Home Blog Page 291

निराधारांच्या पगारी, कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना फेर कर्ज व नवीन पीक कर्जाचे वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकने जलदगतीने करावे-आ.राणाजगजीतसिंह पाटील

उस्मानाबाद –
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता निराधारांच्या पगारीकर्जमाफीच्या लाभार्थ्यांना फेर कर्ज व नवीन पीक कर्जाचे वितरण जिल्हा मध्यवर्ती बँकउस्मानाबादने जलदगतीने करावे असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
आ. पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकउस्मानाबादच्या सर्व संचालकांशी ऑडिओ ब्रिज या तंत्राचा वापर करत संवाद साधलायावेळी आ. पाटील यांच्या सोबत बँकेचे अध्यक्ष  सुरेश बिराजदारउपाध्यक्ष  कैलास शिंदेव्यवस्थापकीय संचालक  भुक्तार व सर्व संचालक सहभागी होते.
यावेळी सर्व संचालकांनी कोविड-१९ च्या साथीने उदभवलेल्या संकटात जिल्हा मध्यवर्ती बँक बाबत विविध विषयावर चर्चा केली. बँकेच्या मार्च अखेरची आकडेवारी अध्यक्ष बिराजदार यांनी सर्व संचालकांसमोर मांडली. मागील वर्षी बँकेचा CRAR ९.७६ असून कर्जमाफीसाठी बँकेस ६० कोटी मंजूर आहेत त्यापैकी ३६ कोटी आज मितीस बँकेकडे जमा झालेले आहेत.
शेतकऱ्यांकडे सद्यस्थितीला कसल्याही प्रकारची रक्कम उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पेरणी व पेरणीपूर्व मशागतीसाठी पैसे उपलब्ध होणे गरजेचे आहेत्यासाठी ज्यांचे पीक कर्ज माफ झालेले आहे अशांना नियमानुसार फेर कर्ज व इतर शेतकऱ्यांसाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणेबाबत बँकेने पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे आ. पाटील यांनी आवर्जून सांगितले. सर्व संचालकांनी ऑनलाईन ZOOM व्हिडीओ कॉल द्वारे एक मीटिंग घेऊन या संबंधित निर्णय घेण्याचे ठरले. यानुसार येत्या काही दिवसात अशी मीटिंग घेऊन महत्वाचे निर्णय घेण्यात येतील. 
जिल्ह्यातील निराधारांची ३ महिन्यांची पगार एकत्रित जमा होत असल्याने त्याच्या जलद वितरणाकडे आवर्जून लक्ष देण्याचे आ. पाटील यांनी सूचित केले. त्यासाठी फिरत्या ए टी  एम गाडीचा नियोजनबद्ध वापर व्हावा तसेच वेळापत्रक ठरवून गावो-गावी जाऊन बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत १५ दिवसात या रकमेचे वाटप लाभार्थ्यांना करण्याचे ठरले. हे वाटप करत असताना तेथे फेस मास्कचा वापरसॅनिटायझरची सोयएकमेकांमध्ये अंतर ठेवणे (सोशल डिस्टंसिंग) हे अनिवार्य करून त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच महसूल व स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य घेणेबाबत आ. पाटील यांनी सांगितले. 
या परिस्थितीत बॅंकेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंदाजे ३५० कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करून सदर विषय हा बोर्ड मिटिंग मध्ये घेण्याचे ठरले. तसेच बँकेच्या सर्वच शाखेत आवश्यक मास्क आणि सॅनिटायजरची सोय करण्यात आली असल्याचे अध्यक्ष  बिराजदार यांनी यावेळी सांगितले.

