Home Blog Page 306

टाकळी(बें) येथे शिवजन्मोत्सव विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न

पाडोळी-उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव पाच दिवस समितीने ठरविलेल्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांने काल(दि२३) महाराजांच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढून संपन्न करण्यात आला.
टाकळी(बें) येथील शिवगर्जना ग्रुपच्यावतीने प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये १९ फेब्रुवारी रोजी महाराजांच्या प्रतिमेची पूजन आणि व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी प्रतिमेचे पूजन बेंबळी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.डी. एस. गोरे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे,औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण आणि शिवव्याख्याते प्रा. नंदकुमार नन्नवरे,दत्तात्रय सोनटक्के, चेअरमन तानाजी गायकवाड, माजी सरपंच काकासाहेब पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.पूजनानंतर नंतर शिवव्याख्याते प्रा. नंदकुमार नन्नवरे यांनी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन केले. सायंकाळी ८ वाजता तुळजापूर आणि टाकळी(बें) कलाकारानी मिळून *सौभाग्य नाही नशिबी* हा तीन अंकी नाटक आयोजित केला होता.त्यानंतर (दि२०) सायंकाळी जेजुरी येथील महिला कीर्तनकार ह.भ.प. नेहाताई भोसले यांचे कीर्तन झाले तत्पूर्वी प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि कीर्तनकार नेहाताई भोसले यांचा सत्कार करण्यात आला . त्यानंतर (दि२१)शुक्रवार आणि शनिवारी (दि२२) मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन कळंब -उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक ऍड.निलेश बारखडे पाटील, संचालक सुजित बाकले, दादा सुरवसे, विजयकुमार पवार, भारत गुंड, विकास ढवळे, अमर गुंड, भारत सोनटक्के, रमेश सूर्यवंशी यांनी केले. तर दुसऱ्या दिवशीच्या  सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, सरपंच आशाताई सोनटक्के,ग्रामपंचायत सदस्य प्रताप गायकवाड, महादेव सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक स्पर्धेत खुल्या गटात प्रथम क्रमांक रायगड येथील साई प्रेरणा ग्रुपने पटकाविला,तर द्वितीय क्रमांक तनुजा शिंदे (लातूर) लहान गट प्रथम क्रमांक जगदंब ग्रुप तुळजापूर, द्वितीय यश क्लॉसेस उजनी याने पटकाविला.यावेळी टाकळी(बें) येथील माजी सैनिक मोतीलाल थोरे आणि जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक हणमंत जगताप सर यांचा शिवगर्जना ग्रुपच्यावतीने सहपत्नी सत्कार करण्यात आला. शेवटच्या दिवशी रविवारी(दि२३) सायंकाळी पाडोळी(आ) पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस पी.एम. आलुरे, व्ही.आर.पेठे, आणि श्री तांबे साहेब  पोलीस बंदोबस्त मध्ये भव्य अशी गावातून मिरवणूक काढून सहकार्य केले..यावेळी शिवगर्जना ग्रुप अनिल पवार,ज्योतिराम जाधव, शिवशांत काकडे, मंगेश दळवे, दीपक तौर, काकासाहेब सोनटक्के, श्रीधर नरवडे, राम खटके, सागर सूर्यवंशी,संतोष बर्डे, संदीप सूर्यवंशी , इम्रान पठाण,अनिल सूर्यवंशी, गणेश गायकवाड, दयानंद सोनटक्के, बळीराम खटके, धनाजी कुंभार, आण्णा तौर, पांडुरंग मोरे, दत्ता सूर्यवंशी, भैरू सूर्यवंशी, सूरज पाटील, अमोल मोरे, विशाल ठवरे, सुरज नरवडे, रामा सोनटक्के, अमोल सूर्यवंशी,चंद्रकांत नरवडे, दादा जाधव, श्रीकांत सूर्यवंशी, नामदेव काकडे,नितीन गायकवाड, रोहन कणसे, तानाजी शेंद्रे, दीपक चव्हाण यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दैनिक जनमत २३ फेब्रुवारी E पेपर

नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उदघाटन

उस्मानाबाद-उस्मानाबाद येथे वकील व्हॉलीबॉल संघातर्फे आयोजित नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री रुपाली भोसले व खा ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आ कैलास पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मा जीवनराव गोरे,सिने दिग्दर्शक निलेश पटवर्धन, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,विधिज्ञ मंडळ अध्यक्ष अँड राघवेंद्र बोधले,अँड नितीन भोसले,अँड राम गरड,संपतराव डोके,नगरसेवक युवराज नळे, प्रदीप घोने,माणिक बनसोडे,सोमनाथ गुरव,विजय सस्ते ,दिलीपराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सिनेअभिनेत्री रुपाली भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
व्हॉलीबॉल सारख्या ग्रामीण भागातील खेळांच्या स्पर्धा उस्मानाबाद येथे भरवीत असल्याने त्यांनी वकील संघ व नगराध्यक्ष यांचे कौतुक केले व आभार मानले.या स्पर्धेसाठी राज्यभरातून 45 संघ आलेले आहेत.
आज रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रम साठी आ. राणा जगजितसिंह पाटील,जनता बँक चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, दत्ताभाऊ कुलकर्णी,अनिलजी खोचरे,नितीनजी काळे ये उपस्थित असणार आहेत.

दैनिक जनमत १९ फेब्रुवारी E पेपर

शिवजयंती विशेषांक

श्री.हणमंतराव पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

कनगरा-प्रतिनिधी
                उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील श्री हणमंतराव पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.
                 प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याद्यापक पाटील जी.एम.म्हणाले,चंदना प्रमाणे झिजून विद्यार्थ्यांनी भविष्यात स्वतःचा व शाळेचा नावलौकिक करावा.शाळा ही रोपवाटिका असून त्यातील छोटी रोपटी हे विद्यार्थी असतात.रोपवाटिकेतील रोपटी आता मोठी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीला जास्त वाव मिळावा म्हणून हा निरोप आहे.
                 तसेच शाळेबद्दलच्या भावना व्यक्त करताना श्रृष्टी जगताप विद्यार्थीनी म्हणाली,भव्य अशा वटवृक्षरुपी शिक्षकांच्या सावली खाली आम्ही वाढलो असून सर्वोत्तम शाळा व शिक्षक आम्हाला लाभले याचा कायम अभिमान राहिल.
                विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लातूर माध्य.विभागाचे मा.उपाध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले,स्वतःच्या क्षमता ओळखून मेहनत घेतल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नाही.मुली सर्वच क्षेञात अव्वल असून घरातून चालना मिळाल्यास त्या भविष्यात नाव करतील असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
                   कार्यक्रमाचे सुञसंचालन ढोणे जी.बी.यांनी,तर आभार श्रीम.पवार ए.एस यांनी मांडले.यावेळी संस्थेचे सचिव विजय पाटील,श्रीम.गवाड ए.एस.,बनसोडे व्ही.बी.,काळे.ए.एस.,श्रीम.मुटकुळे के.बी.,भांगे बी.एम.,घाढगे डी.एल.आदि शिक्षकांसह गायकवाड एन.जी.,बंडगर एम.डी.आदि शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“गाव कृती आराखडा” गावाची पाण्याची गरज पूर्ण करणारा बनवावा – जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे

उस्मानाबाद – जिल्हयातील प्रत्येक गावांनी गावातील लोकांचे जीवनमान सुलभ होईल यादृष्टीने गावातील सर्व शिवकालीन पाणी साठवण योजनांचे
बळकटीकरण करून व नवीन योजनांचा अंतर्भाव करून आणि पाणीसाठे निर्मितीसाठी
पुनर्भरण करण्यावर भर देणारा ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत परिपुर्ण “गाव कृती
आराखडा” बनवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुजल व स्वच्छ गावाची संकल्पना स्पष्ट होणे व जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींचे “गाव कृती आराखडे” बनविणेसाठी, जिल्हास्तरावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,जि.प.उपाध्यक्ष श्री.धनंजय सावंत,कृषी,पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती श्री.दत्तात्रय साळंके,महिला व बालकल्याण सभापती श्रीमती रत्नमाला टेकाळे,उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री.अनंत कुंभार,कार्यकारी अभियंता (ग्रापापु) श्री.दशरथ देवकर, कार्यकारी अभियंता (मजिप्रा.).डि.आर.पांडव,वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.ठाकर, जिल्हा आरोग्यधिकारी श्री.हनुमंत वडगावे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुढे बोलताना  अस्मिता कांबळे म्हणाल्या
की,पडणा-या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविला पाहिजे, तरच जमिनीतील पाणी
पातळी वाढु शकते. त्याचबरोबर वैयक्तिक विहिरीची योजना घेत असताना विहिरीचे
पुर्नभरण ही झाले पाहिजे, याविषयी अधिकारी व कर्मचा-यांनी नागरिकांना महत्व पटवून
सांगणे आवयश्क असल्याचे निदर्शनास आणून, शासकीय यंत्रणांनी त्याप्रमाणे कार्यवाही
करावी अशा मौलीक सूचना उपास्थित अधिका-यांना केल्या. या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी ही ‘जल जीवन मिशन’ च्या अंमलबजावणीची कार्यपध्दती व मार्गदर्शक सुचनानुसार सन २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक/घरगुती
नळजोडण्याद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करुन देण्याचे उदिष्टे आहे. याकरिता ‘गाव कृती
आराखडा व जिल्हा कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. यावेळी जि.प.चे कृषी,पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती श्री.दत्तात्रय साळके यांनी सदर प्रशिक्षणातील मौलिक विषयातील ज्ञानाच्या शिदोरीचा वापर गाव कृती आराखडा बनविण्यासाठी उपयोगी आणावा अशा सूचना उपस्थित अधिकारी यांना केल्या. कार्यशाळेत प्रस्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)अनंत कुंभार यांनी केले. या कार्यशाळेसाठी युनिसेफचे प्रतिनिधी बालाजी व्हर्रकट,प्रायमुव्ह संस्थेचे
प्रतिनिधी मंगेश भालेराव,विभागीय समन्वयक अरुण रसाळ या साधन व्यक्तींनी ‘गाव कृती आराखडा” निर्मितीची प्रकिया व ‘सुजल व स्वच्छ’ गाव संकल्पना सहभागी
अधिकारी व कर्मचारी यांना समजावून सांगितली.सदर कार्यशाळेत जिल्हयातील सर्व गटविकास अधिकारी,उपअभियंता
(मजिप्रा/ग्रा.पा.पुं),तालुका वैदयकीय अधिकारी,विस्तार अधिकारी (पं),विस्तार
अधिकारी(आरोग्य),शाखा अभियंता सर्व,कनिष्ठ अभियंता (पा.पु.),व्ही.एस.टी.एफ चे
ग्रामपरिवर्तक,प्रत्येक तालुक्यातुन १० ग्रामसेवक,पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे पाच
अध्यक्ष उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
कक्षातील सल्लागार व गट संसाधन केंद्रातील समन्वयकयांनी परिश्रम घेतले.

शिवजयंती निमित्त रोहित पवार यांची हजेरी

पाडोळी-
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथील शिवगर्जना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या ३९० व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज(दि.१८) कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली.
       तत्पूर्वी पाडोळी(आ) येथील तीर्थक्षेत्र अकुबाई देवीच्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाडोळी(आ) येथील नागरिकांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला, त्यानंतर येथील युवक शेतकऱ्यांनी सुरू केलेली जरबेरा शेती, आणि दुग्ध व्यवसायाला भेट दिली. त्यानंतर टाकळी(बें) ता.उस्मानाबाद येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रताप पाटील,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस प्रशांत कवडे, पंकज बोराडे,सुशील शेळके, शंतनु खंदारे, धीरज घुटे,  चित्राव गोरे, निलेश बारखडे,वामन गाते, बाबुराव पुजारी, सतीश एकंडे, सतीश देटे,अजित पवार, व्यंकट गुंड,प्रशांत सोनटक्के, ज्योतिराम जाधव, शिवशांत काकडे, दिगंबर गायकवाड, मंगेश दळवे, काकासाहेब सोनटक्के,बळीराम खटके, श्रीमंत पाटील,नंदकिशोर हजारे,सूरज देटे, अमोल सुर्यवंशी, श्रीधर नरवडे,अमोल मोरे, रवी मोरे, रोहित मदने, अभिषेक लोमटे, सूरज नरवडे, रोहन कणसे यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.