Home Blog Page 60

देवकते गल्लीत खंडोबा मंदिराचे भूमीपूजन

धाराशिव : शहरातील देवकते गल्लीत लोकवर्गणीतून खंडोबा मंदिराचे बांधकाम होणार असून आज चंपाषष्ठीचा मुहूर्त साधून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. यावेळी दामू देवकते, अशोक सोलंकर, प्रा. सोमनाथ लांडगे सर, दिनेश बंडगर, लिंबराज डुकरे, सचिन शेंडगे, बालाजी वगरे, संभाजी सलगर, महेश देवकते, अशोक देवकते,  हणमंत देवकते, वसंत देवकते, मंगेश देवकते, तानाजी देवकते, खंडू ठवरे, पिंटू देवकते, नरसिंह मेटकरी, ओंकार देवकते, नवनाथ सोलंकर, आकाश शेंडगे, रामेश्वर घोगरे, शिवम देवकते, गणेश देवकते, रोहन देवकते, तेजस देवकते, अतीष ठवरे, राहुल देवकते, मालोजी देवकते, सुरज देवकते, शुभम कोळेकर, शुभम पांढरे, दत्ता थोरात, शाम ठवरे, प्रमोद ठवरे, कुणाल महानवर, रवि देवकते, विष्णु वाघमोडे व समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सादर मंदिराचे काम हे लोकसहभागातून  लोकवर्गणीतून लवकरात लवकर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

झटतय कोण आणि नटतय कोण…भाजपावाढीसाठी फिरतय कोण…

डी एस गायकवाड
अकलूज(प्रतिनिधी)

  • भाजपावाढीस कारणीभूत ठरलेले मोहिते पाटील भाजपासाठी पायात भिंगरी बांधून जंग जंग पछाडताना दिसत आहेत ते जीवाचे रान करताना दिसत आहेत. न थांबता न थकता भाजपासाठी आणखी वातावरण सुपीक करताना दिसत आहेत पण अशा परिस्थितीत फक्त पदे घेऊन आपणच भाजपाचे तारणहार असल्याच्या अविर्भावात फिरून काही नेते मंडळी फक्त मलीद्याला उठताना दिसत आहेत. म्हणजे भाजपा वाढविणार मोहिते पाटील आणि त्याची फळे चाखायला मात्र अनेक जण टपलेले दिसत आहेत. त्यामुळे कोण काम करतय यावरून झटतय कोण आणि फुकटात नटतय कोण अशी चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असताना दिसत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपामध्ये एकमेकांना पाण्यात पाहण्याचेच धंदे जोमात सुरू आहेत. मुळात पक्ष कोणी वाढवला हे पाहणे गरजेचे बनले आहे आणि आता सुद्धा पक्षासाठी तन-मन-धनाने कोण काम करत आहे हेही पाहणे पक्षाच्या हिताचे ठरणार आहे. मोठमोठाली पदे घेऊन अनेक जण भाजपमध्ये सध्या स्वतःच्या पोळ्या भाजून घेताना दिसत आहेत.पक्ष वाढीसाठी ते कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. फक्त वरिष्ठ नेते मंडळी आली की त्यांच्या पुढे पुढे करायचे, त्या नेते मंडळींना मिसगाईड करायचे, पक्षासाठी आजचे सुपीक वातावरण हे माझ्यामुळेच झाले आहे असा अविर्भाव दाखवायचा हेच उद्योग सध्या सुरू आहेत.त्यामुळे मनापासून झटणारे कार्यकर्ते नेते बाजूलाच राहताना दिसत आहेत. काही जणांना तर इतकी मोठी पदे दिली आहेत की त्यांचे योगदान शून्य आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाचा देखील पत्त्या नाही. त्यामुळे आता भाजपा पक्षाला सतर्कता दाखवावी लागणार आहे. काम करणाऱ्यांना पदे दिली पाहिजेत. जे बिनकामाची पदे घेवून मिरवत आहेत त्यांना पक्ष वाढीसाठी आपले योगदान काय हे पक्षाने विचारले पाहिजे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी चांगले वातावरण आहे पण हे वातावरण अशा मंडळीमुळे बिघडताना दिसत आहे.दुसरीकडे मोहिते पाटील मात्र अचूक धोरण आखून पक्षवाढीसाठी योगदान देताना दिसत आहेत. मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक तालुक्यात ते संपर्क अभियान राबवून, वेगवेगळ्या शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करून,पक्षाची संघटनात्मक ताकद उभा करताना दिसत आहेत. बूथ रचना सक्षम करून सूक्ष्म नियोजनाने ते पक्षाला आणखी मजबुतीकडे घेऊन जाताना दिसत आहेत. अशा अवस्थेत काहीजण पक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा नेत्यांना वेळीच भाजपाने रोखले पाहिजे. वातावरण चांगले असताना काही मंडळी ते खराब करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर पक्षाने अंकुश ठेवला पाहिजे. पक्ष ध्येय धोरणाने पुढे जातो ती ध्येय धोरणे अचूकरित्या मोहिते पाटील राबवताना दिसत आहेत याची प्रचिती गत लोकसभा निवडणुकीत आलेली आहे. कमी कालावधीत मोहिते पाटलांनी हे अद्वितीय यश मिळवून दिले होते. आता त्यांच्या नेतृत्वामुळे पूर्वीपेक्षाही आणखी भक्कमपणा वाढला आहे. पण पक्षातील वरिष्ठ मंडळीनी देखील आता पक्षांमध्ये कलुशीत वातावरण कोण निर्माण करत आहे हे तपासले पाहिजे आणि सच्चा नेतृत्वाच्या पाठीमागिल बळ वाढवले पाहिजे.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाची क्रेझ

