Home Blog Page 281

त्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी ७ व्यक्ती पॉझिटिव्ह

  •  प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वाहन ड्रायव्हर, चॅनल कॅमेरामन, राजकीय पक्षाचा अध्यक्षासह बँकेचे संचालकांचा समावेश)

  • पंढरपुरकरांना काळजी घेण्याची आवश्यकता)

पंढरपूर (प्रतिनिधी):-
पंढरपुरातील त्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी सात जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह  वाल्याने पंढरपूरकरांना काळजी घेण्याची आवश्यकता असून आषाढी एकादशीचा महापूजेला अवघे काही तास उरले असताना पंढरपूरात नव्याने सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान त्या रुग्णांची तपासणी करणारे पंढरपूरच्या तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. पंढरपूरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता नऊ झाली आहे तर शहर व तालुक्यातील मिळून एकूण संख्या १७ आहे.
मात्र प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहन ड्रायव्हरचा समावेश  असल्याने चिंता वाढली आहे. यामध्ये मुंबईहून चित्रीकरण करण्यासाठी आलेला एका चॅनल कॅमेरामन चा समावेश असल्याचे समजते. पंढरपुरातील एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह सहकारी बँकांच्या संचालक मंडळातील पाच जणांना समावेश आहे या सर्वांचे काल स्वॅप घेण्यात आले होते.
त्यातील अहवाल आल्यानंतर हे  धक्कादायक वास्तव समोर आले आहे . सुदैवाने या पाचही जणांना सध्या प्रशासनाने विलगीकरण कक्षात ठेवले असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असून गरज असेल तरच बाहेर पडावे, तोंडाला मास्क लावावा,सॅनिटायझरचा  वापर करा,  सोशल डिस्टंसिंग पाळा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

दैनिक जनमत ३० जून E पेपर

पंढरपूर शहराच्या प्रदक्षिणा मार्गावर कोरोनाचा सापडला पहिला रुग्ण

  • रुग्ण परिसरात घबराट, परिसर केले सील
  • आषाढी यात्रेच्या तोंडावरच रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून प्रशासन सतर्क झाले आहे.
  • ठाण्याहुन करकंब येथे आलेला एक जण सापडला पॉझिटीव्ह
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन नियोजनाच्या तयारीत असताना आज शहरातील स्थानिक व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचा अहवाल प्राप्त झाला त्याचबरोबर तालुक्यातील करकंब येथे एक रुग्ण पॉझिटिव आल्याचे समजतात प्रशासन सतर्क झाले आहे.
शहरातील बेलीचा महादेव परिसरात वास्तव्य असणाऱ्या एका  व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला आहे.तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. बेलीचा महादेव मंदिर परिसर सील करण्यात आले आहे.
ठाणे येथून करकंब मध्ये आलेल्या एका रुग्णास कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले असून या व्यक्तीला सध्या वाखरी येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल केले आहे.
कोरोनाचा चाचणीसाठी एकूण ४७ जणांचे स्वॅब घेतले होते.त्यापैकी आज ३९ अहवाल प्राप्त झाले असून २ अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत त्या पैकी एक व्यक्ती पंढरपूर स्थानिक तर एक  करकंब येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.तर ३६ अहवाल  नेगिटिव्ह आले आहेत.व १ निकृष्ट दर्जा आणि ८ अहवाल अजून प्रतेक्षित आहेत.
प्रदक्षिणा मार्गावरील हा भाग कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे. हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे.
 प्रशासनाने पॉझिटिव रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व थेट संपर्कातील लोकांच्या संपर्कात आलेले व्यक्तींचा शोध घेतला असता थेट संपर्कात ५१ जण मिळून आले तर इतर संपर्कातील ९४ असे मिळून १४५ जणांचा समावेश आहे या सर्वांना क्वाॅरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांनी दिली.

दैनिक जनमत २८ जून E पेपर

कल्याण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

परंडा:- योगीराज श्री कल्याण स्वामी यांच्या 306 व्या पुण्यतिथीनिमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

दि. 26 जुन ते  3 जुलै या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत. यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सालाबादप्रमाणे साजरा होणार नसून दूर दृष्य श्राव्य माध्यमातून सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत . कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत . तसेच मंदिरामध्ये कार्यक्रम घेण्याची परवानगी नाही .त्यामुळे यंदा सर्व कार्यक्रम फेसबुक लाईव्ह द्वारा होणार आहेत.

पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम आॅनलाइन माध्यमातून होणार आहेत . कल्याण स्वामी मठ परंडा या फेसबुक पेजवर या सर्व कार्यक्रमांचे प्रसारण होणार आहे .या फेसबुक पेजला लाइक करून कीर्तन ,प्रवचन हे कार्यक्रम पाहता येतील . तसेच सामुहिक दासबोध पारायणाचे  आयोजन करण्यात आले आहे .सर्व भक्तांनी दासबोध पारायण आपल्या घरी करायचे आहे .यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव  ‘पारायण आपल्या घरी प्रवचन कीर्तन आपल्या दारी ‘ या संकल्पनेनुसार साजरा करण्यात येणार आहे

पुण्यतिथी उत्सवात  स. भ. दतात्रय रत्नाळीकर , स .भ  दामोदर रामदासी,  स. भ . डॉ  मंजुषा कुलकर्णी यांची प्रवचन सेवा होणार आहे . तसेच स. भ. प्रिया सुरवसे -पवार , स. भ .कु मृण्मयी लांडगे , हभप संजयानंद महाराज झानपुरे , स. भ..हनुमंत बुवा ग्रामोपाध्ये ,  हभप रामभाऊ महाराज
निंबाळकर,  स. भ. गणेश बुवा रामदासी , स. भ.  चि. ओंकार वैद्य  ,   स. भ. कु.  सायली देवधर यांची कीर्तने होणार आहेत. 

शुक्रवार दि. 3 जुलै रोजी  सकाळी 10.30 वा  मिरज येथील वेण्णा स्वामी मठाचे मठपती स. भ. कौस्तुभ बुवा रामदासी यांचे कीर्तन होणार आहे . गुलाल पुष्पवृष्टीसह उत्सवाची सांगता होणार आहे . दर वर्षी होणारा परंडा – डोमगाव पायी सोहळा  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  रद्द करण्यात आला आहे .

समर्थ भक्तांनी या सर्व कार्यकमांत सहभागी व्हावे.

कोरोना उपचारासाठीची औषधे जुन अखेरीस जिल्ह्यात उपलब्ध होणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे

  • राज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय
  • खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानी दर आकारणीवर नियंत्रण

मुंबई, दि.२५:  राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होणारी सामान्य रुग्णांची पिळवणूक थांबावी यासाठी खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यांचा प्रति किमी दर निश्चित करून त्याप्रमाणेच दर आकारणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा म्हणून ओळख असलेल्या आशा कार्यकर्तींच्या मानधनात २००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राजयातील ७१ हजार आशा कार्यकर्त्यांना लाभ मिळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध निर्णयंबाबत माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
आरोग्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह संवादातील ठळक मुद्दे असे:
कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने आकारणी केली जाते. त्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागामार्फत समिती नेमण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णवाहिकांची यादी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त या रुग्णवाहिका ताब्यात घेतील आणि त्यांचे प्रति किमी दर निश्चित केले जातील. त्यानुसार रुग्णांकडून दराची आकारणी होईल. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल. सामान्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेमीसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे मागणी केली. त्यानुसार आता राज्यात जून महिन्याच्या अखेरीस ही औषधे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होतील.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत आज राज्याच्या मंत्रिमंडळाने ठराव केला असून तो केंद्राकडे पाठवणार आहे. असा ठराव करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परिक्षा ऑगस्टमध्ये नियोजीत आहे. मात्र हे विद्यार्थी परिक्षेच्या अभ्यासाला लागल्यावर राज्यातील रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्सची कमतरता जाणवेल. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे परिक्षा पुढे ढकलण्याचा ठराव केला आहे.
शहरी भागातील आरोग्य सेवेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून समन्वय व्हावा यासाठी यपुढे संचालक (शहरी आरोग्य) हे नविन पद निर्माण करण्यात आले असून त्याची येत्या दोन दिवसात नियुक्ती केली जाईल.
ग्रामीण भागात आशा वर्कर ७४ प्रकारचे विविध कामे करतात त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो मात्र राज्य शासनाकडून २००० रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारे आशा वर्कर आता १५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळवी शकतात. गटप्रवर्तकांना ३००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.
कोरोना बरोबर जगण्यासाठी एसएमएस ही त्रीसुत्री अंगीकारावी लागेल. यातील एस म्हणजे सोशल डिस्टसिंग, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायजरचा वापर करणे.
राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी ३० दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्के आहे.
मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज सुमारे २० हजार चाचण्या केल्या जात आहेत. ॲण्टीजेन आणि ॲण्टीबॉडी चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेताल वक्तव्यामुळे आम. पडळकर जोमात तर तासगावातील राष्ट्रवादी काँग्रेस कोमात

 तासगाव ( राहुल कांबळे )
शरद पवार हे अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असून ते राज्यातील बहुजनांवर नेहमीच अत्याचार करण्याची भूमिका घेतात व भविष्यात तीच भूमिका कायम ठेवतील त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही ना कुठला अजेंडा नाही, व्हिजन नाही राज्यातील छोट्या मोठ्या समूहातील घटकांना अडकवायचे व आपल्या बाजूला वळवून त्यांच्यावर सतत अन्याय करायचा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राजकारण करायचे हे प्रकार पवार करीत आहेत तर शरद पवार हे महाराष्ट्रातील महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहे अशी जहरी टीका आम. गोपीचंद पडळकर यांनी केली आहे परंतु यासंदर्भातसांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस मधून जोरदार पडसाद उमटत आहेत त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत आहे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पडळकरांनी पवार साहेबांची जाहीर माफी मागावी अशी मागणी होत आहे.व पडळकरांवर टीकेची झोड उठली आहे अशा वेळी मात्र महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय आर आर आबा पाटील यांना शरद पवार यांनी एवढे मोठे केले ग्रामीण भागातील एका छोट्या शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला राज्यातील सर्व मोठी पदे दिली त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही स्व आबांच्या कुटुंबीयांना कोणते अंतर दिले नाही.स्व.आबांचे कुटुंब आपले कुटुंब मानले, त्यांच्या पश्चात त्यांच्या घरात सलग दोन वेळा आमदारकी दिली आहे तरीही त्यांच्या घरातून आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे सध्याचे तालुक्यातील सूत्रधार सर्वेसर्वा सुरेश पाटील, युवा नेते रोहित पाटील, स्मिता पाटील- थोरात,राष्ट्रवादी सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अविनाश पाटील तासगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष किंवा तासगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, युवक राष्ट्रवादीचे कोणताही पदाधिकारी गप्प का आहेत याची उलट-सुलट चर्चा सध्या तासगाव शहरासह तासगाव तालुक्‍यात सुरू आहे सोशल मीडियावर एखादी निषेधाची पोस्ट वगळता कोणताही निषेध व्यक्त होताना दिसत नाही किरकोळ कामासाठी प्रसिद्धीसाठी धडपडणार्‍या युवक राष्ट्रवादी काँग्रेस,व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्यां स्वतःला पदाधिकारी म्हणवणाऱ्या कडून ही या मोठ्या वक्तव्याबद्दल कोणतीही निषेधाची प्रतिक्रिया आलेली नाही हा प्रकार सध्या तासगाव तालुक्यात सुरू आहे.ही सर्व मंडळी सध्या शांत कशी हा प्रसारमाध्यमांना पडलेला प्रश्न आहे खरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तातडीने पत्रकार परिषद घेणे आवश्यक असताना व सदरच्या घटनेचा निषेध नोंदवणे आवश्यक असताना फक्त सोशल मीडियावर पत्रकबाजी करण्यात  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खास.शरद पवार यांच्यावर नितांत मनापासून प्रेम करणार्‍या सामान्य जनतेतून मात्र या सर्व नेत्यांबद्दल राग व्यक्त होत आहे.व राष्ट्रवादींच्या तासगाव, तालुक्यातील नेत्यांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तर राज्यातून पडळकर यांच्यावर टीका सुरू होताच आपण भावनेच्या भरात बोललो अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न पडळकर यांनी केला आहे.
सर्वात महत्त्वाचे ज्येष्ठ नेत्या बद्दल केलेले खालच्या पातळीवरचे वक्तव्य हे पडळकरणी स्वतःच्या मनाने केलेले आहे की त्याला बोलवता धनी कोण आहे हे शोधणे गरजेचे आहे.
भाजपाने असे वक्तव्य कार्यकर्त्यांच्या तोंडी घालून नवीन राजकारण सुरू केले आहे का ??