Home Blog Page 40

बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने केला स्वतःचे गाडीवर हल्ला करण्याचा बनाव

धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की आणि त्यातून होणाऱ्या तक्रारी मुळे भितीचे वातावरण निर्माण झालेले असताना मेसाई जवळगा येथील सरपंचावर हल्ला झाला हा हल्ला पवनचक्की प्रकरणात झाल्याचा प्राथमिक संशय निर्माण करण्यात आला होता मात्र याबाबत हा हल्ला बंदुक परवाना मिळवण्यासाठी सरपंचाने स्वतःच्या गाडीवर हल्ला करण्याचा बनाव केल्याचे तपासातून समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
फिर्यादी . नामदेव बालीश निकम, वय 38 वर्षे, व्यवसाय गाडी धंदा टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स पुणे ह.मु. जवळगा मेसाई यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी फिर्यादी जबाब दिली की, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रविण नरहरी इंगळे हे दोघे दि.26.डिसेंबर रोजी रात्री 10 वाजणेचे सुमारास व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडने त्यांची कार क्र. MH 12 QT 7790 मध्ये जात असताना दोन नेमप्लेट झाकलेल्या मोटारसायकल वरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तीने मिळून फिर्यादी यांचे गाडीवर दोन्ही बाजूने अंडे, दगड, सिमेंटचा ठोकळा असलेल्या पाईपने मारुन काच फोडली. त्यानंतर गाडीत असणारे फिर्यादी व साक्षीदार प्रविण इंगळे यांचे अंगावरती पेट्रोल भरलेला फुगा फेकुन हल्ला केला आहे. अशा प्रकारची माहिती पोलीसांना कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना होवून घटनासथ्ळाची पाहणी केली. नामदेव बालीश निकम यांचे फिर्याद जबाब वरुन अज्ञात चार लोकाविरुध्द पोस्टे तुळजापूर गु.रं.नं. 591/2024 कलम 110,324 (6), 118(1), 126(2),352, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला.

सदर गुन्ह्याचे तपासामध्ये घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता घटनास्थळावरील परिस्थिती आणि फिर्यादी यांनी सागिंतलेली घटना यामध्ये विसंगती दिसुन येत होती. सदर गुन्ह्याचा तांत्रीक पध्दतीने तपास करुन यातील फिर्यादी नामदेव निकम व साक्षीदार प्रविण इंगळे या दोघांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता फिर्यादी व साक्षीदार यांनी सदरची घटना ही फिर्यादी यांना बंदुकीचे लायसन्स काढणेसाठी स्वतःवर इतर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तरी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी स्वतःला बंदुकीचे लायसन्स मिळविणे करीता स्वतःव साक्षीदार यांचेवर पेट्रोल टाकुन, गाडीचे काच फोडून हल्ला केल्याचे कृत्य हे फिर्यादीने स्वतःच करुन हल्ला केल्याचा बनाव केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस
अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे व स्थानिक गुन्हे शाखेची टिम, पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, सपोनि भालेराव, सपोनि चासकर यांनी केलेला आहे.

शैक्षणिक सहल बसला अपघात, पाच विद्यार्थी किरकोळ जखमी!


कसबे तडवळे : धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जय हिंद विद्यालयाच्या शैक्षणिक सहल एसटी बस देवगड हुन कुणकेश्वर  कडे जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील खाक्षी घाट परिसरातील तीव्र वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने साडेतीनच्या सुमारास अपघात झाला. सदर बस चालकाच्या प्रसंगावधातेने चाळीस विद्यार्थी मृत्यूच्या दाढेतून बचावले आहेत.
या बाबत मिळालेली माहिती अशी की,  देवगडहून कुणकेश्वरकडे जाणारी धाराशीव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालयाची शैक्षणिक सहलीच्या एसटी बसला खाक्षी घाट परिसरातील तीव्र वळणावर गाडीचे ब्रेकफेल झाल्याने अपघात घडला. एसटी बस चालकाच्या प्रसंगावधातेने नजीकच्या देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या पाईप लाईनला धडकली व भेंडले माडावर जाऊन नजीकच्या झाळीत अडकली गाडीत सुमारे चाळीस  विद्यार्थी होते. सुदैवाने गाडीतील पाच  विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.


या .अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थ विनोद पेडणेकर उदय परब, महेश कोयघाडी, दर्शन नवलू , समीर लाड यांनी धाव घेतली व अन्य वाहनांना सूचना करून सहकार्य केले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्याना देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील प्रवासासाठी मार्गस्त झाले.घटनास्थळी स्थानिक आगार प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, हेड मकेनिक ब्रम्हदेव चव्हाण, पोलिस हवालदार आशिष कदम यांनी धाव घेतली. जय हिंद विद्यालयाची  शैक्षणिक सहल लांजा येथून देवगड कडे आली होती. त्यानंतर कुणकेश्वर मार्गे मालवण कडे जात असताना जामसंडे साक्षी या मार्गावरून कुणकेश्वरकडे जात असताना खाक्षी घाटीमध्ये एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाचे लक्षात येताच त्याने मोठ्याने ओरडून गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे सांगितले व विद्यार्थी शिक्षक यांना सावध केले.

या अपघातात पृथ्वीराज अमोल धाबेकर, (१४), गणेश सिद्धेस्वर भडके(१५), श्रीकृष्ण शीवाजी करंजकर१४), संकेत सुखदेव सुकांडे (१६), प्रतिक,दत्तात्रय शिंदे (१६) याचा समावेश आहे.दरम्यान पुढील प्रवासाकरीता देवगड आगाराने पर्यायी गाडी व बस चालक उपलब्ध करून दिला.

आमदार रोहित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार गट ) विधीमंडळच्या मुख्य प्रतोदपदी निवड

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांची घोषणा

पंचवीस वर्षे च्या तरूण आमदाराचा विधिमंडळात घुमणार आवाज

तासगाव ( राहुल कांबळे ) तासगाव - कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित दादा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ही निवड जाहीर केली. या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज विधानसभेत घुमणार आहे. अत्यंत तरुण वयात पाटील यांच्यावर मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी टाकल्याने त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे समर्थकांबरोबरच राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघातून बाजी मारली. या मतदारसंघात स्व. आर. आर. आबा पाटील कुटुंबीयांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी, माजी खासदार संजय पाटील हे त्यांच्या विरोधात उभे होते. राज्याचे लक्ष लागून लागलेला राहिलेल्या या निवडणुकीत रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा २९००० इतक्या मतांनी पराभव केला. देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला. दरम्यान, तासगाव - कवठेमहांकाळमध्ये महाविकास आघाडीचा आमदार झाला असला तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून पन्नास उमेदवारही निवडून आणता आले नाहीत. त्यामुळे या विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. विधिमंडळातील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची आज निवड करण्यात आली आहे. रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. परंपरागत प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना चितपट करून त्यांनी विधानसभेत धडाकेबाज 'एन्ट्री' केली आहे. स्व आर. आर.आबा पाटील यांचे चिरंजीव म्हणून राज्यभर त्यांच्या नावाभोवती 'ग्लॅमर' आहेच. मात्र आता देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांचा देशभर नावलौकिक होत आहे. अत्यंत नम्र, अभ्यासू, कोणत्याही गोष्टीचा खोलात जाऊन माहिती घेण्याचा स्वभाव, वक्तृत्व कौशल्य, साधी राहणी - उच्च विचारसरणी यामुळे रोहित पाटील यांच्याकडे नेहमीच सर्वांचा 'फोकस' असतो. आता ते राज्याच्या विधानसभेत काम करताना दिसणार आहेत. वय कमी असले तरी अभ्यासू वृत्तीमुळे विधानसभेत ते विरोधी बाकावर बसूनही आपला आवाज घुमवतील, यात शंका नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गटनेते पदी आमदार जितेंद्र आव्हाड तर रोहित पाटील यांची आज पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी ,व प्रतोत पदी माळशिरस चे आमदार उत्तम जानकर यांची निवड केली.आम.रोहित पाटील त्यांच्यावर आता पक्षाने अधिकची जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तरुण आमदारांना पुढे आणून आगामी काळात त्यांना राज्याचे भविष्य बनविले जात असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

आमदार रोहित दादा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधीमंडळ मुख्य प्रतोत पदी निवड करण्यात आल्याचे समजताच तासगाव शहरांमध्ये व मतदारसंघांमध्ये फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

तरूणाई ला प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वेशभूषेत रस्त्यावर उतरला तरुण; परंडा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५७.०७ टक्के मतदान

