Home Blog Page 53

1 कोटी घरांच्या छतांवर सौर उर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्दिष्टासह “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी करणे हा या योजनेचा उद्देश

मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा यंत्रणेचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

अयोध्या येथे सूर्यवंशी भगवान श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आटोपून दिल्लीत परतल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी, 1 कोटी घरांच्या  छतावर सौरऊर्जा यंत्रणा  बसवण्याच्या उद्देशाने “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. बैठकीदरम्यान पंतप्रधान म्हणाले की, यामुळे प्रत्येक घराला त्याच्या छतावर सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्यांचे वीज बिल कमी करता येईल आणि त्यांना त्यांच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवता येईल.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उद्देश अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवून त्याद्वारे  वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हा  आहे.

मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा पॅनेलचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित  करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना मिळणार छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत 1 कोटी कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा मिळणार आहे.

पंतप्रधान म्हणाले, “आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, देशातील जनतेच्या घराच्या छतावर स्वतःची सौर ऊर्जा यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.

यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होण्याबरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल.

एक्स पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले:

“जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या दर्शनातून नेहमीच ऊर्जा मिळते.

आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सौर ऊर्जा यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या  छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.

यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरही  होईल.

उद्यापासून धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे

राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करुन (इंम्पेरिकल डेटा) माहिती संकलित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांना निर्देश दिलले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांचेकडून प्राप्त सूचनांनुसार धाराशिव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी व माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या सर्वेक्षणाचे काम हे दि. 23 जानेवारी 2024 ते दि. 31 जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या कालावधीत या कामासाठी नियुक्त प्रगणक हे गावातील, शहरातील प्रत्येक कुटंबास भेट देऊन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून देण्यात आलेल्या प्रशावलीनुसार मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलित करणार आहेत. तरी या सर्वेक्षणादरम्यान कुटुंब प्रमुखांनी घरी थांबुन आपली माहिती प्रगणकांना देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.

कृषी महोत्सवात निधीचा चुराडा, शेतकऱ्यांना फायदा झाला का तोटा? ज्याला टेंडर त्यालाच ३० स्टॉल विकले?

धाराशिव – धाराशिव येथे पोलिस मैदानावर होत असलेला कृषी महोत्सव शासकीय निधीचा चुराडा असून जवळपास ३० लाखांपेक्षा अधिकचा खर्च या महोत्सवावर झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती फायदा झाला? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
ज्या इव्हेंट कंपनीला या महोत्सवाचे काम देण्यात आले त्याच कंपनीला ३० स्टॉल विकण्यात आले होते त्या कंपनीने पुढे शेतकऱ्यांना अधिक किमतीने दिले असल्याची चर्चा आहे मात्र अधिकाऱ्यांनी असा कोणताच प्रकार घडला नसल्याची प्रतिक्रीया दिली.शासनाच्या नियमानुसार काही स्टॉल मोफत तर काही प्रायोजक स्वरूपात द्यावे लागतात मात्र आत्मा ने त्याचे वेगळे वेगळे दर ठरवले तसे ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्याबाबत कृषी आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते का? असे काही प्रश्न देखील अनुत्तरीत आहेत. जर स्टॉल चे दर अधिक असतील तर शेतकऱ्यांना, शेतकरी गटांना ते परवडत नाहीत परिणामी ते नुकसानीत जातात आणि नंतर होणाऱ्या इतर कृषी महोत्सवात सहभागी होण्यास धजावत नाहीत. तसेच हा कृषी महोत्सव घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येते त्यातील इतर सदस्यांना देखील याबाबत अनभिज्ञ ठेवण्यात आले असल्याची चर्चा आहे. तसेच शासनाच्या इतर विभागचे स्टॉल असणे आवश्यक असताना काही स्टॉल दिसले नाहीत. त्यांना सहभागी होण्याबाबत पत्रव्यवहार केला गेला असला तरी सहभागी का केले गेले नाही हा संशोधनाचा विषय आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या मैदानावर हा कृषी महोत्सव होत असल्याने याला गर्दी आहे मात्र यात ग्रामीण भागातून किती आले? हे कळायला हवे. केवळ शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे तो खर्च करायचा आहे म्हणून खर्च होत असेल तर त्याचे मूल्यमापन करणारी यंत्रणा देखील असायला हवी.

