Home Blog Page 300

दैनिक जनमत १ एप्रिल E पेपर

खडकी ग्रामस्थांच्या पाठ्पुव्यानंतर सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील रस्ता पूर्ववत

खानापूर(प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा प्रशासनाने सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या  सीमेवरील तुळजापूर तालुक्यतील धोत्री,खडकी येथून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडजीनजीक भर रस्त्यात मुरूम टाकून रस्ता पूर्णपणे बंद केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीमा तपासणी नाका उभारणे गरजेचे असताना सोलापूर जिल्हा प्रशासनाने वडजी शिवारात भररस्त्यावर मातीचा भला मोठा १० ते १२ फुट उंचीचा ढिगारा टाकून रस्ता पूर्ण पणे बंद होता.याबाबत खडकी ग्रामस्थांच्या वतीने सुनील नागणे यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी मा.दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे  तक्रार केली होती.याची दखल घेत रस्त्यावरील माती बाजूला काढून रस्ता पूर्ववत करण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकर्यांनी दिले आहेत.त्यानुसार जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नका उभा करून अत्यावश्यक सेवेला वगळून इतर लोकांना प्रेवेश देण्यास मनाईचे आदेश असताना सोलापूर जिल्हा प्रशासनाने जिल्हासीमेवर मातीचा भला मोठा १० ते १२ फुट उंचीचा ढिगारा टाकून पूर्णता बंद केला होता.संचारबंदीच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांच्य सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत.तुळजापूर तालुक्यातून नांदुरी मार्गे,धोत्री,खडकी वडजीमार्गे सोलापूरकडे जाणारा अंतर्गत रस्ता आहे. याच मार्गावर खडकी वडजी या दोन गावाच्या मध्यावर सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्याची हद्द आहे. खडकी गावापासून सोलापूरचे अंतर १२ किलोमीटर आहे.दवाखाना व इतर अत्यवश्यक सेवेसाठी खडकी,धोत्री काटगाव व चव्हाणवाडी येथील नागरिकांना सोलापूर गाठावे लागते.पण हा मार्ग सोलापूर जिल्हा प्रशासनाने जिल्हासीमेवर मातीचा भला मोठा १० ते १२ फुट उंचीचा ढिगारा टाकून पूर्णता बंद केल्याने या चारही गावातील ग्रामस्थांची खूप मोठी गैरसोय होत होती.
या गावातील भाजीपाला,दुध विक्रीसाठी सोलापूर हि मुख्य बाजारपेठ आहे .येथील भाजीपाला दूध सोलापूरच्या बाजारात विक्रीसाठी जातो पण रस्ताच बंद झाल्याने बाजारात भाजीपाला ,दूध घेऊन जायचा कसा असा प्रश्न येथील शेतकऱ्यासमोर पडला होता. दुध,भाजीपाला ह्या अत्यावश्यक सेवेची वाहूतक करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परतू जिल्हा प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे येथील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे,दुधाचे खूप मोठे नुकसान होत होते.खडकी,धोत्री काटगाव व चव्हाणवाडी या गावातील ग्राम सहयत्ता कक्षातील आरोग्य कर्मचारी,शिक्षक यांना  ये-जा करण्यासाठी हाच मार्ग आहे.मात्र रस्ताच बंद केल्याने त्यांचीही गैरसोय होत होती.

याबाबत खडकी ग्रामस्थांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी मा.दीपा मुधोळ-मुंडे,तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे खडकी गाव सोलापूरपासून अवघ्या १२ किलोमिटर अंतरावर आहे.तर तुळजापूरचे अंतर ३५ किमी एवढे असून सोलापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा रुग्णालय हेही केवळ १५ किमी अंतरावर आहे.यामुळे गावातील रूग्णासह शेतकर्याना सोलापूर जाणे सोयीस्कर होते परंतु सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर वडजीनजीक रस्त्यावर मातीचा बांध घालून रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी खडकी ग्रामस्थांच्या वतीने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे ,शरफोद्दीन मुजावर , शिवाजी जाधव परमेश्वर शिंदे, विध्यादर सोनवणे, अण्णासाहेब साबळे, नागनाथ घाडगे, कैलास जवान , नेताजी जाधव, राजू तळवडे, सचिन कोरे, अंदाप्पा जवान,आनंद कोरे, मल्लिनाथ सोनवणे, विशाल सावंत,बलभीम जाधव, यांनी निवेदनाद्वारे केली होती.याची तात्काळ दखल घेत तुळजपुरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दक्षिण सोलापुरचे तहसीलदार अमोल कुंभार यांचाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.त्यानंतर वडजी येथील मंडळ अधिकारी,तलाठी व पोलीस पाटील यांच्याकडून परस्थितीची माहिती घेऊन त्यांनी अत्यावश्यक सेवेसाठी खडकी,धोत्री,काटगाव यांना ये-जा करण्यसाठी परवानगी देण्याचे आदेश दिले.तसेच अत्यावश्यक सेवेसाठी अडवणूक करण्यात येऊ नये व अडवणूक केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

दैनिक जनमत ३१ मार्च E पेपर

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रुपांतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहित

मुंबई , दि. – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24 करोना बाधित रुग्ण आढळून आले. याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण  मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

इस्लामपूर येथे अचानकपणे वाढलेल्या करोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील  जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. डॉ. पल्लवी सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने 300 खाटांच्या करोना रुग्णालयात रुपांतर केले आहे. यात पंधरा आय.सी.यू . बेड, सिटी स्कॅन एम.आर.आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. करोना तपासणीसाठी येत्या तीन ते चार दिवसात  तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ. वाहन चालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल येईल असेही अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ. कैलास पाटील यांनी दिला ५० लाखांचा निधी

उस्मानाबाद –
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाची यंत्रणा सज्ज आहे. राज्यावर सध्या आणीबाणीची परिस्थिती असुन मोठ्या आर्थिक मदतीची गरज भासत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने परिस्थिती हातळत आहेत. पण अशा अभुतपुर्व परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्व ओळखुन मदतीचा हात देण्याची गरज आहे.या अगोदर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कैलास पाटील यांनी महिन्याचे वेतन देऊ केले आहेच.आता आमदार म्हणुन मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेला व आपत्कालिन परिस्थितीमध्ये जे डॉक्टर्स, नर्सेस इतर कर्मचारी सध्या काम करत आहेत. त्यांच्यासाठी आमदारनिधीतुन मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. उस्मानाबाद कळंब मतदारसंघामध्ये जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा सर्वांना निधीच्या माध्यमातुन सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा  प्रयत्न त्यांनी केला आहे.आमदार निधीतील पन्नास लाख रुपयाची तरतुद या कामासाठी केलेली आहे. कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अतिदक्षता कक्षाची आवश्यकता भासते जिथे व्हेंटीलेटर व इतर अत्याधुनिक सुविधा असतात. कळंब येथे तशी सुविधा नसल्याने पुढील अडचणीची शक्यता ओळखुन अतिदक्षता कक्षासाठी पंधरा लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे.या शिवाय जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर्स,नर्सेस इतर आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा लाखाचा निधी दिला आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीआयपीएपी मशिन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी दहा लाख रुपयाचा खर्च अपेक्षित असुन त्याची तरतुद करण्यात आली आहे. उस्मानाबाद- कळंब मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी इन्फ्रारेड थर्मामीटरर्सची सोय करण्यात येणार आहे. त्याच्या खरेदीसाठी पाच लाख रुपये निधी देण्यात आला आहे. शिवाय या सर्व केंद्रावरील डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यासाठी तीन लाखाचा निधी खर्च करण्यात येणार आहे. उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील सर्व कोरोना सहाय्यता कक्षाच्या माध्यमातुन सॅनिटाझर व मास्क वितरीत करण्यासाठी सात लाखाचा निधी देण्यात आलेला आहे. असा एकुण पन्नास लाखाच्या निधी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, त्याप्रमाणे हा खर्च करण्यासाठी कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेले आहे.

दोन घास परगावाहून आलेल्या स्थलांतरित तरुणांसाठी

सोलापूर ( अकबर बागवान) – वेळ  दु. ४ वाजताची स्थळ :   रविवार पेठ जाधव सर्वेअर येथील मारुती सुझुकी शोरूम…. कोरोना  विषाणूजन्य आजाराच्या भीतीने संपूर्ण जगात लोक डाऊन करण्यात आले आहे.  भारतातही लोक डाऊन करण्याबरोबर संचारबंदी ही लागू करण्यात आली आहे.   देशासह महाराष्ट्र राज्यात ही रेल्वे सेवा व एसटी सेवा बंद करण्यात आले आहे.  अशावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून अनेक कामगार मजूर मुंबई पुणे आदी ठिकाणी गेलेले आहेत मात्र लोक डॉन मुळे व रेल्वे एसटी बंद असल्यामुळे त्यांना आपल्या मूळ गावी जाण्यास अनेक अडचणी येत आहेत.  अशावेळी आपल्या मूळ गावी परतण्यासाठी अनेक कामगार मजूर मिळेल त्या वाहनाने तसेच दोन-दोन तीन-तीन दिवस पायी चालत आपल्या गावाकडची वाट पकडताना सोलापूरच्या प्रमुख रस्त्यावर दिसत आहे.  ना खायला पुरेसे अन्न प्यायला पाणी अशा खडतर प्रवासात खिशात पैसे नसताना सुद्धा अनेक तरुण अनेक कुटुंबे रस्त्यावरून आपल्या मूळ गावी जाताना दिसत आहे.  अशाच काही पाच ते सात तरुण अक्कलकोट रोड पाणी टाकी येथील जाधव सर्वेअर जवळून जाताना दिसले.  त्यांना हटकून विचारले असता गेल्या तीन दिवसापासून मुंबईहून सोलापूरचा प्रवास करून आले असल्याचे  त्या तरुणांनी सांगितले.  कर्नाटकातील यादगिर या गावाहून मुंबई येथे बांधकाम कामगार म्हणून ते सहा ते सात तरुण कामानिमित्त गेले होते मात्र लोक धावून व संचारबंदी मुळे त्यांना आपल्या मूळगावी पडता आले नाही.  अशावेळी मिळेल त्या वाहनाने व प्रसंगी अनेक किलोमीटरचा रस्ता पाईप पार  खरंच भुकेल्या चेहऱ्याने ते तरुण  अक्कलकोट मार्गे कर्नाटकाकडे निघण्यासाठी निघाले असता आमच्या नजरेस पडले.  त्यांना कुठे निघाला आहात असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपली सर्व हकीकत सांगितले.  मुंबईहून निघताना अनेक संकटे आलीत अनेक वेळा गाडी वाहने न मिळाल्याने अनेक किलोमीटरचा प्रवास आम्ही पायीच केला रस्त्यावर काही लोकांनी आम्हाला जेवण पाणीसुद्धा दिले असल्याचे त्या तरुणांनी सांगितले.  वाहतूक व्यवस्था नसल्याने आम्हाला  नाईलाजास्तव फाईज् गावाकडे आमच्या कुटुंबाकडे जाणे भागच असल्याचे त्या तरुणांचे म्हणणे आहे.  त्या पाच ते सात तरुणांच्या चेहऱ्याकडे पाहिले असता प्रवास करून त्यांचे चेहरे खूप थकलेले जाणवले तसेच पुरेसा अंना त्यांच्या पोटात नसल्याने त्यांचे चेहरे एकंदरीत भुकेले जाणवले.  सुरुवातीस आम्ही त्यांना सविस्तर विचारले असता त्यांनी घाबरून सांगण्यास नकार दिला मात्र आम्ही त्यांच्या तेलुगू या बोलीभाषेत विचारले असता त्यांनी आपली सर्व हकीकत सांगितली.  आम्ही त्यांना थोडा वेळ त्या ठिकाणी बसून आमच्या रविवार पेठ भागातील विलास अवसरे  , मनोज जोशी,  सत्यनारायण वडणाल,  अकबर बागवान,  राज जाधव यांच्या सहकार्याने किराणा दुकानातून   भाकरी शेंगा चटणी दही चपाती व घरातील मिळेल ती भाजी त्यांना देऊन त्यांना आम्ही सहकार्य केले.  शिवाय प्रवासात जाताना पाण्याची सोय व्हावी यासाठी तीन ते चार पाण्याच्या बाटल्या सुद्धा त्यांना आम्ही दिल्या.  अक्कलकोट आळंद मार्गे त्यांना कर्नाटकात त्यांच्यामुळे गावी जाता येते असे सांगून त्यांना आम्ही अक्कलकोट रोड चा रस्ता दाखवा.  विशेष सांगायचे म्हणजे आम्ही त्यांना फार मोठी मदत केली नाही मात्र आम्ही जी काही मदत केली ती मदत त्यांनी आनंदाने स्वीकारून आम्हाला धन्यवाद दिले.  या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो की तुमच्या परिसरात तुमच्या भागात सोलापुरात असे जर स्थलांतरित मजूर आपल्या गावाकडे जाताना आपल्या नजरेस आले तर त्यांना शक्य होईल तेवढे आपल्या घरातील जेवण बिस्कीट पुढे पाण्याच्या बाटल्या प्रवासात खाण्यास योग्य असलेले चटणी,  भाकर द्यावी.  सध्या कोरोना आजारामुळे संपूर्ण भारतात हीच परिस्थिती आहे त्यामुळे आपण या आजाराला न घाबरता शक्य तितकी मदत या स्थलांतरित मजुरांना द्यावी आपण पाहतोच आहोत महाराष्ट्रात किंवा विशेषत सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात अनेक सामाजिक संघटना अनेक तरुण मुले विविध लोकांना अनेक कामगार वर्गातील कुटुंबीयांना धान्य फळे वाटप करत आहेत तसेच परगावाहून आलेल्या अनेक लोकांना अन्नदान करून चांगला उपक्रम राबवत आहेत.  त्यामुळे सर्वांनी अशा या गरीब कामगार लोकांना मदत  करावे.  व ज्यांनी ज्यांनी अशा कामगार लोकांना स्थलांतरित कुटुंबीयांना अन्नदान देऊन मदत केली अशा सर्वांचे या निमित्ताने आभार मानावे.

आ. सुमनताई पाटील यांनी दिले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी

 
तासगाव प्रतिनिधी – कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सुमनताई आर. पाटील यांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. रविवारी त्यांनी एक लाख साठ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री जयंत पाटील यांना दिला.
       कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजीक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार व आमदार यांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहाय्यता निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव पवार यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार खासदार यांना आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी किंवा पंतप्रधान साहित्य निदिना देण्याचे निर्देश दिले होते. आणि तसा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार तासगाव कवठेमंकाळ चे आमदार सुमनताई पाटील यांनी एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे दिला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ३ प्रकल्पांना सॅनीटायझर उत्पादनाचे परवाने

उस्मानाबाद – कोरोना च्या पार्श्वभूमीवर हॅण्ड सॅनीटायझर ला मोठी मागणी वाढली आहे. काही ठिकाणी भेसळ असलेले, अवैध सॅनीटायझर अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले होते. चांगल्या प्रतीचे सॅनीटायझर मिळण्याची शाश्वती नागरिकांना नव्हती मात्र केंद्र आणि राज्य सरकारने अत्यंत तातडीने पावले उचलत सॅनीटायझर उत्पादन करू इच्छिणाऱ्या प्रकल्पांना परवानगी दिली आहे. ज्या नागरिकांना हात धुण्याची सोय नाही त्यांना सॅनीटायझर हा एक चांगला पर्याय आहे.
 उस्मानाबाद जिल्ह्यात तीन नव्या प्रकल्पांना अन्न व औषध प्रशासनाने उत्पादन करण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकमंगल माऊली ली. लोहारा, नॅचरल शुगर  रांजणी ता. कळंब,  अॅडलर्स बायोएनर्जी गुरगाव ता. कळंब यांना सॅनीटायझर निर्मितीचे परवाने मिळाले आहेत.
हे परवाने देताना अन्न व औषध प्रशासनाने काही अटी आणि शर्ती ठेऊन सॅनीटायझर च्या उत्पादनास परवानगी दिलेली आहे. या उत्पादकांना ३० जून पर्यंत उत्पादन करण्याची परवानगी आहे. तसेच उत्पादन केलेल्या सॅनीटायझर ची कलबह्याता ( शेल्फ लाईफ) १२ महिन्यापेक्षा अधिक नसू नये. यासह पाच विविध प्रकारच्या अटी अन्न व औषध प्रशासनाने उत्पादकांना परवानगी देताना लावल्या आहेत.