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण केले असुन कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ केलेली आहे. कारखाना वाढीव क्षमतेने वेळेत सुरू होणार आहे. त्याप्रमाणे तोडणी वाहतूक करार व यंत्रणेचे योग्य नियोजन केले आहे.तरी भागातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे

             चेअरमन 

   मा.आ.राहुल भैय्या मोटे.

उपोषणकर्त्यांवर लाठी हल्ला करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा,परंडा सकल मराठा समाजाची मागणी


राज्य सरकारच्या निषेधार्थ परंडा शहर कडकडीत बंद ठेऊन रास्ता रोको आंदोलन


तालुक्याच्या ग्रामीण भागात टायर पेटऊन मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यावर झालेल्या लाठी हल्याचा निषेध



परंडा ( दि.२ सप्टेबर) जालना जिल्हयातील अंतरवली सराडी येथिल मराठा समाजाच्या आरक्षण मागणी साठी सुरू असलेल्या आंदोलकावर लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

      जालना जिल्हयातील अंतरवली सराडी येथे सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अंदोलकरणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या अमानूष लाठी हल्ल्याने मराठा समाजा मध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असुन राज्य सरकारच्या व जालना पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ दि २ सप्टेबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीन परंडा शहर कडकडीत बंद ठेऊन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

           सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या परंडा शहर बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्सफुर्त प्रदिसात देत संपुर्ण व्यावसाय बंध ठेऊन सकल मराठा समाजाच्या अंदोलनाला. पाठीबा दर्शीवला तर शहरात येणारी व शहरातून जानारी एस टी बस वाहतूक पूर्ण बंद होती.

     परंडा शहरा सह तालूक्याच्या  ग्रामीण भागात सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर ठिकठिकानी टायर पेटऊन जालना येथे आरक्षण मागणी साठी अंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकावर झालेल्या लाटी हल्याचा तिव्र निषध करण्यात आला.

        परंडा येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात या आंदोलनास आरपीआय चे राज्य सरचिटणीस संजयकुमार बनसोडे,एमआयएम चे तालूका अध्यक्ष जमील पठाण, राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभाााचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, राष्ट्रीवादी कॉग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.संदिप पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष शंकर घोगरे यांनी पाठींबा देऊन रास्ता रोको अंदोलनात सहभ नोंदवला.

       यावेळी डॉ.प्रशांत मांजरे, राहुल बनसोडे,संजयकुमार बनसोडे,शरद नवले,निशिकांत क्षिरसागर,महेश शिंदे,आशाताई मोरजकर,समाधान खुळे यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मागणी सदंर्भात विचार व्यक्त करून जालना जिल्हयातील अंतरवली सराडी येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या उपोषण कत्यावर पोलीस प्रशासनाने केलेल्या लाटी हल्याचा तिव्र निषध केला.

      यावेळी सकल मराठा समाजाच्या महिलाच्या हस्ते तहसिलदार घनशाम आडसुळ, यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

     यावेळी मराठा सेवा संघाचे तालूका अध्यक्ष गोरख मोरजकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, संभाजी ब्रिगेडचे तालूका अध्यक्ष समाधान खुळे,आंगद धुमाळ,शरद नवले,महेश शिंदे,रवि मोरे,शशिकांत जाधव, निशिकांत क्षिरसागर,नानासाहेब मांडवे,देवानंद टकले,जयदेव गंभीर,सुर्यकांत बोराडे, राजेश काळे,नागनाथ पाटील, भाऊसाहेब खरसडे,राजकुमार देशमुख,जावेद पठाण,गणी हावरे, नाना शिदे,शिवाजी शिदे,रामेश्वर नेटके,गणेश चव्हाण विशाल पवार, प्रदिप लटके,तुकाराम गायकवाड, मालिक सय्यद, तानाजी बनसोडे, सलीम हानुरे,नसीर शहाबर्फीवाले, विठ्ठल जाधव,विश्वास गुडे,पंकज नांगरे,कुनाल जाधव,सचिन पाटील, सचिन सोनारीकर,शंकर चव्हाण,नंदू शिंदे,श्रीहरी नाईकवाडी, आजिनाथ शेळके, बाळासाहेब पाटील, मनोहर मिस्कीन,राहुल खरसडे, प्रविण गरड,आझर शेख, सुर्यकांत कदम यांच्यासह जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा आशाताई मोरजकर,निता मिस्कीन, सुप्रीया गटकुळ,सुचिता खैरे,शिवाणी काळे,सुनिता भगत मिनाक्षी काळे, बालीका शिंदे, सुप्रीया भांडवलकर, राणी कोळगे, आश्वनी गवारे,पुणम सावंत, यांच्या सह शेकडो बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

