Home Blog Page 57

‘जेएन- 1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी -आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

मुंबई, दि. 28 : राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आली असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आली असून, या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी साथी आणि संसर्गजन्य विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक आज पार पडली. आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सर्व जिल्ह्यांचे सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच टास्क फोर्सचे सदस्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदार, नवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदम, आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले. ‘जेएन-1’ साठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असली तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच याबाबत ‘मॉक ड्रील’ राहीलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रूग्णालयांमध्ये ती करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते योग्य उपचार करावेत. नवीन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी लोक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळी जातात. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानंतर लोक परत आपापल्या घरी येतील, त्यामुळे हा विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेने आणि नागरिकांनी सतर्क रहावे. टास्क फोर्सकडून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक उपाययोजना सूचविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी यावेळी सांगितले की, जेएन- 1 या कोरोनाच्या उपप्रकारामुळे मोठा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती सध्या नाही. मात्र तरीही वयोवृद्ध नागरिक आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. उपचारामध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावली, तसेच आवश्यक ती मार्गदर्शक नियमावली लवकरच टास्क फोर्सकडून सादर केली जाईल. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. वर्षा पोतदार, डॉ. डी. बी. कदम या टास्क फोर्सच्या सदस्यांनीही बैठकीत आपले मत व्यक्त केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच टास्क फोर्सचे सदस्य नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदार, नवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदम, आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात सादरीकरण केले.

नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची मान्यता

नारळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२४ च्या वर्षासाठी महत्वाची बातमी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2024 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला (एम. एस. पी.) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी सर्व अनिवार्य पिकांची एमएसपी अखिल भारतीय उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट पातळीवर निश्चित केली जाईल अशी घोषणा सरकारने 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली होती.

2024 च्या हंगामासाठी, तेल गिरण्यासाठी उपयुक्त योग्य सरासरी गुणवत्ता असलेल्या खोबऱ्यासाठी 11,160 प्रती क्विंटल तर गोटा खोबऱ्यासाठी 12,000 प्रती क्विंटल एमएसपी निश्चित केला आहे. ही एमएसपी तेल गिरण्यासाठी 51.84 टक्के आणि गोटा खोबऱ्यासाठी 63.26 टक्के लाभ सुनिश्चित करते. तुलनात्मक विचार करता हा लाभ अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या दीडपट जास्त आहे. तेल गिरण्यासाठीचे खोबरे हे तेल काढण्यासाठी वापरले जाते, तर गोटा/खाण्यायोग्य खोबरे हे सुकामेवा म्हणून खाल्ले जाते आणि धार्मिक कारणांसाठी वापरले जाते. केरळ आणि तामिळनाडू हे घाणीसाठीच्या खोबऱ्याचे प्रमुख उत्पादक आहेत, तर गोटा खोबऱ्याचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटकात होते.

सरकारने गेल्या दहा वर्षात तेल गिरण्यासाठीच्या उपयुक्त खोबऱ्याच्या एमएसपी मधे 113 टक्के तर गोटा खोबऱ्याच्या एमएसपी मधे 118 टक्के वाढ केली आहे. 2014-15 मधे तेल गिरण्यासाठीचे खोबरे उपयुक्त खोबऱ्याचा एमएसपी प्रती क्विंटल 5,250 रुपये तर गोटा खोबऱ्याचा एमएसपी प्रती क्विंटल 5,500 रुपये होता. 2024-25 साठी हा दर अनुक्रमे प्रती क्विंटल 11,160 आणि 12,000 वर पोहचला आहे.

एम. एस. पी. वाढीमुळे नारळ उत्पादकांना केवळ चांगला मोबदलाच मिळेल असे नाही, तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नारळाच्या उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना खोबऱ्याचे उत्पादन वाढवण्याकरता प्रोत्साहनही मिळेल.

सरकारने 2023 या चालू हंगामात 1,493 कोटी रुपये किमतीच्या 1.33 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त खोबऱ्याची विक्रमी प्रमाणात खरेदी केली आहे. सुमारे 90,000 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. चालू हंगाम 2023 मधील खरेदी मागील हंगामाच्या (2022) तुलनेत 227 टक्क्यांची वाढ दर्शवते.

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एन. सी. सी. एफ.) हे मूल्य समर्थन योजनेअंतर्गत (पी. एस. एस.) खोबरे आणि पक्व नारळाच्या खरेदीसाठी केंद्रीय नोडल संस्था (सी. एन. ए.) म्हणून काम करत राहतील.

Dainik Janmat 28 December 2023 E Paper

0

दरोडयाची तयारी करणाऱ्या इसमांवर गुन्हा दाखल

वाशी :- धाराशिव जिल्ह्यात बँकेवर दरोडा घातल्याची घटना ताजी असतानाच दरोडयाची तयारी करणाऱ्यावर ८ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की, आरोपी नामे-अजय दत्तात्रय पुरबुज, वय 23 रा. माळवेस बीड, 2) आदित्य विजय धवन, वय 19 वर्षे, रा. भिमराज नगर राजुरवेस बीड, 3) युवराज पांडुरंग लहाणे, वय 19 वर्षे, रा. जवाहर कॉलनी छत्रपती संभाजी नगर, 4) सुमित बाबासाहेब शेजवळ, वय 22 वर्षे, रा. जवाहर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, 5) रितेश प्रभाकर वडमारे, वय 21 वर्षे, रा. राजुवेस बीड, 6) अमोल सुधाकर आढाव, वय 22 वर्षे, रा. जवाहर कॉलनी बौध्द नगर छत्रपती संभाजीनगर 7) सुमित सुसाबंड, वय 19 वर्षे रा. पेठ बीड 8) स्वप्नील जानकीराम तावरे, वय 30 रा. धांडे गल्ली बीड हे सर्वजन दि.26डिसेंबर रोजी पहाटे 04.10 ते 06.20 वा. सु. एन.एच 52 रोडवरील उंदरे यांचे पेट्रोल पंपाजवळ रोड लगत पारगाव शिवारात दरोड्याचे साहित्यासह तीन चाकी रिक्षा क्र एमएच 23 ए. आर. 1019 मध्ये येवून कोणते तरी मालाविषयी अथवा येणारे जाणारे वाहनावर गंभीर स्वरुपाचा दरोड्या सारखा गुन्हा करण्याचे उद्देशाने एकत्र येवून स्वत:चे कब्जात एक पिस्टल कट्टा, दोन लोखंडी कोयते, लोखंडी सळई, लोखंडी पाईप, रोख रक्कम 10,840 ₹ असा सर्व मिळून 1,68,840 ₹किंमतीच्या साहित्यासह दरोडा टाकण्याचे तयारीने एकत्र जमून थांबलेले वाशी पोलीसांना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी- नवनाथ भारत सुरवसे, वय 35 वर्षे, नेमणुक- पोलीस ठाणे वाशी जि. धाराशिव यांनी दि.26 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 399,402 भा.दं.वि.सं. सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Dainik Janmat 27 December 2023 E paper

0

Dainik Janmat 26 December 2023 E Paper

0

११ वी वरीष्ठ राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याची नेत्रदीपक कामगिरी ;चार रजत आणि चार कांस्यपदकांची कमाई 

प्रतिनिधी (तुळजापूर) : महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटना व जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटना यांच्या वतीने जळगाव येथे ११ व्या वरीष्ठ राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने नेत्रदीपक कामगिरी करत चार रजतपदकासह चार कांस्यपदकांची कमाई केली.

      दि. १९ ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत ही स्पर्धा संपन्न झाली. यात राज्यातील मुलांच्या गटात ३५ जिल्ह्यातील तर मुलींच्या गटात ३० जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. 

     यात धाराशिव जिल्ह्याकडून खेळताना मुलींच्या एकेरी स्पर्धेत प्रियांका किरण हंगरगेकर हिने रजतपदक पटकावले. तर मुलींच्या दुहेरी स्पर्धेत प्रियांका हंगरगेकर व प्रेरणा देशमुख यांनी कांस्यपदक प्राप्त केले. तसेच मुलींच्या सांघीक संघाला रजतपदक प्राप्त झाले.या संघात प्रियांका हंगरगेकर, प्रेरणा देशमुख, इश्वरी गंगणे, गार्गी पलंगे, शुभांगी नन्नवरे यांचा सहभाग होता.

      मुलांच्या एकेरी स्पर्धेत स्वराज देशमुख यांने कांस्यपदक प्राप्त केले. मुलांच्या दुहेरी स्पर्धेत सुयश आडे व आदित्य सापते यांनी रजतपदक प्राप्त केले. दुहेरीमध्ये यशराज हुंडेकरी व संजय नागरे यांनी यांनी कांस्यपदक प्राप्त केले. तसेच मुलांच्या सांघीक संघाने कांस्यपदक पटकावले. या संघात स्वराज देशमुख, आदित्य सापते, यश हुंडेकरी, कृष्णा थिटे, करण खंडागळे, संजय नागरे, सुयश आडे यांची सहभाग होता.

    मिश्र दुहेरीमध्ये प्रियांका हंगरगेकर व यश हुंडेकरी यांनी रजतपदक प्राप्त केले.या सर्व खेळाडूंचे महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुनिल पूर्णपात्रे, सचिव रविंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे, जिल्हासचिव शिराज शेख, प्रशिक्षक संजय नागरे, प्रशिक्षक राहुल जाधव यांनी अभिनंदन केले.

‘निस्वार्थीपणे समाजहिताचे काम करणारे लोक समोर येणे महत्त्वाचे’- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

लोकसेवा पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी उद्गार

धाराशिव : ( प्रतिनिधी ) भारतरत्न माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसेवा समिती, धाराशिव या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकसेवा पुरस्कार – २०२३ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी , श्री. शेषाद्री डांगे , कमलाकर पाटील , श्री. शिवाजीराव कदम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात अटलजींच्या प्रतिमा पुजनाने व दिप प्रज्वलनाने झाली.
पुरस्काराचे हे १४ वे वर्ष असून हा पुरस्कार मराठवाडा स्तरीय पुरस्कार आहे. यावर्षीचा लोकसेवा पुरस्कार- २०२३ परंडा ( जि. धाराशिव ) येथील जगन्नाथ राजाराम साळुंके, मुरुड ( जि. लातूर ) येथील विद्यासागर चंद्रसेन कोळी आणि बुधोडा ( ता. औसा ) शरद केशवराव झरे यांना प्रदान करण्यात आला.
परंडा येथील समसमपुर मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करुन मंदिर परिसरात झाडे लावून सुशोभीकरण करणे तसेच स्मशानभूमी सुशोभीकरण व व्यवस्था केल्याबद्दल श्री. जगन्नाथ साळुंके यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार देण्यात आला. बुधोडा ( ता. औसा ) येथे ५१ निराधार , वंचित , उपेक्षित मुलांना संरक्षण , संगोपन व शिक्षण देऊन भावी पिढी घडविणारया शरद केशवराव झरे यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विषमुक्त सेंद्रिय शेती करणारे व शेकडो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची प्रेरणा देणारे मुरुड येथील विद्यासागर चंद्रसेन कोळी यांना यावर्षीचा लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी यांना रोख अकरा हजार रुपये , सन्मानपत्र , स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले की , अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व असून निस्वार्थीपणे समाजहिताचे काम करणारे लोक समोर येणे महत्त्वाचे आहे. त्यांनी दुष्काळ , पाणी , प्रदुषण , सेंद्रिय शेती , शेतकरी आत्महत्या , सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद पाटील म्हणाले की , निरपेक्ष वृत्तीने लोक कल्याणाचे कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींपासून प्रेरणा घेऊन तरुणांनी कार्य करणे गरजेचे आहे.
शेषाद्री डांगे म्हणाले की , अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या उत्तुंग कार्याने जगाला भारताची ओळख करून दिली. निस्वार्थीपणा व सद्भावना जपणारी कर्तृत्ववान माणसं समाजासमोर आणण्याकरिता लोकसेवा समिती गेल्या चौदा वर्षांपासून काम करत असून सर्वांनी हे काम व्यापक स्वरूपात करण्यासाठी सहकार्य करावे.
यावेळी सहशिक्षिका मीरा पवार व विद्यार्थीनी नारायणी कुलकर्णी यांनी स्वागत गीत म्हटले तर वर्षाताई पाटील यांनी वैयक्तिक गीत गायान केले. याप्रसंगी लोकसेवा समितीला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. योगेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक , विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येण्यासंदर्भात संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य Sanjay Raut on alliance with Vanchit Bahujan Aghadi

मुंबई – २०२४ च्या लोकसभा निवडणुका जस जश्या जवळ येत आहेत तसे राजकारण देखील बदलू लागले आहे. महाराष्ट्रात भाजपचे मिशन ४५ सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत वंचित बहुजन आघाडी संदर्भात मोठे वक्तव्य आजच्या पत्रकार परिषदेत केले आहे.
आम्ही ३५ ते ४० जागा जिंकू, काही प्रमुख लोकं शिवसेना आणि महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत ती गणितं बदलणार आहेत. किमान ४० जागा लोकसभेच्या जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच भाजपच्या मिशन ४५ वर टीका करताना त्यांनी भाजप देशात १ हजार जागा जिंकेल आणि राज्यात १४८ जागा जिंकेल असा उपरोधिक टोला लगावला.भाजप हवेतला पक्ष आहे. जो पक्ष मिंधे आणि अजित पवार दोन कुबड्यांवर उभा आहे त्यांनी ४५ जागा जिंकण्याची भाषा करावी हे हास्यास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले.

बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू

बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेत फरक नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने पुढे जाणारे त्यांचे नातू आहेत. या देशामध्ये संविधान टिकावं , या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये, या देशातला कायदा पायदळी तुडवला जाऊ नये, या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आमची आणि त्यांची जी चर्चा होतेय ती अत्यंत सकारात्मक होतेय आणि ती चालू आहे, लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत. २८ डिसेंबर नंतर जी बैठक होणार आहे ती निर्णायक बैठक होईल, प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील. शिवसेनेच्या बरोबरीने महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकूमशाहीवर हल्ले करत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

Dainik Janmat 25 December 2023 E paper

0