  • भाजपाचे संघटन महामंत्री म्हणून कार्यरत असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते भाजपाला जुडताना दिसत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी पक्षासाठी सक्षम अशी बूथ यंत्रणा लावली आहे. सर्व स्तरात मिसळून काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख असल्याने अनेक युवक भाजपामध्ये सामील होताना दिसत आहेत. त्यांच्या धोरणी नेतृत्वाचा भाजपाला फायदा होत असताना दिसत आहे. एवढा मोठा मतदार संघ असताना सुद्धा संपूर्ण मतदारसंघांमध्ये फिरून कार्यकर्त्यांची मोळी बांधणारे ते भाजपातील एकमेव नेते ठरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे माढा मतदारसंघात भाजपा निर्विवाद वर्चस्व मिळवेल असे वातावरण आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी त्यांचे थेट कनेक्टिंग असल्याने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नावाचा सध्या जोर मतदार संघात वाढताना दिसतो आहे. असंख्य कार्यकर्त्यातून त्यांच्या उमेदवारीची मागणी आतापासूनच होताना दिसत आहे.

दैनिक जनमत मध्ये आपले स्वागत !

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

प्रहार कडून निवडणूक लढवणे हा राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाग,अजित पवार यांनीच जिल्हाधिकाऱ्यांना तसे सांगितले – महेंद्र धुरगुडे

  

प्रहार कडून निवडणूक लढवणे हा राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाग,अजित पवार यांनीच जिल्हाधिकाऱ्यांना तसे सांगितले – महेंद्र धुरगुडे


राजकीय वर्तुळात खळबळ 


धाराशिव – निवडणुकांमध्ये युत्या आघाड्या होतात मात्र आपला मित्र पक्ष आपलेच काम करतो आहे का आपल्याला पाडायचं काम करत आहे हे उमेदवारी दिलेल्या पक्षाला समजत नाही. आघाडी धर्म पाळला जात नाही हे समोर यायला खूप मोठा कालावधी निघून जातो. तुळजापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आपला आघाडी धर्म पाळला नसल्याचे महेंद्र धुरगुडे यांनी केलेल्या वक्तव्याने समोर आले आहे
प्रहार कडून निवडणूक लढवणे हा राष्ट्रवादीच्या रणनीतीचा भाग असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीशी बंडखोरी करून प्रहार प्रहारच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे आणि सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असणारे महेंद्र धुरगुडे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत( ११ डिसेंबर) बोलताना महेंद्र धुरगुडे म्हणाले की, अपात्रतेची फाईल भाजपने पळवत आणली होती, याबाबत स्वतः अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांना बोलले निवडणूक लढवायला लावणे हा पक्षाच्या रणनीतीचा भाग असल्याने कारवाई करू नये असे म्हणाल्याचे धुरगुडे यांनी सांगितले.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात होते.  भाजपचे राणाजगजितसिंह पाटील हे 23 हजार 196 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. 
आ.पाटील यांना 99 हजार 34 मते मिळाली तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांना 75 हजार 865 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांना 35 हजार 153 मते मिळाली होती. प्रहार जनशक्तीच्या महेंद्र धुरगुडे यांना सात हजार 423 मते मिळाली होती.

आघाडी धर्म पाळला नाही?

धुरगुडे यांनी सांगितल्याप्रमाणे जर घडले असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही हे स्पष्ट होते यावर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते ते पहावे लागेल.

भाजपचा जिल्ह्यात शिरकाव

स्वातंत्र्यानंतर आणि २०१४ च्या मोदी लाटेत देखील भाजपचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचा धाराशिव जिल्ह्यात शिरकाव झाला नव्हता. पहिल्यांदाच तुळजापूर विधानसभेची जागा भाजपने जिंकून जिल्ह्यात कमळ फुलवले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जर काँग्रेसच्या उमेदवाराला ताकद मिळाली असती तर चित्र वेगळे असल्याचे आता बोलले जात आहे.