Home Blog Page 285

दैनिक जनमत ५ जून E पेपर

दैनिक जनमत ४ जून E पेपर

तासगावातील त्या महिलेच्या संपर्कातील तिघांचे अहवाल निगेटिव्ह तासगावकर नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

तासगाव प्रतिनिधी/ राहुल कांबळे
तासगाव शहरात मुंबईवरून आलेल्या ५८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यां संपर्कातील त्या महिलेचा पती, मुलगा, तसेच त्या महिलेचा भावाचा मुलगा त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी बरोबर गेलेला होता. त्यामुळे सदर च्या तिघांचे हे
स्वँब काढून घेतले होते. तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याची बातमी तासगावात धडकताच तासगाव शहरात आनंदाचे वातावरण पसरले  आहे. व सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या गोष्टीची चर्चा तासगाव शहरातील चौका चौकांमध्ये सुरू आहे‌.दुपारपासूनच त्यासंदर्भात तासगावकर नागरिक प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना याबाबत माहिती विचारत होते.
सदरची माहिती पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल सूर्यवंशी यांनी प्रसार माध्यमांना  दिली आहे‌. आतातरी तासगाव नगरपालिका प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तर त्यास पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. वेळप्रसंगी कठोर भूमिका घेऊन कठोर कारवाई करण्याची ही गरज निर्माण झाली आहे. यास पर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून येणाऱ्या आपल्याच नागरिक बांधवांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासन जे काही करत आहे ते आपल्या  तुमच्या-आमच्या संरक्षणासाठी करत आहे. याची जाणीव तासगावकर नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे.

डॉक्टर साहेब तुम्ही शत:आयुषि व्हा

                        प्रिय , डॉ. पद्मसिंह पाटील  साहेब !         आपल्याला 80 व्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !        लहानपणी कळायला लागल्यापासून आमचा तुम्हाला लळा लागला, तूमच्या राजकारणातली भरभराट अनं आमचे बालपण एकाच वेळी फुलत गेलं,  माझ्या वडिलांचे आजोळ म्हंजे माझं पंजोळ तेर असल्यामुळे असेल कदचित , ऊठसूट तेरला येण्या मूळ आपलं मोठेपण आमच्या लहानपणीच दुरून ऐकून,  पाहिलं  !     
           उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर सारख्या गावातील तरुण पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेतो डॉक्टर  होतो तसच राजकारणात पण सक्रिय होतो. अनं बघता बघता   जिल्हा परिषद  पासून आमदार , खासदार ते पाटबंधारे , ऊर्जा मंत्री पासून ग्रूहमंत्री होतो हा प्रवास आपला साधा सुधा नव्हता. मराठवाड्यातील उस्मानाबाद सारख्या मागासलेल्या जिल्ह्यास विकासाच्या मार्गावर आणणे येवढं सोपं नव्हतं. जे आपन तेही करून दाखवल. तेही त्या काळात जेव्हा लाईट , टेलिफोन किंबहुना दळणवळणाची कोणतीही साधन नसतानाचा तो काळ , माझं गांव तसं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असल्यामुळे आम्ही नंदनवनातच होतो ,  पण आपल्या नेतृत्वाची भुरळ काही गावांना बसली अनं बार्शी तालुक्यातील आठ गांव उस्मानाबाद जिल्हयात सामील झाली अनं ही येड्शि तडवळा अशी गांव आपल्या मतदारसंघात सामील झाली,  आणि आपल्या कार्यकाळात  नवं उमेदीच्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवसच आले जणू , चौथी , पाचवी ‘ अनं आठवी नापास गावागावात सरपंच , सभापती , अनं सोसायटीच्या बँक कारखान्यावर संचालक म्हणून बिनदिक्कतपणे दिमाखात बसू लागले , म्हशी राखणारे कारखान्यानें चालवायला लागले , व गावागावात जुगार खेळणारे बॅंकां चालवायला लागले , दुसऱ्याच्या भाकरी खाऊन जगणारे सहकार क्षेत्रात भीष्म पिता होऊन करोडोची माया जमऊ लागले , आपन मुंबईत  रहा आम्ही मतदारसंघ जिल्ह्यासह हँडल करतो !  असं म्हणनारे गावो गांवचे नातलग, फक्त निवडनूकी पुरते तुम्हाला जवळ करणारे , व निधी गिळून बसणारे बोके गूर्र गूर्र करत असायचे ,  आपल्या कारकिर्दीतील काळात आपन जिल्हयात जे जे हवं ते ते सगळं मिळऊन दिलं , विमानतळ पासून  दिल्लीच्या तक्तावर मांड ठेऊन रेल्वेला उस्मानाबाद मधे यायला भाग पाडले !          यात आपला काहीच दोष नाही ,आपली दानतच इतकी मोठी होती आपन हात झटकला तरी लोकांनी बंगले बांधले , अनं ज्यांना तुम्ही सगळं दिलेलं त्यांनी सगळं विस्कटून टाकायच काम तेवढं  तूमच्या वळचनींच पाणी पिणार्या कावळयांनी केलं.       जे  सध्या लेनींन चे कपडे घालून बंगळे होऊन फिरायला लागले !  आपन आपुलकीने माणसं उभी केली त्यातली काही बेईमान , तर काही खुनशी, गद्दार ! निघाली तर कित्तेकजन आज ही तूमच्या सोबतीला राहिली. कठोर काळानें तुमचीं परीक्षाच घेतली पवार साहेबांनीची कारकीर्द तुमच्या छातीच्या  ढाली मूळ टिकली !  तुमचा मंत्रिमंडळातला वचक आज ही नवीन मंत्र्यांना शिकवला जातो.  छगन भुजबळ यांनी सेनेत केलेल बंड  तुमच्या संरक्षणामूळ टिकल , ज्या शिवसेनेत वाघ होते ते तुमच्यातला सिंह बघून मान टाकायचे ,  सभागृहात बोलताना भायखळा येतील जनता दलाचा आमदार तिखट काय बोलला , तर त्याला कुस्ती पहिलवानासारखा बाकावर उचलून आदळला , जो नारायण राणे साहेबांनी मध्यस्थीने केली म्हणून वाचला ! तुमच्यातला नीडर पणा  तुमच्या धडाकेबाज निर्णयामुळे मंत्रालयाचे अधिकारी घायाळ व्ह्ययचे यांचे किस्से आज ही मंत्रालयात अधिकारी सांगताना दिसतात !  तुमच्याकडे असलेला दबंग  पणा तुम्ही आज वयाच्या ऐंशी वर्षी पण जपलात , तुमच्याकडे असलेले कौशल्य  किती अदभुत होतं यांची किल्लारी भूकंपाच्या पुनर्वसन काळात व आत्ता आम्हाला याची जाणीव होते ,   तुमचा तो दरारा आज ही जिवंत राहो हीच इच्छा व आपणांस दीर्घ आयुष्य लाभो !                     

