Home Blog Page 72

दैनिक जनमत ७ सप्टेंबर २०२३ E paper

 

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


मुंबई, दि. ६ :- मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. 

आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात येत आहे. 

ही समिती महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याकरिता अशा प्रकरणांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे व त्याबाबतची कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करेल. याबाबत समिती अहवाल तयार करून तो एक महिन्यात शासनास सादर करेल. निवृत्त न्यायाधीश न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, तसेच संबंधित सर्व जिल्हयांचे जिल्हाधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील. तसेच औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)चे विभागीय आयुक्त समितीचे सदस्य सचिव असतील. यापुर्वीची महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती देखील या समितीस पूरक माहिती देण्याचे काम करेल.

दैनिक जनमत ०६ सप्टेंबर २०२३ E paper

 

जालना लाठीचार्ज निषेधार्थ गंधोरा पाटी येथे उद्या रास्ता रोको

 


सलगरा,दि.४ (प्रतिक भोसले) – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये संविधानिक मार्गाने उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज / लाठीमार करणाऱ्या प्रशासन व राज्यशासनाचा राज्यभर सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. म्हणुन त्याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्यावतीने तुळजापूर – नळदुर्ग महामार्गावर गंधोरा पाटी येथे उद्या मंगळवार (दि.५ सप्टेंबर) रोजी सकाळी ०९ वा.सु. रास्तारोको करण्यात येणार आहे. 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी, लहान मुले, वृद्ध महिला यांना तेथील पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ गंधोरा पाटी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करून रास्ता रोको करण्यात येणार आहे. 


धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, धाराशिव जिल्हा हा शांतता प्रिय असून, याची शांतता भंग होता कामा नये. या करिता आपण सर्व मराठा बांधवांनी शांततेचा मार्ग  अवलंबवावा पोलिस प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे. रास्ता रोको करताना कुठल्याही प्रकारच्या शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे, जीवित अथवा वित्त हानी होता कामा नये. याची सकल मराठा बांधवांनी दखल घ्यावी व आपला जिल्हा शांतता प्रिय आहे. हे सर्वांना दाखवून द्यावे ही विनंती.

पोलिस अधीक्षक – अतुल कुलकर्णी

रा.गे शिंदे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रा. गे.शिंदे गुरुजी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन


 परांडा (दि.२ सप्टेंबर) परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे संस्थापक अध्यक्ष कै.रा गे शिंदे गुरुजी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .     

        जयंतीनिमित्त दि३सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान बुद्धिबळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन,ग्रंथ प्रदर्शन, रक्तदान शिबिर,वैज्ञानिक जाणीव व दृष्टीकोण आणि दि ७ सप्टेंबर रोजी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .या रॅलीमध्ये बैलगाडी मध्ये मिरवणूक काढण्यात येत आहे. झांज पथक लेझीम पथक या रॅलीचे खास आकर्षण असणार आहे.

       या कार्यक्रमासाठी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे,संस्थेच्या सहसचिव मंगल उर्फ शीलाताई देठे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.जयंतीनिमित्त कार्यक्रमांमध्ये आयोजीत केलेल्या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी केले आहे.

आयान-बाणगंगा साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2022-2023 चा दुसरा हप्ता प्र.मे.टन रक्कम रु 75/- प्रमाणे शेतक-यांचे बॅक खात्यात जमा – संचालक सचिन सिनगारे

 



परंडा (भजनदास गुडे ) आयान मल्टीट्रेड एल्.एल.पी.संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम  2022-2023 करिता गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकरी यांच्या बॅक खात्यावर प्र.मे.टन रक्कम रु 75/- प्रमाणे दुसरा हप्ता जमा केला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने प्रसिद्वीपत्रकाद्वारे दिली आहे.

