Home Blog Page 283

अज्ञात वाहनाने दिली धडक, शिक्षिकांचा जागीच मृत्यू


इटकळ ( दिनेश सलगरे ) राष्ट्रीय महामार्गावरील बाभळगांव पुला जवळील पडलेल्या खड्ड्यामुळे अज्ञात भरधाव वाहनाने ऑक्टिवा मोटार सायकला जोराची धडक दिल्याने दोन महिला शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात सोलापूर हैद्राबाद महामार्गावर बाभळगाव येथील तलावाच्या पुलावर सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडला. अधिक माहिती अशी की सोलापूर येथील या दोन महिला शिक्षिका वत्सला नगर आणदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होत्या शालेय व्यवस्थापन समितीची बैठक व विद्यार्थ्याना पुस्तके वाटपाच्या नियोजनासाठी या दोन शिक्षिका  शशिकला नागेश कोळी वय 45 वर्ष व रोहिणी शंकर सपाटे वय 35 वर्ष दोन्ही रा.सोलापूर या स्कुटी मोटार साइकल ने सोलापूर हून आणदूर ला आल्या व शाळेतील काम झाल्या नंतर परत वत्सलानगर अणदूर येथील जिल्हा परिषद शाळेतून त्या सोलापूरला ऑक्टिवा मोटारसायकल एम एच 13 सीएच 9867 वर जात आसताना बाभळगाव ता.तुळजापूर येथील  तलावाच्या पुलावर पाटीमागुन येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.हा अपघात इतका जोराचा होता की  ऑक्टिवा मोटार साइकल जवळपास 300 फुट फरफट गेली.व अक्टिवा मोटार साइकल वरील दोन्ही शिक्षिका जागीच ठार झाल्या.अपघाताची माहिती मिळताच  इटकळ औट पोस्ट चे सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृत देह पोस्ट मार्टेम साठी पाठवले.अपघात ग्रस्त वाहन पसार झाले.यामधील शशिकला कोळी यांच्या पति चाही मृत्यू गत वर्षी या ठिकाणच्या जवळच अपघातात मृत्यू झाला होता.या दोन्ही शांत व सुस्वभावी असलेल्या शिक्षिका  अपघाती मरण पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.तरी या राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवून घ्यावेत अशी मागणी होत आहे

दैनिक जनमत १९ जून E पेपर

दैनिक जनमत १८ जून E पेपर

राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टी होणार का आमदार ?

  • शरद पवारांच्या निवासस्थानी गोविंदबागेत शेट्टी यांची पवारांबरोबर चर्चा
बारामती प्रतिनिधी :
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी घेण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गोविंदबाग येथे सकारात्मक चर्चा केल्याचे समजते आहे.आता राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे या चार जागांपैकी एक जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवल्याचे समजते आहे.
यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्याचे ठरले होते त्यानुसार ही जागा सोडली जाणार असल्याचे तसेच सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आज राजू शेट्टी व शरद पवार यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे,
तसेच विधानसभेच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट असताना स्वाभिमानी संघटनेने मात्र महाआघाडीची साथ सोडली नाही व याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना विरोधी प्रचार व जनजागृती करत स्वाभिमानी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसची खंबीर साथ दिल्याचे दिसून आले आहे. 
या भेटीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच सतीश काकडे,स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चव्हाण व इतर नेते उपस्थित होते काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती परंतु त्यावेळी राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषद आमदार होणार की नाही याची खात्री झाली नव्हती मात्र आज झालेल्या चर्चेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राजू शेट्टी यांना विधान परिषदेची जागा सोडण्याचे निश्चित झाल्याचे समजते आहे.

नळदुर्ग शहरात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ

नळदुर्ग :- शहरातील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या माऊली नगर भागातील एक हॉटेल व्यवसायिक हा बारा दिवसापूर्वी अक्कलकोट येथे आपल्या सासरवाडीला गेला होता. सासरवाडी तुन आपल्या मूळ गावी नळदुर्गला परत आल्यानंतर तो गेल्या सहा-सात दिवसापासून तापाने आजारी होता. त्यानंतर त्याने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता त्या ठिकाणी डॉक्टरने त्याला शहरातीलच एका लॅब मध्ये जाऊन विविध टेस्ट करण्याची सूचना केली होती त्यानुसार त्यांनी काही टेस्ट केले होते. औषधोपचार व टेस्ट करून सुद्धा ताप कमी होत नसल्याने त्याच्या घरच्या लोकांनी त्याला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर त्याची त्याठिकाणी  कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्याची रिपोर्ट 15 जून रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत,  तालुका आरोग्य अधिकारी सुहास पवार, नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव, डॉ एम एम शेख, डॉ. यशवंत नरोडे, नगरसेवक नय्यर पाशा जाहगीरदार, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक अफरोज पिरजादे  जी.वी.शाचे धनंजय वाघमारे, विजय सगर यांनी रुग्ण आढळून आलेल्या भागाची पाहणी केली व  हा भाग  कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन सील करण्यात आले त्याचबरोबर  कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 9 लोकांना  तुळजापूर येथे  तपासणीसाठी पाठविण्यात आले.  व रुगण आढळलेल्या माऊली नगर भागाला सील करण्यात आले. याकरिता  मुनीर शेख, खलील शेख, राजाभाऊ सुतार, खंडू शिंदे, फुलचंद सुरवसे यांनी परिश्रम घेतले. यापूर्वी मुलतान गल्ली येथे 1 बौद्धनगर येथे 3 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आज पुन्हा शहरात आणखी 1 रुग्ण आढळून आल्याने शहरातील रुग्णांची संख्या 5 झाली आहे विशेष म्हणजे गेल्या सहा दिवसात चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने. शहरात खळबळ उडाली आहे.

