Home Blog Page 308

“गाव कृती आराखडा” गावाची पाण्याची गरज पूर्ण करणारा बनवावा – जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे

उस्मानाबाद – जिल्हयातील प्रत्येक गावांनी गावातील लोकांचे जीवनमान सुलभ होईल यादृष्टीने गावातील सर्व शिवकालीन पाणी साठवण योजनांचे
बळकटीकरण करून व नवीन योजनांचा अंतर्भाव करून आणि पाणीसाठे निर्मितीसाठी
पुनर्भरण करण्यावर भर देणारा ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत परिपुर्ण “गाव कृती
आराखडा” बनवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुजल व स्वच्छ गावाची संकल्पना स्पष्ट होणे व जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींचे “गाव कृती आराखडे” बनविणेसाठी, जिल्हास्तरावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,जि.प.उपाध्यक्ष श्री.धनंजय सावंत,कृषी,पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती श्री.दत्तात्रय साळंके,महिला व बालकल्याण सभापती श्रीमती रत्नमाला टेकाळे,उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री.अनंत कुंभार,कार्यकारी अभियंता (ग्रापापु) श्री.दशरथ देवकर, कार्यकारी अभियंता (मजिप्रा.).डि.आर.पांडव,वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.ठाकर, जिल्हा आरोग्यधिकारी श्री.हनुमंत वडगावे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुढे बोलताना  अस्मिता कांबळे म्हणाल्या
की,पडणा-या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविला पाहिजे, तरच जमिनीतील पाणी
पातळी वाढु शकते. त्याचबरोबर वैयक्तिक विहिरीची योजना घेत असताना विहिरीचे
पुर्नभरण ही झाले पाहिजे, याविषयी अधिकारी व कर्मचा-यांनी नागरिकांना महत्व पटवून
सांगणे आवयश्क असल्याचे निदर्शनास आणून, शासकीय यंत्रणांनी त्याप्रमाणे कार्यवाही
करावी अशा मौलीक सूचना उपास्थित अधिका-यांना केल्या. या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी ही ‘जल जीवन मिशन’ च्या अंमलबजावणीची कार्यपध्दती व मार्गदर्शक सुचनानुसार सन २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक/घरगुती
नळजोडण्याद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करुन देण्याचे उदिष्टे आहे. याकरिता ‘गाव कृती
आराखडा व जिल्हा कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. यावेळी जि.प.चे कृषी,पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती श्री.दत्तात्रय साळके यांनी सदर प्रशिक्षणातील मौलिक विषयातील ज्ञानाच्या शिदोरीचा वापर गाव कृती आराखडा बनविण्यासाठी उपयोगी आणावा अशा सूचना उपस्थित अधिकारी यांना केल्या. कार्यशाळेत प्रस्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)अनंत कुंभार यांनी केले. या कार्यशाळेसाठी युनिसेफचे प्रतिनिधी बालाजी व्हर्रकट,प्रायमुव्ह संस्थेचे
प्रतिनिधी मंगेश भालेराव,विभागीय समन्वयक अरुण रसाळ या साधन व्यक्तींनी ‘गाव कृती आराखडा” निर्मितीची प्रकिया व ‘सुजल व स्वच्छ’ गाव संकल्पना सहभागी
अधिकारी व कर्मचारी यांना समजावून सांगितली.सदर कार्यशाळेत जिल्हयातील सर्व गटविकास अधिकारी,उपअभियंता
(मजिप्रा/ग्रा.पा.पुं),तालुका वैदयकीय अधिकारी,विस्तार अधिकारी (पं),विस्तार
अधिकारी(आरोग्य),शाखा अभियंता सर्व,कनिष्ठ अभियंता (पा.पु.),व्ही.एस.टी.एफ चे
ग्रामपरिवर्तक,प्रत्येक तालुक्यातुन १० ग्रामसेवक,पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे पाच
अध्यक्ष उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
कक्षातील सल्लागार व गट संसाधन केंद्रातील समन्वयकयांनी परिश्रम घेतले.

शिवजयंती निमित्त रोहित पवार यांची हजेरी

पाडोळी-
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथील शिवगर्जना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या ३९० व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज(दि.१८) कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली.
       तत्पूर्वी पाडोळी(आ) येथील तीर्थक्षेत्र अकुबाई देवीच्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाडोळी(आ) येथील नागरिकांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला, त्यानंतर येथील युवक शेतकऱ्यांनी सुरू केलेली जरबेरा शेती, आणि दुग्ध व्यवसायाला भेट दिली. त्यानंतर टाकळी(बें) ता.उस्मानाबाद येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रताप पाटील,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस प्रशांत कवडे, पंकज बोराडे,सुशील शेळके, शंतनु खंदारे, धीरज घुटे,  चित्राव गोरे, निलेश बारखडे,वामन गाते, बाबुराव पुजारी, सतीश एकंडे, सतीश देटे,अजित पवार, व्यंकट गुंड,प्रशांत सोनटक्के, ज्योतिराम जाधव, शिवशांत काकडे, दिगंबर गायकवाड, मंगेश दळवे, काकासाहेब सोनटक्के,बळीराम खटके, श्रीमंत पाटील,नंदकिशोर हजारे,सूरज देटे, अमोल सुर्यवंशी, श्रीधर नरवडे,अमोल मोरे, रवी मोरे, रोहित मदने, अभिषेक लोमटे, सूरज नरवडे, रोहन कणसे यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दैनिक जनमत १८ फेब्रुवारी E पेपर

बेंबळी परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

कनगरा(अमोल गायकवाड)
              उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो.परंतू सध्या समाज माध्यमातून ब्राॅयलर कोंबड्यांना कोरोना व्हायरस झाल्याची अफवा फिरत असल्याने अशा चुकीच्या माहितीमुळे पाॅल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
              तसेच कनगर्‍यात चार,बेंबळीत सहा,महाळंगी आठ,टाकळीत चार,केशेगांव तीन,नांदुर्गा दोन,धुत्ता एक आदि गावात पाॅल्ट्री फार्म असून एकट्या बेंबळीत ५०० किलो पर्यंत चिकनची दिवसाला विक्री होत असे परंतू सध्या समाज माध्यमातून फिरत असलेल्या चुकीच्या माहितीमुळे या व्यावसायावर मोठा परिणाम झाला असून पुर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विक्री घटली असून चिकनच्या किंमतीही कमी झाल्या असल्याने हा व्यावसाय निव्वळ तोट्यात आला आहे.यामुळे शेतकर्‍यांच्या मका मालावरही याचा परिणाम झाला असून मका पुर्वी २८-३० रुपये किलो प्रमाणे विकायची तर सध्या ती १५-१६ रुपये किलो प्रमाणे विकत असून शेतकर्‍याने तर कोणता जोडधंदा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅंकेतून कर्ज काढून पाॅल्ट्रीची उभारणी केली असून बॅंकेच्या हप्त्याची परतफेड कशी करावी?हा प्रश्नही पाॅल्ट्री व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.या विषयावर बोलत असताना अॅड.अजय पाटील म्हणाले,समाज माध्यमातून पोस्ट टाकणार्‍या विरोधात कायदेशीर कारवाईची गरज आहे.तसेच कोंबड्यांना कोरोना व्हायरस झाल्याची नोंद कोठेही झाली नसून अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सचिव पदी धीरज घुटे यांची निवड

पाडोळी

उस्मानाबाद तालुक्यातील आरणी गावचे रहिवाशी असलेले आणि कर्जत जामखेडचे आमदार यांचे अत्यंत विश्वासु कार्यकर्ते  धीरज घुटे यांची नुकतीच मोहोळ (जि. सोलापूर) येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी निवड करण्यात आली आहे. 
    मोहोळ येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आकाश पाटील, ऋषिकेश ठोंबरे पाटील यांनी धीरज घुटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
यापूर्वी धीरज घुटे यांनी पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी पुणे विद्यापीठात मोठे योगदान दिले आहे. मागील सहा वर्षांपासून ते पक्ष वाढीसाठी मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांना आज पार्टीच्या वतीने राज्यवर काम करण्याची पक्षनेता मंडळीने जबाबदारी दिली आहे. धीरज घुटे यांच्या निवड झाल्यामुळे उस्मानाबाद शहरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.