Home Blog Page 49

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची परंडा येथे आढावा बैठक संपन्न;परंडा तालुक्यातुन ओमप्रकाश राजेनिबांळकर यांना जास्तीची लीड देऊन पुन्हा लोकसभेत पाठवा-सुनिल काटमोरे

परंडा (प्रतिनिधी) – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत अधिकृत उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख सुनिलजी काटमोरे,शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परंडा येथे दि८एप्रिल रोजी परंडा तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेना शाखा प्रमुख,वार्ड प्रमुख,बुथ प्रमुख,शिवसैनीक यांची आढावा बैठक पार पडली.
या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख सुनिलजी काटमोरे,जिल्हा प्रमुख रणजीत पाटील,तालुका प्रमुख मेघराज पाटील यांनी उपस्थित शिवसैनिकाना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उस्मानाबाद लोकसभेचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश
राजेनिबांळकर यांना परंडा तालुक्यातुन जास्ती जास्त मताची लीड देऊन पुन्हा लोक सभेत पाठवा असे अवाहाण केले.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन,शिवसेना समन्वयक जनार्धन मेहेर,माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे,शिवसेना शहरप्रमुख रईस मुजावर,माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी,शिवसेना महीला आघाडी तालुका संघटक छायाताई जोगदंड,शिवसेना उप तालुका प्रमुख दिलाप रणभोर, उप तालुका प्रमुख रमेश गरड, उप तालुका प्रमुख शिवाजी कासारे,उप तालुका प्रमुख बुध्दीवान गोडगे,उप शहर प्रमुख उमेश परदेशी,विजय खरसडे, सुदाम देशमुख,हरि नलवडे, किरण शिंदे,अनिकेत काशिद, जावेद बागवान,दिपक गायकवाड,शाहु खैरे,अशोक गवारे,शिवाजी देवकर,सागर ठवरे,बिभिषण घोगरे,प्रदिप नेटके,भगवंत लांडगे,आब्बास मुजावर,बाबुराव गायकवाड, संजय कदम,तुषार पाटील, भास्कर शिंदे,दादा होरे,मकरंद जोशी,संतोष गायकवाड,प्रशांत गायकवाड,संजय वाघ,सुहास कदम,रावसाहेब काळे,संतोष करळे,महेश करळे,सत्तार पठान यांच्यासह परंडा तालुका व परंडा शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख/वार्डप्रमुख /बुथप्रमुख व निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा अन् औषधे घेण्यासाठी बाहेर पळा!शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुटवडा!!

धाराशिव – वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यातील अडचणी दूर होताना दिसत नाहीत. भौतिक सुविधांचा अभाव तर आहेच मात्र सध्या उन्हाळा सुरू आहे त्यासाठी आवश्यक असणारे जंतनाशक गोळी व ओ.आर.एस. पावडर सारखे औषध उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
६ वर्षाच्या चिमुरडीला तिचे वडील आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोट दुखू लागल्यामुळे घेऊन गेले होते. मुलीस डॉक्टरांनी दिलेल्या औषधापैकी फक्त एकच गोळी मिळाली. मात्र जंताची गोळी आणि ओ आर एस पावडर मात्र बाहेरून घेण्यास सांगितले.

उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यावर महाविद्यालयाची पूर्वतयारी नसेल तर रुग्णाची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औषधाच्या अनुपलब्धतेबाबत अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी औषध उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. मात्र औषधासाठा पुरेसा रहावा यासाठी शासनाने निधी देऊनही तुटवडा का होतो? रुग्णांना बाहेरून औषधे का खरेदी करावी लागतात हा संशोधनाचा विषय आहे.

