Home Blog Page 58

तुळजापूर तालुक्याचा विकासाऐवजी तालुका भकास झाला : अशोक जगदाळे 

तुळजापूर, दि.24 (प्रतिनिधी) :तालुक्याचा आमदार झाल्यावर तालुक्याच्या सर्वांगीण विकास करू अशा घोषणा करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. परंतु प्रत्यक्षात गेल्या चार वर्षात कुठलीही मोठी विकास योजना न आणता, उलट तालुक्याचा विकास दहा वर्ष मागे पडला आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक जगदाळे यांनी सर्किट हाऊस सिटी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तालुक्यात रखडलेल्या योजनांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने कृष्णा खोरे अंतर्गत तालुक्याला मिळणारे सात टीएमसी पाणी अद्यापही मिळाले नाही, त्यामुळे तालुक्यातील शेती ओलीचा खाली अजूनही आली नाही. रेल्वे प्रश्न मार्गी लागला मार्गी लागला असे वारंवार सांगितले जाते, परंतु त्याचे प्रत्यक्ष काम अजूनही सुरू झाली नाही. तुळजापूरसाठी पंधराशे कोटी रुपयांची केंद्राची योजना आणली असे वारंवार सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात कशा प्रकारचा केंद्राचा कुठला आदेशही निघाला नाही, तुळजापूर शहर विकासासाठी 158 कोटी रुपये निधी मंजूर झाला असे सांगितले जाते, त्याचीही कुठे अंमलबजावणी झाली नाही.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त म्हणून तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अजूनही सोडविला नाही, पैसा नसल्याने सातवा वेतन देता येत नाही असे सांगितले जाते. परंतु तुळजाभवानी मंदिरामार्फत जिल्ह्यामध्ये शाळा सुधारण्यासाठी दहा कोटी रुपये निधी देण्यात आला. सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल काढण्यासाठी मंदिराकडून 50 कोटी मागणी करण्यात आली आहे, तर कौशल्य विकास विद्यापीठ काढण्यासाठी मंदिराकडे 15 कोटीची मागणी करण्यात आली आहे, जर मंदिराकडूनच सर्व पैसा घ्यायचा असेल तर तुम्ही सरकार मधले आमदार असून त्याचा उपयोग काय असा प्रश्न पडला आहे. 

एमआयडीसी सारखा रोजगारभूमिक प्रश्न महत्त्वाचा आहे, पण यावर देखील तालुक्यात एक एकर देखील जागा अधिग्रहण केली नाही, मग एमआयडीसी होणार कशी तालुक्याचा विकास होणार कसा मागील निवडणुकीत निवडून येण्यासाठी तालुक्यातील लोकाला मोठ्या मोठ्या विकासाच्या गप्पा मारल्या, पण विकास कुठे गेला, हाच कळत नाही. फक्त सोशल मिडीयावर पोस्ट फिरवून आपण असे असे काम केले सांगणे म्हणजे तालुक्याचा विकास नव्हे असा घणाघात जगदाळे यांनी केला.

    आता जनता यांना कंटाळली आहे, त्यांना बदल हवा आहे, तो बदल महाविकास आघाडी करणार आहे, यासाठी आपण परत एकदा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्यादारी जाणार आहोत, कोणतेही आश्वासन न देता फक्त कृतीतून विकास काम करणार आहोत आणि हाच आपला अजेंडा राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी यावेळी सांगितले.

Paranda- police- duty-help परंडा पोलीस स्टेशनच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची कर्तव्य दक्षता,सतर्कता व तत्परता

परंडा पोलीस स्टेशनच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची कर्तव्य दक्षता,सतर्कता व तत्परता

परंडा (प्रतिनिधी दि.२३डिसेंबर) – मोरे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कुर्डूवाडी रोड परंडा येथे दि.२२ डिसेबर रोजी अत्यावश्यक सेवेमध्ये रात्री ११ ते ११: ३० च्या दरम्यान एक ऑपरेशन सुरू होते.त्याचवेळी हॉस्पिटलच्या समोरील रोडला काही अज्ञाताची भांडणे सुरू झाली होती.त्या पळापळीत दगडफेकीच्या भीतीने ऑपरेशनसाठी आलेले बाहेरचे तज्ञ सर्जन डॉक्टर व भूलतज्ञ यांच्या गाडीतीचे ड्रायव्हर घाबरले.त्यांनी हॉस्पिटलमध्ये घाबरून फोन केला बाहेर गोंधळ चालू आहे गाडीवर दगडफेक होण्याची शक्यता आहे.
तेवढ्यात ग्रामीण भागातील एका रुग्णाच्या अचानक छातीत दुखून चक्कर येऊन पडल्यामुळे त्यास मोरे हॉस्पिटल येथे उपचारा साठी आणले होते.त्या चवेळी त्या रुग्ण व नातेवाईका बरोबर या अज्ञात गोंधळ घालणाऱ्या जामावा मधील काही आठ-दहा व्यक्ती दवाखान्यामध्ये त्या रुग्णासोबत शिरले.कदाचित त्याच्या मधील व्यक्तींचा हेतू त्या रुग्णाला वाचवण्याचा असू शकतो.हे समजताच या गोंधळाने सर्जन व भूल तज्ञ डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट ऑपरेशन करत असताना घाबरले.मध्येच ऑपरेशन तर थांबवणे शक्यच नव्हते अशावेळी भूलतज्ञ यांनी परंडा पोलीस स्टेशनला फोन केला.क्षणाचाही विलंब न करता पोलीस कर्मचाऱ्यारी मोरे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले व त्यांनी हॉस्पिटल समोरील गोंधळ शांत केला व हॉस्पिटल मध्ये गेलेल्या जमाची समजुत काढून त्यांना बाहेर काढले.व दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन थिएटर मधील ऑपरेशम करणाऱ्या डॉक्टर वअसिस्टंट यांना धीर दिला व तुमचे सर्व कार्य संपेपर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्येच थांबतो आहोत असे सांगीतले.
ऑपरेशन संपल्यानंतर त्या दोन्ही डॉक्टरांच्या गाड्या जाईपर्यंत पोलीस कर्मचारी मोरे हॉस्पिटल येथेच उपस्थित होते. परंडा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची योग्य वेळी मदतीमुळे सर्वच रुग्ण, त्यांचे नातेवाईक,तज्ञ डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील स्टाफ आणि ऍडमिट पेशंट यांना मोठा दिलासा मिळाला.

परंडा पोलीस स्टेशनच्या आधिकारी, कर्मचाऱ्यांची तत्परता
योग्य वेळी धावून आलेल्या या देवदूतांमुळेच समाज रक्षक पोलीस दल यांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याची प्रचिती आली.संविधानाचे अधिकार प्रामाणिक,दक्ष, संवेदनशील,संस्कारक्षम व्यक्तींच्या हाती गेले तर कायदा सुव्यवस्थेने समाजातील गरीब, वंचित,पीडित घटक सुखी होईल. पोलीस दलाचे अथक परिश्रम व रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून गुन्हेगारी जगतावर जो वचक ठेवला आहे.याचमुळे आम्ही सर्व कुटुंबीय रात्री शांततेची झोप आपल्या मुलाबाळांसोबत घेतो आहोत.मात्र हीच दक्ष सतर्क यंत्रणा ऊन,वारा,पाऊस,प्रकाश, अंधार या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता स्वतःच्या कुटुंबा पासून दूर राहून निस्वार्थ भावनेने कर्तव्यनिष्ठ समाजसेवा करतात, ती एक प्रकारची देशसेवाच आहे. याचा आम्हा भारत देश बांधवांना अभिमान व गर्व आहे.अशा सर्व खाकी वर्दीतील देवदुतांना मानाचा मुजरा.
दुरितांचे तिमीर जावो।विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो।जो जे वांच्छिल तो ते लाहो।प्राणीजात ।
डॉ.आनंद गोरख मोरे. एम.डी.वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय परंडा
मोरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. परंडा .

संत मीरा पब्लिक स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात संपन्न

परांडा (प्रतिनिधी)परांडा येथिल संत मीरा पब्लिक स्कूल व डॉ.वेदप्रकाश विद्यामंदिर या शाळेत संस्थापक डॉ प्रतापसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘फन -फेअर ‘हा विध्यार्थ्यांच्या विविध कला -कौशल्याला वाव मिळावा हा मनोरंजनात्माक व आनंददायी उपक्रम अतिशय उत्साहत पार पडला.
यावेळी या ‘आनंद मेळाव्यात ‘एकूण २१२ विद्यार्थ्यांनी १०६ स्टॉल लावले होते.यामध्ये भाजीपाला,फळे,मसालेदार पदार्थ,सौंदर्य प्रसाधने,बाईक शोरूम,खेळ व खेळणी इ.ची अतिशय उत्कृष्ट मांडणी करून खूप मोठे मोठे आकर्षक स्टॉल लागले होते.विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्य,नेतृत्व गुण,मार्केटिंग स्किल,सवांद कौशल्य,संघटन कौशल्य समजावे व शिक्षणातून मनोरंजन व्हावे या हेतूने या ‘फन -फेअर ‘ उपक्रमाचे आयोजन केले होते.
यात विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य दाखवत लाखो रुपयांची उलाढाल केली.या स्पर्धात्मक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना १०० पैकी गुण देण्यात येणार आहेत, याबद्दल विद्यार्थ्यांना शाळेत या स्पर्धेचे प्रशिक्षण देण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर,माजी सभापती अनुजा दैन,सुचिता सिद्धेश्वर पाटील,अॅड.झहीर चौधरी, भोत्राच्या सरपंच उर्मिला पाटील, विस्तार अधिकारी सूर्यभान हाके, अशोक खुळे,अॅड.पै.विशाल देवकर,अजय खरसडे,डॉ. अब्बास मुजावर,एव्हरेस्ट देशमुख,जफर जिनेरी,इरफान शेख,समीर पठाण,जयदेव गोफने,शीतल खराडे,संजीवनी पाटील, बाळासाहेब गोडगे,पंजाब घाडगे, सागर ठाकूर,जावेद पठाण, प्राचार्य संतोष भांडवलकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व स्टॉल ला भेटी देऊन कौतुक केले व आनंद घेतला.
मार्केट डे चे संयोजक म्हणून संतोष शेरे,विकास शेळके,राणी भिल्लारे,दादासाहेब गिरवले व सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी यांनी काम पहिले.निरीक्षक म्हणून विकास सुरवसे व सुमित कोकाटे यांनी काम पाहीले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा गव्हाळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी दिवसभरातून परंडा व तालुक्यातील अनेक पालक व शिक्षण प्रेमी नागरीकांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून कौतुक केले.

दैनिक जनमत Dainik Janmat 23 December 2023

0

अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा,चार महिलांची सुटका, दलालासह लॉजचालक व मॅनेजर विरुध्द गुन्हा दाखल

धारशिव – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 21डिसेंबर रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,  धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर ४.०० वा. सु. छापा टाकला असता लॉज मध्ये चार महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव,दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, हे दोघेजण नमुद लॉजचे मालक 1)नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव  यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने लॉज मॅनेजर  नामे- 1) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल-2) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, ॲटोरिक्षा क्र एमएच 09 जे 8134, रोख रक्कम 16,130 व निरोधची  पाकीटे असा एकुण 71,130 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन (लॉजमालक) 1)नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव, लॉज मॅनेजर-2) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- 3) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं 352/2023 भा.दं.वि. सं. कलम- 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अन्वये धाराशिव ग्रामीण  पोलीस ठाण्यात  दि. 21.12.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- वासुदेव मोरे, पोलीस हावलदार- अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, शोभा बांगर, शैला टेळे, पोलीस अमंलदार- साईनाथ आशमोड, योगेश कोळी,  रंजना होळकर, चालक पोलीस अमंलदार- भोसले, अरब यांच्या पथकाने केली

खवय्यांसाठी खाद्यपदार्थ, अध्यात्मिकांसाठी धार्मिक कार्यक्रम, बच्चे कंपनीसाठी मनोरंजन, महिलांसाठी संक्रात वान खरेदी, नववर्षात हिरकणी महोत्सव ठरणार धाराशिवकरांसाठी मेजवानी

धाराशिव – खवय्यांसाठी खाद्यपदार्थ, अध्यात्मिकांसाठी धार्मिक कार्यक्रम, बच्चे कंपनीसाठी मनोरंजन, महिलांसाठी संक्रात वान खरेदी, नववर्षात होणारा हिरकणी महोत्सव धाराशिवकरांसाठी मेजवानी ठरणार आहे.
५ ते १० जानेवारी दरम्यान लेडीज क्लब येथे या महोत्सव होणार असल्याची महिती लेडीज क्लब च्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने १० ते १५ वर्षांपूर्वी हा महोत्सव सुरू करण्यात आला होता. कोरोना काळात यात खंड पडला होता. राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात ५० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत त्यात बासुंदी, पाणी पुरी, रगडा पॅटीस, भेळ, दही धपाटे, यासोबत चिकन समोसा, मटण, मच्छी यासारखे व्यंजन असणार आहेत. तसेच लहान मुलांच्या करमणुकीसाठी देखील काही स्टॉल असणार आहेत. तसेच संक्रांत सणाचे वान खरेदी करण्यासाठी देखील काही स्टॉल असणार असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले.

