Home Blog Page 41

मराठवाड्यातील सर्व गुळ पावडर उत्पादक कारखाने प्रती टन ऊसास देणार ₹२५०० दर

इनोव्हीटीव जागरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन च्या बैठकीत निर्णय

धाराशिव –
इनोव्हीटीव जागरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची ०६ ऑक्टोबर रोजी मराठवाडा विभागामधील सर्व गुळ पावडर उत्पादक कारखानदारांची बैठक धाराशिव येथे संपन्न झाली. यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर व मराठवाड्यातील सर्व (जागरी) गुळ उत्पादक उपस्थित होते.

चालू ऊस गाळप हंगाम सन २०२४-२५ मध्ये सुरु होणाऱ्या हंगामाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली असून उद्योगा समोरील – अडचणी, आव्हाने या विषयी चर्चा करण्यात आली. गुळ पावडरचा मागील सहा/आठ महिन्यापासून सातत्त्याने कमी होत असल्याने यावर उपाय योजना – करणे, यावर चर्चा देखील करण्यात आली.

चालू हंगाम २०२४-२५ या हंगामामध्ये मराठवाड्यातील सर्वच गुळ पावडर उत्पादक कारखान्यांनी गाळपास आलेल्या ऊसास प्रती टन २५००/- रु. ऊस दर देण्याचे सर्वानुमते ठरले. सदरील २५००/- रु. कारखाना आपल्या क्षमतेनुसार एक रकमी किंवा दोन हप्त्यामध्ये हा ऊस दर देऊ शकतील.

तसेच चालू हंगाम ०५ नोहेंबर ते १० नोहेंबरच्या दरम्यान सुरु करावा असे सर्वानुमते ठरले. ऊस दराबाबत कोणत्याही कारखान्याने स्वतंत्र परिपत्रक काढून दर जाहीर करू नये तसेच या दरात बदल करू नये असे सर्वानुमते ठरले.

या बैठकीस अध्यक्षस्थानी व्यंकटराव गुंड, हनुमंत मडके, सुरेश पाटील, रवींद्र काळे, विजय नाडे,दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, ओंकार खुर्पे, अगरवाल साहेब, सुदाम वाभळे, दगडे साहेब, नानासाहेब पाटील,सतीश दंडनाईक, श्री. संजय खरात, अभिराम पाटील, आकाश तावडे, चाळक साहेब,गोविंद थोरबोले, कुणाल राठी, औदुंबर डिसले, व मराठवाडा विभागातील गुळ पावडर उत्पादक उपस्थित होते.

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा अवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस

पंढरपूर (बालम मुलाणी )
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं मी मतदार संघाला दिलेल्या शब्दाप्रमाणे  सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधीही दिला मी जे बोलतो ते करतोच समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाला निधी मंजूर करून घेतला आहे हा विकासाचा रथ यापुढे असाच सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन राज्याची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंधळगाव येथे बोलताना केले ते मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर एमआयडीसी, कर्जाळ कात्राळ ते नॅशनल हायवे रस्ता व तामदर्डी बंधारा या कामाचे उद्घाटन डिजिटल प्रणाली द्वारे करण्यात आले.                यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, चेतनसिंह केदार, उद्योगपती संजय आवताडे दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे, विजयसिंह देशमुख अप्पर सचिव दीपक कपूर, गोणेवाडी चे सरपंच रामेश्वर मासाळ  सरपंच विजय माने, विनायक यादव, चांगदेव कांबळे, तानाजी काकडे ,धनंजय पाटील, सुरेश भाकरे दीपक सुडके यांचे सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासने अनेक मिळाली असतील पण मी मंगळवेढ्याच्या शिवारात पाणी आणून दाखवीन असं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन मी पूर्ण केलं असून तुम्ही तुमचं एक मत समाधान ला दिल त्या समाधान आवताडेनी तुमच समाधान करून दाखविले आहे.ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवल्या आहेत या मतदार संघावर पडलेला दुष्काळाचा कलंक पुसून हा मतदार संघ नंबर एक वर आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. विकासासाठी पाणी हे फार महत्त्वाचा असून पाण्याने शेती उद्योग या सर्व गोष्टी होत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत सध्या आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत दिली आहे येत्या काही महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा 12 तास शेतीपंपाचे वीज मोफत देण्याचे आम्ही नियोजन केले आहे एक रुपयात विमा सुरू केला आहे लाडक्या बहिणींना महिना दीड हजार रुपये या सरकारने दिले आहेत हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या पाठीशी तुम्ही रहा या मतदारसंघाचे आणि नंदनवन करून दाखवू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित यांना दिला .
यावेळी प्रास्ताविक प्रास्ताविक भाषणात बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की मी जे जे मागेल ते तुम्ही मंजूर करून दिले आहे विज बिल माफीचा निर्णय तुम्ही घेतल्यामुळे या मतदारसंघातील 48 हजार लोकांना याचा लाभ झाला आहे म्हैसाळ योजनेसाठी तुम्ही केंद्र व राज्याकडून 13 हजार कोटी रुपये दिल्यामुळे या मतदारसंघातील 19 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे उपसा सिंचन योजनेलाही 700 कोटी रुपये देत आज प्रत्यक्षात या कामाला तुमच्यामुळे सुरुवात होत आहे भूगोलाच्या पुस्तकांमध्ये हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून नोंद होती मात्र तुमच्या या निर्णयामुळे आगामी काळात शेती क्षेत्रात अग्रेसर तालुका म्हणून या तालुक्याची नोंद होईल या अगोदरच्या काळात चाळीसगावची प्रादेशिक योजना अस्तित्वात आली मात्र निकृष्ट कामामुळे तीन वर्षापासून खर्च करून ही योजना व्यवस्थित चालत नाही सध्या ही योजना शिखर समितीकडे असून समितीला ही योजना चालवणे शक्य नाही पुन्हा ती योजना एमजीबी कडे देत दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे पंढरपूर एमआयडीसी मंजूर केल्यामुळे येथील तरुणांना आता बाहेरच्या शहरात न जाता इथेच काम मिळणार आहे आम्ही मागायला कमी पडत नाही तुम्ही द्यायला कमी पडू नका असे म्हणत आमदार अवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल फडणवीस यांचे आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी विनोद लटके,अशोक चौंडे विकास पुजारी,प्राजक्ता बेणारे,प्रसाद कळसे, अनिल यांनीही आपली मनोगते व्यक्त केली यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, शिवाजीराव नागणे, नवनाथ पवार, दिलीप चव्हाण, सचिन शिवशरण, रामेश्वर मासाळ, माजी संचालक बापूसाहेब काकेकर, चंद्रकांत पडवळे, जगन्नाथ रेवे, राजन पाटील, वृषाली पाटील बी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ व भारत मुढे यांनी केले.


 मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामदैवतांच्या पालख्या कार्यक्रम स्थळी आणून ग्रामस्थांनी फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्याचबरोबर 24 गावातील माती गोळा करून कळस पूजन ही करण्यात आले

माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना पितृ शोक,हाजी ईस्माईल सौदागर यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

परंडा ( दि ५ ऑक्टोबर )परंडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जकीर सौदागर यांचे वडील हाजी ईस्माईल सौदागर यांचे ५ ऑक्टोंबर रोजी पाहाटे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धप काळाने निधन झाले आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता परंडा येथिल हजरत खाँजा बद्रोद्दीन दर्गाह येथिल कब्रस्तान येथे त्यांचा दफन विधी करण्यात आला.
ईस्माईल सौदागर यांच्या पश्चात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर,माजी नगर सेवक शाबीर सौदागर,वाहेद सौदागर जुबेर सौदागर,अब्दूल सौदागर, फाजील सौदागर हि ६ मुले विवाहीत आसून दोन विवाहीत मुली,नातवंडे असा मोठा सौदागर परिवार आहे.
दफण विधी दरम्यान परंडा शहरासह ग्रामीन भागातील राजकीय,सामाजीक,शैक्षणीक क्षेत्रातील,व्यापारी,शेतकरी मोठया संख्यांने उपस्थित होते.

दत्ता कुलकर्णी यांच्याकडे मराठवाड्यातील सहकार विभागाची जबाबदारी

विधानसभा निवडणूक संचालन समिती अंतर्गत सहकार क्षेत्र संपर्क समितीमध्ये मराठवाड्याची जबाबदारी

धाराशिव – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली असून नव्या चेहऱ्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. विधानसभा प्रदेश निवडणूक संचलन समिती मध्ये धाराशिव जिल्ह्यातून भाजपचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.दत्ताभाऊ कुलकर्णी यांना सहकार विभागाची जबाबदारी जबाबदारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा अध्यक्षतेखालील समितीत धाराशिव जिल्ह्यातून दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश आहे या समितीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, माजी मंत्री नारायण राणे, यांच्यासह राज्यातील मातब्बर नेते मंडळींचा समावेश आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी व्यूहरचना अखून काम करायचा आहे. सहकार क्षेत्र संपर्क समितीमध्ये विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, मराठवाड्यातून दत्ताभाऊ कुलकर्णी, अशोकराव जगताप उत्तर महाराष्ट्रातून रोहित निकम, केदा आहेर, मुंबई विभागातून नितीन बनकर तर विदर्भ मधून योगेश बन यांची निवड करण्यात आलेली आहे.

