Home Blog Page 299

दैनिक जनमत ७ एप्रिल E पेपर

विझलेले दिवे आणि कोरोनाशी लढणारा माणूस


उमरगा (अमोल पाटील) :-  भारतातच नव्हे तर सबंध जगामध्ये कोरोना विषाणूने मानव या प्राण्यालाच लक्ष केल्याने हजारो लाखो माणसे कीड्या-मुंगी प्रमाणे मरण पावली . हे सबंध जगाविरुद्ध आ वासून उभा टाकलेलं महाभयंकर संकट. साक्षात मरण समोर दिसत असतानाही जातीय ,धार्मिक ,दैवीक, कर्मकांडाच्या भावना संवेदना बोथट होत जाव्यात असे वाटते . किमान जाता जाता माणुस म्हणून काहीकाळ जगण्याची संधी आपणास मिळाल्यास आपण ती स्विकारणार की उन्मत्त होऊन धर्माधंतेची दुधारी तलवार उराशी कवटाळनार हा प्रत्येकाच्या जागृत विवेकाचा भाग आहे .
          जागतिक स्तरावर पूर्वीपासूनच निरक्षर, गरीबी ,अप्रगत देशाची , पाटी आजही गळ्यात बांधलेल्या मटक्या सारखी लटकत आहे .भारतातील पारतंत्र्य ,अस्पृश्यता जरी नष्ट झाली असली तरी जागतिक स्तरावर आपल फारसं नावलौकिक झालेला नाही . अमेरिका, इटली ,चायना , रशीया सारख्या कित्येक बलाढय देशांनी या लहानशा विषाणू समोर गुडघे टेकले आहेत. लहान थोर आबालवृद्ध माणसे जिवाच्या आकांताने  शेवटची घटका मोजत असताना  कुठल्याच मंदिर, मस्जित, चर्च, गुरुद्वारातून कसलीही दैवीशक्ती बाहेर पडली नाही जी त्या विषाणूंचा नायनाट करेल .
         आजही विज्ञान ,विवेक ,वास्तव या त्रिसूत्री वरच संबंध जगाने लक्ष केंद्रित केल्याचे दिसते . प्रत्येक जीव वाचवण्यासाठी केली जाणारी धडपड त्यासाठी उभारण्यात येणारी यंत्रणा आणि परिस्थितीचे भान ओळखून राखलेला संयम आपणास पहावयास मिळतो. किमान या संकटामुळे तरी सबंध जगात विषाणू विरुद्ध माणूस असा लढा उभारल्याचे चित्र दिसत आहे .
 आज तरी जगाला फक्त अध्ययावत उपचार पद्धती, प्रगत तंत्रज्ञान, उत्कृष्ट सोई, सवोत्कृष्ट वैज्ञानिक, तज्ञ डॉक्टर, निर्भिड आरोग्य कर्मचारी ,कर्तव्यनिष्ठ सुरक्षा यंत्रणा यावरच माणसाचे भविष्य अवलंबून असल्याचे दिसते . आज पणत्या विझल्यानंतर तरी आपण आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून माणूस म्हणून माणसासाठी जगण्याची गरज वाटते.
         
—————-
मा. प्रधानमंत्री यांनी दोन्ही वेळेला केलेल्या आवाहना नंतर बाबा वाक्य प्रमाणम वृत्ती जोपासत अनेकांनी उत्सवी गोंधळ घातल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले.देश अभूतपूर्व अशा आव्हानात्मक परिस्थितितून जात असताना विज्ञान तंत्रज्ञानावर स्वार होऊन हे सार घड़ल, घडवल गेल. हे क्लेशकारक आहे.समाजातील विवेकवादी लोकांनी आपल्या साइलेंट मेजॉरिटीचे रूपांतर लाऊड मेजॉरिटीत करणे आवश्यक आहे.
जनतेला या प्रसंगी भौतिक मदत व भावनिक मदत या दोहोंची गरज आहे. भावनिक आधार हा आपल्या आश्वासक,संयमित व विवेकी बोलण्यातून देता येणे शक्य आहे. शिवाय त्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची मदत घेता येऊ शकते.
त्यामुळे राज्यकर्त्यानी आपला सदसदविवेक आणि राज्य घटना समोर ठेऊन प्राधान्यक्रम ठरवायला हवा.शासनाच्या प्रत्येक कृतीतून  जनसामान्याना हे लोक कल्याणकारी राज्य असून आम्ही सर्वजण एक आहोत ,सुरक्षित आहोत ही भावना वाढीस लागली पाहिजे.


