धाराशिव प्रतिनिधी: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (नीट ) यांच्याकडून चार मे रोजी देशभरात घेण्यात आली होती. या परीक्षा प्रक्रिया बाबत मोठया तक्रारी येत आहेत. अतिशय महत्वाच्या परीक्षेत असा प्रकार होणं हे दुर्देवी आहे. त्यामुळे या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सरकार कडे केली आहे. देशातल्या 571 शहरातील एकूण चार हजार 750 केंद्रावर 24 लाख सहा हजार 79 विद्यार्थ्यांपैकी 23 लाख 31 हजार 297 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल हा 14 जून अपेक्षित असताना संबंधित एजन्सीने या परीक्षेचा निकाल चार जून रोजी जाहीर केला. परीक्षेत देशात 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळाले आहेत. दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांना परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय आहे.हरियाणातील एका केंद्रावरील प्रश्न पत्रिका उशिरा दिल्याचे कारण देऊन ग्रेस मार्क दिल्यामुळे चार विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळालेले आहेत. व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशनवर आधारित आहे.बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 718- 719 असे गुण प्रदान करण्यात आल्यायमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त केली आहे. पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.ही परीक्षा भारतातील सर्वात मोठी असण्याबरोबर वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेण्याकरिता अत्यंत महत्त्वाची समजली जाते. परीक्षेतील दिलेल्या ग्रेस मार्क्सचा आढावा उच्चस्तरीय समितीमार्फत घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार ओमराजे यांनी केली आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नीट चे महानिदेशक यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
नीटच्या परीक्षेतील गैरप्रकाराची तात्काळ चौकशी करा- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
उषा बनसोडे यांना उपचारासाठी परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थीक मदत
शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील व सभापती जयकुमार जैन यांच्या हस्ते उषा बनसोडे यांच्या कुटुंबाकडे धनादेश सुपूर्द
परांडा (प्रतिनिधी)परंडा मंडई भीम नगर येथील हमाल हर्षवर्धन बनसोडे यांच्या मातोश्री उषा गजेंद्र बनसोडे यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील काही दिवसा पुर्वी अपघात झाला होता.त्यांच्या उपचारासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आर्थीक मदतीचा धनादेश उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख रनजित पाटील यांच्या हस्ते त्यांच्या कुटूंबीयाकडे दि८जून रोजी स्पूर्द करण्यात आला.
या आपघातात उषा बनसोडे या गंभीर जखमी झाल्या आसुन त्याना उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे.मात्र त्यांची आर्थीक परिस्थिती अत्यांत हालाकीची आसल्याने रुग्लालयाचा खर्च करणे त्यांच्या कुटुंबीयांना परवडत नसल्याची बाब समोर आल्याची माहीती मा.आ ज्ञानेश्वर पाटील व मा.आ.राहुल मोटे यांना मिळाली असता पाटील व मोटे यांनी उषा बनसोडे यांना उपचारा साठी आर्थीक मदत करा आशा सुचना कृषी उत्पन्न बाजार समितीला दिल्या होत्या.
त्या अनुशंगाने परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उषा बनसोडे यांच्या उपचारा साठी तातडीच्या आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या नातेवाईकांकडे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते देन्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन,उपसभापती संजय पवार, संचालक अॅड.सुजित देवकते, शंकर जाधव,बाजार समितीचे सचिव सचिन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, घनश्याम शिंदे,जीवन बनसोडे, रणजीत शिंदे,विजय चौतमहाल , अजय चौतमहाल,सुजाताबाई बनसोडे,बेबीताई चौतमहाल, कामीनाबाई बनसोडे यांच्या सह महिला व समाज बांधव उपस्थित होते.