मुरगूडमधे कौटुंबिक वादातून शिक्षक पतीकडून  पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून

मुरगूड(जोतीराम कुंभार) मुरगूड येथील एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून शिक्षक पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून केला. आज सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. या घटनेने मुरगूडमधे एकच खळबळ उडाली असून या घटनेची नोद मुरगूड पोलीसात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील साई कॉलनीत राहत असलेल्या शिक्षक परशराम पांडूरंग लोकरे वय 53 यांचे आपली पत्नी सौ. सविता लोकरे वय 45 हिच्याशी कौंटुबिक कारणातून वारंवार भांडण होत होते. आज त्या भांडणाचे पर्यावसन खुणात झाले या दोघात वाद सुरु असताना त्यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी वाद विकोपाला गेला शिक्षक पतीने राग अनावर झाल्याने वखंटा घेऊन सौ. पत्नी सविताच्या डोक्यात घातला यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. ही घटना सकाळी साडे नऊ च्या दरम्यान घडली या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात हलविला. अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनीही दुपारी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत.
दरम्यान अपूर्वा परशराम लोकरे वय 25 हिने आपल्या आईच्या या दुर्दैवी घटने संबंधी मुरगूड पोलीसात फिर्याद दिली असून या घटनेची नोंद झाली आहे. शिक्षक पती परशराम पांडूरंग लोकरे वय 53 यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वायफळे ता. तासगाव च्या मंडल अधिकारी वैशाली वाले ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले : नोंद घालण्यासाठी मागितली होती लाच : एक खासगी इसमही ताब्यात


तासगाव( प्रतिनिधी) तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मंडळ अधिकारी वैशाली प्रवीण वाले यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. वाले यांनी बस्तवडे येथील एका व्यक्तीची एक नोंद घालण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले होते. हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यासोबत बस्तवडे येथील एका खासगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

      वायफळे येथे मंडल अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून वैशाली वाले यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. पैसे दिल्याशिवाय नोंद केली जात नव्हती. अनेक सामान्य लोक वाले यांच्या या छळाला कंटाळले होते. वायफळे येथील तलाठी कार्यालयासह मंडळातील इतर तलाठी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामच होत नव्हते. बारीक-सारीक कामासाठीही पैशाची मागणी केली जात होती. त्यामुळे सामान्य लोकांची आर्थिक लुबाडणूक होत होती.

      याप्रकरणी मंडळ अधिकारी वाले यांना काही लोकप्रतिनिधींनी सूचनाही केल्या होत्या. सामान्य लोकांची कामे तातडीने करा. लोकांना आर्थिक भुर्दंड लावू नका. अनावश्यक पैसे घेऊन त्यांची लुबाडणूक करू नका, अशा सूचना वेळोवेळी देण्यात आले होत्या. मात्र वैशाली वाले यांच्या कारभारात कसलीही सुधारणा होत नव्हती. पैसे दिल्याशिवाय त्या कोणत्याही कामाला हात लावत नव्हत्या. एकाही कागदावर सही करत नव्हत्या, अशा तक्रारी होत्या.

       त्यांच्या कारभाराला सामान्य लोक अक्षरशः कंटाळले होते. दरम्यान, बस्तवडे येथील एका व्यक्तीच्या व्यवहाराची नोंद घालण्यासाठी वाले यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित व्यक्तीने इतक्या पैशांची जुळणी होणार नाही, असे सांगितले होते. दरम्यान चर्चेनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर संबंधित तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. वाले यांच्या विरोधात रीतसर तक्रार दिली. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांच्या विरोधात वायफळे येथे सापळा लावला.

      तक्रारदाराला पैसे घेऊन वाले यांच्याकडे पाठवण्यात आले. यावेळी वाले यांनी संबंधित कामासाठी सात हजार रुपये मागितले व घेतले. यावेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाले यांना रंगेहाथ पकडले. वाले यांच्यासह एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

     या कारवाईमुळे तासगाव तालुक्यातील महसूल प्रशासनातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. वाले यांच्या कारभाराची यानिमित्ताने पोलखोल झाली आहे. वाले यांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे. दरम्यान वाले यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुसक्या आवळल्याने वायफळे मंडळात आनंदाचे वातावरण आहे.

अंतिम नोटीस दिल्यानंतर कारवाई करण्याऐवजी पुन्हा कारणे दाखवा नोटीस


धाराशिव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्यांचा प्रताप



धाराशिव, दि. ३० (आकाश नरोटे)

जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांचा अजब कारभार समोर आला आहे. कार्यालयांतर्गत असणाऱ्या वाहनांचा वेळेत विमा काढणे, फिटनेस, पीयूसी काढणे याची जबाबदारी असणाऱ्या उप अभियंता एस. पी. शिंदे यांना २१ ऑगस्ट रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस काढली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षीत असताना कार्यकारी अभियंत्यांना वेगळीच कार्यपध्दती शोधून काढली आहे. अंतिम कारणे दाखवा नोटिशीनुसार कारवाई करण्याऐवजी दि. २३ सप्टेंबर रोजी पुन्हा कारणे दाखवा नोटीस काढून प्रशासकीय कार्यवाहीचा नवीन प्रताप आणला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीसाठी हातपंप दुरुस्तीसाठी पंचायत समिती स्तरावर वेगवेगळी सहा वाहने देण्यात आली आहेत. त्या वाहनाचा विमा काढणे, फिटनेस पीयूसी काढणे याची जबाबदारी  उप अभियंता यांत्रिकी  यांची आहे. मात्र उप अभियंता यांनी हे कर्तव्य पार न पाडल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना ५२ हजाराचा दंड देखील ठोठावला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सचिन सर्जे यांच्या तक्रारीवरून सुरू असून पहिली तक्रार त्यांनी ०३ मे रोजी केली त्यावर उप अभियंता यांना पहिलं पत्र ११ जून रोजी काढण्यात आले. त्यानंतर दुसरे पत्र १८ जून रोजी कार्यकारी अभियंता यांनी उप अभियंता यांना काढले त्यांनतर २१ ऑगस्ट रोजी उप अभियंता यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली.त्यात
कार्यालयांतर्गत शासकीय वाहनांचा वेळेत विमा काढणे, फिटनेस व पीयुसी काढणे हे आपले अभिप्रेतः कर्तव्य असताना तशी कार्यवाही न करता वाहने नियमबाह्यपणे चालू ठेवुन कर्तव्यात कसूर केल्याचे सकृतदर्शनी सिध्द होत असल्याचे म्हटले आहे.  सुचना देवुनही वरील बाबी प्रलंबीत ठेवलेल्या आहेत.
यावरुन उपअभियंता शासकीय नियमांचे व वरीष्ठांच्या सुचना व आदेशांचे उलंघन करत असल्याचे
स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत खुलासा सादर न केल्यास किंवा समाधानकारक व वेळेत सादर न केल्यास आपले काहीही म्हणने नाही असे गृहीत धरुन आपणा विरुध्द संदर्भीय नियमानुसार सक्त शिस्तभंग विषयक कार्यवाही अनुसरली जाईल असा सज्जड इशारा देखील देण्यात आला होता  तसेच खुलासा सादर न केल्याने वरिष्ठांच्या आदेशाचे व शासन नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. असे असून देखील कार्यकारी अभियंता यांनी पुन्हा २३ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस काढल्याने प्रशासकीय पत्राचा हा खेळ नेमका कशासाठी सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.


ही वाहने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नावाने आहेत. तरी प्रकरणांत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जलदगतीने कारवाई करावी, अन्यथा या प्रकरणात न्यायालयात जाणार आहे. सचिन सर्जे, तक्रारदार

PMFBY चे पोर्टल बंद कृषी आयुक्तालयाच्या विमा कंपन्यांना सूचना

धाराशिव –

पिकाचे नुकसान झाले तर पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना मदत मिळते मात्र त्यासाठी नुकसान झाल्याच्या ७२ तासाच्या आत तक्रार करावी लागते मात्र तक्रार करण्यासाठीची वेबसाईट बंद असल्याने शेतकऱ्यांना तक्रार करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना पत्र काढत महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२४ हंगामात, दिनांक २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२४ दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकरी स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपश्चात नुकसान बाबी अंतर्गत विमा कंपनीला नुकसानीच्या सूचना देत आहेत.

मात्र दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री पासून PMFBY पोर्टल बंद असल्यामुळे शेतकरी सूचना देऊ शकत नाही. या परिस्थितीत जेवढ्या कालावधीसाठी पोर्टल बंद आहे, तो कालावधी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सूचना देण्यासाठी ७२ तासाची मुदतीमध्ये गृहीत धरला जाणार नाही याची सर्व विमा कंपन्यांनी नोंद घ्यावी, विमा कंपन्यांनी त्यांचे तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी यांच्यामार्फत हा संदेश सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा अश्या सूचना कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना दिल्या आहेत.

नागज फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज बांधवांचा दोन तास रास्ता रोको

माजी खासदार संजय (काका) पाटील यांनी लेखी पत्राद्वारे व रोहित पाटील यांनी फोन व्दारे पाठिंबा दिला.

कवठेमहांकाळ,दि.२४.(तानाजी शिंगाडे)

राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी कवठेमहांकळ येथील रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्ग नागज फाट्यावर सोमवारी (ता. २३) धनगर समाज बांधवांनी तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. शेवटी तहसीलदार प्रतिनिधी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित व्हावे या करिता पंढरपूर या ठिकाणी 14 दिवसापासून आमरण उपोषण व आंदोलन सुरू आहे आंदोलनास पाठिंबा म्हणून आंदोलन होणार असल्याचे म्हटले आहे.तसेच महाराष्ट्रातील आदिवासी असलेला धनगर समाज कायम अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित राहिला आहे. धनगरसमाजासाठी हक्काचे अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा,अन्यथा धनगर समाज पेटून उठल्या शिवाय राहणार नाही, असे नमूद केले आहे.

यावेळी रास्ता – रोको आंदोलनात धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या अमलबजावणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वसंत कोळेकर गुरुजी,माजी सभापती अजितदादा कारंडे, माजी सभापती विकास हक्के, पैलवान नितीन आमुने, सुर्यकांत ओलेकर, सुरेश घागरे, राहुल गावडे,सुभाष खांडेकर यांच्या सह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
या आंदोलनात माजी उपायुक्त भाऊसाहेब कोळेकर, उपसभापती रावसाहेब पाटील,जनाप्पा खताळ, संजय दाईगडे, दत्ता पाटील, दादासाहेब चोरमुले, कोंडिबा पाटील,संजय घागरे, संजय खरात,गटुभाऊ ओलेकर,
युवराज घागरे, माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील सरपंच रमेश कोळेकर, महादेव यमगर, पांडुरंग यमगर,दिपक कोळेकर, मंजुनाथ कोळेकर अमोल ओलेकर, भारत माने, अवधुत ओलेकर, राघू शिंदे, संभाजी शिंदे, निवृत्ती इरकर,आदींसह असंख्य सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

ईट येथे खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाची जोरदार तयारी


ईट ( सोमेश्वर स्वामी)
महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता धमाल मजेदार कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय दादा सावंत यांच्या मित्र मंडळ कडून ईट येथे करण्यात आलेले आहे . हा कार्यक्रम खास सेने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याची जोरदार तयारीकरण्यात आली आहे .याची पाहणी शिवशक्ती कारखान्याचे सर्वेसर्वा केशव सावंत यांच्याकडून करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शिवाजी तात्या भोईटे,धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक प्रवीण देशमुख,युवा सेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण ,ईश्वर आबा देशमुख व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून या कार्यक्रमाचे आयोजन जि.प प्रशाला ईट शाळेच्या प्रांगणात करण्यात आलेले आहे . या कार्यक्रमात प्रथम पारितोषक फ्रीज,द्वितीय टीव्ही,तृतीय वॉशिंग मशीन, चतुर्थ पिठाचीचक्की व पाचवे बक्षीस शिलाई मशीन दिले जाणार आहे.
उपस्थित राहणाऱ्या सर्वच महिलांना साडीची भेट दिली जाणार आहे.
हा कार्यक्रम घेण्यामागचा प्रमुख हेतू महिलांना घरगुती कामातून विरंगुळा मिळावा आणि एक दिवस मनोरंजन व्हावे यासाठी ही होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली आहे . त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी होण्याचे अवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे .