हुश्श… चिखली येथील पोलिसाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह
उस्मानाबाद – तालुक्यातील चिखली येथील पोलिसाच्या संपर्कातील व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर एक रिपोर्ट अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आहे. मात्र तूर्तास उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला आहे. दि २ मे रोजी सोलापूर येथे पोलीस सेवेत असलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पाॅझीटीव्ह आल्याची बामती आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने चिखली हे गाव सिल करून संबंधित व्यक्तीच्या घरातील व्यक्तींना दवाखान्यात दाखल करून त्यांची चाचणी केली होती. त्याचा अहवाल आज निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. तसेच आज एकूण वीस जणांचे अहवाल आले आहेत सर्व अहवाल निगेटीव्ह असल्याने जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे.
महाराष्ट्रातील पत्रकारांचा ५० लाख रकमेचा विमा उतरवावा आ.सुमनताई पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
तासगाव – ( राहुल कांबळे)
सध्या भारत देशाचे महाराष्ट्रात व प्रमुख मुंबई येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात या विषाणूने थैमान घातले आहे. आपले महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्याप्रकारे काम करीत आहेत या महामारी विरोधात पूर्ण ताकदीनिशी मुकाबला करीत आहेत या आजाराशी लढा देण्यासाठी झटणारे पोलीस डॉक्टर नर्सेस व आशा वर्कर्स व संबंधित त्या धर्तीवर घटकांचा केंद्र शासन ५० लाख रुपये रकमेचा विमा उतरवला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन अंगणवाडी सेविका यांचा २५ लाख रकमेचा विमा उतरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही अभिनंदन तसेच लॉक डाऊन काळात पोलीस डॉक्टर नर्स त्यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार बांधव त्यामध्ये प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीवर असल्याने आपणास घरबसल्या टीव्ही व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशातील आपल्या राज्यातील व आपल्या भागातील इतंभूत माहिती मिळत आहे. मुंबई येथे कोरोना संदर्भात माहिती मिळवण्या साठी पत्रकार बांधव कार्यरत आहेत.त्यातच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ५० पत्रकार बांधवांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबई येथे उपचार सुरू आहेत ते सर्वजण सुखरूप आहेत त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पत्रकार बांधव जीवाची पर्वा न करता जनतेच्या हितासाठी जनजागृतीच्या माध्यमातून आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहेत आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्याला प्राधान्य देत आहेत म्हणून या पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारचे प्रमुख म्हणून आपल्याकडे या पत्राद्वारे आग्रही मागणी करीत आहे. संपूर्ण राज्यातील पत्रकार बांधवांचा ५० लाख रुपये रकमेचा महाराष्ट्र शासनाने विमा उतरवावा अशी आग्रही मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्राचे लोकनेते माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांनी सदैव महाराष्ट्रात आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जनतेच्या हिताचे कामे केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील दुष्काळी जनता, शिक्षक ,पोलीस प्रशासन इत्यादींच्या बाबतीत सकारात्मक विचार केला होता त्यांचे अकाली निधनानंतर आज राज्याच्या राजकारणात कधी नव्हे एवढी पोकळी निर्माण झाल्याचे राजकीय विश्लेषक आपले मत व्यक्त करीत आहेत अशातच स्व.आबांच्या पत्नी तासगाव कवठेमहांकाळ च्या लोकप्रिय आमदार श्रीमती सुमन ताई आर. पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांचा ५० लाख रु. रकमेचा विमा उतरवावा अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केल्याने स्व आबांच्या पश्चात आमदार सुमन ताई पाटील या त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. तरी या रास्त व आग्रही मागणीचा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे साहेब यांनी याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेतील अशी तमाम महाराष्ट्रातील पत्रकारांची अपेक्षा आहे.
सुट्टी संपवून ड्युटीवर गेलेल्या पोलिसाचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह, पोलीस उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथील रहिवासी
उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील चिखली या गावचा रहिवासी असलेल्या आणि सध्या सोलापूर येथे सेवेत असलेल्या आणि नुकतीच सुट्टी संपवून सोलापूर येथे गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, चिखली येथे हा पोलीस कर्मचारी २४ एप्रिल च्या दरम्यान सुट्टीनिमित्त गावी आला होता. त्यानंतर तो सोलापूर येथे गेल्यानंतर त्याची चाचणी घेतली ती पाॅझिटीव्ह आली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना उस्मानाबाद येथे तपासणीसाठी आणण्यात आले आहे असे सांगितले. तत्पूर्वी चिखली हे गाव सिल केले असून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आहे.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या वतीने दोन हजार मास्कचे वाटप
उस्मानाबाद दि.१(प्रतिनीधी)
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे वतीने ६०व्या महाराषट्र दिनी, हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कोरोनापासून सूरक्षित राहण्यासाठी दोन हजार मास्कचे वाटप केले आहे.
लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा संपत आला आसातांनाही व राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आसतांनाही उस्मानाबाद शहरात आजही अनेक जण मास्क न वापरता शहरात फिरतांना दिसत असल्याने आशांना महाविद्यालयाच्या वतीने मास्क वाटप करण्याच्या भूमिकेतून
आज महाविद्यालयात, प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियोजन करून महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक यांना मास्कचे वाटप केले .
व सध्या उस्मानाबाद शहरातील विविध भागातील रस्त्यावर व गल्लीमध्ये अनेक जण तोंडाला मास्क न लावता फिरत आहेत.त्यामुळे महाविद्यालयातील शिक्षकांनी ,रस्त्यावर मास्क न लावता फिरणा —याला व आपण राहात असलेल्या परिसरातील नागरिकांना मास्क वाटप करण्याचे आवाहन केले.सदर दोन हजार मास्क महाविद्यालय व महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक,अभ्यासकेंद्राच्या वतीने नियोजन केले होते.
आज महाराषट्र दिनानिमित्त महाविद्यालयातील संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे पुतळा परिसरात सोशल डिस्टन्सचे आंतर ठेवून कर्मचारी यांना मास्कचे वाटप प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रा.डी.एम.शिंदे,उपप्राचार्य प्रा.बबन सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील विविध भागात शिक्षकांनी मास्कचे वाटप करावे म्हणून शिक्षकांना मास्क देण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयातील शिक्षकांनी महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावरून ये जा करणारे,व बार्शी नाका,शाहुनगर,सांजा रोड,शिक्षक काॅलनी या ठिकाणी मास्कचे वाटप केले आहे.























