                       सोमनाथ तडवळकर

सलग दुसऱ्या दिवशीही मायणी पोलीसांची मोठी कारवाई साडेसहा लाख रु चा मुद्देमाल जप्त

मायणी प्रतिनिधी-
 सलग दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई असून उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी वडूज चे पी आय पाटील यांनी मायणी पोलास टीमचे अभिनंदन केले .
  मिळालेल्या माहितीनुसार विखळे फाटा येथे एका इनोव्हा गाडीवर कार्यवाही केली गाडीत विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले . मायणी दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांना माहिती मिळाली की एका गाडीतून दारूची विना परवाना वाहतूक होणार आहे या माहितीच्या आधारे गोसावी यांनी विखळे फाटा येथे सापळा रचला आसता पडळ  बाजूने एक इनोव्हा गाडी क्र एम एच ०४क क १०५३ वेगाने कलेढोंन बाजूला जाताना दिसली सदर गाडी थांबवून गाडी तपासले असता गाडीत विदेशी दारुचे बॉक्स आढळुन आले  त्याची किंमत ५७६०० रु त्यांच्याकडे चौकशी केली आसता त्यांच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता .विनापरवाना विदेशी दारू वाहतूक करीत असलेल्या दोघाजणांवर गुन्हा दाखल  केला आहे. इनोव्हा गाडीसह असलेल्या मुद्देमालची किंमत अंदाजे साडे सहा लाख रु आहे .
    याच्य आगोदर म्हणजे एक दिवस अगोदर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेंपोवर कारवाही केली होती सलग दोन दिवसात दोन मोठया कारवाई मुळे मायणी पोलिस व आधिकरी यांचे कौतुक होत आहे.या कारवाईत
उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मायणीचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी  व  , पो ना खांडेकर,पो कॉ सानप,पो कॉ कोळी, पो कॉ सूर्यवंशी यांनी भाग घेतला
     
    

सांगली जिल्ह्यात आणखी आठ जण कोरोना बाधित,जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांची माहिती

तासगाव प्रतिनिधी दि.३०
जिल्ह्यात आणखी आठ जण कोरोणाबाधित झाले असून यामध्ये औंढी तालुका जत येथील ५५ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे .सदर व्यक्ती १६ मे रोजी मुंबईहून आलेली आहे.
खानापूर तालुक्यातील कारंजे येथील ३० वर्षिय पुरुष कोरोणा बाधित झाला असून सदर व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली आहे.
नेर्ली येथील काल कोरोणा पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा २८ वर्षिय मुलगाही कोरोणा बाधित झाला आहे.
 रेड तालुका शिराळा येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीय २० वर्षीय पुरुष नातेवाईक कोरोणा बाधित झाला आहे.
 खिरवडे तालुका शिराळा येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीय ५२ वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे.
 कचरेवाडी तालुका तासगाव येथील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे.
 आंबेगाव तालुका कडेगाव येथील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची बारा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलगा ही कोरोना बाधित झाला आहे.
अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहे.