बेंबळी परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
कनगरा(अमोल गायकवाड)
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीपूरक जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो.परंतू सध्या समाज माध्यमातून ब्राॅयलर कोंबड्यांना कोरोना व्हायरस झाल्याची अफवा फिरत असल्याने अशा चुकीच्या माहितीमुळे पाॅल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तसेच कनगर्यात चार,बेंबळीत सहा,महाळंगी आठ,टाकळीत चार,केशेगांव तीन,नांदुर्गा दोन,धुत्ता एक आदि गावात पाॅल्ट्री फार्म असून एकट्या बेंबळीत ५०० किलो पर्यंत चिकनची दिवसाला विक्री होत असे परंतू सध्या समाज माध्यमातून फिरत असलेल्या चुकीच्या माहितीमुळे या व्यावसायावर मोठा परिणाम झाला असून पुर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विक्री घटली असून चिकनच्या किंमतीही कमी झाल्या असल्याने हा व्यावसाय निव्वळ तोट्यात आला आहे.यामुळे शेतकर्यांच्या मका मालावरही याचा परिणाम झाला असून मका पुर्वी २८-३० रुपये किलो प्रमाणे विकायची तर सध्या ती १५-१६ रुपये किलो प्रमाणे विकत असून शेतकर्याने तर कोणता जोडधंदा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅंकेतून कर्ज काढून पाॅल्ट्रीची उभारणी केली असून बॅंकेच्या हप्त्याची परतफेड कशी करावी?हा प्रश्नही पाॅल्ट्री व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे.या विषयावर बोलत असताना अॅड.अजय पाटील म्हणाले,समाज माध्यमातून पोस्ट टाकणार्या विरोधात कायदेशीर कारवाईची गरज आहे.तसेच कोंबड्यांना कोरोना व्हायरस झाल्याची नोंद कोठेही झाली नसून अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सचिव पदी धीरज घुटे यांची निवड
जि.प.सदस्या सलगर यांची कनगरा गावास सदिच्छा भेट.
कनगरा/प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथे जि.प.सदस्या सक्षणा सलगर यांनी भेट देवून विविध समस्यांवर चर्चा केली.
यावेळी गावकर्यांनी शेतरस्त्याच्या समस्या,बाजार चौकात सिमेंट रस्ता बनवावा,पशु वैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम मंजूर असून काम चालू करण्यात यावे,आरोग्य उपकेंद्रात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांची हेळसांड होत असून औषधांचा पुरवठा करण्यात यावा,महादेव मंदाराच्या कुंपनासाठी निधी द्यावा तसेच तरुणांना व्यायाम शाळा देण्यात यावी अशा विविध समस्या गावकर्यांच्या वतीने मांडण्यात आल्या.
गावकर्यांच्या समस्यांवर उत्तर देताना सलगर म्हणाल्या,ग्रामपंचायतीचे ठराव घेतल्यास सर्व समस्या प्रामाणिकपणाने मार्गी लावणार असून,गावच्या विकासासाठी जे-जे शक्य होईल ते करणार असल्याच त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी ग्रा.पं.सदस्य जगन्नाथ इंगळे,,ग्रा.पं.सदस्य शिराज शेख,विजय पाटील,महेबुब शेख,संजय इंगळे,मनोज धाराव,खलील शेख,अॅड अजय पाटील आदिंसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








































