भूम ( वसीम काजळेकर )
लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी शासन जसे प्रयत्न करते तसेच प्रयत्न काही नागरिक करत असतात. परंडा मतदारसंघात तरुणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत येऊन मतदान करण्याचे आवाहन केले. परांडा विधानसभा मतदार संघातील २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. परांडा विधानसभा मतदार संघात हाती आलेल्या आकडेवारी नुसार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ५७.०७ टक्के मतदान झाले. परांडा विधानसभा मतदार संघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला होता. विद्यमान विधानसभा सदस्य प्रा डॉ तानाजी सावंत,माजी आमदार राहुल मोटे,वंचितचे प्रवीण रणबागुल,रासप चे डॉ राहुल घुले अशी चौरंगी लढत या मतदार संघात रंगली होती. या मतदार संघात ३ लाख ३० हजार ७७३ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ७५ हजार ३२१ पुरुष तर १ लाख ५५ हजार ५४६ स्त्री मतदार आहेत. या मतदार संघात ६ तृतीय पंथी मतदार आहेत. भूम,परांडा,वाशी या तिन्ही तालुक्यात ३७६ मतदान कक्षाची सुविधा करण्यात आली होती. भूम तालुक्यात १३५ मतदान केंद्रावर ६५ हजार ३९९ पुरुष तर ५६ हजार ३४२ एकूण १ लाख १९ हजार ६४१ मतदार होते. परांडा तालुक्यात १४२ मतदान केंद्रात ६५ हजार ७५१ पुरुष व ५८ हजार ९२ महिला असे एकूण १ लाख २३ हजार ८४७ मतदार होते. वाशी तालुक्यात ९९ मतदार केंद्रात ४६ हजार १७१ पुरुष तर ४१ हजार ११२ असे एकूण ८७ हजार २८५ मतदार होते. उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परांडा मतदार संघात मतदानाच्या दिवशी कोठेही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही .

तानाजीराव सावंत यांनी दिलेली अश्वासने पाळली नाहीत, त्यांनी मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली – राहुल मोटे

तानाजीराव सावंत यांनी गत विधानसभा निवडणुकीत
मतदाराना दिलेल्या खोटया आश्वासनाची राहूल मोटे यांनी पत्रकार परीषदेत पुराव्यासह केली पोलखोल

परंडा (भजनदास गुडे ) तानाजीराव सावंत यांनी गत विधानसभा निवडनुकी वेळी मतदार संघांतील मतदारांना दिलेली अश्वासने पाळली नाहीत त्यांनी मतदार संघातील जनतेची फसवणूक केली आसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेरवार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
गुरूवार दि १४ नोव्हेंबर रोजी परंडा येथील सरगम मंगल कार्यालयात संध्याकाळी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी तानाजीराव सावंत यांनी दिलेल्या विविध अश्वासणाची ऑडियो क्लीप दाखवीत खोटया आश्वासनाची पोलखोल केली.
पुढे बोलताना राहुल मोटे म्हणाले की पाच वर्षात उजणीचे पाणी का आणले नाही तसेच , परंडा व वाशी येथे एम.आय.डी.सी कुठे आहे. त्यांनी दाखऊन द्यावी असे आवाहन केले.तसेच बचत गटाने उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ मिळऊन देतो असे अश्वासन सावंत यांनी दिले होते.कोणतेही अश्वासन पाळले नाही त्या मुळे महिलांनी सावंत यांना मतदान का करावे असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या कार्यकाळात मतदार संघात शासकीय नाविन कार्यालयाची इमारत,पाझर तलाव,बांधारा, मध्यम,लघू तलाव,नवीन रुग्लाय उभारून चालू केले असल्याचे त्यांनी दाखऊन ह्यावे असे अवाहान मोटे यांनी केले आहे.
तसेच पुढे बोलताना मोटे म्हणाले की मला मतदार संघातील मतदारांचा वाढता
पाठीबा पाहून त्यांच्या पाया खालची घसरली असल्याने ते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत असे मोटे म्हणाले
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. संदीप पाटील,कॉग्रेस आयचे तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, आमोल काळे,अॅड.नुरोद्दीन चौधरी,रमेश परदेशी,अॅड सुभाष वेताळ,राहूल बनसोडे,किरण करळे,मधुकर पाटील,विक्रम पाटील,सत्तार पठाण,पाशाभाई शाहाबर्फीवाले,हरिचंद्र मिस्कीन, अॅड.गोविद कोटूळे,डॉ.रविद्र जगताप, हनुमंत कोलते, धनंजय मोरे,पंकज पाटील, सचिण पाटील,मलीक शेख,बुद्धीवान लटके,सुरेश कोकाटे,किरण शिदे,सुधीर वाघमोडे,गणेश चव्हाण, खय्युम तुटके याच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास अघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक संपन्न

महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी करण्याचा संकल्प

तात्या अखेर पर्यत शिवसेना पक्षाशी निष्ठेने राहीले मी ही पक्षनिष्ठा सोडणार नाही रणजित पाटील यांची घोषणा

महाविकास अघाडीचे उमेदवार राहूल मोटे यांना विजयी करण्याचे रणजित पाटील यांचे शिवसैनिकांना आवाहन


परंडा (भजनदास गुडे)तात्या शेवट पर्यंत शिवसेना पक्षाशी एक निष्ठेने राहील मी पण त्याच प्रमाणे शिवसेना पक्षाशी निष्ठेने राहाणार अल्याचे अश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी परंडा येथिल महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना दिले.
शनिवार दि ९ नोव्हेंबर रोजी परंडा येथिल महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची परंडा शहरातील राजवीरा लॉन्स येथे संयुक्त बैठक घेण्यात आली.
महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडू शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांना परंडा विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती तर महा विकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहूल मोटे यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती.पाटील व मोटे यांनी पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या मध्ये संमभ्रमाचे वातावरण तयार झाले होते.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनमध्ये चर्चा होऊन परंडा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडण्यात आला.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आखेरच्या दिवशी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणजित पाटील यांना उमेदवारी परत घेण्याच्या सुचना दिल्या असता उद्धव ठाकरे यांचा आदेश व पक्षनिष्ठा काय असते ते दाखऊन उमेदवारी अर्ज परत घेतला.रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निष्ठांवंत शिवसैनिका मध्ये नाराजी पसरली होती.शिव सैनिकांची नाराजी दुर करण्या साठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्याची संयुक्त बैठक ठेवण्यात आली होती.
या बैठकीस उपस्थित शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते यांना रणजित पाटील यांनी मार्गदर्शन करताना महा विकास आघाडीचे उमेदवार राहूल मोटे यांना विजयी करण्याचे अवाहाण केले या मुळे शिवसैनाकांची नाराजी दूर झाल्याचे दिसुन आले.
यावेळी रणजित पाटील म्हणाले की तात्या आजारी असताना तानाजी सावंत यांच्या सांगण्या वरून तात्याच्या विरोधात बॅक संचालक पदाची तक्रार करण्यात आली अश्या लोकांना धडा शिकवायची वेळ आली असुन महाविकास अघाडी चे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कोहिर सय्यद,माजी जि.प.सदस्य सिद्धेश्वर पाटील,ॲड.संदिप पाटील, अणिल शेंडगे,दिलीप शाळू,रुपेश शेंडगे,जयकुमार जैन,तात्या गायकवाड,चेतन बोराडे,रईस मुजावर,शंकर जाधव,शंकर इतापे,हरिश्चंद्र मिस्कीन,अॅड. सुजित देवकते,नसिर शहाबर्फीवाले,अॅड.सुभाष वेताळ,रेवण ढोरे,सुरेश डाकवाले,दादा पाडुळे,अरविद
नरुटे,नंदू शिदे,संतोष गायकवाड प्रशांत गायकवाड, दत्ता मेहर, दत्ता गुडे,आप्पा नरुटे,डिगंबर गुडे,तानाजी गुडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे यांनी केले.

गंधोरा शिवारात शेतीच्या वादातून मारहाण;15 जणांवर गुन्हे दाखल

सलगरा,दि.19 (प्रतिनिधी) – तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील गंधोरा शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सलगरा-गंधोरा या दोन्ही गावातील मिळून एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी गंधोरा येथील फिर्यादी-सविता राठोड,(वय 38 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे – बाळु नागनाथ पाटील,सतिश शहाजी पाटील, दयानंद सतिश पाटील,नवनाथ शहाजी पाटील,लक्ष्मण नवनाथ पाटील, नागनाथ शहाजी पाटील, संतोष धनाजी मुसळे, हणुमंत जाधव, प्रविण पदम भोसले, कल्याण हनुमंत जाधव, ज्ञानु हनुमंत जाधव, सर्व रा.गंधोरा ता.तुळजापूर, सागर मनिष मुळे,बाळु नामदेव मुळे, अमर अनिल मुळे, सर्व रा.सलगरा (दि.) ता.तुळजापूर, यांनी (दि.18ऑक्टोबर) रोजी 12.30 वा.सु.गंधोरा येथे फिर्यादी नामे-सविता नामदेव राठोड, (वय 38 वर्षे) रा.गंधोरा, यांना व त्यांचे आई, वडील, भाऊ व भावजय यांना आरोपींनी शेतीच्या वादाच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठी व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सविता राठोड यांनी (दि.18ऑक्टोबर) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 118(1),74, 115(2),352, 351(2),189(2), 191(2), 191(3), 190, 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावधान!सोनारी परिसरात वाघ आलाय? सोनारी परिसरात वाघ सदृश प्राणी दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण


सोनारी (अशोक माने)
सोनारी कौडगाव रस्त्यालगत शेतातून घरी येत असताना सोनारी येथील केतन साळुंके व दत्ता साळुंके यांना वाघ सदृश प्राणी हरणाची शिकार करुन तुरीच्या शेतातून ऊसाच्या शेतात जाताना निदर्शनास आले. हि घटना दि. १७ रोजी सायंकाळी ५ ते ५:३० च्या दरम्यान घडली. अचानक समोरुन जानार्या भला मोठा वाघ सदृश प्राणी दिसल्याने दोघेही घाबरुन शेतातून पळ काढत जवळीलच जगताप वस्तीवर येऊन तेथील नागरीकांना सदीरल घटनाक्रम सांगीतला. यावेळी संबंधीत वन विभाग अधिकारी यांना फोन द्वारे कल्पना दिल्यावर वन मजूर यांनी रात्री ७:३० च्या दरम्यान येऊन पाहणी केली असता तरस किंवा चिता असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सकाळी वन विभाग अधिकारी येऊन पाहणी करतील तोपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिल्या आहेत.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा महायुती सरकारने प्राधान्यक्रम बदलल्याचा जिल्हाप्रमुखांचा अजब दावा

कैलास पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर मात्र मुळ प्रश्न कायम

धाराशिव –
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा महायुती सरकारने प्राधान्यक्रम बदलल्याचा अजब दावा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केला. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्राधान्यक्रम बदलल्याचा दावा पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता त्यामुळे नेमकं खरं कोण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत जिल्ह्यात सध्या पाणीबाणी सुरू असून यंदाची निवडणूक या पाण्याभोवतीच राहिल अशी शक्यता आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाहणी दौऱ्यात जो गोंधळ घातला तेव्हापासून सुरू झालेले नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेत आ. कैलास पाटील यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर दिले मुद्दे खोडून काढण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे ते म्हणाले मात्र आ. कैलास पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना केवळ राजकीय उत्तरे दिल्याने मुळ प्रश्न कायम आहेत. धाराशिव कळंब मतदारसंघात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी आणण्याबाबत आ. कैलास पाटील यांनी कोणते प्रयत्न केले असा सवाल सूरज साळुंके यांनी केला मात्र धाराशिव कळंब मतदारसंघात येणारे पाणी उपसा सिंचन क्र.१ मधून येणार की क्र. 2 मधून येणार याबाबत प्रश्न विचारला असता त्याबाबत माहिती घेऊन सांगतो असे उत्तर त्यांनी दिले.
आ. कैलास पाटील यांनी सरकारने निधी कमी दिला याबाबत पत्रकार परिषदेत आकडेवारी दिली महाविकास आघाडीच्या काळात केलेली तरतूद आणि वितरीत झालेला निधी याबाबत देखील स्पष्टपणे माहिती दिली मात्र सूरज साळुंके यांनी विद्यमान सरकारने केलेली तरतूद आणि वितरीत केलेला निधी याबाबत लेखी माहिती द्यायला तयार असल्याचे म्हटले मात्र आकडेवारी दिली नाही. आमदार आणि खासदार खोटी माहिती देत असून खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची अवस्था असल्याचे सूरज साळुंके म्हणाले.

सूरज साळुंके एकाकी?

नवं सरकार स्थापन झाल्यापासून आ.कैलास पाटील, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या पत्रकार परिषदेला सूरज साळुंके एकाकी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये समन्वय समिती स्थापन झाली होती त्या समितीमधील कोणीही त्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहत नाहीत त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष सूरज साळुंके एकटे पडले आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा ;वाघ वाहनातून काढली छबिना मिरवणूक

धाराशिव दि.०९ (प्रतिनिधी) शारदीय नवरात्र महोत्सवात आज ०९ ऑक्टोबर रोजी बुधवारी सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.  

श्री तुळजाभवानी देवीजींच्या आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. 

या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला (मळ) पासून दोन दैत्य उत्पन्न झाले.त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत.ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले.  त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन देवीला जागविले व विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया देवीला विश्राम करण्यासाठी दिले.त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते.अशी आख्यायिका सांगितली जाते.

शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.यात उद्या १०  ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११  ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.    

काल ८ ऑक्टोबर रोजी मंगळवारी रात्री श्री देवीजींची वाघ वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.मोठया संख्येने भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.