Home Blog Page 59

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत असून भाविकांना सुलभ सुविधा मिळवण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व्यवस्था करावी

अक्कलकोट (प्रतिनिधी) – मार्गशिर्ष महिना व नाताळ सुट्टीमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत असून, यंदा १० लाखांहून अधिक भाविक येतील असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने प्रशासनाकडून वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. भाविकांना सुलभ सुविधा मिळण्याकामी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी सकल स्वामी भक्तातून होत आहे.

सतत वाढत चाललेल्या गर्दीने वाहतुकीची कोंडी, निवासासाठी प्रतीक्षा व नाहक त्रास, अरुंद रस्ते व अस्वच्छता यामुळे भाविकांना अनेक अडचणीच्या सामोरे जावे लागले आहे. हे शासकीय यंत्रणाने पहिले, सलग आलेल्या सुट्यांमुळे अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविकांची संख्या वाढणार असून सदर सुट्टीत प्रचंड गर्दी होणार आहे.

गत दिवाळीच्या सुट्टीमध्ये पहाटे तर दर्शनाची रांग राजे फत्तेसिंह चौक पार झाली होती. भाविकांना दर्शनासाठी आठ ते दहा तास लागत होते. हि पार्श्वभूमी पाहता आगामी सुट्यांच्या दिवशी वटवृक्ष देवस्थान, मुरलीधर मंदिर, समाधी मठ (चोळप्पा मठ), गुरु मंदिर (बाळप्पा मठ), राजेराय मठ, शिवपुरी, नवसाचा मारुती मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व अन्नछत्र मंडळ व परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर येथे दर्शनासाठी व महाप्रसादाकरिता गर्दी होणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीमध्ये पोलिस प्रशासनाने शहरातील वाहनांची कोंडी टाळावी म्हणून कमलाराजे चौक, कारंजा चौक, मैंदर्गी रोड या ठिकाणी बॅरिकेडिंग करून वाहनांना मंदिर परिसरात सोडले नाही. त्यामुळे भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने लावण्यात येत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडली होती. असे होता कामा नये याकरिता प्रशासनाने वादळा पूर्वीची शांतता म्हणून आत्तापासूनच काटेकोरपणे नियोजन करणे काळाची गरज आहे.

समाधी मठाजवळ दाटीवाटीने भक्तांना मंदिरापर्यंत पोहोचावे लागते, याबाबत प्रशासनाने सुटसुटीतपणा आणण्याकामी विशेष योजना आखणे गरजेचे आहे. यामध्ये येथील काही रस्ते वनवे करणे गरजेचे असून, तेथील रहिवाश्यांनी देखील होणार्या गर्दीमुळे प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे

दैनिक जनमत DAINIK JANMAT 21 december 2023 E paper

अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धाड,४२ लाखाचा मुद्देमाल जप्त आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

५ टन गोमांस व ५० जिवंत जनावरे जप्त

पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने परंडयात मोठी कारवाई

परंडा ( प्रतिनिधि ) परंडा शहरातील अवैध कत्तल खान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने दि २० डिसेंबर रोजी धाड मारून ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की परंडा शहरात अवैध कत्तलखाना सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो उपनिरिक्षक संदिप ओहळ पोलिस अमलदार वलीउल्लाह काझी,विनोद जानराव,नितीन जाधवर,योगेश कोळी तसेच पोलिस मुख्यातयातील अती जलद पोलिस पथकातील अमलदारांनी सकाळी ९-३० वाजेच्या सुमारास परंडा येथिल सिकलकर गल्ली परिसरातील अवैध कत्तलखान्यावर धाड मारली.या मध्ये ५ टन गोमांस किंमत १० लाख रूपये तसेच चार पिकअप वाहन २ आयशर टेम्पो असा एकुन ४२ लाख ५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी,जाकीर हुसेन गुलाम गणी,आशपाक बेपारी राहणार इंदापूर फाजील सौदागर, ऐराब सौदागर,ओवेस सौदागर व इतर १० ते १२ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाड कामी पोनि विनोद इज्जपवार,सपोनि कवीता मुसळे,पोलिस अमलदार नितीन गुंडाळे,भुजंग अडसूळ,योगेश यादव,रफीक मुलाणी,सुर्यजित जगदाळे,महिला पो,अमलदार अर्चणा भोसले यांनी सहकार्य केले.

राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी

आ.कैलास पाटील यांचा सभागृहात घणाघात

धाराशिव ता. 20ः राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाई, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत सरकार काहीच करत नाही, रिक्त असलेल्या दोन ते अडीच लाख जागा न भरल्याने तरुणाची वय निघुन जात आहेत. कांदा अनुदान, दुधाचे भाव, कृष्णा मराठवाडा प्रकल्प या विषयावर आमदार कैलास पाटील यानी सरकारचे लक्ष वेधले. विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आमदार पाटील बोलत असताना सरकारच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले.
पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु म्हणणाऱ्या केंद्र सरकारने उत्पन्न नाही तर उत्पादन खर्च दुप्पट केला आहे. खताच्या दराचे त्यानी उदाहरण दिले शिवाय दहा वर्षात सोयाबीनच्या दरात फक्त 161 रुपये वाढले असुन तुलनात्मक फरक त्यानी दाखवुन दिला. कांद्याला भाव मिळणार असे दिसताच सरकार निर्यातबंदी करुन शेतकऱ्यांचे नुकसान करते. कांद्याची महाबँक उभारण्याचे सरकार म्हणते पण तोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विकलेला असतो,सरकार मग व्यापाऱ्यांचा कांदा खरेदी करणार याने शेतकरी कसा जगेल असा प्रश्न पाटील यानी उपस्थित करत अद्यापही गेल्यावर्षी दिलेले 21 पैकी फक्त सहाच कोटी अनुदान मिळाले आहे. पीएम किसानचा गवगाव होता पण प्रत्यक्षात याचे लाभार्थी लाखाने कमी झाल्याचे दिसते. पहिल्या हप्तावेळी दोन लाख 93 हजार शेतकरी होते पण आता फक्त 79 हजारच शेतकरी लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिल्यास अशा पैशाची त्याना गरज देखील लागणार नाही असा दावा त्यानी यावेळी केला. बेरोजगारी प्रचंड वाढले आहे, त्यात राज्यातले उद्योग गुजरातला पळविले जातात, तेव्हा सरकार म्हणते यापेक्षा मोठा उद्योग पंतप्रधान मोदी राज्याला देणार आहेत. कुठे आहे तो उद्योग असा प्रतिप्रश्न त्यानी मुख्यमंत्र्याना केला. एमपीएससीची जुन्या पध्दतीने होणारी ही शेवटची परिक्षा असणार आहे, त्यामुळे आता सर्व रिक्त जागेची जाहीरात काढुन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी त्यानी केली. गृह विभागातील 57 हजार जागा रिक्त आहेत त्या भरला जात नाहीत.पोलीस पाटील, होमगार्ड या घटकांनाही न्याय देण्याची गरज आमदार पाटील यानी व्यक्त केली. महिला देखील सुरक्षित नाहीत, 2019 साली धाराशिव शहरासाठी जिल्हा नियोजन समितीकडुन सीसीटीव्हीसाठी पैसे दिले पण अजुनही ते लावले नसल्याने सरकारची गतीमानता लक्षात येते.
दुधाचे दर कमी झाले असले तरी ग्राहकाना मिळणाऱ्या दर कमी झालेले नाहीत. दुधामध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात होत असुन ती रोखली तरी त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होईल. जलयुक्त शिवार योजनेत 24 जिल्हे घेतले पण त्यात गरज असलेल्या धाराशिवला वगळले आहे, याही जिल्ह्याचा यामध्ये समावेश करावा. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामाची गती थांबली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या कामाचा प्राधान्यक्रम काढुन अत्यंत वेगाने कामे सूरु केली होती, या सरकारला एक वर्षात कार्यारंभ आदेश देखील देता आलेला नाही यावरुन हे सरकार किती गंभीर आहे हे दिसते. तसेच पश्चिम वाहिनी नद्या वळविण्याचे घोषणा करण्यात आली आहे, पण धाराशिव, बीड, लातुर या जिल्ह्याना पाण्याचा किती वाटा मिळणार रे पहिल्यांदा सरकारने सांगितले पाहिजे ही मागणी देखील आमदार पाटील यानी केली.
ग्रामपंचायतच्या परिचालकांना पुर्वीप्रमाणे संग्राम कक्षामध्ये जोडुन त्याना ग्रामपंचायत कर्मचारी म्हणुन समाविष्ट करावे. सरकारी शाळाचा अवस्था बिकट होत आहे, शाळेमध्ये शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. वर्गखोल्या मिळत नाहीत.एका बाजुला सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार सांगितला जातो तर दुसरीकडे समुह शाळेचा निर्णय सरकार घेते असा दुटप्पीपणा योग्य नसल्याचे आमदार पाटील म्हणाले. आरोग्याच्या बाबतीतही गंभीर स्थिती आहे, साधी सर्दी खोकल्याची औषधे मिळत नाहीत बाकी मुलभुत सुविधा तर दुरच राहिल्या अशी स्थिती आहे. त्यामुळे सरकार सर्वच पातळीवर अपयशी झाल्याचे आमदार पाटील यानी सभागृहात सांगितले.

वैद्यकीय प्रतिनिधींचा संप, केंद्र सरकारकडे विविध मागण्यांसाठी निवेदन

दैनिक जनमत २० डिसेंबर २०२३ E paper

मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ.अश्विनी धनंजय पडवळ(मुंडे) यांची सर्वानुमते निवड

अध्यक्ष – डॅा.अश्विनी धनंजय पडवळ

धाराशिव – मागील सोळावर्षांपासून शहरात दरवर्षी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.अश्विनी धनंजय पडवळ (मुंडे), कार्याध्यक्षपदी सुधाकर पवार तर सचिवपदी बाळासाहेब केदार यांची निवड करण्यात आली.

कार्याध्यक्ष – सुधाकर पवार
सचिव – बाळासाहेब केदार


जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी १२ जानेवारीपासून समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.
राजमाता जिजाऊ पुरस्कार, लोकराजा राजर्षी शाहु समाजभूषण पुरस्कार, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे क्रीडाभुषण पुरस्कार, कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार. मान्यवरांची व्याख्याने, स्त्री रुग्णालय येथे विविध साहित्य वाटप तसेच भव्य रक्तदान शिबीर देखील या निमित्ताने आयोजित केले जाते. यावर्षी देखील समितीच्यावतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

प्रभाग १९ मधील नागरी समस्यासाठी रासपचा तुळजापूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन

उप मुख्याधिकारी पृथ्वीराज पवार यांनी केली प्रभाग क्रमांक 19 ची पाहणी

धाराशिव शहरातील प्रभाग क्र.१९ मधील नागरी समस्या व असुविधेबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वगरे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर नाका पोहनेर रोड येथे प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रभागातील समस्या, कचरा, गटारी, मोकाट जनावरे, रस्ते अशा विविध मागण्यांसाठी रस्ता रोको करण्यात आला यापूर्वी वेळोवेळी
जिल्हाधिकारी, व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आली होती परंतु प्रशासनाच्या वतीने अंमलबजावणी किंवा दखल न घेतल्यामुळे रासपच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला यावेळी नगरपरिषद चे उपमुख्य अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिक समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी नागरिकांनी प्रभागातील समस्याची पाहणी करण्याचा आग्रह केल्यानंतर उपमुख्याधिकारी यांनी पाहणी केली यावेळी नागरिकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या यावेळी विधी न्याय विभाग शमशुद्दीन सय्यद, शहराध्यक्ष सलीम पठाण, तालुकाध्यक्ष सचिन देवकते, युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बंडगर, शाम तेलकर, गोरोबा पवार, डॉक्टर स्वामी, इंगळे दादा, युवराज देवकते, सचिन साळुंखे, तुकाराम घोडके, राहुल जाधव, बालाजी माने, चंद्रकांत पोंदे, मोहसीन पठाण, जमीर शेख, सोनू निचलं, अण्णा शेंडगे, नेताजी कोकाटे, अमोल कोटेकर आदीं सह प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

दैनिक जनमत १९ डिसेंबर २०२३ E paper new