   अंदोला दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडुनये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या मार्गदर्शना खाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

दैनिक जनमत ०२ सप्टेंबर २०२३ E paper

 

पावसाने दिली ओढ, शेतकरी हतबल #कोरडा_दुष्काळ ट्रेण्ड चालवून शेतकरी, सामजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी केल्या भावना व्यक्त


धाराशिव – गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतीचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडे मदतीची याचना करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्ह्यात #कोरडा_दुष्काळ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला असून सामजिक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी देखील यात सहभाग नोंदवला आहे.किमान या ट्रेंड ची तरी शासन दखल घेईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे



















मा.आ.राहूल मोटे यांच्या वाढदिवसानिमीत्त आयान-बाणगंगा शुगर येथे रक्तदान शिबिर संपन्न

आयोजित रक्तदान शिबिरामध्ये  २०१ रक्तदात्यानी केले रक्तदान

 परंडा प्रतिनिधी  -मा.आ. राहूल (भैय्या) मोटे यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून आयान- बाणगंगा शुगर युनिट इडा-जवळा यांच्या वतीने कारखाना स्थळी दि. २६ऑगष्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०१रक्तदात्यांनीर क्तदान केले.

         आज विज्ञान एवढे पुढे सरसावले आहे की,आपल्याला विज्ञानामुळे बरेच चमत्कार पाहायला मिळत आहेत. पृथ्वीच्या उत्पतीपासून चे वेगवेगळ्या ग्रहापर्यंत आणि समुद्रातल्या तळापर्यत असे विविध बाबी विज्ञानाने शोधून काढल्या आहेत.परंतु अजूनही मानवाला कृत्रीम रक्त तयार करण्यात यश आले नाही हे एक सत्य आव्हान आहे मानवासाठी. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देण लागतो.अन ते पांग फेडण्यासा ठीची संधी म्हणजे रक्तदान होय. सध्याची परिस्थितीचा विचार करून रक्तपेटीमध्ये रक्ताची कमतरता भासू नये म्हणून आयान बाणगंगा कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांच्या मार्गदर्शनाने मा.आ.राहुल (भैय्या) मोटे यांचे वाढदिवसानिमित्त   “आयान-बाणगंगा शुगर युनिट इडा-जवळा” येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        रक्तदान शिबिराचा शुभारंभ बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन महादेव (आबा) खैरे,संचालक  तात्यासाहेब (भाऊ) गोरे, कारखान्याचे जनरल मॅनेजर मा. संतोष तोडले, मुख्य शेतिधिकरी  विठ्ठल मोरे,डिस्लरी मॅनेजर हनुमंत जगताप,चीफ अकौंटंट विशाल सरवदे,सिव्हील इंजिनिअर बंडगर,स्टोअर कीपर नानासाहेब जाधव यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, विभागप्रमुख यांचे हस्ते संपन्न झाला. 

        या रक्तदान शिबीराचे योग्य नियोजन कारखान्यातील कर्मचार्‍यांनी केले होते.ज्या रक्तदात्याने रक्तदान केले आहे. त्या रक्तदात्यास कारखान्याच्या वतीने हेल्मेट वाटप करण्यात आले.यावेळी भगवंत रक्तपेढी, व श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचे कर्मचारी तसेच कारखान्यातील सर्व विभागाचे खातेप्रमुख, विभागप्रमुख,अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करून शिबिरात सहभाग नोंदविला.