या कृषी महोत्सवात झालेल्या अनेक परिसंवाद, चर्चासत्र कार्यक्रमाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे हे बोलके चित्र

कृषी महोत्सवाचा उद्देश :-

कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहोचविणे.
शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षमीकरण.
समुह/गट संघटीत करुन स्थापीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरीता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे.कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांचे माध्यमातुन विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातुन बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे.

कोणत्या दालनांना (स्टॉल्स) प्राधान्य द्यावे लागते

कृषि विभागाच्या विविध योजना (उदा. प्रधानमंत्री फसल बिमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, आत्मा, माहिती विभाग, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, रा.कृ.वि.यो, यांत्रिकीकरण),संबंधित विभागातील कृषी विद्यापीठ, (विस्तार व प्रशिक्षण)संबंधीत जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेचा कृषि विभाग (विविध लोक कल्याणकारी योजना),
महसूल विभाग ( सुवर्ण जयंती राजस्व अभियान, विविध लोक कल्याणकारी योजना), समाजकल्याण विभाग (विविध लोक कल्याणकारी योजना),आरोग्य विभाग- (म.फुले जनआरोग्य योजना),सामाजिक वनीकरण महासंचालनालय (वृक्ष तोड प्रतिबंध जनजागृती),जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ( विविध लोककल्याणकारी योजना),विविध संशोधन केंद्रे- (सुधारीत, संशेधित व विकसीत वाण व तंत्रज्ञान यांचा प्रचार प्रसार),विविध कृषी विज्ञान केंद्रे- (अव्यावसायिक लोककल्याणकारी उपक्रम),ग्रामीण विकास विभाग (विविध लोक कल्याणकारी योजना),स्वच्छ भारत अभियान, तंटामुक्ती अभियान यांना प्राधान्य द्यावे लागते. ते दिले गेले आहे का यातील किती स्टॉल आले नाहीत आणि का आले नाहीत याचा खुलासा प्रशासनाने करणे आवश्यक आहे.

कृषी महोत्सव निधीचा चुराडा, शेतकऱ्यांना फायदा झाला का तोटा? ज्याला टेंडर त्यालाच ३० स्टॉल विकले?

धाराशिव – धाराशिव येथे पोलिस मैदानावर होत असलेला कृषी महोत्सव शासकीय निधीचा चुराडा असून जवळपास ३० लाखांपेक्षा अधिकचा खर्च या महोत्सवावर झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती फायदा झाला? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
ज्या इव्हेंट कंपनीला या महोत्सवाचे काम देण्यात आले त्याच कंपनीला ३० स्टॉल विकण्यात आले होते त्या कंपनीने पुढे शेतकऱ्यांना अधिक किमतीने दिले असल्याची चर्चा आहे मात्र अधिकाऱ्यांनी असा कोणताच प्रकार घडला नसल्याची प्रतिक्रीया दिली.शासनाच्या नियमानुसार काही स्टॉल मोफत तर काही प्रायोजक स्वरूपात द्यावे लागतात मात्र आत्मा ने त्याचे वेगळे वेगळे दर ठरवले तसे ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्याबाबत कृषी आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते का? असे काही प्रश्न देखील अनुत्तरीत आहेत. जर स्टॉल चे दर अधिक असतील तर शेतकऱ्यांना, शेतकरी गटांना ते परवडत नाहीत परिणामी ते नुकसानीत जातात आणि नंतर होणाऱ्या इतर कृषी महोत्सवात सहभागी होण्यास धजावत नाहीत. तसेच हा कृषी महोत्सव घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येते त्यातील इतर सदस्यांना देखील याबाबत अनभिज्ञ ठेवण्यात आले असल्याची चर्चा आहे. तसेच शासनाच्या इतर विभागचे स्टॉल असणे आवश्यक असताना काही स्टॉल दिसले नाहीत. त्यांना सहभागी होण्याबाबत पत्रव्यवहार केला गेला असला तरी सहभागी का केले गेले नाही हा संशोधनाचा विषय आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या मैदानावर हा कृषी महोत्सव होत असल्याने याला गर्दी आहे मात्र यात ग्रामीण भागातून किती आले? हे कळायला हवे. केवळ शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे तो खर्च करायचा आहे म्हणून खर्च होत असेल तर त्याचे मूल्यमापन करणारी यंत्रणा देखील असायला हवी.

कृषी महोत्सवाचा उद्देश :-

कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहोचविणे.
शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षमीकरण.
समुह/गट संघटीत करुन स्थापीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरीता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे.कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांचे माध्यमातुन विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातुन बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे.