व्यवस्थापनशास्त्र विभागाची ‘लॉकडाऊन’ मधील आयडिया – ‘डिजिटल अकॅडमिक प्लॅटफॉर्म’ची निर्मिती – उपपरिसर व्यवस्थापनशास्त्र विभागाचा उपक्रम

उस्मानाबाद, दि.१४ः  लॉकडाउनमुळे शिक्षणक्षेत्रासह बहुंताशी क्षेत्रातील कामे थांबली आहेत. परंतु याही परिस्थितीत उपलब्ध पर्यायामध्ये तंत्रज्ञांनाच्या सहाय्याने व्यवस्थापनशास्त्र विभागाने उत्तर शोधले आहे

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
उप-परिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाने विभागाच्या विद्यार्थ्यासाठी “डिजिटल अकॅडमिक प्लॅटफॉर्म” ची सुविधा तयार केली आहे. हा प्लॅटफॉर्म वेबसाइट व मोबाईल अप्लीकेशनद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सेवा विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध असून सदर सुविधा ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांना विभागामार्फत आय डी व पासवर्ड मिळतील. या प्लॅटफॉर्म वरती विविध कोर्स नुसार प्रत्येक सेमेस्टरचे एक टॅब तयार केले आहे. ज्या सेमिस्टर मध्ये विद्यार्थी आहे त्याने त्या टॅब मध्ये प्रवेश केल्यास त्याला विषय निवडायचा आहे त्या विषयाच्या टॅब वरती त्याला संबधित विषयाचे विविध प्रकारातील ऑडिओ,व्हिडिओ, पी. डी. एफ., पी. पी. टी.,विषयाची पुस्तके, नोटस, बातम्या, ब्लॉग लिंक, संशोधन लिखाण, प्रश्नावलि, मॅनेजमेंट गेम्स, बिजीनेस प्लॅन, केस स्टडी आदी अभ्यास करण्यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध केले जाणार आहे. सदरील साहित्य हे त्या विषयाच्या शिक्षका मार्फत त्या प्लॅटफॉर्म वरती पुरवलेले असेल. त्यामुळे घरी राहून देखील सर्व टिचिंग व लर्निंग चालू रहण्यास मदत होणार आहे, तसेच वेळोवेळी विभागामार्फत दिली जाणारी नोटिस,आसाईन्मेंट, प्रोजेक्ट, कार्यक्रम, माहिती देखील विद्यार्थ्यांना सदर प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध असणार आहे. त्याच बरोबर विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचे माहिती संकलन तिथे उपलब्ध होणार आहे. जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या सोबत देखील संवाद ठेऊन प्रोजेक्ट, फील्ड सर्वे, नौकरी व मार्गदर्शन बाबत माजी विद्यार्थ्याद्वारे मदत घेऊ शकेल. ‘प्लेसमेंट ‘ या टॅब मध्ये उपलब्ध झालेल्या प्लेसमेंट बाबत बातम्या, जाहिरात, संपर्क देखिल विद्यार्थ्यांना त्यावरती उपलब्ध होणार आहेत. विभागातील होणारे कार्यक्रम बाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे. विभागाचा आद्याप पर्यंतचा प्रवास, माहिती, विभागाच्या उपलब्धता, शिक्षक, सेवा व सुविधा, कार्यक्रम फोटो बाबत माहिती या उपक्रमा मार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बाबत व विषया बाबत काही आडचण असल्यास तो या प्लॅटफॉर्म वरुण समंधित शिक्षकास ईमेल पाठऊ शकतो सदरील ईमेल चे उत्तर विद्यार्थ्याला ईमेल वरती मिळू शकले. जिथे आवश्यकता असेल तिथे संपर्कासाठी गुगल फॉर्म व गुगल मिट यांचाही वापर केला जाणार आहे.
या प्रकल्पासाठी मोलाचे मार्गदर्शन कुलगुरू. डॉ. प्रमोद येवले यांचे लाभले आहे. तसेच प्र कुलगुरू  डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव  डॉ.  जयश्री सूर्यवंशी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे आधीष्ठाता प् डॉ. वाल्मीक सरवदे,  व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. अभिजीत शेळके, उप-परिसराचे संचालक डॉ. प्रशांत दीक्षित यांचे मार्गदर्शन मिळाले. या प्रकल्पाचे नियोजन विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी केले या प्रकल्पातील शैक्षणिक जबाबदारी डॉ. विक्रम शिंदे,विभागाच्या माहितीची  प्रा. सचिन बस्सैये व प्लेसमेंट व माजी विद्यार्थी बाबत जबाबदारी प्रा. वरुण कळसे यांनी पूर्ण केली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रा. शीतलनाथ एखंडे व विभागाचा विद्यार्थी सूरज शिंदे यांनी महत्वाचे तांत्रिक सहकार्य केले आहे. विभागातील विद्यार्थ्यांची नोंदणी व माहिती आपलोड चालू केली जाणार आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत छोट्या व्यवसायिकांना झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत करा – दत्ता कुलकर्णी

उस्मानाबाद
लॉकडाऊनच्या कालावधीत छोट्या व्यवसायिकांना झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत करा अशी मागणी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी जिल्हाधिकऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊनच्या मागील ५१ दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील छोटे व्ययसायिक, पारंपारिक व्यवसाय करणारे, चहा स्टॉल, टपरीधारक, वाहतूक व्यवसाय करणारे खाजगी वाहन चालक, रिक्षाचालक, सलूनधारक, चौपाटीवरील भेळ विक्रेते, फेरीवाले, तांत्रिक दुरुस्त्या करणारे टेक्निशियन तसेच दैनंदिन उत्पन्नावरच ज्यांचे जीवनमान अवलंबून आहे, असे अनेक घटक या कालावधीत प्रचंड अडचणीत सापडले आहेत़
मुळातच उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळप्रवण क्षेत्रात मोडतो, मोठे उद्योग नसल्याने रोजगारांची वानवा आहे़, परिणामी, अनेकजण छोटे-मोठे व्यवसाय, कामे करुन आपला उदरनिर्वाह भागवितात़ अत्यंत तोकड्या भांडवलावर उपरोल्लेखित घटक हे व्यवसाय करीत असल्याने त्यांना मिळणारे उत्पन्नही तुटपुंजे असून, त्यातूनच ते आपल्या गरजा भागवीत असतात़ अशातच लॉकडाऊनमुळे व्यवसायही थंडावल्याने हे घटक आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ गरजा भागविण्यासाठी व्यवसायातील भांडवलच खर्ची गेल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत़ आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर किंबहुणा ते उठविल्यानंतर या घटकांना आपला व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यासाठी भांडवलाची गरज भासणार आहे़ तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील या मर्यादित गरजांमध्ये जगनाऱ्या सर्वसामान्य घटकांना, बचत गटाच्या माध्यमातून कामे करणाऱ्या महिलांना सरकारच्या माध्यमातून आपण भांडवल उपलब्ध करुन द्यावे, त्यासाठी तातडीने स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावे,  असे निवेदनात म्हटले आहे.

दैनिक जनमत १४ मे E पेपर

परंडेकरांना मोठा दिलासा परंडा तालुक्यातील त्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी 8 जणांचे अहवाल नकारात्मक-डॉ सय्यद

परंडा :-ग्रीन झोन असलेल्या उस्मानाबाद जिल्यात  सोमवार दि 11 रोजी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता त्या रुग्णाच्या संपर्कात तालुक्यातील 22 जण आले होते त्यातील 6 जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने तालुकवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे तर त्यातील आणखी 8 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून  ते सर्व अहवाल नकारात्मक आले आहेत अशी माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद यांनी   दैनिक जनमत शी बोलताना दिली
डॉ सय्यद म्हणाले की  रुग्णाच्या संपर्कातील 22 जनांपैकी 6 जणांचे अहवाल काल दि 12 रोजी प्राप्त झाले ते सर्व अहवाल नकारात्मक आले होते तर आज 8जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत तेही नकारात्मक आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे
 पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानुसार 5 – 5 दिवसानंतर स्वाब पाठवावे लागतात त्यानुसार उर्वरित जणांचे ठराविक वेळेत पाठवले जाणार आहेत अशी  माहिती डॉ सय्यद यांनी दिली
   जिल्ह्यात पझिटिव्ह  रुग्ण  सापडल्याने  गालबोट लागल्याने लाल परी ,विविध आस्थापना बंद कराव्या लागल्या असल्या तरी अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

सरणवाडी कोरोना ग्रस्ताच्या संपर्कातील 6 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