रक्तावाचून कुणालाही जीव गमवावा लागेल,हे होऊ द्यायच नाही -सुभाष सातपुते

आटपाडी दि.१४( प्रतिनिधी):
रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचणार असेल तर एक सामाजिक बांधिलकी या नात्याने रक्तदान करायलाच हवे असा संकल्प भरारी ग्रुपच्या वतीने जागतिक रक्तदान दिनानिमीत्त करण्यात आला.कोरोना या विषाणूने जगात थैमान घातल्याने कोरोना बाधित रुग्णांना व इतर रुग्णांना रक्ताची खूप टंचाई भासू लागली आहे.राज्यातील सर्व रक्तपुरवठा करणारा रक्तपेढीमधे रक्तसाठा अल्पप्रमाणात आहे.रक्तदान ही काळाची गरज आहे.कारण विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी रक्त तयार करता येता येणार नाही. त्यामुळे रक्तपुरवठ्यच्या तुटवडावर मात करण्यासाठी आज भरारी ग्रुपच्या वतीने शासकीय जिल्हा रक्तपेढीच्या सहकार्याने अंबर हाॅल कोथरूड़ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.कोरोना काळातील सर्व सोशल डिस्टनसचे  नियम पाळुन 158  रक्तदात्यानी रक्तदान करुन सहभाग नोंदविला.
सर्व रक्तदात्याना मास्क,सेनिटाइझर व ‘अर्सेनिक अल्बम 30 या  होमाओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सदर नियोजित शिबिरासाठी ऑनलाइन नोंदणी ठेवण्यात आली होती. या रक्तदान शिबिरामधे 27 नविन रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केले.या शिबिरात पोलिस,युवक-युवती व नागरिक यानी आवर्जून सहभाग नोंदविला.सदर शिबिरास पोलीस अधिकारी राऊत साहेब, काशीद साहेब, चार्टर्ड अकाउंटट सचिन वास्कर साहेब, सिडकोचे करण शिंदे साहेब , डॉ. प्रीतम संचेती, फॅबटेक उद्योग समूहाचे सुनिल रूपनर, आम्ही सांगलीकरचे अध्यक्ष अरुण कदम, आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन भरारी ग्रुपच्या या कार्याचे कौतुक केले.
 हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भरारी ग्रुपचे शैलेश घाडगे, स्वप्निल डोळस,विशाल पाटील, भगवान खसे, रोहन तावरे ,संतोष  इंगळे,महेश कदम,नामदेव शेलार, रविंद्र कोथेरे,वृषाली राजहंस, शुभदा भोसले, स्वाती टकले आदी पदाधिकारीने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आयोजन भरारी ग्रुपचे  संस्थापक-अध्यक्ष सुभाष सातपुते यानी केले होते.

परंडा शहरातील एकाच कुटुंबातील चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

परंडा (दत्ता नरुटे)
परंडा येथील पोलीस वसाहतीत सोलापूर येथून आलेल्या दोघांचे  कोविड19 रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी  पॉझिटिव्ह आले होते शनिवारी रात्री त्याच कुटुंबातील आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे
परंडा येथील पोलीस कॉलनीत सोलापूर येथून दोघे आले होते परंडा  आल्यानंतर त्यांना सर्दी,ताप आल्याने  दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांचे स्वाब लातूर येते पाठवण्यात आले शुक्रवारी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात दोन दिवस जनता कर्फ्यु लावण्यात आला  त्यांचं कुटुंबातील आणखी तिघांचे स्वाब पाठवण्यात आले होते त्यापैकी  दोघाचे रिपोर्ट शनिवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले यामध्ये 54 वर्षीय पुरुष व 29 वर्षीय युवकाचा समावेश आहे पहिल्या रिपोर्ट मध्ये माय-लेकरं तर दुसऱ्या रिपोर्ट मध्ये बाप लेक पॉझिटिव्ह आल्याने परंडेकरांच्या चिंतेत भर पडली आहे तर एकाच कुटुंबातील रुग्णांची संख्या चार इतकी झाली आहे