      — सुधिर कांबळे (सामाजिक शैक्षणिक अभ्यासक )
—————
थाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा शुद्ध मूर्खपणा आहे… आणि पंतप्रधान सारख्या व्यक्तीने याबाबत लोकांना आवाहन करणे हा पंतप्रधानाच्या पदाला न शोभणारे व त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे…. एवढा पोरकट पंतप्रधान यापूर्वी झाला नाही…. या काळात लोकांना सरकारच्या सज्जते बाबत व लोकांनी घ्यायच्या काळजी बाबत बोलून लोकांचे मनोधैर्य वाढवणे व जबाबदारीची जाणीव करून देणे हि अपेक्षा असताना, आपले पंतप्रधान असे हास्यास्पद आवाहन करून, लोकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेऊन स्वतःचा इव्हेंट साजरा करणे हे शोभत नाही
मरकज प्रकरणावरून मुस्लिम समाजा बाबत द्वेष निर्माण करण्याचा प्रकार म्हणजे मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे… या बाबत मुख्यंत्र्यांनी केलेले आवाहन हे कितीतरी पोक्त व समंजस वाटले…
मुस्लिम समाजातील पुरोगामी लोकांनी पुढे येऊन याबाबत ठोस भूमिका घेऊन पुढे यावे व इतरांनी त्यांना साथ देवून समाजात दुही पसरवणाऱ्या प्रवृतिविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

           –  अॅड. सयाजी शिंदे , ( आपलघर सचिव नळदुर्ग )
————
   पोलीस व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ थाळ्या वाजविणे व दिवे लावण्यापेक्षा त्यांना या संकट समयी सुरक्षा कवच व अत्याधुनिक उपकरणे पुरविणे व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने घ्यावे हाच त्यांचा सन्मान असेल .
    करोना संसर्गामुळे समाजातील काही घटकानी धार्मिक तेढ निर्माण केली आहे, अशा संकट समयी इतके खालचे विचार या लोकांच्या मनात आलेच कसे, खोटे व्हिडीओ पोस्ट केल्याने सामाजिक वातावरण तात्पुरते दूषित झाले होते, परंतु भारतातील सर्वसाधारण जनता आजपर्यंत अशा लोकांना कधीही बळी पडली नाही व पडणार पण नाही सदर प्रकाराला मरकज चे आयोजक व त्यांना परवानगी देणारे पोलीस प्रशासन, गैरसमज पसरवनाऱ्या खोट्या बातम्या दाखवणाऱ्या वाहिन्या जबाबदार आहेत
       टी व्ही पाहणं सोडलं तर आपल्या भागात सामाजिक सलोखा आहे आणि पुढेही राहणार आहेच यात दुमत नाही आणि सर्वजण मिळून करोनावर मात मिळविण्यात यशस्वी होऊ यात शंका नाही, प्रत्येक समाजाच्या अध्यक्षांची व नगरसेवकांची मिळून एक मध्यवर्ती दक्षता समिती स्थापन केली तर प्रशासनाला मदतच होईल.

           — बी .एम. मुजावर (सेवानिवृत्त शिक्षक उमरगा )
———–
अवघें जगाला करोना व्हायरसच्या प्रकोपामुळे संकटाशी सामना करावा लागत आहे. तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी यावर उपाय शोधून काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आपल्या देशात ही वैद्यकीय यंत्रना विविध आघाड्यांवर करोना बाधितांना दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लाॅकडाऊन मध्ये आणि कर्फ्यू मध्ये विनाकारण लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिस,होमगार्ड,सैन्यदल कार्यरत आहे. मेडिकल ,अन्नधान्य  आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वितरण व्यवस्थापन योग्य पध्दतीने व्हावे यासाठी राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत.हे सारं होत असतानाच देशातील काहीं मंडळी सोशल मीडियाचा उपयोग करून आणि काहीं नेते मंडळी विविध विधाने करीत दुही निर्माण करीत आहेत. लातूर जिल्ह्यातील राठोडा येथे मुक्कामी हजार चे आसपास संख्येने उपस्थित राहून परिस्थिती धोक्यात आणली. उत्तरेत एका मुख्यमंत्र्यांनी रामनवमीला जमावबंदी १४४ कलम लागू असताना ही हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन मिरवणूकीने रामलल्ला ची पूजा पार पाडली. तिकडे तबलीकी मुस्लिम दिल्लीमध्ये मरकस मज्जीदीत हजारोंच्या संख्येने जगातून आणि देशभरातून जमून धार्मिक कार्यक्रम केला. नांदेड मध्ये शीख धर्मियांच्या मंडळींनी बंदी काळात गुरुद्वारात हजारोंच्या गर्दीने गुरुबानीचे पठण केले. पोलीसांकडून गुरुद्वारा प्रबंधक आणि कमिटीवर गुन्हे दाखल करण्यात आले. उपरोक्त तीन धर्म समुदाय यातून सुटले.
साधारणपणे हे दोषी असतानां  देशातील काहीं पक्ष आणि त्यांच्या समर्थक संघटना विशिष्ट पद्धतीने समाजमाध्यमाचा वापर करीत तसेच प्रभाव आणि मालकीच्या प्रसार प्रचार माध्यमाव्दारे या करोनाच्या आणिबाणीच्या काळात ही धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या कामी लागलेले आहेत अशी शंका येते. या अशा प्रसंगी विविध क्षेत्रात नकळतपणे बहुसंख्यांना आवडतील आणि सहज सोपे कार्यक्रम हाती देऊन अल्पसंख्य समाजावर धाक- दबाव – दडपण वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे असे दिसते.
देशावर जेव्हां संकट येते तेव्हां देश सर्व जाती धर्मासह प्रांतासह एकजूट असला पाहिजे आणि तसाच दिसलाही पाहिजे. भारतीय संविधाना प्रमाणे हा देश कुठल्याही  एका धर्माचा कधी नव्हता आणि भविष्यात असणार ही नाही.
*विसरा सारे भेदाभेद एकच असती कुराण-वेद*
या महात्मा गांधींच्या घोषणेप्रमाणे संख्येने बहुल असलेल्या समुहाने जातीभेद ,धर्म आणि वर्ण-वर्ग भेद न करता गुण्यागोविंदाने नांदता आले पाहिजे. असे मला अहिंसेचा मंत्र देणारे शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर जयंतीनिमित्त नम्रपणे आणि कळकळीने सांगावे वाटते.

— प्रा . किरण सगर (उपाध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद )
———–
देशातील नागरिक एकसंघ असल्याचे व कोरोनाच्या कामी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे यासाठी दिवे लावणे हा एकमेव पर्याय आहे असे मला वाटत नाही.दिवे लावण्याचा इव्हेंट म्हणजे केंद्र सरकारची ढिलाई,यंत्रणांतील त्रुटी आणि निष्काळजीपणा होय. देशात कोरोना उपचारासाठी पुरेशी साधन सामुग्रीचा अभाव,सुरक्षित साधनाची कमतरता,आर्थिक नियोजनाचा अभाव याकडे जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष जाऊ नये त्यांचे लक्ष भलतीकडे वळविण्याचा हा खरा प्रयत्न आहे.
    आपला देशात विविध जाती धर्मांचे लोक गुणा गोविंदाने राहातात.कोरोनाच्या पा२र्वभूमीवर दिल्लीमध्ये ‘तबलीग जमात’ यांच्या इस्तेमा पार पडला.या दरम्यान कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन  असताना या जमातीतील काही लोक देशभर फिरले यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला हे खरे आहे.यातील काहीनी   वेगळीच कृत्य केली. धर्मप्रसारक म्हणायचे की रोगप्रसारक म्हणायचे असा प्रश्न निर्माण होणे सहाजिकच आहे.परंतु या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम रंग देऊन धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत असल्याचे सोशेल मिडीयावरुन  जाणवते.परंतु या गोष्टीचा संबंध धर्माशी न जोडता.आपला देश धर्मनिरपेक्ष आहे.अशावेळी धर्मापेक्षाही देशाचा कायदा मोठा असतो हे समजून घेणे महत्वाचे आहे.या एका घटनेमुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होणे हे खरे नाही.
     धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष तत्वाचे पालन करुन एकात्मता निर्माण करुन जातीय सलोखा राखणे.   देशातील सर्व नागरिकांनी केंद्रसरकार व राज्यसरकारच्या आदेशाचे पालन करुन संपूर्ण यंत्रणांना सहकार्य करुन त्यांचे मनोबल वाढविणे.                 कोरोनामुळे घाबरलेल्या जनतेला मानसिक दृष्टया सक्षम करुन प्रथमोपचार मिळवून देणे.    कुठल्याही अंधश्रध्दा पसरविणाऱ्या अफवानवार विश्वास ठेवता कामा नये.   विवेकाची साथ धरुन विज्ञाननिष्ठ बनावे.         
      आपण भारतीय आहोत. संविधान हा आमचा आधार आहे.तेव्हा देशावर आलेल्या कोरोना संकटाचा मुकाबला सर्वांनी मिळून करु या.कुठलाही भेदभाव नकरता माणूस म्हणून माणसाने माणसाला वाचवले पाहिजे हा माणूसकीचा धर्म पाळू या.द्वेष,मत्सर,कलह याला तिलांजली देवू या.सर्वांनी स्वयम् शिस्त व सुरक्षित अंतर ठेवून,शासन व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करुन घरीच बसू या,मीच माझा रक्षक! या भावनेतून काम करुन जे प्रत्यक्ष कामात आहेत त्यांच्या प्रती कृतज्ञता बाळगू  या.मी देशाच्या कामी येणार अशी भूमिका घेऊ आणि सहकार्य करु या!

            —प्रा.डॉ.महेश मोटे , (  जिल्हा कार्याध्यक्ष              महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती,उस्मानाबाद).

दैनिक जनमत ५ एप्रिल E पेपर

कोरोना आणि पाणीटंचाई दुहेरी संकटात नांदुर्गा

उस्मानाबाद :- कोरोना आणि पाणीटंचाईच्या दुहेरी संकटात नांदुर्गा ग्रामपंचायत सापडली असताना प्रशासनाने मात्र हात वर केल्याने गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
याबाबत माहिती अशी की, नांदुर्गा येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली तसा रीतसर प्रस्ताव ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे दिला. प्रशासनाकडून एक पथक पाहणीसाठी आले मात्र त्यांनी गावापासून ३००० फूट अंतरावर असलेल्या बोअरवेल वरून पाणी आणण्याचा सल्ला दिला मात्र त्यासाठी निधी नाही तुम्ही खर्च करा असे सांगून जनतेला वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.  तसेच गावात १५ मार्च पासुन मुंबई पुणे अश्या ठिकाणाहून अनेक लोक मूळ गावी आल्याने पाण्यासाठी ते गावातील एका टाकी वर गर्दी करत आहेत यामुळे सोशल डिस्टन्सिंग ला खो बसत आहे. कोरोना आणि पाणी टंचाई या दोन्ही संकटात ग्रामस्थ सापडल्याने लोक चिंतेत आहेत. प्रशासनाने याची दाखल घेऊन ही समस्या सोडवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

कोरोना बाधिताच्या संपर्कातील व्यक्तीस पकडले ! तेरच्या ग्रामीण रूग्नालयात दाखल केले !!

तेर(प्रतिनीधी) तालुक्यातील तेर येथे कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या संभाव्य व्यक्तीस पोलिसानी ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले  आले आहे.  या बाबत माहिती अशी की दिल्ली येथे   तब्लिकी-ए-जमात या धार्मिक कार्यक्रम झाला होता कार्यक्रमाच्या ३ की.मी. परिसरातील मोबाईल नंबर पोलिसांनी शोधले होते. त्यात  उस्मानाबाद जिल्ह्यातील  एकूण   आठ नागरिकांचा तपास  जिल्हा प्रशासनाने सुरू केला होता.
दिल्ली येथे निजामुद्दीन परिसरात झालेल्या  धार्मिक कार्यक्रमानंतर अनेक नागरिक कोरोणा बाधित झाल्याचे उघडकीस आले आहे. बाधीतांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकाचा शोध घेतला जात आहे.अशा  एका व्यक्तीबधितामध्ये तेरच्या एकाचा  समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडे होती.
सदर व्यक्ती जो मोबाईल क्रमांक वापरतो तो त्याच्या आईच्या नावावर आहे. तो व्यक्ती दिल्ली वरून मुंबई आणि मुंबई वरून तेर येथे येत असल्याची माहिती प्रशासनाने तेर येथील यंत्रणेला दिली होती त्यानुसार सरपंच, पोलिस विभाग,तलाठी,पोलिस पाटील हे पाळत ठेऊन  होते.1 एप्रिलला संशयीत व त्याची पत्नी दूपारी आल्याचे पोलीसाना कळताच त्यानी त्यास ताब्यात घेऊन ग्रामीण रूग्नालयात  उपचारासाठी दाखल  केले आहे. तसेच घाश्याच्या स्त्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत.  खबरदारी म्हणून  पोलिसानी ग्रामीण रुग्णालय  परीसर बंदीस्त केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे ती व्यक्ती तब्लिकी-ए-जमात शी संबंधित नाही.

कोरोनामुळे जेरबेरा फुलाच्या शेतीलाही लॉकडाऊन उमरग्याच्या महीला शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

उमरगा :  (युसुफ मुल्ला)
तालुक्यातील कुन्हाळी येथील एका शिक्षित शेतकरी महिलेने विविध शेती तंत्राचा अवलंब करून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू केला होता मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने लॉकडाऊन झाल्याने वहातूक व्यवस्था आणि बाजारपेठही बंद झाली, परिणामी गेल्या दहा दिवसापासूनची तोड वाया गेली. मजूरीचा आर्थिक भूर्दंड आणि मेहनतीवरही पाणी पडले. शिवाय पन्नास हजार रूपयाचे नुकसान सहन करावे लागले आहे.
कृषी विभागाच्या अनुदान तत्वावरील पॉलीहॉऊसची उभारणी करून गेल्या चार वर्षापासुन वैशाली कैलास आष्टे यांनी जरबेरा फुलाचे उपन्न सुरु केले  आहे. गेल्या सहा ते सात महिन्यापासून दहा गुंठे क्षेत्रात जरबेरा फुलाचे उपन्न सुरू झाले होते त्यातून जवळपास तीन लाख रुपये उत्पन्नातुन मिळाले होते. 
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असताना पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करून कमी पाण्यावर अधिक उत्पन्न देणारे पीक घेण्यासाठी कुन्हाळीच्या शेतकरी वैशाली आष्टे यांनी प्रयत्न केला. २०१४ मध्ये साडेबारा लाख रुपये खर्चाचे पॉलीहाऊसची उभारणी करण्यात आली. त्यात कृषि विभागाने सव्वा चार लाखे लाखाचे अनुदान दिले होते. पॉलीहॉऊसमध्ये पहिले उपन्न जेरबेरा फुलाचा निर्णय घेण्यात आला. जेरबेरा फुलाचे रोपाची एकदा लागवड केल्यानंतर त्यातुन तीन वर्ष फुले मिळतात, एका रोपाला वर्षभरात ६५ ते ८० फुले मिळतात. पॉलीहाऊसच्या १० गुंठे क्षेत्रात साधारणतः तीन वर्ष उत्पन्न घेतल्यानंतर सौ. आष्टे यांनी पून्हा एक ऑक्टोबर १०१८ मध्ये पूणे येथून दोन लाख २८ हजार किंमतीची सहा हजार २५० जरबेरा फुलांच्या  रोपाची लागवड करण्यात आली. २५ डिसेंबर २०१९ पासून प्रत्यक्ष फुले विक्रीसाठी सुरू झाली. आणि दररोज आठशे ते नऊशे फुलांचे उत्पन्न सुरू झाले. प्रति फुलास दोन ते आठ रुपयापर्यंत दर मिळतो. या फुलांसाठी हैद्राबादची बाजारपेठ आहे. परंतू लॉकडाऊनमुळे तेथील बाजारपेठ बंद आहे शिवाय लग्नसराईतच लॉकडाऊन झाल्याने मंगल कार्यालयासह घरासमोरील मोठ्या शामियांत होणारी लग्न थांबल्याने स्टेज सजावटीसाठी लागणारे फुलांची मागणीही थांबली. २० मार्चपासून सर्वत्र बंद असल्याने फुलाची मागणी चक्क घटली, परंतू आलेली तोड तरी थांबवता येत नाही, मजूर फुलाची तोडणी केली. आणि जागेवरच त्या फुलाची नासाडी सुरू झाली आहे. दहा ते बारा दिवसात जवळपास बारा ते चौदा हजार फुले जागेवरच पडून आहेत, साधारणतः तीन रुपये दराने एका फुलाला दर मिळाला असता तरी जवळपास चाळीस ते पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. 
—–
” लॉकडाऊनमुळे जेरबेरा फुलाच्या विक्रीला ब्रेक लागला आहे. दररोज दोन ते तीन हजार रुपये फुल विक्रीतुन मिळत होते. आता गेल्या बारा दिवसापासुन उठावच बंद झाला आहे. परिपक्व झालेल्या फुलाची तोड तर करावी लागते, दररोज पाचशे रूपये मजूराचा खर्च आहे तो निकामी ठरतो आहे. शिवाय खत, पाण्याची सोय तर नियमित करावी लागते. आता आणखी तीन दिवसाने फुलाची तोड करावी लागते, तीही लॉकडाऊनमुळे वायाच जाणार आहे.  – वैशाली आष्टे
—–

फुलशेतीवर संक्रांत, शेतकरी संकटात. फुले बांधावर, शेतकरी उघड्यावर, कर्जाचा डोंगर डोक्यावर.


मोहा (दिलिप झोरी) :- कळंब तालुक्यातील मोहा येथील लोकसंख्या जवळजवळ दहा हजारांवर असुन लोकसंख्येनुसार गावाचा शेतीशिवार मोठा आहे. तसेच नवीन पिढीतील तरुण सुशिक्षित बेरोजगार यांची संख्याही लक्षणीय आहे. पैकी काही सुशिक्षित बेरोजगार तरुणानी शेतीच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न केला.
शेती गहान ठेवून बँकाचे लाखो रुपयाचे कर्ज काढले व
यामध्ये पाँलीहाऊस उभा करून जरबेरा व त्यासारख्या फुलाची शेती केली, तर काहीनी झेंडूच्या फुलाची शेती केली. परंतु दैवाने दिले आणि कर्माने नेहले तर कोरोना व्हारसने खिंडीत गाठले. मौसमात आलेला बहर आसमानी संकटात वाहुन गेला. त्यासाठी नवीन उमेदीने स्वतःहाच्या पायावर उभा राहू पहाणारा तरुण शेतकरी
पार मेथाकुटीला आला असल्याचे दिसुन येत आहे. आशा या शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीबद्दल काहीसा दिलासा मिळावा म्हणून शासनाच्या मदतीची गरज असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
          मोहा गावातील पदवीधर होऊन नौकरीच्या मागे न लागता आपला पारंपारिक पद्धतीने चालत आलेला शेती व्यवसाय हा नवनवीन प्रयोग करत सुधारीत पध्दतीने करावा म्हणून उच्च विद्याविभूषित व व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ. रामचंद्र लकडे यानी
आपली जमीन बँकतारण ठेवून लाखो रुपयाचे कर्ज काढून आपल्या २० गुंठे क्षेत्रात जरबेरा फुलाची लागवड केली. व कमी कालावधीत चांगले उत्पन्न व जास्त पैसा मिळाला परंतु नंतरच्या काळात निसर्गाने केलेली वक्रदृष्टी व पडलेले व व्यापार्याकरवी पाडलेले भाव आणि जागतीक महामारी आलेल्या कोरोना व्हायरस यामुळे ठप्प झालेले बाजार त्यामुळे चांगले आलेले उत्पन्न स्वखर्चाने मजूराकरवी अक्षरशः बांधावर टाकावे लागले आहे. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती शिक्षणाने पदवीधर असलेले श्री संजय भैय्या मडके यांची आहे. नवनवीन प्रयोग करून उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने कर्ज काढून २ एकर जमीनीवर झेंडूच्या फुलाची शेती केली असून उत्पन्न जोमत आले सध्या सणावाराचे दिवस असल्याने भरपूर
पैसा मिळेल असे वाटत असतानाच दुष्काळात तेरावा म्हटल्याप्रमाणे जागतीक महामारीने बाजारावर व वाहतुकीवर परिणाम केला. व बाजार सुनसान तर वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. शेतात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले व कष्टावर जोमात आलेले फुलाचे पिक मजूरी देऊन त्याच्यावर नांगर फिरवला जात आहे. आमदनी चव्वनी खर्च रुपय्या प्रमाणे शेतकरी कोमात गेलेला दिसून येत आहे.
          गावोगावची हि परिस्थिती लक्षात घेऊन व संबधीत शेतकर्‍यांच्या व्यथा जानून शासनाने सहानुभूती पुर्वक विचार करुन आशा शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आर्थिक मदत करावी असे पिडीत शेतकर्‍यांतुन बोलले जात आहे.