Home Blog Page 310

दैनिक जनमत २३ जानेवारी E paper

दैनिक जनमत २२ जानेवारी E Paper

टक्केवारीचे वाढते प्रमाण ( अग्रलेख )

देशातील आर्थीक, सामाजिक परिस्थीतीची टक्केवारी गेल्या काही वर्षांत खालावत आहे. मंदी, बेरोजगारी, महागाई हे त्याच आकडेवारीतून दिसते. मात्र भ्रष्टाचाराची आकडेवारी स्पष्टपणे समोर आली नसली तरी त्याचे काही निदर्शक आहेत. दस्तुंरखुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीच ही गोष्ट समोर आणल्याने त्यात तथ्यता वाटते. रस्त्याची कामे करणार्‍या कंपन्यांना त्या त्या भागातील लोकप्रतिनीधींनी पैसे मागीतले. दुष्काळी भाग असणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींचाही त्यात समावेश आहे. १०० कोटींच्या कामात २ टक्के म्हणजेच २ कोटी एवढी ती रक्कम आहे. ही माहीती कंपन्यानीच गडकरींना दिल्याने त्यांनी सी. बी. आय. मार्फत याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यात गडकरींचे अभिनंदन करावे लागेल. अनेकदा लोप्रतिनीधी नेमकेे कशासाठी आंदोलन करतात याची खडानखडा माहिती नेत्यांना असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कंत्राटदाराकडून कोट्यावधी रूपये लोप्रतिनीधी घेत असतील तर त्यांना कुठलाच नैतिक अधिकार रहात नाही. ज्या कामात त्यांनी पैसे मागीतले त्याचा दर्जा ढासळलेलाच रहाणार. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय तीन टोलनाके आहेत त्याच्यापैकी दोन टोलनाक्यावर शिवसेनेच्या खासदार आमदारंानी विविध मागण्यासाठी आंदोलन केले आंदोलनातील मागण्या रास्त आहेत. मात्र खासदार हे देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांनी या मागण्यांसाठी तिथे नेमका काय पाठपुरावा केला? यासाठी संबंधित विभागाच्या नेत्यांची कितीवेळा भेट घेतली, अधिकार्‍यांशी काय चर्चा केली काय पाठपुरावा केला हे ही नागरीकांना सांगायला हवे होते. मात्र कार्यकर्त्यांच्या गर्दीचा वापर निवळ्ळ दबावासाठी केला गेला की काय असे यातून वाटते. आंदोलनात उपस्थित केलेले प्रश्‍न सोडवण्यासाठी ठराविक वेळ टोल कंपनीला दिला गेला होता तो अवधीही निघून गेला आहे. मग आंदोलन करणारे लोकप्रतिनिधी गप्प का? केंद्रीय मंत्री गडकरींना याच लोकप्रतिनीधींकडे बोट दाखवायचे होते का असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. यात आजी- माजी लोकप्रतिनिधींची नावे गुपित आहेत. रस्त्याच्या कामात टक्केवारी मागणारे जिल्ह्यातील इतर कामात मागत नसतील याची काय शाश्‍वती. मात्र हे टक्केवारी मागण्याचे प्रमाण कमी व्हायला हवे 

दैनिक जनमत २१ जानेवारी E paper

महागाईची साडेसाती ( अग्रलेख)


माणसाच्या आयुष्यात सारख्या वाईट घटना घडत असतील तर आपण त्याला साडेसाती लागलीय असे म्हणतो. मग त्यावर अनेक उपाय करण्याचा सल्लाही दिला जातो. साडेसाती असते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. मात्र तरीही त्यावर उपाय केला जातो. देशातही अशीच काही अवस्था सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक औद्योगीक आणि आयटी ंकंपन्या बंद पडल्याच्या बातम्या आल्या. कोट्यावधी लोकांच्या नोकर्‍या गेल्याचे दाखले दिले गले मात्र तो निवडणुक प्रचाराचा मुद्दा आहे. असे भासवून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता भारताची अर्थव्यवस्था ही  मंदीच्या सावटाखाली आहे. असे अनेक अर्थतज्ञ सांगत होते तरीही सत्ताधार्‍यांनी अर्थशास्त्रज्ञांच्या मताकडे दुर्लक्ष केले. मात्र गेल्या दोन दिवसांत महागाईचा दर ७.३७ टक्क्यावर असल्याचे समोर आले आहे. मात्र सत्ताधारी मंडळी आर्थिक दिवाळखोरीकडे दुर्लक्ष करण्यासाठी भावनीक राजकारण करत असल्याचे समोर येत आहे. देशातील ढासळती आर्थिक स्थिती पहाता  याला आर्थीक स्थितीतील साडेसाती का म्हणू नये. केवळ कांदा महागला हे महागाईचे परिमापक होऊ शकत नाही. कांद्याचे भाव आता खाली येऊ लागले आहेत याचा अर्थ स्वस्ताई आली असा होत नाही. इंधनाचे दर चंद्रकोरीप्रमाणे वाढत आहे. स्टेटबँकेच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात काही लाख तरुणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. वाहन, घरबांघणी, वस्तु उत्पादन यासारखे अनेक उद्योग घायकुतीला आले आहेत. देशात नव्याने आर्थिक गुतवणुक होताना दिसत नाही. त्यामुळे नविन रोजगार निर्मीती ठप्प आहे. आणि त्यात महागाईचा हा समोर आलेला दर आणि जागतीक पातळीवर रुपयाचे होणारे अवमुल्यन. अश्या अनेक संकटात देशाची आर्थव्यवस्था वाटचाल करत आहे. काही दिवसात देशाचा अर्थसंकल्प सादर होईल त्यात काही तरी ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. या सर्व परिस्थीतीवर सर्वसामान्य नागरिक बोलायला तयार नहीत. या पुर्वी देशात महागाई वाढली, रुपयाचे अवमुल्यन झाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढे, गॅसचे दर वाढले की मोठ मोठे मोर्चे निघत होते. सध्या देशात सर्वसामान्य नागरिकाचे नागरिकत्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरीकत्व दुरूस्ती कायद्यावरून मोर्चे निघत आहेत आणि ते केवळ त्यासाठीच निघावेत. अशी सत्ताधार्‍यांची अपेक्षा आहे. जर महागाईच्या विरोधात मोर्चे निघाले तर सरकारला उत्तर द्यावेच लागेल वर  उपाय योजनाही कराव्या लागतील. नागरीकत्व कायद्यावरून भाजपच्या किरीट सोमय्या यांना एका पत्रकाराने  अनेक प्रश्‍न विचारले त्यावर ते केवळ एकच उत्तर देत होते ‘मैने आपको बता दिया है’ असे महागाईच्या बाबतीत होऊ नये. सरकारला प्रश्‍न विचारल्यावर सरकार म्हणेल आम्ही उपाययोजना केल्या आहेत. आणि सारे काही सुरळीत होईल. या भाबड्या आशेवर नागरीकांनी बसू नये. नागरीकांनी सजग होऊन या नव्या निर्माण झालेल्या आर्थीक साडेसातीच्या निर्मुलनासाठी सरकावरवर नैतिक दबाव वाढवला पाहीजे.