      आयान-बाणगंगा या साखर कारखान्यांने गाळप हंगाम 2022-2023 मध्ये 481636.249 मे टन उसाचे गाळप केले असून 10.94 % साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याने 2022-2023 करिता गळीतास आलेल्या ऊसासाठी पहिला हप्ता प्र.मे.टन रक्कम रु 2350/- प्रमाणे यापूर्वीच समंधीत शेतकऱ्यांना वेळेत अदा केला आहे.आत्ता “बैलपोळा सणाचे” औचित्य साधुन गळीत हंगाम 2022-2023 मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचे दुस-या हप्त्यापोटी प्र.मे.टन रक्कम रु 75/- प्रमाणे ऊसबिल ऊस ऊत्पादक शेतक-यांचे “भाऊसाहेब बिराजदार ना.सह.बँक” शाखा परंडा व भूम शाखेत शेतकऱ्याच्य बॅक खातेवर तसेच इतर विभागातील शेतकऱ्यांनी दिलेल्या बॅक खातेवर जमा केलेले आहे.तरी सर्व शेतकरी बांधवांनी बॅंकेतून आपापल्या ऊसबिलाची रक्कम घेऊन जाणे.तसेच हंगाम 2023-2024 करिता तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण झाले असून तोडणी वाहतूक ठेकदारांना ॲडव्हान्सचे वाटप सुध्दा केलेले आहे.तसेच गाळप हंगाम 2023-2024 सुरू करनेच्या दृष्टीने कारखाना गाळप क्षमता विस्तार वाढीची व दुरुस्तीची कामे पूर्ण झालेली आहेत.त्यानुसार गाळप हंगाम 2023-2024 मध्ये कारखाना वाढीव क्षमतेने चालणार असुन हंगाम वेळेत सुरू करणार आहोत.तसेच  गाळप हंगाम 2023-2024 मध्ये कारखान्याचे जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उदीष्ट आहे.तरी गतवर्षीप्रमाणे हंगाम 2023-2024 मध्ये सुध्दा ऊस उत्पादक शेतकरी बंधूनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन आयान मल्टीट्रेड एल.एल.पी चे संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे. 

    यावेळी बाणगंगा कारखान्याचे चेअरमन मा.आ.राहुल भैय्या मोटे, व्हा.चेअरमन,महादेव आबा खैरे व सर्व संचालक मंडळ, जनरल मॅनेजर संतोष तोंडले, मुख्य शेती अधिकारी विठ्ठल मोरे, चीफ इंजिनिअर राजेशकुमार शिंदे,डिस्टीलरी मॅनेजर हनुमंत जगताप,चीफ अकौंटट विशाल सरवदे,सिव्हील इंजिनियर बंडगर, स्टोअर किपर नानासाहेब जाधव तसेच कारखान्याचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

         यावेळी बाणगंगा साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ. राहुल भैय्या मोटे व सर्व संचालक मंडळ यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार व आयान मल्टीट्रेडचे  संचालक सचिन सिनगारे यांचे आभार मानले. 


आयान-बाणगंगा साखर कारखान्याने गाळप हंगाम 2018-2019 पासून ते गाळप हंगाम 2022-2023 पर्यंत नेहमी या भागातील कारखान्यापेक्षा चांगला ऊस दर दिलेला असुन ऊस उत्पादक शेतकरी यांचे हित जोपासनारा साखर कारखाना आहे.आयान-बाणगंगा साखर कारखान्याचा वजन काटा अगदी तंतोतंत असुन याबाबत ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतुक ठेकेदार यांनी नेहेमी समाधान व्यक्त केलेले आहे. गाळप हंगाम 2023-2024 करिता कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण केले असुन कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ केलेली आहे. कारखाना वाढीव क्षमतेने वेळेत सुरू होणार आहे. त्याप्रमाणे तोडणी वाहतूक करार व यंत्रणेचे योग्य नियोजन केले आहे.तरी भागातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे

             चेअरमन 

   मा.आ.राहुल भैय्या मोटे.

उपोषणकर्त्यांवर लाठी हल्ला करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा,परंडा सकल मराठा समाजाची मागणी


राज्य सरकारच्या निषेधार्थ परंडा शहर कडकडीत बंद ठेऊन रास्ता रोको आंदोलन


तालुक्याच्या ग्रामीण भागात टायर पेटऊन मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यावर झालेल्या लाठी हल्याचा निषेध



परंडा ( दि.२ सप्टेबर) जालना जिल्हयातील अंतरवली सराडी येथिल मराठा समाजाच्या आरक्षण मागणी साठी सुरू असलेल्या आंदोलकावर लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

      जालना जिल्हयातील अंतरवली सराडी येथे सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी अंदोलकरणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या अमानूष लाठी हल्ल्याने मराठा समाजा मध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असुन राज्य सरकारच्या व जालना पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ दि २ सप्टेबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीन परंडा शहर कडकडीत बंद ठेऊन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

           सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या परंडा शहर बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्सफुर्त प्रदिसात देत संपुर्ण व्यावसाय बंध ठेऊन सकल मराठा समाजाच्या अंदोलनाला. पाठीबा दर्शीवला तर शहरात येणारी व शहरातून जानारी एस टी बस वाहतूक पूर्ण बंद होती.

     परंडा शहरा सह तालूक्याच्या  ग्रामीण भागात सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर ठिकठिकानी टायर पेटऊन जालना येथे आरक्षण मागणी साठी अंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकावर झालेल्या लाटी हल्याचा तिव्र निषध करण्यात आला.

        परंडा येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात या आंदोलनास आरपीआय चे राज्य सरचिटणीस संजयकुमार बनसोडे,एमआयएम चे तालूका अध्यक्ष जमील पठाण, राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभाााचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, राष्ट्रीवादी कॉग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.संदिप पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष शंकर घोगरे यांनी पाठींबा देऊन रास्ता रोको अंदोलनात सहभ नोंदवला.

       यावेळी डॉ.प्रशांत मांजरे, राहुल बनसोडे,संजयकुमार बनसोडे,शरद नवले,निशिकांत क्षिरसागर,महेश शिंदे,आशाताई मोरजकर,समाधान खुळे यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मागणी सदंर्भात विचार व्यक्त करून जालना जिल्हयातील अंतरवली सराडी येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या उपोषण कत्यावर पोलीस प्रशासनाने केलेल्या लाटी हल्याचा तिव्र निषध केला.

      यावेळी सकल मराठा समाजाच्या महिलाच्या हस्ते तहसिलदार घनशाम आडसुळ, यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

     यावेळी मराठा सेवा संघाचे तालूका अध्यक्ष गोरख मोरजकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, संभाजी ब्रिगेडचे तालूका अध्यक्ष समाधान खुळे,आंगद धुमाळ,शरद नवले,महेश शिंदे,रवि मोरे,शशिकांत जाधव, निशिकांत क्षिरसागर,नानासाहेब मांडवे,देवानंद टकले,जयदेव गंभीर,सुर्यकांत बोराडे, राजेश काळे,नागनाथ पाटील, भाऊसाहेब खरसडे,राजकुमार देशमुख,जावेद पठाण,गणी हावरे, नाना शिदे,शिवाजी शिदे,रामेश्वर नेटके,गणेश चव्हाण विशाल पवार, प्रदिप लटके,तुकाराम गायकवाड, मालिक सय्यद, तानाजी बनसोडे, सलीम हानुरे,नसीर शहाबर्फीवाले, विठ्ठल जाधव,विश्वास गुडे,पंकज नांगरे,कुनाल जाधव,सचिन पाटील, सचिन सोनारीकर,शंकर चव्हाण,नंदू शिंदे,श्रीहरी नाईकवाडी, आजिनाथ शेळके, बाळासाहेब पाटील, मनोहर मिस्कीन,राहुल खरसडे, प्रविण गरड,आझर शेख, सुर्यकांत कदम यांच्यासह जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा आशाताई मोरजकर,निता मिस्कीन, सुप्रीया गटकुळ,सुचिता खैरे,शिवाणी काळे,सुनिता भगत मिनाक्षी काळे, बालीका शिंदे, सुप्रीया भांडवलकर, राणी कोळगे, आश्वनी गवारे,पुणम सावंत, यांच्या सह शेकडो बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

   अंदोला दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडुनये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या मार्गदर्शना खाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.