परंडा – परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील युवकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले होते. आरोग्य विभागाने तातडीने बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी घेऊन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे  पाठवले होते आज त्यांचा अहवाल आला आहे. त्या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बधिताच्या कुटुंबातील व्यक्ती, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करणारे डॉक्टर, खाजगी दवाखान्यात त्याच्या शेजारील व्यक्तीचे अहवाल घेण्यात आले होते. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कातील आणखी 23जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंडा तालुक्यातील आसू ,पिंपळवाडी, पाचपिंपला  यागावतील त्या बाधित व्यक्ती ने फळे, भाजीपाला खरेदी केला असल्याने प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे तसेच सोलापूर जिल्यातील करमाळा अनेक तालुक्यातील गावात हा रुग्ण फिरलेला असल्याने त्याचा तपास सुरू आहे  तर कोरंटाईन केलेल्या 23 जणांवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे.

आटपाडी पोलिसांनी उंबरगाव चेक नाक्यावर पकडला गुटख्याचा टेम्पो

 आटपाडी दि.12 (प्रतिनिधी):

आटपाडी पोलिसांनी सांगली-सोलापूर जिल्हा सरहद्दीच्या उंबरगाव चेक पोस्ट नाक्यावर सोलापूरहून चिपळूणला जाणारा बादशहा गुटख्याची 29 पोती असलेला आयशर टेम्पो पकडून कारवाई केली. 7 मे रोजी पोलिसांनी अशीच कारवाई केली होती. एकाच आठवड्यात ही दुसरी कारवाई आहे.
सोमवार  दि.11 मे रोजी पहाटे 5.45 वाजता सांगली -सोलापूर जिल्हा सरहद्दीतील आटपाडी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील उंबरगाव चेक पोस्ट नाक्यावरील पथकाने सोलापूरहुन चिपळूणला जाणारा एमएच 12 एचडी 5284 या क्रमांकाचा आयशर टेम्पो अडविला. काचेवर अत्यावश्यक सेवा, पशुखाद्य असे कागदी स्टिकर चिटकवला होता, परंतु अधिकृत परवाना काचेवर नव्हता. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तपासणी केली. त्यांना पशुखाद्यऐवजी गुटख्याची पोती आढळून आली. 14 लाख रुपये किमतीच्या बादशाह गुटख्याची 29 पोती होती.
पोलीस पथकाने वाहन चालक खाजेभाई लाडलेसाहेब (वय 60, लोहगाव, पुणे )व बाबू मोमीन लाडलेसाहेब (वय 60 ,इंदिरानगर, मंद्रूप, सोलापूर) यांच्यासह आयशर टेम्पो व गुटख्याची पोती ताब्यात घेतली आहेत. या घटनेची माहिती  सांगली जिल्हा अन्न व सुरक्षा अधिकारी यांना कळवून आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 आटपाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, उपनिरीक्षक कनकवाडी, पोलीस हवालदार नंदकुमार पवार, पोलीस नाईक रामचंद्र खाडे, पोलीस हवलदार दिग्विजय कराळे, परशराम देशमुखे ,अतुल माने, नितीन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत. आटपाडी पोलिसांनी आठवड्याभरात दोन वेळा अशी कारवाई करून 48 लाख रुपयांचा गुटख्यासह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

परंडा तालुक्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश केवळ या आस्थापना सुरू राहणार

उस्मानाबाद –  ११ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात कोव्हीड १९ ( कोरोना) चा रुग्ण आढळून आला आहे. त्यानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी परांडा तालुक्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत त्यानुसार तालुक्यात ठराविक आस्थापना चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार
 शासकीय / निमशासकीय कार्यालये , पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा – या आस्थापना, सर्व बँका , दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा – या आस्थापना, अन्न , भाजीपाला , दूध, किराणा पुरविणा – या आस्थापना ( सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरू राहतील ), दवाखाने , वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने ,विद्युत पुरवठा . ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने , प्रसार माध्यमे , मिडीया ,अत्यावश्यक सेवा देणा – या आय . टी . आस्थापना . चालू राहणार आहेत वरील सर्व आस्थापना सोडून बाकी सर्व आस्थापना १७ मे पर्यंत बंद राहणार असल्याचे आदेशा मध्ये म्हटले आहे.