असे असणार कार्यक्रम

५ जानेवारी रोजी नवदुर्गा कार्यक्रम असून देवीची नऊ रूपे नृत्याविष्कारामधून देवीच्या विविध गाण्यावर दाखवण्यात येणार आहेत. ६ जानेवारी रोजी ह भ प शिवलीलाताई पाटील यांची कीर्तन असणार आहे. ७ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील यशस्वी महिला उद्योजकांचा मार्गदर्शन कार्यक्रम आहे. ८ जानेवारी रोजी कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन असणार आहे. ९ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या श्रवणीय आवाजातील ग. दि. माडगूळकर यांची सुमधुर गाणी असलेले गीत रामायण नृत्याविष्कार हा कार्यक्रम आहे. तर १० जानेवारी रोजी आज लग्न संस्था नष्ट होतेय का या प्रश्नावर लग्न पहावे करून हा कार्यक्रम असणार आहे.

खासदारांचे निलंबन, सामाजिक संघटनांचे आंदोलन,९२ व्या वर्षी समाजवादी नेते पन्नालाल सुराणा आंदोलनात उतरले



धाराशिव – १४२ पेक्षा अधिक खासदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन करत राष्ट्रिय निषेध दिन पाळला. या आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी हिरीरीने सहभाग घेतला हे विशेष.

१३ डिसेंबर रोजी दोन युवकांनी प्रेक्षक गॅलरी तून उड्या मारत गदारोळ केला होता. त्यानंतर विरोधीपक्षाचे खासदार प्रचंड आक्रकम झाले होते. संसद भवनाच्या सुरक्षेचा मुद्दा देखील अनेकांनी यावेळी उचलून धरला होता. या घटनेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. याविरोधात देशभर आज आंदोलने सुरू आहेत.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालासमोर अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत आज आंदोलन केले. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, गुंडू पवार, ॲड. रेवण भोसले, ॲड. अजय वाघाळे, सिद्धेश्वर बेलुरे, गणेश वाघमारे, अब्दुल लतिफ, विजय गायकवाड, आदि उपस्थित होते. तसेच या आंदोलनात सोशलिस्ट पार्टी इंडिया, राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मुलन समिती आदी सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.

तांदुळवाडी येथे एस टी बस व दुचाकीचा भीषण अपघात
तिघांचा जागीच मृत्यू


कारी दि२१(प्रतिनिधी)बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुयश विद्यालयाजवळ गुरूवार ( दि२१) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एस टी बस आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.

यामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. धाराशिव आगाराची पुणे-धाराशिव बस बार्शीमार्गे धाराशिवकडे जात होती. तर, धाराशिव येथून दुचाकीवरून तिघे बार्शीच्या दिशेने येत असताना तांदुळवाडी नजीक हा भीषण अपघात झाला. अपघातात कार्तिक रोहित यादव (वय १७रा गोरे गल्ली धाराशिव), ओंकार अनिल पवार (वय २०रा शींगोली ता धाराशिव), ओम दत्ता आतकरे (वय २२रा. शिंगोली ता धाराशिव) मृत व्यक्तीची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात वेळ काढूपणाची भूमिका घेऊ नये- डॉ.प्रतापसिंह पाटील

धाराशिव-सध्या राज्य सरकार हे मराठा आरक्षणासंदर्भात वेळ काढू पणाची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर योग्य ठोस भूमिका घ्यावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी दिले आहे.

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा झाल्यानंतर मराठा समाज पेटून उठलेला आहे.मराठा समाजातील अनेक तरुण हे नैराश्यापोटी आत्महत्या करत आहेत त्यामुळे जर भविष्यात अशा गोष्टी टाळावयाचा असतील तर सरकारने वेळ मारुन न नेता मराठा आरक्षणासंदर्भात तात्काळ अध्यादेश काढावा व मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण द्यावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

सरकार मराठा आरक्षणासंदर्भात तारीख ते तारीख देत आहे मनोज जरांगे पाटील यांना आतापर्यंत दोन वेळा तारखा दिलेल्या आहेत.आता सरकारने दिलेली 24 डिसेंबर ही डेडलाईन तारीख जवळ आलेली असताना सरकार कुठलेही ठोस पावले उचलताना दिसत नाही.उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत बोलताना फेब्रुवारी अखेरपर्यंत आरक्षण देऊ असे म्हटले आहे त्यामुळे मराठा समाजात संभ्रमाची भूमिका निर्माण होत आहे असेही या निवेदनात म्हटले आहे.