1170 शेतक-यांच्या नावे बनावट सातबारे व 8 अ उतारे तयार करून 2994.54 हेक्टर जमीनीवर उतरवला विमा 15 कोटी,68 लाख 15,156 निधीचा अपहार २४ जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये बीड जिल्हयातील १६ ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, छत्रपती संभाजीनगर, जिल्हयातील दोन ऑनलाईन चालकाने, परभणी जिल्हयातील दोन ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, नांदेड जिल्हयातील एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, सोलापुर जिल्हयातील एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, धाराशिव जिल्हयातील एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी व अज्ञात एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी अशा एकुण २४ ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शासकिय जमीनीवर भाडेकरार/संमंतीपत्र नसताना धाराशिव जिल्हयातील एकुण २९९४.५४ हेक्टर शासनाच्या मालकिच्या जमीनीवर ११७० शेतकऱ्यांच्या नावावर शासनाची व विमा कंपनीची फसवणुक करून शासकिय निधी हडप करण्याचे उद्देशाने शासकिय जमिनीचा वापर करून पिक विमा हप्ता भरलेला आहे.
बीड जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 1) संग्राम प्रभु मुरकुटे रा. मुरकुटवाडी ता. जि. बीड 2) चाटे राहूल शिवाजी खापरटोने ता. आंबेजोगाई जि. बीड3) रवि नारायण पुरी घाटनांदूर ता. आंबेजोगाई जि. बीड4) लक्ष्मण विनायक आघाव रा. अबेगाव ता. माजलगांव जि. बीड 5) महादेव गणपती वरकले रा. पहाडी पारगाव ता.धारुर. जि. बीड 6) कृष्णा बालाजी आंधळेरा, हेळंब ता. परळी जिल्हा बीड 7) महेश सोमनाथ बुरांडे धर्मापुरी ता. परळी जि. बीड8) गजानन व्यंकट होळंबे रा. हेळंब ता. परळी जिल्हा बीड 9) अजय दत्तात्रय गुट्टे, हेळंब ता. परळी जिल्हा बीड 10) विश्वनाथ व्यंकट आघाव हेळंब ता. परळी जिल्हा बीड 11) अमर सुभाषराव देशमुखे ता. परळी जि. बीड 12) धनराज महादेव होळंबे रा. हेळंब ता. परळी जिल्हा बीड 13) रविंद्र दामोदर मुंढेरा. लिंबुटा ता. परळी जिल्हा बीड14) नंदनी रावसाहेब होळंबे रा. परळी ता. परळी जि. बीड 15) विष्णु महादेव नागरगोजेरा. नागदरा ता. जि. बीड 16) विजय गिरधारी फड रा. धर्मापुरी ता. परळी जि. बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 17) कृष्णा राम आंधळे रा. धनवत ता. सोयगाव जि. औरंगाबाद 18) कुणाल जयदेव मुळे रा. वडगांव कोल्हाटी ता. सोयबांव दि. औरंगाबाद व परभणी जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 19) संदेश वैजीनाथ मुंढे रा. आंतरवेली ता. गंगाखेड जि. परभणी 20) धनराज उत्तम चैधर रा. पराढ्वाडी ता. परभणी ता. जि. परभणी व नांदेड जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 21) रघुनाथ प्रभु घोडके रा. धनोरा (मुक्ता) ता. लोहा जि. नांदेड व सोलापुर जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 22) नावजी सौदागर अनभुले रा. उपळाई खु ता. माढा जि. सोलापुर धाराशिव जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 23) भोगील पांडूरंग जयराम रा. दांडेगाव ता. भुम 24) अज्ञात ऑनलाईन सेवा केंद्र व ऑनलाईन सेवाकेंद्राचे चालक यांनी धाराशिव जिल्हयातील 2994.54 हेक्टर जमीन ही शसनाच्या मालकीची आहे. ती शेतक-यांच्या मालकीची नाही अथवा शासकिय जमीनीवर भाडेकरार/संमंतीपत्र केलेले नाही, हे माहित असताना सुध्दा, ती 1170 शेतक-यांच्या नावे बनावट सातबारे व 8 अ उतारे तयार करून, ते खरे आहे असे दाखवून, शासनाची फसवणूक करून प्रत्येकी पिक विमा हप्ता (प्रिमियम) रु. 1/- असे 1170 शेत-यांचे ऑनलाईन अर्ज सादर केले. त्यामुळे शासनाने रू. 3,13,71,635.50/- एवढी रक्कम विमा कंपनीला विमा हप्ता (प्रिमीयम) स्वरूपात अदा केल्यामुळे शासनाची
गैरहानी झालेली आहे. तसेच त्यावर पिक संरक्षित होणारी एकुण रक्कम रू. 15,68,15,156/- एवढा शासकीय निधीचा अपहार करण्याचे उद्देशाने बनावट दस्तऐवज बनवून, बनावट नोंदी घेऊन सदरची रक्कम अपहार करण्याचा प्रयत्न केला आहे. वैगेरे फिर्याद जबाबवरुन वरीष्ठआंच्या आदेशाने गुन्हा दाखल करुन एस. डीपीओ सो यांच्या आदेशाने पुढील तपास पोनि आर्थीक गुन्हे शाखा श्रीगणेश एस. कानगुडे यांच्याकडे देण्यात आला.

