राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप
कळंब :– येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि २९ पासून चालू असलेले राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा आज महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करून समारोप करण्यात आला.
औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये राष्ट्रसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या आणि कौशल्याची जाणीव प्रशिक्षणार्थ्यांना करून देण्यात येत असते. यानुसार दि ०४ रोजी सकाळच्या सत्रात “घनकचरा व्यवस्थापन” या विषयावर विक्रम समुद्रे सहायक प्रकल्प अधिकारी नगर परिषद कळंब यांचे मार्गदर्शन झाले. त्याच दिवशी दुपारच्या सत्रात “आजची सामाजिक स्थिती आणि युवक” या विषयावर कळंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शन झाले. दि ०५ रोजी सकाळच्या सत्रात “बदलते पर्यावरण आणि आपली भूमिका” या विषयावर मोहेंकर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ बी वाय पाटील यांचे मार्गदर्शन झाले. त्याच दिवशी दुपारच्या सत्रात “व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर मोहा येथील उद्योजक बालाजी मडके यांचे मार्गदर्शन झाले. दि ०६ रोजी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांची “आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे” आयोजण करण्यात आले होते. यामध्ये १७७ जणांची आरोग्य तपासणी केली असून १८ कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थीनी रक्तदान शिबिरात उस्फुर्त सहभाग नोंदवला होता. यासाठी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद आणि उपजिल्हा रुग्णालय कळंब यांची सर्व टीमचे विशेष सहकार्य लाभले.
राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत दि ०७ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. दि ०८ रोजी महिला दिन असल्याकारणाने आयोजक टीमने वक्तृत्व स्पर्धेचे सर्व नियोजन संस्थेतील महिला कर्मचारी आणि मुलींच्या ताब्यात देण्याचे ठरवले. त्यानुसार प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका ज्योतीताई सपाटे आणि मोहेंकर महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका मंगलताई ढेंगळे या उपस्थित होत्या. त्यांनीही महिला दिन, उद्योग आणि समाज याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांनी महापुरुषांविषयी विचार मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सचिन सूर्यवंशी, गटनिदेशक अनिल आहेर, कार्यक्रम अधिकारी एस पी डोंगे, मुख्य लिपिक रवीचंद्र जगदाळे, शिल्पनिदेशक सचिन डोंगरे, शिल्पनिदेशिका कल्पना जाधवर, सर्व निदेशकवर्ग तसेच संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सर्व प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
वंदना धुमाळ-कदम यांचे कार्य ग्रामीण भागातील स्त्रियांना प्रेरणादायी
स्त्री ही आदीमाया शक्ती आहे ,सामर्थ्याची जननी आहे. पराक्रमाची प्रेरणा आहे. मोडका तोडका संसार उभा करणारी कुटुंबातील फार मोठा आधार आहे. संस्कारक्षम पिढी घडवणारे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे स्त्री आहे.प्रत्येक महापुरुषांच्या कार्यात सामर्थ्यशाली स्त्रीची समर्थ साथ असतेअसे म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी माँसाहेबा जिजाऊ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात समर्थ साथ देणारी सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोडका तोडका संसार उभा करणारी माता रमाई ,मेरी झांशी नहीं दुंगी म्हणून इंग्रजासी लढणारी राणी लक्ष्मीबाई ,लोकमाता आहील्यादेवी होळकर आशा कितीतरी सामर्थ्यवान महिला होऊन गेल्या.एकंदरीत स्त्री शक्तीचा महीमाच वेगळा आहे. हे आता समाजमनाने मान्य केल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच एके काळी चुल आणि मुल इथपर्यंतच मर्यादीत असलेली स्त्री आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे आज सक्षमपणे काम करताना दिसतात.
यात ग्रामीण भागातील स्त्रिया देखील मागे नाहीत. हे वंदना धुमाळ-कदम यांच्या कार्यातून जानवते.
वंदन किशोर धुमाळ-कदम यांनी बी.एस्सी. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सन २००५ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वहाक म्हणून सेवेत रूजू होऊन आज यशस्वीपणे काम करताना दिसतात.सुरुवातीला परभणी आगारात नेमनुक झाली.काही काळ तेथे नोकरी करून त्यांनी तुळजापूर आगारात बदली करून घेतली. सध्या तुळजापूर आगारात गेली दहा बारा वर्ष झाली अविरतपणे सेवा करतात. आक्कलकोट तुळजापूर तालुक्याच्या सिमा रेषा जवळ तुळजापूर तालुक्यातील वागदरी हे त्यांच गाव .लोहारा येथील कदम घराने हे त्यांच माहेर आहे. वागदरी येथील त्या एकमेव वहाक म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत. पती किशोर धुमाळ यांचा जीप चालविण्याचा व्यवसाय.ओंकार आणि श्रीकार आशी दोन मुल त्याना आहेत.एक मुलगा औषध निर्माण शाखेत शिक्षण घेत असून दुसरा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.आपला संसारम सांभाळून त्या कामगार संघटनेतहीसक्रिय सहभागी आहेत. इंटक काँग्रेस या कामगार संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून सक्षमपणे नेतृत्व करतात. संसार, नौकरी सांभाळून मिळलेला वेळ सामाजिक कार्यासाठी देतात. एकुनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन २०१७ मध्ये रत्नागिरी येते त्यांना राज्यस्तरीय गुणीजन कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेआहे.
दि.०८ मार्च जागतिक माहिला दिनाच्या निमित्ताने त्यांना व आशा सर्व कर्तबगार महिना हार्दिक शुभेच्छा.
चालु बसचा नट बोल्ट निखळला.. बस चालकामुळे मोठा अनर्थ टळला..
दहिफळ – कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गौर कडुन कळंब कडे जाणा-या गाडीचा चालु गाडी धावत असतानी नट निखळुन पडल्यामुळे पाटे सरकले..व गाडीचा तोल जाऊ लागला.अचानक घडलेल्या प्रकारामुळे बस चालकाच्या सावधानतेमुळे पुढील घटना टळली.ब्रेक लाऊन गाडीवर ताबा मिळवला.
गाडीचा बिघाड झाल्याचे कळंब आगारला कळविले.रोजच्या सवयी प्रमाणे वरच्या वरी भागवा भागवीची उत्तरे आली…परंतु कळंब आगारामध्ये विशेष बस गाडीची देखरेख करण्यासाठी व्यवस्था असताना नट फिटींग,सर्विसींग का केली जात नाही? हा.प्रश्न पडतो.
ग्रामीण भागातील महत्वाची येण्या जाण्यासाठी सोय म्हणजे बस….लालपरी होय
कळंब आगार विभागामार्फत सोडण्यात येणा-या बसेस खास करुन ग्रामीण भागात सोडलेल्या गाड्या खिळखिळ्या झालेल्या आहेत.कधी टायर फुटते,कधी ब्रेक फेल होते.कधील नट बोलट गळुन पडतात.अश्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
गावाचा विकास साधायचा असेल तर मतभेद टाळा-भास्कर पेरे पाटील
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पाटोदा गावचे आदर्श सरपंच पेरे पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले..यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले की,गावाचा विकास साधायचा असेल तर आपआपसातील मतभेद बाजुला सारा..राजकारणामुळेच कितेक वर्षापासुन गावातील विकास खुंटला आहे.पाडापाडीशिवाय आपन काही करत नाहीत.प्रत्येक आळीतील जातीतील सरपंच,सदस्य निवडुन दिले तरी विकास का झाला नाही.असा सवाल केला. लोकांना योजनाची सवय लागल्यामुळे आळशी प्रवृत्ती वाढली.दुस-यावर अवलंबुन राहायी सवय लागली.त्यमुळेच नागरिकाचे कर्तव्य विसरुन गेली.गावातील नागरिकानी ग्रामपंचातचा कर भरला तर खासदार,आमदाराच्या फंडाची वाट पाहिची गरज भासणार नाही.घरातील सांडपाणी जमीनीत मुरवा,पाणी जपुन वापरा,झाडे लावा,शाळा महत्वाची आहे.जरा लक्ष द्या लाखो रुपये पगार शिक्षक उचलतात.आपली मुलं शिकली तरच समाजाचे कल्याण होणार आहे.शाळेकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.गावातील विकास करायचा असेल तर विरोध करणे सोडा.सरपंच,सदस्य,ग्रामसेवकाकडुन कामे करुन घ्या तरच गावाचा काया पालट होईल..नागरिकांनी घर पट्टी भरलीतरच ग्रामविकास निधी जमेल या रक्कमेतुनच गावातील रस्ते,नाली,लाईट,व्यवस्थीत होतील.म्हणुन नागरिकांनी ग्रामपंचायतला कर भरणा करावा…हे पाहिजे ते पाहिजे ते द्या करत बसण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा द्या…नंतर ग्रामपंचायतला भांडा…शासकीय योजनावर अवलंबुन न राहता गावात उद्योग उभारा..आर्थीक विकास होईल..नुसतं निवडणुका घेऊन राजकारण करत बसल्याने गावाचा विकास होणार नाही..सारे एकत्र या चांगला वेळ देणारा व्यक्ती निवडुण द्या पाच वर्ष तो चांगले काम करेल..पुढील पाच वर्षात तुमच्या गावात विकासाची गंगा पोहचलेली असेल..असा अश्यावाद पेरे पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उस्मानाबाद कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील,पंचायत समिती कळंब उपसभापती,ग्रामविकास अधिकारी झांबरे,सरपंच शिल्पा पाटील,उपसरपंच बालाजी मते,शिवाजी मते बालाजी भातलवंडे,तुषार वाघमारे,चरणेश्वर पाटील अदी मान्यवर तसेच गावातील नागरिक महिला,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
































































