Home Blog Page 41

तरूणाई ला प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वेशभूषेत रस्त्यावर उतरला तरुण; परंडा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५७.०७ टक्के मतदान

भूम ( वसीम काजळेकर )
लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी शासन जसे प्रयत्न करते तसेच प्रयत्न काही नागरिक करत असतात. परंडा मतदारसंघात तरुणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत येऊन मतदान करण्याचे आवाहन केले. परांडा विधानसभा मतदार संघातील २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. परांडा विधानसभा मतदार संघात हाती आलेल्या आकडेवारी नुसार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ५७.०७ टक्के मतदान झाले. परांडा विधानसभा मतदार संघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला होता. विद्यमान विधानसभा सदस्य प्रा डॉ तानाजी सावंत,माजी आमदार राहुल मोटे,वंचितचे प्रवीण रणबागुल,रासप चे डॉ राहुल घुले अशी चौरंगी लढत या मतदार संघात रंगली होती. या मतदार संघात ३ लाख ३० हजार ७७३ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ७५ हजार ३२१ पुरुष तर १ लाख ५५ हजार ५४६ स्त्री मतदार आहेत. या मतदार संघात ६ तृतीय पंथी मतदार आहेत. भूम,परांडा,वाशी या तिन्ही तालुक्यात ३७६ मतदान कक्षाची सुविधा करण्यात आली होती. भूम तालुक्यात १३५ मतदान केंद्रावर ६५ हजार ३९९ पुरुष तर ५६ हजार ३४२ एकूण १ लाख १९ हजार ६४१ मतदार होते. परांडा तालुक्यात १४२ मतदान केंद्रात ६५ हजार ७५१ पुरुष व ५८ हजार ९२ महिला असे एकूण १ लाख २३ हजार ८४७ मतदार होते. वाशी तालुक्यात ९९ मतदार केंद्रात ४६ हजार १७१ पुरुष तर ४१ हजार ११२ असे एकूण ८७ हजार २८५ मतदार होते. उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परांडा मतदार संघात मतदानाच्या दिवशी कोठेही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही .

तानाजीराव सावंत यांनी दिलेली अश्वासने पाळली नाहीत, त्यांनी मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली – राहुल मोटे

तानाजीराव सावंत यांनी गत विधानसभा निवडणुकीत
मतदाराना दिलेल्या खोटया आश्वासनाची राहूल मोटे यांनी पत्रकार परीषदेत पुराव्यासह केली पोलखोल

परंडा (भजनदास गुडे ) तानाजीराव सावंत यांनी गत विधानसभा निवडनुकी वेळी मतदार संघांतील मतदारांना दिलेली अश्वासने पाळली नाहीत त्यांनी मतदार संघातील जनतेची फसवणूक केली आसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेरवार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
गुरूवार दि १४ नोव्हेंबर रोजी परंडा येथील सरगम मंगल कार्यालयात संध्याकाळी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी तानाजीराव सावंत यांनी दिलेल्या विविध अश्वासणाची ऑडियो क्लीप दाखवीत खोटया आश्वासनाची पोलखोल केली.
पुढे बोलताना राहुल मोटे म्हणाले की पाच वर्षात उजणीचे पाणी का आणले नाही तसेच , परंडा व वाशी येथे एम.आय.डी.सी कुठे आहे. त्यांनी दाखऊन द्यावी असे आवाहन केले.तसेच बचत गटाने उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ मिळऊन देतो असे अश्वासन सावंत यांनी दिले होते.कोणतेही अश्वासन पाळले नाही त्या मुळे महिलांनी सावंत यांना मतदान का करावे असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या कार्यकाळात मतदार संघात शासकीय नाविन कार्यालयाची इमारत,पाझर तलाव,बांधारा, मध्यम,लघू तलाव,नवीन रुग्लाय उभारून चालू केले असल्याचे त्यांनी दाखऊन ह्यावे असे अवाहान मोटे यांनी केले आहे.
तसेच पुढे बोलताना मोटे म्हणाले की मला मतदार संघातील मतदारांचा वाढता
पाठीबा पाहून त्यांच्या पाया खालची घसरली असल्याने ते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत असे मोटे म्हणाले
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. संदीप पाटील,कॉग्रेस आयचे तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, आमोल काळे,अॅड.नुरोद्दीन चौधरी,रमेश परदेशी,अॅड सुभाष वेताळ,राहूल बनसोडे,किरण करळे,मधुकर पाटील,विक्रम पाटील,सत्तार पठाण,पाशाभाई शाहाबर्फीवाले,हरिचंद्र मिस्कीन, अॅड.गोविद कोटूळे,डॉ.रविद्र जगताप, हनुमंत कोलते, धनंजय मोरे,पंकज पाटील, सचिण पाटील,मलीक शेख,बुद्धीवान लटके,सुरेश कोकाटे,किरण शिदे,सुधीर वाघमोडे,गणेश चव्हाण, खय्युम तुटके याच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास अघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक संपन्न

महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी करण्याचा संकल्प

तात्या अखेर पर्यत शिवसेना पक्षाशी निष्ठेने राहीले मी ही पक्षनिष्ठा सोडणार नाही रणजित पाटील यांची घोषणा

महाविकास अघाडीचे उमेदवार राहूल मोटे यांना विजयी करण्याचे रणजित पाटील यांचे शिवसैनिकांना आवाहन


परंडा (भजनदास गुडे)तात्या शेवट पर्यंत शिवसेना पक्षाशी एक निष्ठेने राहील मी पण त्याच प्रमाणे शिवसेना पक्षाशी निष्ठेने राहाणार अल्याचे अश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी परंडा येथिल महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना दिले.
शनिवार दि ९ नोव्हेंबर रोजी परंडा येथिल महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची परंडा शहरातील राजवीरा लॉन्स येथे संयुक्त बैठक घेण्यात आली.
महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडू शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांना परंडा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती तर महा विकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहूल मोटे यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती.पाटील व मोटे यांनी पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या मध्ये संमभ्रमाचे वातावरण तयार झाले होते.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनमध्ये चर्चा होऊन परंडा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडण्यात आला.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आखेरच्या दिवशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणजित पाटील यांना उमेदवारी परत घेण्याच्या सुचना दिल्या असता उद्धव ठाकरे यांचा आदेश व पक्षनिष्ठा काय असते ते दाखऊन उमेदवारी अर्ज परत घेतला.रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निष्ठांवंत शिवसैनिका मध्ये नाराजी पसरली होती.शिव सैनिकांची नाराजी दुर करण्या साठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्याची संयुक्त बैठक ठेवण्यात आली होती.
या बैठकीस उपस्थित शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते यांना रणजित पाटील यांनी मार्गदर्शन करताना महा विकास आघाडीचे उमेदवार राहूल मोटे यांना विजयी करण्याचे अवाहाण केले या मुळे शिवसैनाकांची नाराजी दूर झाल्याचे दिसुन आले.
यावेळी रणजित पाटील म्हणाले की तात्या आजारी असताना तानाजी सावंत यांच्या सांगण्या वरून तात्याच्या विरोधात बॅक संचालक पदाची तक्रार करण्यात आली अश्या लोकांना धडा शिकवायची वेळ आली असुन महाविकास अघाडी चे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कोहिर सय्यद,माजी जि.प.सदस्य सिद्धेश्वर पाटील,ॲड.संदिप पाटील, अणिल शेंडगे,दिलीप शाळू,रुपेश शेंडगे,जयकुमार जैन,तात्या गायकवाड,चेतन बोराडे,रईस मुजावर,शंकर जाधव,शंकर इतापे,हरिश्चंद्र मिस्कीन,अॅड. सुजित देवकते,नसिर शहाबर्फीवाले,अॅड.सुभाष वेताळ,रेवण ढोरे,सुरेश डाकवाले,दादा पाडुळे,अरविद
नरुटे,नंदू शिदे,संतोष गायकवाड प्रशांत गायकवाड, दत्ता मेहर, दत्ता गुडे,आप्पा नरुटे,डिगंबर गुडे,तानाजी गुडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे यांनी केले.

गंधोरा शिवारात शेतीच्या वादातून मारहाण;15 जणांवर गुन्हे दाखल

सलगरा,दि.19 (प्रतिनिधी) – तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील गंधोरा शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सलगरा-गंधोरा या दोन्ही गावातील मिळून एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी गंधोरा येथील फिर्यादी-सविता राठोड,(वय 38 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे – बाळु नागनाथ पाटील,सतिश शहाजी पाटील, दयानंद सतिश पाटील,नवनाथ शहाजी पाटील,लक्ष्मण नवनाथ पाटील, नागनाथ शहाजी पाटील, संतोष धनाजी मुसळे, हणुमंत जाधव, प्रविण पदम भोसले, कल्याण हनुमंत जाधव, ज्ञानु हनुमंत जाधव, सर्व रा.गंधोरा ता.तुळजापूर, सागर मनिष मुळे,बाळु नामदेव मुळे, अमर अनिल मुळे, सर्व रा.सलगरा (दि.) ता.तुळजापूर, यांनी (दि.18ऑक्टोबर) रोजी 12.30 वा.सु.गंधोरा येथे फिर्यादी नामे-सविता नामदेव राठोड, (वय 38 वर्षे) रा.गंधोरा, यांना व त्यांचे आई, वडील, भाऊ व भावजय यांना आरोपींनी शेतीच्या वादाच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठी व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सविता राठोड यांनी (दि.18ऑक्टोबर) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 118(1),74, 115(2),352, 351(2),189(2), 191(2), 191(3), 190, 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावधान!सोनारी परिसरात वाघ आलाय? सोनारी परिसरात वाघ सदृश प्राणी दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण


सोनारी (अशोक माने)
सोनारी कौडगाव रस्त्यालगत शेतातून घरी येत असताना सोनारी येथील केतन साळुंके व दत्ता साळुंके यांना वाघ सदृश प्राणी हरणाची शिकार करुन तुरीच्या शेतातून ऊसाच्या शेतात जाताना निदर्शनास आले. हि घटना दि. १७ रोजी सायंकाळी ५ ते ५:३० च्या दरम्यान घडली. अचानक समोरुन जानार्या भला मोठा वाघ सदृश प्राणी दिसल्याने दोघेही घाबरुन शेतातून पळ काढत जवळीलच जगताप वस्तीवर येऊन तेथील नागरीकांना सदीरल घटनाक्रम सांगीतला. यावेळी संबंधीत वन विभाग अधिकारी यांना फोन द्वारे कल्पना दिल्यावर वन मजूर यांनी रात्री ७:३० च्या दरम्यान येऊन पाहणी केली असता तरस किंवा चिता असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सकाळी वन विभाग अधिकारी येऊन पाहणी करतील तोपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिल्या आहेत.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा महायुती सरकारने प्राधान्यक्रम बदलल्याचा जिल्हाप्रमुखांचा अजब दावा

कैलास पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर मात्र मुळ प्रश्न कायम

धाराशिव –
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा महायुती सरकारने प्राधान्यक्रम बदलल्याचा अजब दावा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्राधान्यक्रम बदलल्याचा दावा पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता त्यामुळे नेमकं खरं कोण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत जिल्ह्यात सध्या पाणीबाणी सुरू असून यंदाची निवडणूक या पाण्याभोवतीच राहिल अशी शक्यता आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाहणी दौऱ्यात जो गोंधळ घातला तेव्हापासून सुरू झालेले नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेत आ. कैलास पाटील यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर दिले मुद्दे खोडून काढण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे ते म्हणाले मात्र आ. कैलास पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना केवळ राजकीय उत्तरे दिल्याने मुळ प्रश्न कायम आहेत. धाराशिव कळंब मतदारसंघात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी आणण्याबाबत आ. कैलास पाटील यांनी कोणते प्रयत्न केले असा सवाल सूरज साळुंके यांनी केला मात्र धाराशिव कळंब मतदारसंघात येणारे पाणी उपसा सिंचन क्र.१ मधून येणार की क्र. 2 मधून येणार याबाबत प्रश्न विचारला असता त्याबाबत माहिती घेऊन सांगतो असे उत्तर त्यांनी दिले.
आ. कैलास पाटील यांनी सरकारने निधी कमी दिला याबाबत पत्रकार परिषदेत आकडेवारी दिली महाविकास आघाडीच्या काळात केलेली तरतूद आणि वितरीत झालेला निधी याबाबत देखील स्पष्टपणे माहिती दिली मात्र सूरज साळुंके यांनी विद्यमान सरकारने केलेली तरतूद आणि वितरीत केलेला निधी याबाबत लेखी माहिती द्यायला तयार असल्याचे म्हटले मात्र आकडेवारी दिली नाही. आमदार आणि खासदार खोटी माहिती देत असून खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची अवस्था असल्याचे सूरज साळुंके म्हणाले.

सूरज साळुंके एकाकी?

नवं सरकार स्थापन झाल्यापासून आ.कैलास पाटील, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या पत्रकार परिषदेला सूरज साळुंके एकाकी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये समन्वय समिती स्थापन झाली होती त्या समितीमधील कोणीही त्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहत नाहीत त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुंके एकटे पडले आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा ;वाघ वाहनातून काढली छबिना मिरवणूक

धाराशिव दि.०९ (प्रतिनिधी) शारदीय नवरात्र महोत्सवात आज ०९ ऑक्टोबर रोजी बुधवारी सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.  

श्री तुळजाभवानी देवीजींच्या आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. 

या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला (मळ) पासून दोन दैत्य उत्पन्न झाले.त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत.ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले.  त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन देवीला जागविले व विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया देवीला विश्राम करण्यासाठी दिले.त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते.अशी आख्यायिका सांगितली जाते.

शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.यात उद्या १०  ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११  ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.    

काल ८ ऑक्टोबर रोजी मंगळवारी रात्री श्री देवीजींची वाघ वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.मोठया संख्येने भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मराठवाड्यातील सर्व गुळ पावडर उत्पादक कारखाने प्रती टन ऊसास देणार ₹२५०० दर

इनोव्हीटीव जागरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन च्या बैठकीत निर्णय

धाराशिव –
इनोव्हीटीव जागरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची ०६ ऑक्टोबर रोजी मराठवाडा विभागामधील सर्व गुळ पावडर उत्पादक कारखानदारांची बैठक धाराशिव येथे संपन्न झाली. यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर व मराठवाड्यातील सर्व (जागरी) गुळ उत्पादक उपस्थित होते.

चालू ऊस गाळप हंगाम सन २०२४-२५ मध्ये सुरु होणाऱ्या हंगामाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली असून उद्योगा समोरील – अडचणी, आव्हाने या विषयी चर्चा करण्यात आली. गुळ पावडरचा मागील सहा/आठ महिन्यापासून सातत्त्याने कमी होत असल्याने यावर उपाय योजना – करणे, यावर चर्चा देखील करण्यात आली.

चालू हंगाम २०२४-२५ या हंगामामध्ये मराठवाड्यातील सर्वच गुळ पावडर उत्पादक कारखान्यांनी गाळपास आलेल्या ऊसास प्रती टन २५००/- रु. ऊस दर देण्याचे सर्वानुमते ठरले. सदरील २५००/- रु. कारखाना आपल्या क्षमतेनुसार एक रकमी किंवा दोन हप्त्यामध्ये हा ऊस दर देऊ शकतील.

तसेच चालू हंगाम ०५ नोहेंबर ते १० नोहेंबरच्या दरम्यान सुरु करावा असे सर्वानुमते ठरले. ऊस दराबाबत कोणत्याही कारखान्याने स्वतंत्र परिपत्रक काढून दर जाहीर करू नये तसेच या दरात बदल करू नये असे सर्वानुमते ठरले.

या बैठकीस अध्यक्षस्थानी व्यंकटराव गुंड, हनुमंत मडके, सुरेश पाटील, रवींद्र काळे, विजय नाडे,दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, ओंकार खुर्पे, अगरवाल साहेब, सुदाम वाभळे, दगडे साहेब, नानासाहेब पाटील,सतीश दंडनाईक, श्री. संजय खरात, अभिराम पाटील, आकाश तावडे, चाळक साहेब,गोविंद थोरबोले, कुणाल राठी, औदुंबर डिसले, व मराठवाडा विभागातील गुळ पावडर उत्पादक उपस्थित होते.

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा अवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस

पंढरपूर (बालम मुलाणी )
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं मी मतदार संघाला दिलेल्या शब्दाप्रमाणे  सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधीही दिला मी जे बोलतो ते करतोच समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाला निधी मंजूर करून घेतला आहे हा विकासाचा रथ यापुढे असाच सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन राज्याची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंधळगाव येथे बोलताना केले ते मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर एमआयडीसी, कर्जाळ कात्राळ ते नॅशनल हायवे रस्ता व तामदर्डी बंधारा या कामाचे उद्घाटन डिजिटल प्रणाली द्वारे करण्यात आले.                यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, चेतनसिंह केदार, उद्योगपती संजय आवताडे दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे, विजयसिंह देशमुख अप्पर सचिव दीपक कपूर, गोणेवाडी चे सरपंच रामेश्वर मासाळ  सरपंच विजय माने, विनायक यादव, चांगदेव कांबळे, तानाजी काकडे ,धनंजय पाटील, सुरेश भाकरे दीपक सुडके यांचे सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासने अनेक मिळाली असतील पण मी मंगळवेढ्याच्या शिवारात पाणी आणून दाखवीन असं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन मी पूर्ण केलं असून तुम्ही तुमचं एक मत समाधान ला दिल त्या समाधान आवताडेनी तुमच समाधान करून दाखविले आहे.ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवल्या आहेत या मतदार संघावर पडलेला दुष्काळाचा कलंक पुसून हा मतदार संघ नंबर एक वर आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. विकासासाठी पाणी हे फार महत्त्वाचा असून पाण्याने शेती उद्योग या सर्व गोष्टी होत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत सध्या आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा 12 तास शेतीपंपाचे वीज मोफत देण्याचे आम्ही नियोजन केले आहे एक रुपयात विमा सुरू केला आहे लाडक्या बहिणींना महिना दीड हजार रुपये या सरकारने दिले आहेत हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या पाठीशी तुम्ही रहा या मतदारसंघाचे आणि नंदनवन करून दाखवू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित यांना दिला .
यावेळी प्रास्ताविक प्रास्ताविक भाषणात बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की मी जे जे मागेल ते तुम्ही मंजूर करून दिले आहे विज बिल माफीचा निर्णय तुम्ही घेतल्यामुळे या मतदारसंघातील 48 हजार लोकांना याचा लाभ झाला आहे म्हैसाळ योजनेसाठी तुम्ही केंद्र व राज्याकडून 13 हजार कोटी रुपये दिल्यामुळे या मतदारसंघातील 19 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे उपसा सिंचन योजनेलाही 700 कोटी रुपये देत आज प्रत्यक्षात या कामाला तुमच्यामुळे सुरुवात होत आहे भूगोलाच्या पुस्तकांमध्ये हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून नोंद होती मात्र तुमच्या या निर्णयामुळे आगामी काळात शेती क्षेत्रात अग्रेसर तालुका म्हणून या तालुक्याची नोंद होईल या अगोदरच्या काळात चाळीसगावची प्रादेशिक योजना अस्तित्वात आली मात्र निकृष्ट कामामुळे तीन वर्षापासून खर्च करून ही योजना व्यवस्थित चालत नाही सध्या ही योजना शिखर समितीकडे असून समितीला ही योजना चालवणे शक्य नाही पुन्हा ती योजना एमजीबी कडे देत दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे पंढरपूर एमआयडीसी मंजूर केल्यामुळे येथील तरुणांना आता बाहेरच्या शहरात न जाता इथेच काम मिळणार आहे आम्ही मागायला कमी पडत नाही तुम्ही द्यायला कमी पडू नका असे म्हणत आमदार अवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल फडणवीस यांचे आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी विनोद लटके,अशोक चौंडे विकास पुजारी,प्राजक्ता बेणारे,प्रसाद कळसे, अनिल यांनीही आपली मनोगते व्यक्त केली यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, शिवाजीराव नागणे, नवनाथ पवार, दिलीप चव्हाण, सचिन शिवशरण, रामेश्वर मासाळ, माजी संचालक बापूसाहेब काकेकर, चंद्रकांत पडवळे, जगन्नाथ रेवे, राजन पाटील, वृषाली पाटील बी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ व भारत मुढे यांनी केले.


 मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामदैवतांच्या पालख्या कार्यक्रम स्थळी आणून ग्रामस्थांनी फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्याचबरोबर 24 गावातील माती गोळा करून कळस पूजन ही करण्यात आले

माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना पितृ शोक,हाजी ईस्माईल सौदागर यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

परंडा ( दि ५ ऑक्टोबर )परंडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जकीर सौदागर यांचे वडील हाजी ईस्माईल सौदागर यांचे ५ ऑक्टोंबर रोजी पाहाटे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धप काळाने निधन झाले आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता परंडा येथिल हजरत खाँजा बद्रोद्दीन दर्गाह येथिल कब्रस्तान येथे त्यांचा दफन विधी करण्यात आला.
ईस्माईल सौदागर यांच्या पश्चात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर,माजी नगर सेवक शाबीर सौदागर,वाहेद सौदागर जुबेर सौदागर,अब्दूल सौदागर, फाजील सौदागर हि ६ मुले विवाहीत आसून दोन विवाहीत मुली,नातवंडे असा मोठा सौदागर परिवार आहे.
दफण विधी दरम्यान परंडा शहरासह ग्रामीन भागातील राजकीय,सामाजीक,शैक्षणीक क्षेत्रातील,व्यापारी,शेतकरी मोठया संख्यांने उपस्थित होते.