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज

  • कोल्ड रूमची स्थापना
  • मुबलक औषधी साठा उपलब्ध

धाराशिव दि 31( प्रतिनिधी) जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे.त्यामुळे उन्हाचा तडाखा देखील वाढत आहे. जिल्ह्यात वाढते तापमान व पुढील महिन्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची दृश्यप्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली.यामध्ये उष्माघाताच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व आरोग्य संस्थांनी नागरिकांना योग्य उपचार व उष्माघाताबाबत काळजी घेण्याबाबतचे आरोग्य शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यात 5 ग्रामीण रुग्णालये, 6 उपजिल्हा रुग्णालये,44 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 2 शहरी आरोग्य केंद्र येथे कोल्ड रूम स्थापन करण्यात आलेल्या आहेत.उष्माघाताच्या उपचारासाठी मुबलक औषधी साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. जिल्हयात उष्माघाताबाबत उपाय योजनेसाठी टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे. सर्व आरोग्य संस्थांना प्रसिद्ध साहित्य देखील देण्यात आले आहे.
नागरिकांनी उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर टोपी, रुमाल व छत्रीचा वापर करणे,हलक्या रंगाचे, पातळ सुती कपडे वापरणे,लहान मुले व गरोदर माता वृद्ध यांचे विशेष काळजी घेणे घ्यावी. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत घराभार जाणे टाळावे.असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिदास व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुल्ला यांनी नागरिकांना केले आहे.

कपड्यांची वाहतूक करणाऱ्या कंटनेरला लागली आग लाखोंचा माल जळून खाक

दहिफळ (योगराज पांचाळ)
कळंब तालुक्यातील दहिफळ- परतापूर रस्त्यावर रात्रीच्या अकराच्या सुमारास रेडीमेड कपड्यांची वाहतुक करणाऱ्या कंटेनरला आग अचानक आग लागली यामध्ये लाखोंचा माल जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, सोलापूरहून अंबाजोगाई कडे जाणारा कंटनेर दहिफळ परतापूर मार्गे कळंब कडे जात होता.बाभळगाव येथे ड्रायव्हरचे नातेवाईक होते जाता जाता भेटावे म्हणून या मार्गे रेडीमेड कपड्यांनी भरलेली गाडी रस्त्याने जात असताना गाडी रस्त्याच्या कडेला गेली गाडी वर घेताना टायर गरम होऊन टायरने पेट घेतला.पत्रा गरम झाल्यामुळे आतील कपड्याला आग लागली.काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले गाडी पेटली.रात्रीची वेळ होती.जवळ वस्ती असल्यामुळे काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली जवळ शेतात असलेले बोअर चालू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात आली नाही.
घटनेची माहिती मिळताच
वैभव काळे, तात्या भातलवंडे, मनोज गोरे,वैभव गायकवाड, गोपाळ शिंदे समाधान वाघमारे अतुल वाघमारे यांच्यासह
परतापुर दहिफळ बाभळगांव च्या २५-३० तरुणांनी तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात येण्याजोगी नसल्याचे लक्षात येताच तुषार वाघमारे यांनी फोन करून पोलीस व अग्निशामक दलास पाचारण केले.
कळंब नगरपालीकेचे कर्मचारी महादेव हाजगुडे व गजानन जाधवर यांनी वेळीच धावून येत आग्निशामकच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.परंतू कपड्यांची राख रांगोळी झाली होती.लाखोंचा माल जळून खाक झाला आहे.
गाडीच्या आसपास मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे, कडब्याच्या गंजी, सोलारपंप होते अग्नीशामक गाडी वेळीच आल्यामुळे मोठ्याप्रमाणात हानी टळली.

शासन निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन सहायक समाज कल्याण आयुक्त बी.जी. अरवत यांच्यावर गुन्हा दाखल!

धाराशिव – शासन निर्णय तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे सहायक समाज कल्याण आयुक्त बी.जी. अरवत यांना महागात पडले असून त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की,
२५ मार्च रोजी जिवे मारण्याचा प्रयत्न व हिंदु मुस्लीम जातीय दंगलीचा गंभीर गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा सत्र न्यायालयात चालणारा व त्यास 07 वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेला गुन्हा घडल्याने व गंभीर गुन्हयात व सत्र न्यायालयात चालणारे गुन्हयात शासकिय पंच घेणे बाबत शासन निर्णय आहे.त्याच शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी दैनंदिन वार ठरवुन देवुन त्या बाबत त्यामध्ये नमुद दैनंदिन ठरवुन दिलेल्या वार प्रमाणे कार्यालय प्रमुखानी त्यांचे अधिनस्त कर्मचाऱ्यांना ठरवुन दिलेल्या आठवडयातील नियमानुसार पोलीस ठाण्यास दाखल झालेल्या गंभीर गुन्हयाचे तपासकामी, गुन्हयातील जप्ती पंचनामा, घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी मानसिक व शारीरीक दृष्ट्या सक्षम असलेले दोन शासकिय कर्मचारी पंच म्हणुन उपलब्ध करून देण्यात यावे असे परिपत्रक आदेश आसल्याने व आठवडयातील मंगळवार हा दिवस समाज कल्याण अधिकारी, कार्यालय धाराशिव यांचा दिवस/वार होता.
बीट अंमलदार पोहेकाँ/379 गलांडे, 872 पाटील दोघे ने.पो.स्टे. धाराशिव शहर याना समाज कल्याण अधिकारी, कार्यालय धाराशिव येथे ठरवुन दिलेला मंगळवार हा वार असल्याने पाठविण्यात आले होते. सहा. आयुक्त बी.जी. अरवत यांनी गंभीर गुन्हयाचे तपासकामी दोन शासकिय पंच उपलब्ध करून देणे बाबत मुलःत असे कर्मचारी पुरविण्याबाबत तरतुद नसल्याचे उलट टपाली लेखी पत्र देवुन शासकिय पंच पुरविले नाही त्या मुळे आम्ही या गंभीर गुन्हयाचे घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा करणे कामी ऐनवेळेस खाजगी पंच उपलब्ध करून त्यांचे समक्ष पंचनामा केला. सदर गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने व शासनाचे आदेश असताना सुध्दा समाज कल्याण सहा. आयुक्त बी.जी. अरवत समाज कल्याण धाराशिव यांनी शासकिय पंच पुरविले नाही. त्यानी शासनाचे आदेशाचे व जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे आदेशाचे अवमान करून आदेशाचे उल्लंघन केले त्यामुळे फिर्यादी नामे दिनेश उत्तमराव जाधव सपोनि पोलीस ठाणे धाराशिव यांनी दि २८ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 188, 187 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

गृह विभागाचा शासन निर्णय काय सांगतो
एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपासी अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्याच्यावेळी उपस्थित असलेल्या पंचाचे जबाब खटल्याच्या सुनावणी दरम्यान महत्वपुर्ण ठरत असतात. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीस येण्याकरिता काही प्रकरणांमध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो. तपासी अधिका-याने तत्कालीन परिस्थितीत उपस्थितीत केलेले पंच सुनावणी दरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते. पंच फितूर झाल्यामुळे ब-याचश्या गंभीर गुन्हयांमध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषारोपसिध्दीचे प्रमाणे घटत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. गुन्हयाच्या तपासादरम्यान पंच म्हणुन सरकारी कर्मचा-यांची सेवा घेतल्यास सुनावणी दरम्यान पंच फितुर होण्याची शक्यता फार कमी राहिल यासाठी गृह विभागाने शासन निर्णय काढला आहे.
पंच फितुर होऊन दोषारोपसिध्दीचे प्रमाण कमी होणा-या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने सात वर्षे किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्हयांमध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

२. ज्या गुन्हयामध्ये सात वर्षे किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा नमूद केली असेल अशा प्रकरणांमध्ये तपासी अधिकारी यांनी शक्यतोवर सरकारी कर्मचा-याची पंच म्हणून सेवा घ्यावी.

३. सदरची सेवा पंच म्हणून घेताना ज्या परिसरामध्ये खटल्याची सुनावणी होणार आहे त्या परिसरात वास्तव्य असणा-या सरकारी कर्मचा-यास पंच म्हणून घ्यावे जेणेकरुन खटल्याच्या सुनावणीदरम्यान सदर पंचास उपस्थित राहणे सुलभ होईल.

४. पंच म्हणून घेत असलेल्या सरकारी कर्मचा-याचे चारित्र्याबाबत प्रथम मौखिक स्वरुपात तपास अधिका-याने खातरजमा करुन घ्यावी.

५.एकाच सरकारी कर्मचा-यास अनेक गुन्हयांत वारंवार पंच म्हणून घेण्यात येवू नये.

६. गुन्हयातील फिर्यादी व आरोपी यांचे नातेवाईक असलेल्या सरकारी कर्मचा-यास पंच म्हणून घेण्यात येवू नये.

४ हजाराची लाच स्वीकारली, मंडळ अधिकारी लाचलुचपत च्या ताब्यात


धाराशिव –
मुरुमाची रॉयल्टी न भरुन घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी,तलाठी यांना कारवाई न करण्यासाठी ४ हजाराची लाच स्वीकारताना मंडळ देवानंद मरगु कांबळे  वय 51 वर्षे , मंडळ अधिकारी (वर्ग-३), येरमाळा सर्कल, ता.कळंब, जि.धाराशीव. यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
मौजे चोराखळी येथील देवस्थान जमिन गट क्रमांक 639/1 मधील 50 ब्रास मुरूम रॉयल्टी न भरुन घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी तसेच संबंधित तलाठी यांना कारवाई न करणे बाबत सांगणे करिता तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 4000/-रुपये लाचेची मागणी करून 4000/- रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी विकास राठोड, पोलिस निरीक्षक यांनी काम पाहिले तर
सापळा पथकात – पोलीस अमलदार मधुकर जाधव , विशाल डोके यांचा समावेश आहे.

दगडफेकीत २३ जणांवर गंभीर गुन्हे दाखल

धाराशिव – २५ मार्च रोजी धाराशिव शहरात झालेल्या दगडफेकीत पोलिसांनी संशियातंची धरपकड सुरू केली असून सीसीटिव्ही आणि इतर फुटेज पाहून २३ जणांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.आरोपी नामे-1)वसीम दस्तगीर शेख, 2) हज्जु शेख, रा. तालीम गल्ली, 3) अमीर उर्फ हमदू शेख, 4) मोहसीन शेख, 5) फैय्याल ईस्माईल काझी, 6) जमीर सिटी फर्निचरवाला, 7)हाजी मलंग सत्तार सय्यद उर्फ निहाल, 8) नवीद शेख रा. खाजानगर गल्ली नं 19 धाराशिव, 9) अरबाज पठाण रा. एकमिनार मस्जीदजवळ, 10) आलीम कुरेशी, 11) अरबाज शेख, 12) सलीम शेख लिमरा हॉटेलवाला, 13) गौस शेख यांचे सह 100 ते 125 इसम सर्व रा. खाजा नगर धाराशिव, 14) सागर भांडवले, 15) सौरभ काकडे, 16) निलेश साळुंके, 17) हनुमंत यादव, 18)ओमकार शामराव कोरे, 19)विनय, 20) बापू देशमुख, 21) राहुल बबन भांडवले, 22) राज निकम, 23) मनोज जाधव व यांचे सह 70 ते 80 इसम सर्व रा. गणेश नगर धाराशिव यांनी दि. 25.03.2024 रोजी 20.45 वा. सु. गणेश नगर धाराशिव येथे बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना त्यांचा जमाव हा बेकायदेशीर असुन तेथुन शांततेत निघून जाण्याबाबत समजावून सांगूनही तेथुन निघून न जाता दगड, विटा, फरशीच्या तुकडे व काचेच्या बाटल्या एकमेकांवर पोलीस पथकावर व खाजानगर आणि गणेशनगर परिसरातील राहणारे नागरिकांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक करुन शासकीय वाहन व जनतेच्या वाहनांचे नुकसान केले व आरडा ओरडा व शिवीगाळ केल्याने जनतेत दहशत निर्माण झाली. तसेच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार यांना जखमी करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संदिप ओहोळ पोलीस उप निरीक्षक नेमणुक धाराशिव शहर पोलीस ठाणे यांनी दि.26.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 336, 109, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वारदवाडी-परंडा राज्यमार्गाच्या कामाकडे सार्वजनीक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष


साईड पट्टयाचे खोदकाम अंदाजपत्रका प्रमाणे न करता साईडपट्टयात माती मिश्रीत मुरूम टाकून साईड पट्टयाची दबाई!


सोनगीरीच्या पुलाजवळ रस्ता रुंदीकरणासाठी मातीचा वापर!


परंडा( भजनदास गुडे )गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या वारदवाडी ते परंडा काशीमबाग पर्यंतच्या रस्त्याचा ठेका धुळे येथिल देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला असुन सदर रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
       ठेकेदार यांच्या कडून अंदाज पत्रकाप्रमाणे रस्त्याचे कम करण्यात येत नसुन थातूर मातूर काम करण्यात येत आहे.सोनगीरी नदी पुलाल गदच्या वळणावर रस्त्याचे रुंदीकर करण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला आहे.या गंभीर बाबीकडे परंडा सार्वजनीक बांधकाम विभागा कडून दूर्लक्ष केले जात आसल्या मुळे प्रवाशातून आश्चर्य व्यक्त केल जात आहे.
            सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या कामाकडे जानीव पूर्वक दुर्लक्ष का?करीत आहेत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक व प्रवाशी नागरिकांतून  होत आहे.
         तसेच अंदाजपत्रका प्रमाणे रस्त्याची साईड पट्टयाची खोली ४९ सेंटीमीटर खोदकाम करून  हार्ड मुरूम भरणे गरजेचे असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्टीचे खोदकाम अंदाज पत्रकाप्रमाने न करता अपूर्ण खोदकाम करून माती मिश्रीत मुरूम टाकुन दबाई करण्यात येत आहे.
         अंदाजपत्रका प्रमाणे रस्त्याचे काम करून घेण्याची जबाबदारी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची असताना त्यांच्या कडून दर्जाहीन होत असलेल्या रस्त्याच्या कामाकडे जानीव पुर्वक दुर्लक्ष होत आसल्याचे दिसत आहे.
            रस्त्याचे काम अंदाज प्रत्रकानुसार न झाल्यास शासनाचे कोट्यावधी रुपये वाचा जाऊन काही वर्षात रस्ता पुन्हा खराब होऊन त्याचा वाहनधारक व प्रवाशाना त्रास सहन करावा लागनार आहे.
           या रस्ता कामाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाची पाहणी करून अंदाजपत्रका प्रमाने काम करून घ्यावे अशी मागणी वाहाणधारक व प्रवाशी नागरीकातुन होत आहे.

तूळजापूर येथे ड्रायव्हरनेच मारला ८५ लाखावर डल्ला,आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथक रवाना 



तुळजापूर – (ज्ञानेश्वर गवळी)
तुळजापूर शहरातील एचडीएफसी बँक येथील एटीएम मध्ये  कॅश भरण्यासाठी आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरने महिंद्रा बोलेरो चार चाकी वाहनांमध्ये हवा भरतो म्हणून गाडी घेऊन जाऊन गाडीसह तब्बल ८५ लाख रुपये घेवून पसार झाल्याची  घटना शहर दि.२२ मार्च रोजी घडली आहे. या बाबत तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे . पोलिसांनी विविध ठिकाणी तीन पोलीस पथक रवाना केली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळत आहे .

या बाबत पोलिस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील एच डी एफ सी बँक येथे हिताची या कंपनीची बोलेरो गाडी क्रमांक MH -04 -JK – 4407 हे वाहन दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कॅश भरण्यासाठी आली होती .सदर गाडीमध्ये ड्रायव्हर सह,अन्य तीन जण होते. तीन  कर्मचारी कॅश भरण्यासाठी एच डी एफ सी बँक येथील ए टी एम मध्ये गेले असता ड्रायव्हर यांनी महिंद्रा बोलेरो या गाडीत हवा भरून येतो म्हणून संधीचा फायदा घेत गाडी व रोख रक्कम अंदाजे ८५ लाख रुपये घेऊन फरार झाला .सदर प्रकार तिन्ही कर्मचारी यांच्या लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरला शोधाशोध केल्यानंतर ड्रायव्हर सापडत नसल्याने  अखेर त्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली सदर घटनेची माहिती दिली.

तेव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ .निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली व सदर गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदर गाडी तुळजापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर पांडुरंग नगर येथे सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मिळून आली .सदर गाडीजवळ कोणीही नसल्याचे दिसून आले गाडीची झाडाझडती घेतली असता  ड्रायव्हर  फरार असल्याचे दिसून आले तर गाडी मधील वेगवेगळ्या एटीएमला पैसे भरण्यासाठी आणलेली कॅश तब्बल अंदाजे ८५ लाख रुपये गाडी चालक  घेऊन फरार झाल्याचे  निदर्शनास आले .

वैभव शंकर वय २५ वर्ष कॅश मॅनेजमेंट अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे ड्रायव्हर सचिन विलास पारसे व अन्य एक तरुण राहणार दत्तनगर तेरणा कॉलेज जवळ धाराशिव असे दोघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 132/2024 भादवि कलम 406,408,420,381,120,(4)34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे करत आहेत . दरम्यान तीन पोलीस पथक आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले असून सदर आरोपीचा शोध चालू आहे .

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख,पोलीस निरीक्षक राजेंद्र खांडेकर,पोलीस हवलदार रवी भागवत,पोलीस कॉन्स्टेबल अजित सोनवणे,पोलीस कॉन्स्टेबल वानखेडे,पोलीस हवालदार गणेश माळी,पोलीस हवालदार पोपट क्षीरसागर,पोलीस हवालदार संतोष करवार इत्यादी तत्काळीत घटनास्थळी दाखल झाले.
दिवसा ढवळ्या ड्रायव्हरने संधीचा फायदा साधत ८५ लाख रुपये घेऊन गेल्यामुळे पोलीस खात्यासमोर आरोपीच्या शोधासाठी मोठे आव्हान असणार आहे .

आरोपींनी एक खाजगी वाहना मधून सदर कॅश तुळजापूर वरून सोलापूर दिशेने घेऊन जाऊन वाटेमध्ये तामलवाडी परिसरामध्ये लॉकर चे कुलूप तोडून लॉकर मधील रोख रक्कम ८५ लाख रुपये घेऊन जाऊन रिकामी लॉकर पेटी त्या ठिकाणी सोडून सोलापूर दिशेनी चार चाकी गाडीमध्ये फरार झाला .अशी माहिती मिळत आहे.
 एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन खाजगी गाडी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे .तर गुन्ह्यामध्ये अन्य काही आरोपी फरार आहेत त्यासाठी वेगवेगळे पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले आहेत