Home Blog Page 54

पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले

धाराशिव – पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी सोयाबीनचे भाव पडले असा आरोप माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी धाराशिव येथे केला आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला संबोधित करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा आरोप केला आहे ते म्हणाले की,गौतम अदानिणी मोठ्या प्रमाणात परदेशातून पामतेल आयात केलेलं आहे.त्याचा धंदा चांगला व्हायला पाहिजे यासाठी पामतेलावर आयात कर पाच टक्क्यांनी कमी केला त्याचा परिणाम सोयाबीन च्या दरावर झाला. जेव्हा पामतेल स्वस्तामध्ये मिळतं त्यावेळी आपोआप सोयाबीनच्या, भुईमुगाच्या, सूर्यफुलाच्या सगळ्या प्रकारच्या तेलावर त्याचा परिणाम होतो.ज्यावेळी पक्क्या मालाचा भाव कमी होतो त्यावेळी कच्या मालाचा भाव कमी होतो हे साधं अर्थशास्त्र आहे.सोयाबीन चे भाव पडले असतील आणि आत्महत्या अडीच टक्क्यांनी वाढल्या असतील तर अदानिंचे हात देखील रक्ताने बरबटले असतील असेही ते यावेळी म्हणाले.दरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली, सरकार शेतकऱ्यांच कर्जमाफ करत नाही उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यांचा सातबारा कोरा करा, नैसर्गिक आपत्तीला शेतकरी जबाबदार नाही निसर्गाचे नुकसान उद्योगपतींनी केलं म्हणून शिक्षा आम्हाला झाली कधी गारपिटीच्या माध्यमातून तर कधी महापुराच्या माध्यमांतून, दुष्काळाच्या माध्यमातून शिक्षा झाली.

कांद्याला भाव मिळत नाही कारण निर्यातीवर बंदी घातली,त्यामुळे ३० लाख लोकांचा रोजगार बुडाला. गेल्या जन्मीचे पाप म्हणून आम्ही गरीब राहिलो नाहीतर सरकारने लुटणारी धोरणे राबवली म्हणून आम्ही गरीब राहिलो त्याचा जाब सरकारला विचारायचा आहे असं त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोंधित करताना सांगितले

आणखी वाचा

१४ नव्हे १३, महायुतीच्या मेळाव्याला एक घटकपक्ष अनुपस्थित

१४ नव्हे १३, महायुतीच्या मेळाव्याला एक घटकपक्ष अनुपस्थित

धाराशिव – शहरात आज महायुतीचा मेळावा पार पडला मात्र मेळाव्याला भाजपचा जुना घटकपक्ष अनुपस्थित होता.
एकूण १४ घटकपक्ष असलेल्या महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार, आर पी आय यांच्यासह इतर घटकपक्ष आहेत त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा देखील समावेश आहे. रासपला महायुतीच्या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले होते मात्र वरिष्ठांनी सहभागी न होण्यास सांगितले असल्याची माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली.
रासपचे प्रमुख महादेव जानकर जिल्ह्याचे सहपालकमंत्री होते तसेच २०१७ साली रासपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २१ जागा लढवल्या होत्या. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदार संघात रासपचा प्रभाव आहे. राज्यस्तरावर बारामती, माढा, परभणी मतदारसंघात देखील रासपचा प्रभाव आहे. येत्या काळात रासप महायुती पासून दूर राहिल्यास भाजपच्या ५१ टक्के मतदान घेण्याच्या रणनीतीला धक्का पोहचू शकतो असे राजकीय विश्लेषक सांगतात.

१८ लाख जनतेसाठी केंद्रातील एक योजना आणलेली दाखवा, म्हणल ती पैज – आरोग्यमंत्र्यांचे विद्यमान खासदारांना आव्हान

धाराशिव – महायुतीच्या धाराशिव येथील मेळाव्यात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनाच लक्ष्य केले. १८ लाख जनतेसाठी केंद्रातील एक योजना आणलेली दाखवा म्हणल ती पैज असे थेट आव्हान विद्यमान खासदारांना यानिमित्ताने दिले तसेच एक महिना शिल्लक आहे आणता आली तर एखादी केंद्राची योजना आणून दाखवा असेही ते यावेळी म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी धाराशिव जिल्ह्याला भावनिक आवाहनाला मतदान देण्याची सवय आहे त्याला छेद द्या भावनेच्या आहारी जाऊन मतदान करणं पाप आहे असे सांगितले. पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की विरोधकांची अवस्था शोले चित्रपटासारखी झाली आहे आधें इधर जाव आधे उधर जाव, धाराशिव जिल्हा आकांक्षीत जिल्हा असून मागच्या पापात जाणार नाही, जो नेता विकास उंबऱ्या पर्यंत आणेल तोच आपला नेता. विकासाच्या विषयी मी स्फोटक आहे. आकांक्षित जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी माझा रोड मॅप तयार आहे. लोकसभेचे तिकीट कोणाला मिळेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील दिलेल्या उमेदवाराला अडीच लाखांच्या पुढे मताधिक्य असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्यांनी धाराशिव जिल्ह्याच्या फंदात पडू नये असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना मेळाव्यात बोलू दिलं नाही, शिवसैनिकांची नाराजी?

लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मेळावा होत असल्याने याला महत्व होते. सर्वच घटक पक्षातील नेत्यांची यानिमित्ताने भाषणे झाली मात्र आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाषणानंतर पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना भाषणासाठी बोलवले गेले त्याच वेळी आ. ज्ञानराज चौगुले यांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना बोलू देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली मात्र ती मागणी मान्य न केल्याने मंचावर उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ नाराजीचे चित्र होते.

बहुत झाले भावी खासदार, कधी जाहीर करणार उमेदवार?महायुतीच्या मेळाव्याकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा

धाराशिव – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत मेळावा आयोजित केला असून त्यानिमित्ताने उमेदवार जाहीर करावा अशी सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महायुतीतील प्रहार आणि रयतक्रांती या संघटना सोडून सर्वांनी आपला भावी खासदार जाहीर केला आहे.

जागा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सुटणार!

लोकसभा निवडणुकीचा पूर्वानुभव पहाता धाराशिव लोकसभेची जागा लढण्याचा अनुभव राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे आहे. नैसर्गिक स्थितीनुसार या दोन पक्षांना जागा सोडावी लागेल न सुटल्यास दोन्ही घटक पक्षावर अन्याय होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

महाविकास आघाडीने जागा, उमेदवार याबाबत स्पष्टता ठेवली आहे त्याविरोधात तगडा उमेदवार अपेक्षित आहे मात्र काम कोणाचे करायचे हे निश्चित नसल्याने महायुतीतील कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले नाहीत. तीन पक्षातील नेत्यांशी सुसंवाद असणारी व्यक्तीच उमेदवार असावी, क्लीन चेहरा असावा, कोणतेही राजकीय आरोप नसावेत अश्याच व्यक्तीच्या गळ्यात उमेदवारी देण्यात येणार असल्याचे राजकीय निष्णात सांगतात.

आजचा मेळावा निर्णायक

राजकीय दृष्ट्या आज धाराशिव शहरात स्वस्तिक मंगल कार्यालय येथे होणारा महायुतीचा मेळावा निर्णायक असणार आहे. अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर टीका केलेले अनेकजण आज मांडीला मांडी लावून कार्यकर्त्यांच्या समोर बसणार आहेत.

आयएनएस चिता, गुलदार आणि कुंभीर 40 वर्षांच्या वैभवशाली देशसेवेनंतर कार्यमुक्त

भारतीय नौदलाची चीता, गुलदार आणि कुंभीर या युद्धनौका 12 जानेवारी 2024 रोजी चार दशकांच्या गौरवशाली देशसेवेनंतर नौदलातून कार्यमुक्त करण्यात आल्या. पोर्ट ब्लेअर येथे पारंपारिक पद्धतीने कार्यमुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सूर्यास्ताच्या वेळी या तीनही जहाजांवरील राष्ट्रीय ध्वज, नौदल चिन्ह आणि तीन जहाजांचे डिकमिशनिंग प्रतिक शेवटच्या वेळी खाली उतरवण्यात आले.

चीता, गुलदार आणि कुंभीर ही जहाजे पोलंडच्या ग्डिनिया शिपयार्ड येथे पोलनोक्नी वर्ग जहाजे म्हणून बांधली गेली होती आणि ही जहाजे अनुक्रमे 1984, 1985 आणि 1986 मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती. चित्ता हे जहाज आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अल्पा काळासाठी कोची आणि चेन्नई येथे तर कुंभीर आणि गुलदार हे विशाखापट्टणम येथे तैनात होते. या जहाजांनी नौदलात सूमारे 40 वर्षे सक्रिय सेवा बजावली. या जहाजांनी 12,300 दिवस समुद्र वास्तव्यात एकत्रितपणे सुमारे 17 लाख समुद्री मैलांचा प्रवास केला आहे. अंदमान आणि निकोबार कमांडचे उभयचर प्लॅटफॉर्म म्हणून, या जहाजांनी सैन्याच्या तुकड्या किनाऱ्यावर उतरवण्यासाठी 1300 पेक्षा अधिक समुद्रकिनारी मोहीमा केल्या आहेत.

आपल्या गौरवशाली सेवा काळात या जहाजांनी अनेक सागरी सुरक्षा मोहिमा आणि मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण कार्यात भाग घेतला आहे. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची तस्करी तसेच भारत आणि श्रीलंकेच्या सीमेवरील अवैध स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मे 1990 मध्ये ऑपरेशन ताशा दरम्यान भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या आयपीकेएफ मोहीमेचा भाग म्हणून ऑपरेशन अमन तसेच 1997 मध्ये श्रीलंकेवर चक्रीवादळामुळे कोसळलेले संकट आणि 2004 मध्ये हिंदी महासागरातील त्सुनामी नंतरच्या मदत कार्यात या जहाजांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

चित्ता, गुलदार आणि कुंभीर या भारतीय नौदलाच्या जहाजांनी सागरी सेवा क्षेत्रात एक अमिट छाप उमटवली आहे आणि त्यांची कार्यमुक्ती झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय संपला आहे.

एअर मार्शल साजू बालकृष्णन, एव्हीएसएम, व्हीएम, अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN) चे कमांडर-इन-चीफ आणि व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम , व्हीएसएम यांच्यासह नौदल उपप्रमुख, ध्वज अधिकारी, माजी कमांडिंग अधिकारी आणि या तीनही जहाजांचा सेवादल ताफा पोर्ट ब्लेअर येथे संपन्न झालेल्या कार्यमुक्ती समारंभात सहभागी झाला होता. एकाच वर्गाच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी कार्यमुक्त करण्यात आल्याने हा कार्यक्रम खूप अनोखा बनला होता.

अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर आता फौजदारी कार्यवाहीचा धाराशिव नगरपालिकेचा इशारा

धाराशिव – शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनवर नगरपालिकेची नजर राहणार असून त्यांच्यावर फौजजादरी कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच ज्या नागरिकांकडे अनाधिकृत नळ कनेक्शन आहेत अश्या नागरिकांनी दि. २२ जानेवारी पर्यंत नळ कनेक्शन शुल्क व दंडात्मक रक्कम घरगुती नळ कनेक्शनसाठी रक्कम रु. ४,०००/- व व्यावसायिक नळ कनेक्शन साठी रक्कम रु.१०,०००/- भरणा करून सदरील नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. मुदत संपल्यानंतर शहरातील ज्या नागरिकाकडे अनाधिकृत नळ कनेक्शन असल्याचे निदर्शनास येईल अश्या नागरिकाचे नळ कनेक्शन बंद करून संबंधितावर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

मराठा समाज बांधवांसाठी जनसुविधा पुरवाव्यात : सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ते डॉ.राजसाहेब पाटील

मुंबई – मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव हे आमरण उपोषण करण्यासाठी मुंबईकडे येत असून, त्यांच्यासाठी जनसुविधा, अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ते डॉ.राजसाहेब पाटील यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डॉ.राजसाहेब पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, सकल मराठा समाज आपल्या आरक्षण व अन्य विविध मागण्यांसाठी २० जानेवारीपासून मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई येथे मोठ्या संख्येने, आमरण उपोषणासाठी येत आहे. आपणास आग्रहाची विनंती की, मराठा समाजासाठी आमरण उपोषणाचे ठिकाण व मराठा मार्ग येथे वैद्यकीय सेवा, अग्निशमन तथा रुग्णवाहिका व तत्सम अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विविध स्तरातील ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव, भगिनी, युवा, कष्टकरी, शेतकरी, जेष्ठ नागरिक, लहान थोर यांच्यासाठी अत्यावश्यक सेवा यामध्ये शौचालय, आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका,प्रथमोपचार, औषधोपचार, औषधी, फिरते दवाखाने, हॉस्पिटल, पोलीस संरक्षण तसेच अन्न व पाणी, निवाऱ्याची, जसे की मंडप, ऊन, वारा व पाऊस, थंडी यांपासून संरक्षण मिळण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच मराठा समाज बांधवांचे संरक्षण, मराठा मार्गावरील व मुंबईमधील उपोषणस्थळी वाहतूक व्यवस्थेचे वाहतूक यंत्रणेमार्फत येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था याचे योग्य नियोजन करण्यात यावे. महाराष्ट्र शासनाने वरील सर्व बाबींचा विचार करावा व जनसुविधा, अत्यावश्यक सेवा,अन्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती या निवेदनात डॉ.राजसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

भाजप मध्ये बरेच मोठे प्रवेश होतील – आ. राणाजगजितसिंह पाटील

लोकसभेपूर्वी फुल्ल इन्कमींग

धाराशिव – जिल्ह्यात येत्या काही काळात बरेच जण भाजपचे कमळ हाती घेतील या चर्चेला आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दुजोरा दिला आहे. मात्र नेमके प्रवेश कोणाचे होणार आहेत, केव्हा होणार आहेत हे सांगायला मात्र त्यांनी नकार दिला. काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर देखील त्यांनी बोलण्यास नकार दिला.
शहरात आज महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), प्रहार, रयतक्रांती यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून महायुतीचा मेळावा १४ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, दत्ता साळुंके, राजाभाऊ ओव्हाळ, सुरज साळुंके, मयूर काकडे, सुरज अबाचने आदी उपस्थित होते.

समन्वय समिती चे काम

महायुतीतील घटक पक्षात समन्वय साधण्याचे काम ही समिती करणार असून प्रत्येक आठवड्याला समितीतील सदस्यांची बैठक होणार आहे. शासकीय समित्यांवर कोणाची नेमणूक करायची याबाबत देखील चर्चा याच समितीत होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीचे बँक खाते गोठवताच शेतकऱ्यांना विमा कंपनी प्रलंबित रक्कम देण्यास तयार

धाराशिव दि.9 (प्रतिनिधी ) प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये सोयाबीन पिकाच्या 97 टक्के पुर्वसुचना ह्या क्रॉप कॅलेंडरनुसार 15 ऑक्टोबरपूर्वी प्राप्त झालेल्या असल्याने मार्गदर्शक सूचनेतील मुद्दा क्रं.21.5.10 लागू होत नाही.विमा कंपनीने 50:50 भारांकन न लावता पंचनाम्यातील नमूद नुकसानीचे क्षेत्र व नुकसानीच्या टक्केवारीनुसार नुकसान भरपाई वितरीत करावी.असे आदेश विमा कंपनीस जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती,विभागस्तरीय तक्रार निवारण समिती,राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती व राज्यस्तरीय समितीचे आदेशानुसार विमा कंपनीस दिलेले होते.परंतु विमा कंपनीने वरील समितीच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पाठपुरावा केल्याने भारतीय कृषि विमा कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नूसार वसुलीची कार्यवाही प्रस्तावित करुन विमा कंपनीचे बँक खाते गोठविलेले असता विमा कंपनीचे अधिकारी रविश लोहीया,व्यवस्थापक,भारतीय कृषि विमा कंपनी,दिलीप डांगे
उपव्यवस्थापक,भारतीय कृषि विमा कंपनी व मच्छिंद्र सावंत क्षेत्रिय व्यवस्थापक,भारतीय कृषि विमा कंपनी लि.मुंबई यांनी 8 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेवून वसुलीची प्रस्तावित करण्यात आलेली रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यास विमा कंपनी तयार असल्याबाबतचे लेखी पत्र देवून प्रस्तावित करण्यात आलेली कार्यवाही परत घेणेबाबत विनंती केली.

त्याअनुषंगाने 8 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे अध्यक्षतेखाली विमा कंपनीच्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली.प्रस्तावित करण्यात आलेल्या वसुलीच्या रक्कमेपैकी 294 कोटी 8 लक्ष रुपयांपैकी 12 कोटी रुपये हे हंगामातील प्रतिकुल परिस्थिती(Mid Season Adversity) अंतर्गत वितरीत करण्यात आलेले आहे.विमा हप्त्याची रक्कम 50 कोटी रुपये अद्याप विमा कंपनीस प्राप्त नसल्याने उर्वरीत 232 कोटी रुपये द 25 जानेवारी 2024 पुर्वी वितरीत करण्याबाबत विमा कंपनीस आदेश दिले आहे.या आदेशाद्वारे रक्कम वितरित करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शविलेली आहे.तसेच उर्वरीत रक्कम 50 कोटी रुपये विमा कंपनीस प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी वितरीत करील असे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समितीला अवगत केले.

विमा कंपनीने वरीलप्रमाणे विहीत मुदतीत कार्यवाही पुर्ण न केल्यास विमा कंपनीच्या विरोधात परत महसुली वसुली प्रमाणपत्र (आर.आर.सी.) ची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे अधिन राहून विमा कंपनीच्या विरोधात प्रस्तावित करण्यात आलेली कारवाईस स्थगिती दिलेली असुन 28 जानेवारीपर्यंत 232 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीस दिलेल्या आहेत.यामध्ये उर्वरीत 50 कोटी काही कालावधीनंतर जमा होणार असल्याने त्यासाठी काही अधिसुचित मंडळाचा विमा उशिरा जमा होईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.

उलट्या बोंबा मारण्याचं थांबवावं – वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांचा माजी मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई – लोकसभा निवडणुका जस जश्या जवळ येत आहेत तस तसे राज्यातील राजकारण तापत चालले आहे. आघाडी, जागावाटप याच्या चर्चा प्राथमिक स्तरावर आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजप यांना थेट आव्हान देणाऱ्यांपैकी वंचित बहुजन आघाडी सर्वात आघाडीवर आहे. मात्र या पक्षाला इंडिया आघाडीत घेण्यासंदर्भात सध्या उलटसुलट चर्चा सुरू असतात त्याला विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी उत्तर दिले आहे ते म्हणतात की,
काँग्रेस मधील 23 बंडखोर नेत्यांपैकी एक असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना असा सल्ला दिला आहे की, त्यांनी भडक वक्तव्य करू नयेत आणि इंडिया आघाडी किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी भेटून चर्चा करावी. त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आतापर्यंत आम्ही 3 वेळा पत्र लिहिलेले आहेत. अनेकदा माध्यमांमधून, समाज माध्यमांमधून आणि सभांमधून आम्हाला इंडिया आघाडी मध्ये सहभागी व्हायचंय याची जाहीर वाच्यता केलेली आहे, सगळ्या जगाला हे माहिती आहे. मात्र तरीही अद्याप आम्हाला तुमच्या पक्षाकडून किंवा इंडिया अलायन्स कडून कुठलंही अधिकृत निमंत्रण न आल्यामुळे आम्ही त्याचा भाग होऊ शकलो नाही.

राहिला दुसरा मुद्दा, ज्या वेळेला मल्लिकार्जुन खरगे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावा की न घ्यावं या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांना बोलावलं होतं, त्यात पृथ्वीराज चव्हाण होते. त्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास विरोध केला होता. स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला एक वेगळा सल्ला द्यायचा की वंचितला सोबत घेऊ नका, आणि बाहेर येऊन माध्यमांमध्ये वंचितला वेगळे सल्ले जायचे, सारवासारव करणारी भूमिका मांडायची या भूमिकेचे वागण्याचा नेमकं कारण काय आहे? पृथ्वीराज चव्हाण यांना मी सांगू इच्छितो की याला मराठीत म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा. एकीकडे विरोध करायचा आतून आणि बाहेर येऊन वेगळच काहीतरी सांगायचं त्यामुळे माझी विनंती त्यांना की त्यांनी या अशा पद्धतीच्या उलट्या बोंबा मारण्याचं थांबवावं आणि सरळ सोयीने काही जर चांगलं जुळून येत असेल तर त्याला सहकार्य करावं. असेही सिद्धार्थ मोकळे
व्हिडिओ मध्ये म्हणाले आहेत.