Home Blog Page 45

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलनचा इशारा 

महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना आक्रमक

धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) – धाराशिव नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वेळी पेन्शन विक्री करतात एमसीएमआर लागू असून त्याचे लाभ लाभार्थ्यास देणे बंधनकारक आहे. मात्र ते बंद केलेले असून ते पूर्ववत चालू करावे यासह इतर विविध मागण्यासाठी दि.१ ऑगस्ट रोजी कर्मचारी काळ्याफिती लावून काम करतील. मात्र मागण्या मान्य न झाल्यास दि.8 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवेसह सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दि.२४ जुलै रोजी दिला आहे. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेचे कर्मचारी, कामगार यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे अथवा त्यांचे औषध उपचाराचे (मेडिकल बील) कसलेही बील हे अदा करण्यात येत नाही. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांची बिले अदा करण्यात आलेली आहेत. तर काही कर्मचाऱ्यांनी अर्ज करून देखील ती देण्यात आलेली नाहीत. त्याचा खुलासा देण्यात यावा. ७ वा वेतन आयोग शासन निर्णय क्र. वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा -९, दि.२० जून २०२४ प्रमाणे पाचवा हप्ता देणे आवश्यक होते. परंतू काही कर्मचाऱ्यांना चौथा हप्ता देण्यात आला नाही, तो देण्यात यावा. तर जानेवारी २०२२ ते जून २०२४ पर्यंत शासनाचे सहायक अनुदान किती आले व त्याचा विनीयोग कसा केला ? तसेच उपयोगी प्रमाणपत्र सादर केले, त्याच्या प्रती संघटनेस देण्यात याव्यात. तसेच शासनाचे अनुदान जवळपास दरमहा अंदाजे ३.२० कोटी रुपयांच्या आसपास नगर परिषदेकडे येते.

हे अनुदान कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे बिल देण्यासाठी येथे तथापि या गोष्टीची पूर्तता करीत नाहीत. वरील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने अभिलेख यांच्या छायांकित सत्यप्रती सात दिवसाच्या आत देण्यात याव्या तसेच संघटनेने नमूद केलेल्या वरील मागण्या मान्य कराव्यात, या मागण्या मान्य कराव्यात असे नमूद केले आहे. यावर अध्यक्ष दीपक तावरे सचिव रावसाहेब शिंगाडे, तानाजी सुरवसे दत्तात्रय बनसोडे, कुमार मुंडे, धनराज मिसाळ, सुदाम खरात गायकवाड, दत्ता पेठे, अशोक देवकते, भास्कर वाघ चौरे, लहू गेजगे, दयानंद बनसोडे, एजाज शेख, सुनील उंबरे, अरुण जाधव, नागनाथ गोरपे, सिद्राम जानराव, नितीन गायकवाड, सचिन गायकवाड, जे.एस. राजेनिंबाळकर, दिगंबर डुकरे, शाकीर शेख, अजिंक्य जानराव आदीसह इतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

भैरवनाथ उद्योग समुहाच्या वतीने लोणी येथे ६की.मी.रस्ता कामाची सुरुवात

जि.प.माजी सभापती धनंजय सावंत यांच्या हस्ते जोतिबा मंदिर ते नालगाव शिव ६.कि मी रस्ता कामाचा शुभारंभ

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील लोणी येथील जोतीबा मंदिर ते नालगाव शिव ६ कि.मी.रस्ता कामाचा जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दि.२१जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला.
लोणी येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे जोतिबा मंदिर ते नालगावकडे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही रस्त्याचे काम करुन द्या आशी मागणी करण्यात आली होती.लोणी ग्रामस्त व शेतकरी यांची रस्त्यांची निकड लक्षात घेत धनंजय सावंत यांनी रस्ताकाम करुन देतो आसा शब्द लोणी ग्रामस्थाना दि.२०जुलै रोजी दिला होता.
दिलेल्या आश्वासना नुसार दि.२१जुलै रोजी प्रत्यक्ष जोतीबा मंदिर ते नालगाव रस्ता कामाचा शुभारंभ धनंजय सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला आहे.जोतीबा मंदिर ते नालगाव शिव या मार्गवरील १०० कुटूंबाची लोक वस्ती आहे मात्र रस्त्या अभावी त्यांचे मोठे हाल होत होते.आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली व भैरवनाथ उद्योग समुहाच्या माध्यमातुन जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी शेतकरी व ग्रामस्थांची मागणी त्वरीत मान्य करत ६ कि.मी.रस्त्याच्या कामाचा स्वा:ता शुभारंभ करून जोतीबा मंदिर ते नालगाव मार्गावर राहाणाऱ्या कुंटूबाचा रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे. रस्ता कामाचा प्रश्न धनंजय सावंत यांनी मार्गी लावल्याबद्दल
लोणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने धनंजय सावंत यांचा सत्कार करून आभार मानले.
या वेळी नागनाथ पाटील, शाहाजी शिदे,विनोद शिंदे,सुरेश सोठे,धर्मासाठे,सतिष शिंदे,दगडु केमदारणे,बाळासाहेब शिंदे
नवनाथ शिंदे,नानासाहेब केमदारने,वैभव सांगडे, बाळासाहेब शिंदे,सत्यवान शिदें, अनिखेत शिंदे,जयराम शिदें, मुकुंद शिदें यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

सिनाकोळेगाव प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रा गेलेल्या जमीनीचा वाढीव मावेजा शेतकऱ्यांना मिळऊन देण्यासाठी मंत्री सावंत यांचे प्रयत्न

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचा डोंजा येथील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार

परंडा( भजनदास गुडे )परंडा तालुक्यातील डोंजा येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी सिना कोळेगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात गेल्या आहेत.त्याचा वाढीव
मावेजा मिळावा यासाठी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत प्रयत्न करत आहेत.
सिनाकोळेगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात गेलेल्या जमीनीचा वाढीव मावेजा मिळाळवा आशी मागणी डोंजा येथील शेतकरी अनेक वर्षापासुन करत आहेत. मात्र वाढीव मावेजावा मितळत नसल्याने डोंजा येथील शेतकऱ्यांनी सदर मागणी आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
शेतकऱ्यांच्या सदर मागणीच्या अनुशंगाने आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळावा यासाठी मंत्रालईन स्थरावर पाठपुराव केला आसुन
लवकरच हा प्रस्न मार्गी लागेल असे मंत्री सावंत यांनी डोंजा येथील शेतकऱ्यांना सांगीतले.
मंत्री सावंत वाढीव मावेजा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मंत्रालईन स्थरावर प्रयत्न करीत आसल्याबद्दल डोंजा येथील शेतकऱ्यांनी मंत्री सावंत यांची सोनारी येथील भैरवनाथ कारखाण्यावर भेट घेऊन त्यांचा सत्कार करून अभार व्यक्त केले.
या वेळी बोलताना मंत्री सावंत म्हणाले तुमचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे.मी शंभर टक्के वाढी मावेजा मागणीचा आपला प्रस्न मार्गी लावतो असे आश्वासन मंत्री सावंत यांनी डोंजा येथील शेतकऱ्यांना दिले असता शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले
यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,मोहन बापू करपुरे,शशिकांत पाटील,पिंटू हजारे,बिभीषण घोगरे,किशोर पाटील,शरद बापू पाटील,तुकाराम पाटील,बंडू काका जगताप, नामदेव घोगरे,सोमनाथ गणगे, पांडू दादा घोगरे,सुनील शिरसाट, सुधाकर भालेराव,किरण भालेराव,हनुमंत शिरसाट,कचरू करपुरे,जनक घोगरे,बालाजी घोगरे आदी शेतकरी उपस्थित होते.

सोनारी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याने अवघी सोनारी नगरी दुमदुमली

दिंडी सोहळ्यातील संत, वारकऱ्यांच्या वेशभूषतील विद्यार्थ्यानी ग्रामस्थांचे वेधले लक्ष

परंडा [ दि.१३ जुलै ] महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेने चालत आलेला पालखी,दिंडी सोहळ्याची माहीती आत्ताच्या पिढीला व्हावी तसेच जाती,धर्म मतभेद,सहकार्य,ऐकतेची भावना मुलांमध्ये रुजावी व तीची जोपासना करण्यासाठी सोनारी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आषाढी पालखी सोहळ्याचे आयोजन दि.१३जुलै रोजी करण्यात आले होते.
जि.प.शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी संत वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.सकाळी गावातील मुख्य रस्त्यावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणाचे आयोजन करण्यात आले होते,गावात विविध ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला.
या वेळी मुलच्या हातात भगवे ध्वज तर मुलीच्या डोक्यावर तूलशी वृंदावन हे दृष्य पाहून पंढरपुरच्या आषाढी वारीला दिडीं सोहळा निघाला आसल्याचा भास होत होता.
एरव्ही शाळेच्या गणवेशात असणारी लहान मुलं-मुली संत, वारकऱ्यांचा पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी,कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारी साडीत,केसात गजरा,डोक्यावर तुलस आणि मुखी विठ्ठल नामाची भरली शाळा,शाळा शिकताना तहान भूक हरली’या अभंगा प्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी गावातील प्रमुख मार्गावरुन दाखल होत संपूर्ण गावात ही पायी दिंडी अवतरली.
यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.अन अवघे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ दिंडी सोहळ्याच्या भक्तीसागरात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी शाळेतील शिक्षक देखील संत,वारकऱ्यांच्या वेशभूषत दिडी सोहळ्यात सहभागी होते.
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने आयोजित दिंडीमध्ये पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.हि दिंडी यशस्वी पार पाडण्यासाठी प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक पोपट परदेशी, माध्यामिक शाळेचे मुख्याध्यापक विलास थोरात यांच्या सह सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.


वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले -मुली,शिक्षक पालखी मिरवणूक,विठू नामाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात सोनारी गावातील परिसरासह शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी पालक, ग्रामस्थांचे आकर्षण ठरले.बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.


बल वारकऱ्यांची पायी दिंडी संपुर्ण गावातून येऊन शाळेत विसावली.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गणेश फले यांच्या वतीने बाल वारकऱ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच दिपक दुबळे,दिगंबर ईटकर, अविनाश हांगे,राम ईटकर, आण्णा हांगे,नाना मांडवे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी परंडा शहरातून शनिवारी सकाळी ८ वा पंढरपुर कडे मार्गस्थ

दिपक थोरबोले यांच्या फार्म हाऊसवर माऊलींच्या पालखीचा विसावा

थोरबोले परिवाराच्या वतीने पालखीचे फटाक्याच्या अतिषबाजित भव्य स्वागत

परंडा ( दि १३ जुलै )पैठण तालुक्यातील आपेगाव येथिल संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखीचे शुक्रवार दि १२ जुलै रोजी सायंकाळी परंडा शहरात आगमन झाले.
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या स्वगृही मुक्कामी असलेल्या पालखीचे पाटील कुटंबीयांनी स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले.यावेळी पालखीतील वारकऱ्यांच्या भोजनाची व्यावस्था पाटील कुंटूबीयांच्या वतीने करण्यात आली होती.
शनिवारी सकाळी ८ वाजता परंपरे नुसार दिपक थोरबोले यांच्या कुर्डूवाडी रोडवरील
थोरबोले फार्म हाऊस येथील माऊली विसाव्यावर पालखीने विसावा घेतला.या वेळी थोरबोले परिवराच्या वतीने फाटाक्याच्या आतिषबाजीत पालखीचे व दिंडीतील वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापुरकर यांचा थोरबोले परिवराच्या वतीने फेटा, पुष्पहार,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच दिपक थोरबोल यांच्या वतीने पालखीला पुष्पहार अर्पण करून कुटूंबासह दर्शन घेतले.
थोरबोले परिवाराच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांसाठी अल्पोहारची व्यावस्था करण्यात आली होती.वारकऱ्यांनी अल्पो हाराचा आस्वाद घेतल्यानंतर
संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा पालखी सोहळा विठठल, रुखमाई,ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या नामाचा जयघोष करत पंढरपुर कडे मार्गस्थ झाली या पालखी सोहळ्यात महिल, पुरुष भावीक मोठया संखेने सहभागी झाले होते.
यावेळी मा.आ.ज्ञानेश्वर पाटील,डॉ.सत्यनारायण गायकवाड,जि.प.माजी सदस्य सिध्देश्वर पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील,विकास कुलकर्णी,विश्वजीत पाटील, बाळासाहेब पाटील,विलास पाटील,मारूती धनवे,अनिल शिदे,श्रीकांत भराटे,बाबुराव गायकवाड,प्रशांत गायकवाड, रामराव शेळके,मोहण गायकवाड, यांच्या सह थोरबोले कुटूंब व भावीक मोठया संखेने उपस्थित होते.

श्री संतश्रेष्ठ भगवानबाबा महाराज पालखी सोहळ्याचे कल्याण सागर विद्यालय परिसरात जल्लोषात स्वागत

मा.आ.सुजितसिह ठाकुर,शैला ठाकुर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून श्री संत भगवान बाबांच्या पादुकांचे घेतले दर्शन

उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने पालकी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप

परंडा (प्रतिनिधी)-विठ्ठलाच्या भेटीच्या लागलेल्या ओढीत,टाळ मृदंगाच्या ठेक्यावर कष्टकरी ऊसतोड कामगार वारकऱ्यांनी धरलेला फेर,भगवानबाबाचा जयघोष,आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या भागवत धर्माची फडकत असणारी पताका,अशा भक्तीमय वातावरणात श्री संत भगवान बाबा पालखीचे सकाळी ११ वा.शहरातील कल्याण सागर विद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले.
यावेळी मा.आ.सुजितसिंह ठाकुर,सौभाग्यवती शैला ठाकुर, डॉ सुयेशा ठाकूर,सुबोधसिंह ठाकुर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी माजी नगरसेवक सुबोधसिंह ठाकुर,भाजपा जिल्हा संघटक विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक चंद्रकात पवार, मुख्याध्यापक किरण गरड,मा. नगर शेवक गणेश राशिनकर, मनोज ठाकूर,डॉ आनंद मोरे आदी उपस्थित होते.पालखी सोहळा कल्याण सागर प्रांगणात पोहचताच कल्याण सागर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करुन पालखीचे स्वागत केले.
संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या पादुकांची ठाकुर यांनी सपत्नीक पुजा करून दर्शन घेतले. कल्याणसागर समुहाच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांसाठी शाळेच्या प्रांगणामध्ये १०हजार वारकऱ्यांच्या महाभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादाच्या वाटपासाठी प्रशालेचे२००विद्यार्थी,विद्यार्थीनी कार्यरत होते.भोजनाच्या व्यावस्थेची जवाबदारी मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक किरण गरड, चंद्रकांत तनपुरे,महादेव नरुटे, अजित गव्हाणे,रजणी कुलकर्णी, भारत थिटे,सचिन शिंदे,प्रशांत कोल्हे,आमोल कोकाटे,नरसिंह सोणवने,गणेश पवार यांनी संभाळली.
कल्याण सागर समुहाचा पाऊणचार घेऊन पालखी आवार पिंपरी येथील मुक्कामासाठी मार्गस्त झाली.
पालखी परंडा शहरातून आवार पिपरीकडे मार्गस्थ होत असताना परंडा शहरातील भाविकांनी श्री संतश्रेष्ठ भगवान बाबाच्या पादुकांचे दर्शन घेतले.

उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने पालकी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

     श्री संतश्रेष्ट भगवानबाबा महाराराज यांच्या पालकी सोहळ्याचे कल्याण सागर विद्यालयावर आगमन होताच उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकानी पालकी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासनी करुन औषधाचे वाटप करण्यात आले.
     या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी,डॉ.आनंद मोरे,डॉ. दयानंद पाटील,डॉ जयश्री गोफणे,डॉ.इफत कोरबू,डॉ.प्रशांत जाधव,सौ.शिवगंगा गायकवाड, ज्योती जगदाळे,सिस्टर औषध निर्माता तेजश्री शिंदे,स्वाती चव्हाण यांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी,कर्मचारी व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.ज्ञानदेव नलवडे आधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अटी बदलल्या, ५ एकर शेतीची अट वगळली

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली होती मात्र योजनेतील अटी शर्तीमुळे या योजनेचा लाभ अनेकांना होणार नसल्याचे विरोधीपक्षनेत्यांनी बोलून दाखवले होते मात्र आता बदल करण्यात आला असून

या योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
तसेच योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

यासोबत महत्वाची बाभांजे योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
याबरोबरच योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

भर दिवसा गोळीबार, परंडा तालूक्यातील भोत्रा शिवारातील घटना

गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल

परंडा(प्रतिनिधी) – वाळू च्या कारणा वरून दोन गटात वाद झाल्याने गोळी मारून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने एकास गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला असुन यामुळे तालूक्यात एकच खळबळ उडाली असुन
हि घटना परंडा तालूक्यातील भोत्रा येथील सिना नदी पात्रात दि २२ जून रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे.
या भांडणात परंडा येथिल योगेश हनुमंत बुरंगे यांच्या कमरेला गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. तर कपील आजिनाथ अलबत्ते यांच्या दोक्यात दगड लागल्याने तो जखमी झाला आहे.
जखमींना तातडीने परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन गोळी लागलेल्या योगेश बुरंगे याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमीक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व आरोपीचा शोध घेणे सुरु केले आहे.
गेल्या अनेक वर्षा पासुन परंडा तालूक्यातील नदीपात्रा लगदच्या गावात वाळू माफीयांनी धुमाकुळ घातला आसुन चोरीच्या वाळु व्यावसायातुन मिळवीलेल्या आमाप संपतीतुन वाळूमाफीयांची गुंडगीरी वाढली आसल्यामुळे तालूक्यात आशा अनेक वेळा घटना घडल्या आहेत.त्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
वाळू माफीयांनी नदीपात्रा लगतच्या गावात अवैध ठिक ठिकानी वाळुचे मोठमोठे साठे करून ठेवले आहेत.याची महसुल व पोलीस प्रशासनाने चोकशी करून वाळुसाठे करणाऱ्या वाळु माफीयांवर कठोर कार्यवाही करावी आशी मागणी नागरीकातून होत आहे.

सारोळा ( मां) येथे नापिकी , कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकरी पुत्राची आत्महत्या


पारा (प्रतिनिधी ): सतत च्या नापिकीला तसेच कर्जबाजारी पणाला कंटाळून वाशी तालुक्यातील सारोळा (मां)येथील एका अल्प भूधारक शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि.22 जून रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मेघराज शेषेराव मोरे वय 35वर्ष या शेतकरी पुत्राने कष्ट करून शेतात दरवर्षी पीक घेतले होतें. परंतू सतत च्या नापिकीला तसेच विधवा आईच्या नावावर काढलेले बँकेचे पीक कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून मेघराज मोरे यांनी घराशेजारील शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयताच्या भावाने पोलीसात दिल्यामुळे वाशी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्चदन प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे करण्यात आले असून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मोहसीन खान पठाण, कॉ. नवनाथ सुरवसे , कॉ. किरण माळी करत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

देवगाव(खुर्द)येथिल मुक्ताई आंगणवाडी क्र.२१६च्या इमारतीची दुरावस्था,बालकांच्या सुरक्षेचा प्रश्नन ऐरणीवर

इमारत पोखरली घुशीने ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष,बालकांच्या जिवीतास धोका

या पुर्वी जि.प.शाळेच्या शोचालयाची भिंत पडून दोन विद्यार्थी झाले होते जखमी

घुशी च्या खड्डयातून अंगणवाडीत सर्प निघाल्याने बालकांत भितीचे वातावरण……

परंडा (भजनदास गुडे)
( दि २२जून ) परंडा तालूक्यातील देवगाव (खुर्द) येथिल मुक्तांई अंगणवाडी क्र. २१६ मध्ये घुशी ने पोखरल्याने इमारतीत मातीचा ढिग लागला असून फरश्या पोकळ झाल्या आहेत.या मुळे बालकांचा जिव धोक्यात आला असून या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे दूर्लक्ष होत असत्याने ग्रामस्था मध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अंगणवाडीत घुशी ने पोखरल्यामुळे अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती करून देण्यात यावी आशी मागणी अंगणवाडी सेवीका यांनी सरपंच व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र त्यांच्या मागणीची ग्रामपंचायतीची दखल घेतली नाही.घुशीने पोखरलेल्या खड्डयातून सर्प निघाला होता अशी माहिती पालकांनी दिली आहे या गंभीर प्रश्ना कडे ग्रामपंचायत जानीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वर्षी देवगाव येथील शाळेच्या सौचालयची भिंत कोसळून दोन विद्यार्थीनी जखमी झाल्याची घटणा घडली होती. अशी घडणा घडल्यानंतर देखील ग्रामपंचायतीला जाग आलेली नाही.
एखादी अशी घटना घडण्याची ग्रामपंचायत पहात वाट आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.अंगणवाडी ची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थ व पालकांनी अंगणवाडी ची पाहणी केली व तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देवराव चौधरी, नागनाथ नरसाळे,अमर महादेव चौधरी, अमोल नागनाथ चौधरी,योगेश शिंदे,धनाजी शिंदे,योगेश काळे, वैभव शिंदे,योगेश पाटील, बालाजी चौधरी आदिची उपस्थिती होती.