सलगरा आणि किलज पंचक्रोशीतून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जास्त मताधिक्य
सलगरा,दि.५(प्रतिक भोसले) – आजवर झालेल्या एकूण १७ लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम ओमराजे निंबाळकर यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांची सुन व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ओमराजे यांनी तब्बल ३ लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला आहे. ओमराजे निंबाळकर यांना सात लाख ४८ हजार ७५२ तर अर्चना पाटील यांना ४ लाख १८ हजार ९०६ इतकी मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतली होती. ते अखेरच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली. एकाही फेरीत महायुतीच्या अर्चना पाटील यांना आघाडी घेता आली नाही. लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी लक्षवेधी मताधिक्य खेचून घेतले आहे.
दरम्यान धाराशिव लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेला विरोधकांकडून काही ठिकाणी नाराजगीचे सुर उमटलेले होते, खासदारांचा फोनवरुन जनतेशी असलेला संपर्क हा चांगलाच टीकेचा विषय बनला, बसमध्ये जागा मिळवून देणं, जॅक देणं हे खासदाराचं काम आहे का? असा सवालही महायुतीच्या काही नेत्यांनी प्रचारात विचारला होता. अन् त्यातच विशेष म्हणजे राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापुरचे आमदार असताना सुध्दा आमदार पाटील यांच्या पत्नी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांना कौल न देता – सलगरा, गंधोरा, किलज, वाणेगाव, वडगाव, बोरनदीवाडी, जवळगा, देवसिंगा, कार्ला, या गावकऱ्यांनी ओमराजे यांना कौल दिला आहे.
१) किलज मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १२९१ आणि अर्चना पाटील यांना ३६३ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ९२८ अधिक मतं मिळाली आहेत.
२) सलगरा दिवटी मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १२५९ आणि अर्चना पाटील यांना ६५५ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ६०४ अधिक मतं मिळाली आहेत.
२) काक्रंबा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १४४० आणि अर्चना पाटील यांना ९५९ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ४८१ अधिक मतं मिळाली आहेत.
३) जवळगा मेसाई मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ६१४ आणि अर्चना पाटील यांना २३४ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ३८० अधिक मतं मिळाली आहेत.
४) वाणेगाव मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ४६० आणि अर्चना पाटील यांना १५९ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ३०१ अधिक मतं मिळाली आहेत.
५) देवसिंगा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ४७९ आणि अर्चना पाटील यांना २६९ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना २१० अधिक मतं मिळाली आहेत.
६) वडगाव मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ३३७ आणि अर्चना पाटील यांना १८७ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १५० अधिक मतं मिळाली आहेत.
७) बोरनदीवाडी मध्ये ओमराजे निंबाळकर यांना २०८ आणि अर्चना पाटील यांना १२५ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ८३ अधिक मतं मिळाली आहेत.
८) गंधोरा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ७०४ आणि अर्चना पाटील यांना ६२५ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ७९ मतं अधिक मिळाली आहेत.
९) कार्ला मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ५०५ आणि अर्चना पाटील यांना ४४८ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ५७ अधिक मतं मिळाली आहेत.
तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकांना फुटले पाय,दिलीप नाईकवाडी, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, मंदिर सुरक्षा संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब
मागील दोन वर्षापासून संचिका गायब झाल्याचा अहवाल ठेवला दडवून
धाराशिव -महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकांना पाय फुटले असून त्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा अहवाल दैनिक जनमत च्या हाती लागला असून मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थान हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळतं. भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी सोने-चांदीचे मौल्यवान पुरातन दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यासोबतच दानपेटी घोटाळा उघडकीस आला. दोन्ही प्रकरणे न्यायालयात सुरू असून मंदिर संस्थान मध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरती नेहमीच भ्रष्टाचार आरोप केले गेले आहेत. एवढेच नाही तर आता तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकाच गायब झाल्याचा प्रकार दैनिक जनमत ने समोर आणला आहे.
यात मोठी धक्कादायक माहिती समोर आली असून तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर आणि मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याच्या संदर्भातील महत्त्वाची संचिकाच गायब असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जून 2013 मधील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे दस्तावेज, श्री तुळजाभवानी मंदिरातील गैर कारभाराची चौकशी संदर्भातील सप्टेंबर 2012 मधील संचिका, तुळजापूर दानपेटी मोजणी संदर्भातील तहसील कार्यालयाची संचिका, मंदिरातील भरती प्रक्रियेतील महत्त्वाची दस्त गायब झाले आहेत. मे 2022 मध्ये संचिका गायब प्रकरणी 3 सदस्य समिती स्थापन करून याची चौकशी करण्यात आली होती. मागील दोन वर्ष हा अहवाल गुपित ठेवण्यात आला होता. लेखाधिकारी यांच्या मार्फत चौकशी केल्यानंतर विविध विषयांच्या महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब असल्याचा अहवाल देण्यात आला होता.
मौल्यवान दागिने प्रकरण नेमकं काय आहे?
तुळजाभवानी मंदिर संस्थानातील तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याने तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारला. जवळपास 35 तोळे सोने, 71 किलो चांदी, 71 प्राचीन नाणी, गायब केली. या प्रकरणी 13 सप्टेंबर 2020 रोजी याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच दिलीप नाईकवाडी याला अटकही करण्यात आली. नाईकवाडी याने 17 वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने पुरातन नाणी गायब केली. तुळजाभवानी देवीला अनेक राजेराजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैर व्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते त्याचा ठपका नाईकवाडी याच्यावर ठेवत नाईकवाडी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती मात्र आता याच तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्र मंदिर संस्थान कार्यालयातून गायब झाले आहेत.
संचिका गायब प्रकरणी या समितीने केली चौकशी

मंदिर संस्थान लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, सहाय्यक व्यवस्थापक स्थापत्य राजकुमार भोसले या समितीने 29 एप्रिल 2022 रोजी अभिलेख कक्षामध्ये प्रत्यक्ष तपासणी केली. दरम्यान समितीला 50 पेक्षा अधिक महत्त्वाच्या संचिका गायब असल्याचे लक्षात आले. त्या अनुषंगाने या समितीने 4 मे 2022 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासनाकडे संचिका गायब असल्याचा अहवाल बनवून सुपूर्द केला. यावर मंदिर प्रशासनाने नेमकी काय भूमिका घेतली हे अद्याप समोर आले नसले तरी तरी अहवालातून उघड झालेल्या प्रकारावर मंदिर प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
पारा येथील विशाल गोडसे च्या अंगावर पडली मेन लाईनची तार वेळ आली होती पण काळ आला नव्हता युवक सुखरूप!
महावितरणच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह
पारा येथील विशाल गोडसे च्या अंगावर पडली मेन लाईनची तार वेळ आली होती पण काळ आला नव्हता युवक सुखरूप!
पारा (राहूल शेळके): वाशी तालुक्यातील पारा येथील नवयुवक विशाल गोडसे चे दैव बलवत्तर म्हणून दि. २५ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अंगावर महावितरण ची मेन लाईनची तार पडून सुद्धा हा युवक सुखरूप बचावला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , पारा येथील नवयुवक विशाल लक्ष्मण गोडसे हा युवक सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पारा गावातून स्वतःच्या शेताकडे जात असताना गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाशी रोडवर स्वतःच्या मोटरसायकल वरून जात असताना अचानक वाशी ते पारा जाणारी महावितरण ची मेन लाईनची तार तुटून अचानक अंगावर पडली व तो युवक गाडीवरून पडला . दैव बलवत्तर म्हणून या युवकाला थोडासा करंट लागला परंतु शारीरिक काही नुकसान झाले नाही. याबाबत युवकाने वाशी व पारा येथील महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईलवर संपर्क केला असता कोणीही कॉल घेतला नाही.
दैनिक जनमतने वारंवार बातमीतून तसेच प्रतिनिधीने अधिकारी व कर्मचाऱ्यांशी भेटून पारा येथेच 33 के व्ही प्रि मान्सून मेन्टेनन्स ची कामे करण्यात यावी म्हणून पाठपुरावा केला आहे .परंतु या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अध्याप पर्यंत काहीही कामे केलेली नाहीत. अशा निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या पारा 33 के वी चे काही देणे घेणे दिसत नाही .पावसाळापूर्वी प्रि मेन्टेनन्स ची कामे जर वाशी महावितरण केले असते तर आज ही वेळ आली नसती. वाशि महावितरण ने या गंभीर गोष्टीची दखल घेऊन प्रि मान्सून मेन्टेनन्स ची कामे करावीत अन् ग्राहकांना विज पुरवठा सुरळीत द्यावा अशी मागणी होत आहे.
खरीप २०२३ मधील नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात; आठवडाभरात १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाईची रक्कम – आ. राणाजगजितसिंह पाटील
खरीप २०२३ मध्ये सुरुवातीला पावसातील खंड व नंतर अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. अवेळी पावसाने झालेल्या नुकसानी बाबत ऑनलाइन तक्रारी देण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत विहित मुदतीत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीला दिल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीने सुरू केली असून तक्रार दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील विमा वितरित करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
पावसातील खंडामुळे संभाव्य नुकसानीच्या २५% अग्रीम प्रमाणे रु. २५३ कोटी यापूर्वीच शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. खरीप हंगामात अवेळी पावसाने देखील सोयबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत ऑनलाईन तक्रारी देण्याचे आवाहन त्यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना केले होते. या अनुषंगाने नुकसानीच्या साधारणत: १,९२,००० ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने नुकसान भरपाई रकमेचे वितरण सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारी दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील इतरांप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीत खरीप हंगामा ची पेरणी तोंडावर असताना पेरणी पूर्वी पैसे उपलब्ध होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. यामुळे त्यांना मोठा आधार मिळत आहे. ठाकरे सरकारच्या काळातील खरीप २०२० व २०२१ मधील उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करा – आ. कैलास पाटील यांची प्रधान सचिवांकडे मागणी
धाराशिव – धाराशिव जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करण्याची मागणी आ. कैलास पाटील यांनी प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांच्याकडे केली आहे.
धाराशिव जिल्हयात मागील चार दिवसापासुन अवकाळी पाऊस व गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे, जनावरांचा मृत्यू, राहती घरे, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बि-बियाणे, खते आणण्यास पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्याचे फक्त पंचनामे, घोषणा न करता पेरणीपुर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे आवश्यक आहे.
धाराशिव जिल्हयात दिनांक-११/०४/२०२४ तसेच त्यानंतर दि. २०/०४/२०२४ रोजी अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते.३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिके सोडुन जिरायत पिका खालील ४०२ बाधित शेतकऱ्यांच्या १४१.५० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. १३६०० प्रमाणे रु.१९.२४०० लक्ष, ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिके सोडुन बागायत पिका खालील २०९ बाधित शेतकऱ्यांच्या ७३.५० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. २७००० प्रमाणे रु.१९.८४५०० लक्ष, ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिका खालील २०३१ बाधित शेतकऱ्यांच्या १२२०.६० हेक्टर बाधित क्षेत्रासठी रक्कम रु. ३६००० प्रमाणे रक्कम रु.४३९.४१६०० लक्ष असे एकुण ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या एकुण २६४२ शेतकऱ्यांना रक्कम रु.-४७८.५०५०० लक्ष मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या कडुन आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर झाला असुन सदर प्रस्ताव तात्काळ मागवुन शेतकऱ्यांना पेरणीपुर्वी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असताना सदरील प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, लोहारा, वाशी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असुन उर्वरीत कळंब, तुळजापुर, उमरगा, भुम, परंडा तालुक्यातील ३३ मंडळांना दुष्काळ सदृष्य म्हणुन घोषीत करण्यात आलेले आहे. या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुष्काळ घोषीत केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे दुष्काळी अनुदान देणेबाबत घोषणा करण्यात आलेली होती. परंतु स्वतःला निर्णय वेगवान गतीमान सरकार म्हणवुन घेणाऱ्या घोषणाबाज सरकारने या तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत दुष्काळाची एक रुपयाचीही मदत दिलेली नाही. त्यामुळे फक्त घोषणा व पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळाचे अनुदान पेरणीपुर्व जमा होणे आवश्यक आहे.धाराशिव जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करणेबाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ कार्यवाही करावी असे आ. कैलास पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटोच्या जोरावर ब्लॅकमेल; लव्ह जिहादचा आरोप, नराधम पोलिसांच्या ताब्यात
- धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत छुप्या युतीत ठिणगी? भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत गोंधळ!
- सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे इतिवृत्त गायब? धाराशिव नगरपरिषदेत पारदर्शकतेचा बोजवारा?आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्याचा फुगा फुटला!
- परंडा तालुक्यात माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा; २४ तासांत टोळी जेरबंद, गुन्हे शाखेची कामगिरी
- टेक्सटाईल पार्कवरून आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा यू -टर्न?;
कौडगावसाठी डिफेन्स हबचे नवे आश्वासन, जुन्या बाटलीत नवी दारू!
धाराशिव शहराला होणार नऊ दिवसाआड पाणी पुरवठा – मुख्याधिकारी वसुधा फड
धाराशिव – गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिव शहरात नियमित पाणी पुरवठा होत नव्हता. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत होता. पुढील काही दिवस पाणीपुरवठा होणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड यांनी प्रसिद्धीपत्रक काढून यांनी सांगितले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
धाराशिव शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या पंपगृहांना महावितरण मार्फत होणारा विद्युतपुरवठा सध्यस्थितीत सुरू असलेल्या पावसाळी वातावरण व वाऱ्यामुळे वारंवार खंडित होत आहे. तसेच उजनी जलाशयात पाणीसाठा नसल्याने शहरास अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेमार्फत शहरात नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.
शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली तलाठ्या विरोधात गुन्हा नोंद
धाराशिव – शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने तलाठ्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत माहिती अशी की
आरोपी
कल्याण शामराव राठोड, वय-43 वर्षे, धंदा-नोकरी, पद-तलाठी, सज्जा आंदोरा, अतिरिक्त कार्यभार- सज्जा ईटकुर, तालुका कळंब जिल्हा-धाराशीव. रा. ज्ञानेश्वर नगर, राजीव गांधी चौक, आयटीआय कॅालेजच्या पाठीमागे, जिल्हा बीड यांनी तक्रारदार यांचे भावाचे नावे खरेदी घेतलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी स्वतःसाठी व साहेबाला द्यावे लागतील असे म्हणून 14 मे रोजी तक्रारदार यांचेकडे 4000/- रु. लाच रकमेची मागणी करून तरजोडीअंती 3000/- रु. लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून पोलीस स्टेशन कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांचा समावेश आहे
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 63.88 टक्के मतदान
- सर्वाधिक मतदान तुळजापूर विधानसभा क्षेत्रात
- 12 लक्ष 72 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
- 81 पैकी 20 तृतीयपंथीयांनी केले मतदान
धाराशिव,दि.8(प्रतिनिधी) उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. या निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
औसा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 56 हजार 479 पुरुष, 1 लक्ष 37 हजार 604 स्त्री व 3 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लक्ष 94 हजार 86 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 1 हजार 978 पुरुष, 87 हजार 536 स्त्री आणि एक तृतीयपंथी अशा एकूण 1 लक्ष 89 हजार 515 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुषांची मतदानाची टक्केवारी 65.17 टक्के, महिलांची 63.61 टक्के तर तृतीयपंथीयांची 33.33 टक्के अशी एकूण 64.44 टक्के इतकी आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघात 3 लक्ष 10 हजार 703 मतदार असून यामध्ये 1 लक्ष 64 हजार 500 पुरुष, 1 लक्ष 46 हजार 193 स्त्री आणि 10 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यापैकी 1 लक्ष 291 पुरुष, 87 हजार 56 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 1 लक्ष 87 हजार 351 मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदारांची टक्केवारी 60.97, स्त्री मतदारांची 59.55 टक्के आणि तृतीय पंथीयांची टक्केवारी 40 टक्के असे एकूण टक्केवारी 60.30 टक्के आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले त्याची टक्केवारी 65.40 इतकी आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 98 हजार 517 पुरुष, 1 लक्ष 77 हजार 39 स्त्री आणि 6 तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून काल झालेल्या निवडणूकीत 1 लक्ष 34 हजार 1 पुरुष, 1 लक्ष 11 हजार 625 स्त्री आणि एका तृतीयपंथीयाने अशा एकूण 2 लक्ष 45 हजार 627 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 67.50 टक्के पुरुष, 63.05 टक्के स्त्री व 16.67 टक्के तृतीयपंथी अशा एकूण 65.40 टक्के मतदारांनी मतदान केले.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 92 हजार 957 पुरुष, 1 लक्ष 72 हजार 977 स्त्री व 17 तृतीयपंथी असे एकूण 3 लक्ष 65 हजार 951 मतदार आहेत. त्यापैकी 1 लक्ष 28 हजार 121 पुरुष, 1 लक्ष 5 हजार 985 स्त्री अशा 2 लक्ष 34 हजार 106 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 66.40 टक्के पुरुष, 61.27 टक्के स्त्री असे एकूण 63.97 टक्के मतदान झाले.
परंडा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 73 हजार 146 पुरुष, 1 लक्ष 52 हजार 13 स्त्री व 6 तृतीयपंथी मतदार असे एकूण 3 लक्ष 25 हजार 165 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 13 हजार 940 पुरुष, 92 हजार 673 स्त्री व 3 तृतीयपंथी असे एकूण 2 लक्ष 6 हजार 616 मतदारांनी मतदान केले. मतदानाची पुरुषांची टक्केवारी 65.81, स्त्री टक्केवारी 60.96 टक्के व 50 टक्के तृतीयपंथी अशी एकूण टक्केवारी 63.54 टक्के इतकी आहे.
बार्शी विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 66 हजार 497 पुरुष, 1 लक्ष 54 हजार 734 स्त्री व 39 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 3 लक्ष 21 हजार 270 मतदारांचा समावेश आहे. 7 मे रोजी 1 लक्ष 12 हजार 202 पुरुष, 97 हजार 541 स्त्री आणि 11 तृतीयपंथी अशा एकूण 2 लक्ष 9 हजार 754 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 67.39 टक्के पुरुष, 63.04 स्त्री व 28.21 तृतीयपंथी अशा एकूण 65.29 टक्के मतदारांनी मतदान केले.
येत्या 7 मे रोजी झालेल्या निवडणूकीसाठी 10 लक्ष 52 हजार 96 पुरुष, 9 लक्ष 40 हजार 560 स्त्री आणि 81 तृतीयपंथी असे एकूण 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांचा मतदार यादीत समावेश आहे. त्यापैकी 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री व 20 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा या निवडणूकीत हक्क बजावला. यामध्ये 65.63 टक्के पुरुष, 61.92 टक्के स्त्री व 24.69 टक्के तृतीयपंथी अशा एकूण 63.88 टक्के मतदारांनी मतदान केले.
उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक 31 उमेदवार या निवडणूक रिंगणात आहे. सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 14 उमेदवार, सन 2014 च्या निवडणूकीत 27 उमेदवार, सन 2009 च्या निवडणूकीत 25 उमेदवार, सन 2004 मध्ये 8 उमेदवार, सन 1999 मध्ये 5 उमेदवार, सन 1998 मध्ये 7 उमेदवार, सन 1996 मध्ये 21 उमेदवार, सन 1991 मध्ये 17 उमेदवार, सन 1989 मध्ये 12 उमेदवार, सन 1984 मध्ये 6 उमेदवार, सन 1980 मध्ये 5 उमेदवार, सन 1977 मध्ये 3 उमेदवार, सन 1971 मध्ये 5 उमेदवार, सन 1967 मध्ये 3 उमेदवार, सन 1962 मध्ये 3 उमेदवार, सन 1957 मध्ये 2 उमेदवार, सन 1951-52 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 2 उमेदवारांत लढत झाली.
येत्या 4 जून 2024 रोजी 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतमोजणी होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून सर्वांचे लक्ष 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.