कोणत्या दालनांना (स्टॉल्स) प्राधान्य द्यावे लागते

कृषि विभागाच्या विविध योजना (उदा. प्रधानमंत्री फसल बिमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, आत्मा, माहिती विभाग, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, रा.कृ.वि.यो, यांत्रिकीकरण),संबंधित विभागातील कृषी विद्यापीठ, (विस्तार व प्रशिक्षण)संबंधीत जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेचा कृषि विभाग (विविध लोक कल्याणकारी योजना),
महसूल विभाग ( सुवर्ण जयंती राजस्व अभियान, विविध लोक कल्याणकारी योजना), समाजकल्याण विभाग (विविध लोक कल्याणकारी योजना),आरोग्य विभाग- (म.फुले जनआरोग्य योजना),सामाजिक वनीकरण महासंचालनालय (वृक्ष तोड प्रतिबंध जनजागृती),जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ( विविध लोककल्याणकारी योजना),विविध संशोधन केंद्रे- (सुधारीत, संशेधित व विकसीत वाण व तंत्रज्ञान यांचा प्रचार प्रसार),विविध कृषी विज्ञान केंद्रे- (अव्यावसायिक लोककल्याणकारी उपक्रम),ग्रामीण विकास विभाग (विविध लोक कल्याणकारी योजना),स्वच्छ भारत अभियान, तंटामुक्ती अभियान यांना प्राधान्य द्यावे लागते. ते दिले गेले आहे का यातील किती स्टॉल आले नाहीत आणि का आले नाहीत याचा खुलासा प्रशासनाने करणे आवश्यक आहे.

शेतकरी चिठ्ठीत तुमचं नाव लिहून आत्महत्या करतो अन् तुम्ही शेतकऱ्याचा कळवळा असल्यासारखं दाखवता – नितीन काळे यांचा खा. राजेनिंबाळकर यांच्यावर घणाघात

जो तेरणा कारखाना निवडणूक लढवून ताब्यात घेतला ७२ शेतकऱ्यांना कारखान्याच्या कर्जापोटी जमिनी विकाव्या लागल्या, पोटाला चिमटा लावून शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडले, त्यावेळी तेरणा कारखाना कोणाच्या ताब्यात होता? तुमचा खंदा शेतकरी कार्यकर्ता कर्जापोटी जमीन कारखान्याला देतो त्याच्या लिलावाच्या उद्वेगाने त्याच्या चिठ्ठीत तुमचं नाव लिहून आत्महत्या करतो अन् तुम्ही शेतकऱ्याचा कळवळा असल्यासारखं दाखवता असे म्हणत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर जोरदार घणाघात केला. खा. राजेनिंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खा. राजेनिंबाळकरांनी बाष्कळ बडबड थांबवावी, पुतना मावशीचे प्रेम आणि मगरीचे अश्रू दाखवू नये, महायुतीच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद पाहून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.
पाच वर्षांपूर्वी खा. राजेनिंबाळकर यांनी आपलं संसदेतील पहिलं भाषण ऐकावं मोदी साहेब मोदी साहेब जप किती वेळा केला हे देखील पहावं असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच राम मंदिराच्या प्रतिष्ठापणेवरून केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध केला. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील, रामदास कोळगे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

शेतकरी चिठ्ठीत तुमचं नाव लिहून आत्महत्या करतो अन् तुम्ही शेतकऱ्याचा कळवळा असल्यासारखं दाखवता – नितीन काळे

जो तेरणा कारखाना निवडणूक लढवून ताब्यात घेतला ७२ शेतकऱ्यांना कारखान्याच्या कर्जापोटी जमिनी विकाव्या लागल्या, पोटाला चिमटा लावून शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडले, त्यावेळी तेरणा कारखाना कोणाच्या ताब्यात होता? तुमचा खंदा शेतकरी कार्यकर्ता कर्जापोटी जमीन कारखान्याला देतो त्याच्या लिलावाच्या उद्वेगाने त्याच्या चिठ्ठीत तुमचं नाव लिहून आत्महत्या करतो अन् तुम्ही शेतकऱ्याचा कळवळा असल्यासारखं दाखवता असे म्हणत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर जोरदार घणाघात केला. खा. राजेनिंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खा. राजेनिंबाळकरांनी बाष्कळ बडबड थांबवावी, पुतना मावशीचे प्रेम आणि मगरीचे अश्रू दाखवू नये, महायुतीच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद पाहून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.
पाच वर्षांपूर्वी खा. राजेनिंबाळकर यांनी आपलं संसदेतील पहिलं भाषण ऐकावं मोदी साहेब मोदी साहेब जप किती वेळा केला हे देखील पहावं असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच राम मंदिराच्या प्रतिष्ठापणेवरून केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध केला. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नेताजी पाटील, रामदास कोळगे, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

आरोग्य विभागाच्या बांधकामांना शासनाचा छदाम देखील उपलब्ध नाही – मकरंद राजेनिंबाळकर

धाराशिव – गेल्या काही दिवसात जिल्ह्यात उद्घाटने झालेल्या आरोग्य विभागाच्या बांधकामांना शासनाचा छदाम देखील उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप शिवसेना ( उबाठा) चे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी शिवसेना तालुकास्तरीय कार्यशाळेत केला. त्यांच्या या गंभीर आरोपानंतर जिल्ह्याला विकासाच्या नावावर केवळ नारळ मिळाला असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
तसेच जिल्ह्यात जी आरोग्य शिबिरे घेतली त्यात दिली गेलेली औषधे जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयातून घेतली गेली मात्र शिबिरासाठी औषधाची वेगळी तरतूद न केली गेल्याने औषधांचा तुटवडा होऊन रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागला.

या कार्यशाळेत बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी भाजप च्या धोरणावर जोरदार प्रहार केला.
विधानसभा अध्यक्षांनी खोटारडेपणा करत निकाल दिला आहे, यापूर्वी राज्यातील राजकारण कधीही असे झाले नव्हते, सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा जनतेपर्यंत पोहोचवा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले. सध्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. धाराशिव शहरातील स्वच्छतेवरून देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.नेत्यांना बदनाम करून फोडाफोडी करून मत मागितली जातील त्यापासून सावध रहा असा सल्ला देखील उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी यावेळी दिला.
या कार्यशाळेत जिल्हा प्रमुख आ. कैलास पाटील यांनी देखील राज्य सरकार आणि विरोधकांवर चांगला निशाणा साधला. मूलभूत विषय बाजूला ठेवून मराठा ओबीसी वाद  लावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये जात असताना मोठ्ठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन प्रधांमंत्र्यांनी दिले होते तो प्रकल्प कुठे आहे हे देखील सत्ताधाऱ्यांना विचारा, जिल्ह्यात पाच हजार कोटींची कामे आणली म्हणून सत्कार करून घेतला ती कामे कुठे आहेत हे देखील सत्ताधाऱ्यांना येत्या काळात विचारा असे आ. कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले.

या कार्यशाळेला सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, युवासेना राज्य विस्तारक अक्षय ढोबळे, युवासेना सहसचिव मनीषा वाघमारे, पंचायत समिती माजी सभापती शाम जाधव, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, गणेश खोचरे,रवी वाघमारे, दयानंद येडके, बाळासाहेब काकडे तसेच धाराशिव शहरासह तालुक्यातील सर्व गटप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, आदींसह, शिवसैनिक उपस्थित होते.

ओबीसींचा मेळावा २४ जानेवारीलाच होणार, ओबीसी मध्ये कुठलीही कोअर कमिटी नाही – अर्जुन सलगर

धाराशिव – ओबीसींचा मेळावा २४ जानेवारीलाच होणार आहे त्याबाबत प्रकाश अण्णा शेंडगे, टी.पी.मुंडे यांच्याशी चर्चा झाली असल्याचा खुलासा सम्राट मौर्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर यांनी केला.
24 जानेवारी ला मेळवा होणार नसल्याबाबत नवनियुक्त ओबीसी कोअर कमिटीच्या खुलाश्याचे त्यांनी खंडन केले तसेच ओबीसी मध्ये कुठलीही कोअर कमिटी नसून त्यातील लोक आमच्या संपर्कातील नाहीत ठरलेल्या कार्यक्रमात कुठलाही बदल होणार नसून सकल ओबीसी समाज हाच या मेळाव्याचा आयोजक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच याबाबत पत्रकार परिषद घेण्याचा विचार असून त्यात सर्व काही सांगितले जाईल असेही अर्जुन सलगर यांनी सांगितले.

तिघांनी घेतली २ हजाराची लाच, वाशी पोलिस ठाण्यातील २ पोलिस शिपाई एका खाजगी इसमावर लाचलुचपतची कारवाई

धाराशिव –
तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी लाचमागणी करून स्वीकारल्याने तिघांविरोधत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की,
तक्रारदार यांचेविरुद्ध वाशी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये यातील आरोपी क्रमांक तानाजी त्रिंबक तांबे यांनी यातील तक्रारदार यांना तुमच्या विरुद्ध 107 प्रमाणे प्लेन चॅप्टर / किरकोळ कारवाई करण्यासाठी बिट अंमलदार यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी किरकोळ कारवाईचा रिपोर्ट पाठविला आहे. त्या बदल्यात व तक्रारदार यांचे पत्नीस समजावून सांगून सदरची तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी लाचमागणी करण्यात आली होती. पडताळणी दरम्यान आरोपी तानाजी त्रिंबक तांबे यांनी आरोपी रणजित अनिल कासारे यांचेकरवी पंचा समक्ष २०००/-रुपये लाचेची मागणी केली.
सापळा कारवाई दरम्यान आरोपी तानाजी त्रिंबक तांबे याने लाचेची रक्कम खाजगी इसम आरोपी पवन राजेंद्र हिंगमिरे यांच्याकडे देण्यास सांगितले असता आरोपी पवन राजेंद्र हिंगमिरे यांनी सदर २०००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने सदर ०२ आरोपी लोकसेवक व ०१ खाजगी इसम यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सापळा अधिकारी म्हणून नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक काम पाहिले तर
सापळा पथकात – पोलीस अमलदार सिद्धेश्वर तावसकर , अविनाश आचार्य यांचा समावेश आहे.

आरोपींमध्ये यांचा समावेश

-तानाजी त्रिंबक तांबे , वय 28 वर्षे, पोलीस शिपाई ब. नं. 260, नेमणूक पोलीस ठाणे वाशी, ज़ि. धाराशिव ( वर्ग -3-)

  1. रणजित अनिल कासारे, वय 31 वर्षे, पोलीस शिपाई ब. नं. 514, नेमणूक पोलीस ठाणे वाशी, ज़ि. धाराशिव ( वर्ग -3-)
  2. पवन राजेंद्र हिंगमिरे, वय 26 वर्षे, रा. झिन्नर, ता. वाशी, ज़ि. धाराशिव ( खाजगी ईसम )

धाराशिव जिल्ह्यात 15 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी

धाराशिव जिल्ह्यात 15 जानेवारी 13 फेब्रुवारी या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी असणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत हे सण साजरा होणार आहे. दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. दिनांक 18 जानेवारी2024 ते दिनांक 26 जानेवारी2024 या कालावधीत श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. दिनांक 24 जानेवारी2024 ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधीत श्री खंडोबा यात्रा मैलापूर नळदुर्ग ता. तुळजापूर येथे संपन्न होणार आहे. दिनांक 20 जानेवारी 2024 ते दिनांक 24 जानेवारी 2024 या कालावधीत परंडा शहर ता. परंडा येथे हजरत ख्वॉजा बद्रीद्दीन चिस्ती दर्गा उरुस संपन्न होणार आहे. दिनांक 24 जानेवारी 2024 ते दिनांक 02 फेब्रुवारी 2024 या कालावधीत धाराशिव शहर ता, धाराशिव येथे हजरत ख्वॉजा शम्सोद्दीन गाजी दर्गा उरुस संपन्न होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष संघटना यांचे कडून आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिकविमा व नुकसान भरपाईची देय रक्कम मिळावी आणि इतर मागण्या अनुषंगाने शेतकरी तसेच विविध पक्ष / संघटना यांचे कडून धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, बंद, निदर्शने, तालाठोको व रास्तारोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात पर्यन्यमान कमी झाल्याने विविध पक्ष / संघटना व शेतकरी संघटना यांचे कडून धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीकरीता आंदोलने होत आहेत. धाराशिव जिल्हयात ग्रामीण / शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा / जत्रा / ऊरुस लहान मोठया स्वरुपात साजरे करण्यात येतात. व्यक्ती, व्यक्ती समुह तसेच विविध पक्ष/संघटना यांचे वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी अचानकपणे अंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संपन्न होणारे धार्मिक सण उत्सव, कार्यकम च यात्रा/जत्रा ऊरुस तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2024 रोजीचे 00:01 पासून ते दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी 24:00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात जारी होणार आहेत.

या कालावधीत शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत.

2) लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तु बाळगणार नाहीत.

3) कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत.

4) दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडक्याची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.

5) आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.

6) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत.

7) व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत.

8) पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक / मोर्चा काढता येणार

उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरीता लागू होणार नाहीत

1) अंत्ययात्रा

2) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी

3) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी

4) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी

प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही

आणखी वाचा

पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले