Home Blog Page 280

लोहारा येथे अप्रमाणित औषधाचा साठा जप्त; उत्पादकावर होणार कारवाई!

उस्मानाबाद – लोहारा येथील सुंदरम एजन्सी मध्ये अप्रमाणित औषधाचा साठा आढळून आला होता. अन्न व औषध प्रशासनाने तो साठा जप्त केला असून याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की लोहारा येथील सुंदरम एजन्सी ची नियमित तपासणी करत असताना एनझीमाॅल ड्रॉप या पोटफुगी दूर करणारे सुगंधी  औषधाच्या ८ बॉटल्स जप्त करण्यात आल्या होत्या १८ जून रोजी त्यांचा दर्जा अप्रमाणित असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला मिळाला त्यानुसार २९ जून रोजी उर्वरित २२ बॉटलस चा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. हे औषध अकोला येथील एलमेको या वितरकाकडून अकोला येथीलच  वितरकाकडून  लोहारा येथील लीबेन लाईफ सायन्सेस या मार्केटिंग आणि वितरण करणाऱ्या कंपनीला   मिळाले होते.त्यानंतर ते सुंदरम एजन्सी लोहारा यांना पुरवठा करण्यात आले होते. जी. एम.एच. लॅबोरेटरी, हिमाचल प्रदेश  ही या औषधाची उत्पादक कंपनी आहे. जी. एम.एच. लॅबोरेटरी १०७८० बॉटल उत्पादित केल्या होत्या त्यापैकी लीबेन ने पूर्ण १०७८० बॉटल खरेदी केल्या होत्या. आणि पुढे त्यातील ३२०० बॉटल एल्मेको कंपनीने खरेदी केल्या त्यातील ३० लोहारा येथे सुंदरम एजन्सी कडे वितरित करण्यात आल्या होत्या. तो साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. तसेच हे औषध अप्रमाणित दर्जाचे आढळून आल्याने ते बाजारातून परत मागविण्यात येत आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासन योग्य ती कार्यवाही करत असून खटला दाखल करण्यासाठी परवानगी मागविण्यात आली आहे. परवानगी मिळाल्यानंतर लोहारा येथील न्यायालयात खटला चालणार असल्याची माहिती अन्न व औषध निरीक्षक दुसाने यांनी दैनिक जनमतशी बोलताना दिली

या औषधाच्या खरेदीच्या पावत्या आमच्याकडे आहेत. हे औषध कोणत्याही मेडिकल मध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आले नव्हते. अशी प्रतकिया सुंदरम एजन्सी चे बिराजदार यांनी दैनिक जनमत शी बोलताना दिली.

दैनिक जनमत ०४ जुलै E पेपर

पोखरा योजना लक्षांकाविना व पुर्वसंमतीपत्रासह तातडीने राबविण्याची आ. कैलास पाटील यांची रस्तोगी यांच्याकडे मागणी

उस्मानाबाद 
पोखरा योजना लक्षांकाविना व पुर्वसंमतीपत्रासह तातडीने राबविण्यात यावी अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी राज्य प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे केली. प्रकल्प संचालक रस्तोगी हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन या अडचणीबाबत सविस्तर चर्चा करुन यातुन मार्ग काढण्याबाबत त्यांना विनंती केली असल्याचे आ. कैलास पाटील यांनी सांगितले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली योजना म्हणुन पुढे आली आहे. असे असताना मध्यंतरी यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आहेत.   
मतदारसंघासह जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 287 गावामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 48, दुसऱ्या टप्प्यामध्ये 137 तर तिसऱ्या टप्प्यात 102 गावांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्यस्थितीत पोखरांतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी पुर्वसंमती देणे शासनाच्या स्तरावरुन बंद करण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुर्वसंमती पत्र देण्याचे थांबविले आहे,पण ते फक्त वैयक्तीक योजनेपुरते मर्यादीत आहे.येत्या काही दिवसात त्याचाही विषय निकाली काढण्यात येणार असल्याचे श्री.रस्तोगी यानी आ. पाटील यांच्याशी चर्चा करताना  सांगितले.
जिल्ह्यांना,तालुक्यांना दिलेल्या लक्षांकापेक्षा अधिक अर्ज आले तर प्राप्त अर्ज मंजुरीबाबत अडचणी येत असल्याची बाब त्यांच्या निर्दशनास आणुन दिली. जिल्ह्यासह मतदारसंघात शेतकऱ्यांची शेळी, ठिबक, विद्युत मोटार, पाईप संच इत्यादी खरेदी केले असुन शेतकऱ्यांच्या पुर्व संमती रद्द झालेल्या आहेत. त्या पुर्व संमती पुन्हा मिळवुन देण्याची मागणी श्री. रस्तोगी यांच्याकडे केली. त्यावर त्यानी लक्षांकाविना भविष्यात ही योजना सूरु होणार असल्याचा विश्वास दिला.जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्पाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांपैकी पाईप, पंपसंच, यांत्रिकीकरण, नवीन विहिर यासाठी आर्थिक लक्षांक ठरवून देण्यात आला आहे. फळबाग व वृक्षलागवड, शेडनेट हाऊस,पॉलीहाऊस, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन,गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, गांडूळखत युनिट,कंपोस्ट उत्पादन युनिट, सेंद्रीय निविष्ठा उत्पादन युनिट, वैयक्तिक शेततळे,भूजल पुनर्भरण,ठिबक व तुषार संच तसेच हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणीत बियाण्यांचे बीजोत्पादन करणे या घटकांसाठीही आर्थिक लक्षांक किमान ठेवण्यात आला आहे. याबाबतीत सुध्दा विचार करण्याची विनंती केल्यानंतर श्री.रस्तोगी यानीही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला.येत्या वर्षभरात या योजनेची आर्थिक स्थिती रुळावर येऊन ही योजना पहिल्यासारखी गती पकडेल असेही श्री. रस्तोगी यानी सांगितले आहे.

दैनिक जनमत ०३ जुलै E पेपर

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे गांधीगिरी आंदोलन

  • केंद्र शासनाच्या निषेधात पेट्रोल पंपावर ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन

——————
उस्मानाबाद प्रतिनीधी : उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उस्मानाबाद येथे सूर्यकांत  पेट्रोल पंपावर ग्राहकांना तसेच पेट्रोल पंप चालक, कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात  जिल्हाध्यक्ष  सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी आंदोलन करण्यात आले .
          या आंदोलनासाठी महाराष्ट्र प्रदेश युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, प्रदेश सरचिटनीस  मसूद शेख , युवक प्रदेश सरचिटनीस प्रशांत कवडे , विद्यार्थी प्रदेश सचिव धीरज घुटे,  युवती जिल्हाध्यक्ष देवकन्या गाडे, नगरसेवक शेख अय्याज, खलीफा खुरेशी , बाबा मुजावर   यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ एक हि भूल, कमल का फूल ‘, ‘वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा  तेल ‘ अशा घोषणा देत शारीरिक व सामाजिक अंतराचं पालन करत मास्क घालून आलेल्या ग्राहकाला गुलाबाचं फूल देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले .
     शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना , कोरणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सामान्य नागरिक, व्यापारी, सर्व व्यवसायिक आर्थिक संकटात सापडलेला असताना,  केंद्र शासन शेतकरी आणि सामान्य वर्गाची पिळवणूक करत असून आज उस्मानाबाद येथे पेट्रोलचे दर ८७ .५९तर डिझेलचा दर ७८ .०६ एवढ्या मोठ्या उच्चांकी आकड्यावर जाऊन पोचले आहेत . भूलथापा देऊन सत्तेवर आलेले सरकार जनतेला कधी पाकिस्तान तर कधी चीनची भीती घालून पेट्रोल ,डिझेलचे दर वाढवुन जनतेची पिळवणूक करीत आहे . या भाजप सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो असे मत जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी व्यक्त केले.
           या गांधीगिरी आंदोलनासाठी रोहित बागल, सुरज शेरकर, आशिष पाटील, नंदकुमार गवारे, बबलू शेख, इस्माईल काजी म्हणणं काजी वाजीद पठाण, आतीक शेख,कादरखान पठान, खलील पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .

मिरजेत कोरोनाची लागण झालेले 2 रुग्ण सापडलेने एकच खळबळ

मिरज प्रतिनिधी
 येथील कबाडे गल्ली आणि रमा उद्यान या दोन ठिकाणी  मुबंई येथून आलेल्या दोन वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने मिरजेत खळबळ उडाली आहे ,महापालिका वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांचे स्वाब घेतल्याने पुढील धोका टळला आहे
कबाडे गल्ली येथे मुबंई येथून आलेली 60 वर्षाची महिला कोरोना पोजिटीव्ह निघाली आहे ,त्याच बरोबर रमा उद्यान येथे ही मुबंई येथून आलेल्या वृद्धाला कोरोना झाला आहे ,आज त्यांचे कोरोना चाचणी रिपोर्ट आल्याने महापालिका वैद्यकीय विभागाने जागेवर धाव घेतली होती ,महापालिका वैद्यकीय विभागाने मुबंई येथून आलेल्या वृद्ध प्रवाशांची सक्तीची कोरोना चाचणी सुरू केली आहे .उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका वैद्यकीय विभागाचे डॉ वैभव पाटील,डॉअक्षय पाटील,किरण कांबळे यांनी घरोघरी जाऊन वृद्धांची तपासणी सुरू केली आहे. कबाडे गल्ली आणि रमा उद्यान येथे  मुबंई येथून आलेल्या दोन वृद्धांची  कोरोना चाचणी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आज कोरोना पोजिटीव्ह आला आहे ,आज वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन नातेवाईकांना इन्स्टिट्यूट कोरोंटाईन केले आहे ,रमा उद्यान येथील वृद्धांच्या संपर्कात आलेल्या 4 जणांना इन्स्टिट्यूट कोरोंटाईन करण्यात आले आहे .रमा उद्यान व कबाडे गल्ली येथे कोविड 19 प्रतिबंधक क्षेत्र घोषित केले आहे 

दैनिक जनमत २ जुलै

कथा एका मल्लाची ….. यशोगाथा पैलवानाची गरिबा घरी नांदते मर्दुमकी

कुस्तीच्या मैदानात हनुमंत पुरी हे नाव जरी ऐकलं,तरी अनेक पैलवानांना थरकाप आणि घाम सुटतो अशा या महान पैलवानाची जीवनसंघर्ष व यशोगाथा
……उस्मानाबाद सारख्या कमी पावसाच्या आणि शेतीप्रधान जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यात कंडारी या गावात एक जाणकार व एकेकाळचे पैलवान श्री .नानासाहेब पुरी .यांच्या कुटुंबामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी एक बाळ जन्माला आलं .पुढे त्या बाळाचे नामकरण शक्ती भक्ती आणि युक्ती चे प्रतीक असणारे हनुमान बजरंग बली म्हणजेच हनुमंत पुरी असे ठेवण्यात आले . गोंडस आणि बाळसअसणारा हनुमंत आपल्या गावामध्ये घरामध्ये इकडे -तिकडे फिरू लागला . बागडू लागला .बालपणीच वडिलांनी त्याला कुस्तीचे बाळकडू कंडारीचा तालमीत दिले .शेतीप्रधान कुटुंबात उदारनिर्वाह करून नानासाहेबांनी आपल्या मुलाला पहिलवान बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते .केवळ 5 ते 7 एकर जिरायती जमीन नानासाहेबांचा संसाररूपी गाडा चालवत असे . संसार चालवत असताना त्यांनी हनुमंताला गावातील तालमीत आपल्याबरोबर दररोज नियमितपणे व्यायाम व कुस्तीचे धडे देऊ लागले .आपल्या वडिलांच्या पितृभक्तीवर हनुमंत भाऊ तालमीत सवंगड्यांसोबत कुस्ती सराव करू लागला .शालेय जीवन व कुस्ती यांचा ताळमेळ करून शिक्षण व खेळ यांची सांगड तो प्रभावीपणे घालू लागला .अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीची परिस्थिती असताना नानासाहेबांनी केलेलं हे दांडगे धाडस लोकांना पटत नसे .पण उदंड स्वप्न पाहणारा तपस्वी …. यशस्वी होऊ शकतो या उक्तीचा अनुभव काही काळातच सर्वांना येऊ लागला .हनुमंत पुरी पंचक्रोशीतील गावोगावी यात्रेच्या मैदानात चांगल्या कुस्त्या करू लागला .याचा आनंद नानासाहेबांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागला याचे समाधान हनुमंत पुरी यांना वाटत होते .मैदानामध्ये हे कुस्ती करताना कुस्तीतील काही तंत्र व कौशल्य यावर हनुमंताची चांगली पक्कड होती . हनुमंतला आता गावात कोणी मोठा जोडीदार उरला नव्हता ,तेव्हा नानासाहेब स्वतः लंगोट लावून आपल्या पोरास कुस्ती सराव देऊ लागले . त्याच वेळेस गावातील काही नामवंत व माजी पैलवान मंडळीनी हनुमंताला कोल्हापूर या ठिकाणी पाठवण्याचा सल्ला दिला .मुलाला पैलवान करायचे तर आहेच पण आर्थिक अडचण खूप मोठी होती . नानासाहेबांच्या हातावर पैसा नसायचा आणि  सतत आर्थिक चणचण असायची . ठामनिर्णय आणि आणि जिद्द यामुळे माणूस कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो ! याची प्रचिती नानासाहेबांना आली .हनुमंतला कोल्हापुरास पाठविण्याचे ठरले . त्यारात्री नानासाहेबांना रात्रभर झोप नव्हती . हनुमंत पैलवान होईल का ?पैसे पुरतील का ? आपला निर्णय योग्य आहे का ? यामुळे त्यांचा जीव कासावीस होत होता .  बेचैन वाटत होते . पण मनाचा हिय्या करून त्यांनी दुसऱ्या दिवशी खाजगी सावकाराकडून पैसे घेवून हनुमंताला कुस्तीची पंढरी म्हणजेच कोल्हापुरमधील शाहुपुरी तालमीत मोठ्या मनाने आणि जड अंतकरणाने सोडले .

 हनुमंत आता कोल्हापुरात खूप जिद्दीने आणि कष्टाने कुस्ती मेहनत करू लागला .भरपूर व्यायाम करू लागला . वडलांनी छातीचा कोट करुन पाहिलेले स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी आणि आपल्या घरची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी तो अतोनात खडतर कष्ट करत होता .कुस्तीतील विविध कौशल्य डावपेच तंत्र यासह आपली शक्ती  युक्ती व दम वाढवण्यासाठी तो सतत कुस्ती या विषयी विचार करत होता .खरोखरच कुस्तीसाठी आपलं जीवन अर्पण करण्यासाठी आणि आपल्या वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हनुमंताने अतिशय हलाखीचे आणि कष्टाचे जीवन कोल्हापूरमध्ये हे निश्चित केले .कुस्ती म्हणजेच कुस्ती एवढच हनुमंताला आपल्या वडिलांनी दिलेला वसा आणि वारसा जपण्यासाठी तो प्राण कंठात पर्यंत येईल एवढी मेहनत तो करत होता .खरंतर हनुमंताला आपल्या घरची परिस्थिती आणि वास्तविकता माहित होती . वडिलांनी दिलेले पैसे काहीच महिने पुरले . पुढची कुस्ती मेहनत कशी करायची आता ? आर्थिक कुमक ही संपली होती .तेव्हा हनुमंताला घरचा रस्ता पकडावा लागणार होता . आपली कुस्ती संपणार का ?याचं दुःख हनुमंतला होत होतं यातूनच तो उदास आणि निराश झाला होता . कुस्तीवेड त्याला गप्प बसू देत नव्हते . पण फाटलेला खिसा हे ही जगाची रीत दाखवत होती प्रत्यक्ष जीवन वेगळे होते .ज्या बालवयात मुलाने बागडायचं खेळायचं !
 स्वप्नाच्या दुनियेत रमायचं !
 गावामध्ये फिरायचं !
 मुक्तपणे जगायचं !
 आईच्या कुशीत झोपायचं ! बापासोबत फिरायचं !
 आजोबा सोबत गप्पा करायच्या !
त्याच वयामध्ये हनुमंतला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला या कुस्तीने शिकवली . कोवळया मनाचं पोर फक्त कुस्ती हीच संकल्पना घेऊन आपलं संपूर्ण जीवन त्याला अर्पण करण्यास तयार होतं त्यावेळेस त्याच्या हातातून काही तरी ऐतिहासिक गोष्ट झाल्याशिवाय रहात नाही हा कुस्तीचा इतिहास आहे . ज्याला आपली परिस्थितीची जाणीव आणि उणीव कळाली तोच भविष्यामध्ये उज्ज्वल आणि यशस्वी होऊ शकतो ! ! याचाच अनुभव प्रत्यक्ष हनुमंताच्या बाबतीत सर्वांना येत होता . बालवयात हनुमंताला खूप खूप वेदना होत होत्या .कष्ट सोसावे लागले .एवढेच नाही तर पैलवान होण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती नाही पण वडिलांच स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी एका मोठ्या पैलवानांचा .ज्ञानेश्वर धंगेकर यांचा स्वयंपाकी होण्याचं ठरवलं . पण हार मानून आपल्या गावचा रस्ता झाला नाही /कुस्ती सोडली नाही . पैलवान ज्ञानेश्वर धंगेकर यांनी  हनुमंतला आपल्या छोट्या भावाप्रमाणे वागणूक दिली .पैलवान होण्यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणे सिंहाचा वाटा उचलला .दोघांचा स्वयंपाक करून हनुमंत आता कुस्ती मेहनत करू लागला . हनुमंत इतरांपेक्षा जास्तच मेहनत करत असे प्राणकंटा पर्यंत येणे हे त्याने कित्येक वेळा कुस्ती मेहनत करताना अनुभवले आहे .हनुमंत खऱ्या अर्थाने पैलवान होण्यासाठी पै .ज्ञानेश्वर धंगेकर यांनीमोलाचे मार्गदर्शन आणि त्यांनीच हनुमंताला पुण्यामध्ये हे श्री मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र कात्रज याठिकाणी पाठवले .या ठिकाणी आल्यानंतर हनुमंताला वस्ताद म्हणून ज्ञानेश्वर मांगडे हे भेटले त्यांनी
हनुमानच्या अंगातील शक्ती व दम यांचा पुरेपूर वापर करून त्यांला स्पर्धात्मक कुस्ती  करण्यासाठी हनुमंताला खूप असे अनमोल मार्गदर्शन केले .खरोखर पुण्यामध्ये आल्यानंतर हनुमंत भाऊ खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये आपलं !आपल्या जिल्ह्याच ! वडिलांचं !नाव चमकवू / गाजवू लागला .महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विविध पैलवानांचा अंदाज घेऊन
 विभागीय सचिव पै .वामनदादा गाते यांच्या मार्गदर्शनाखाली तो विविध कुस्त्या जिंकू लागला .त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विविध वजनी गटात खूप सुंदर  व चमकदार कुस्त्या करून उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राभर गाजवलं .
2017 साली वारजे या ठिकाणी 74 किलो वजनी गटात सिल्वर पदक मिळवलं,2018 साली भूगाव या ठिकाणी 79 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळ्वले ,2019 साली जालना या ठिकाणी 79 किलो वजनी गटात सिल्वर पदक मिळवले,2020 बालेवाडी या ठिकाणी 79 किलो माती विभागात सुवर्णपदक मिळवले,खाशाबा जाधव युवा महाराष्ट्र केसरी आळंदी स्पर्धेत 79 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले,टॉकीज कुस्ती दंगल मध्ये हे उत्तम प्रतिसाद व सहभाग
असा कुस्ती क्षेत्रामध्ये खडतर कष्टमय आणि मेहनतीचा रस्ता हनुमंत पुरी यांच्या वाट्याला आला. तो त्यांनी यशस्वीपणे कष्टाने .परीश्रमाने आत्मविश्वासाने हसत-खेळत पार पाडली. कुस्ती करत असताना यात्रेतील व स्पर्धेतील विविध मानाच्या या स्पर्धेत त्यांनी खूप मोठं आपलं नाव केलेला आहे . राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 3सुवर्ण व 2 सिल्वर पदकाची कमाई त्यांनी यशस्वीपणे केलेली आहे .याचा आमच्या उस्मानाबादकरांना पूर्णपणे अभिमान व स्वाभिमान आहे .यापुढील त्यांनी लाल मातीची व कुस्तीची अशीच सेवा करून उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर यावे ..हीच अपेक्षा व सदिच्छा .।

लेखन …

पै.गोविंद नवनाथ घारगे (नितळीकर )
सहशिक्षक . प्रा .शा. रुद्रवाडी
ता .जी . उस्मानाबाद
9421111200

तासगावातील राज्य मार्ग वरील हॉस्पिटलमधील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह

  • वाघापूर येथील अॅडमिट महिलेच्या संपर्कातून लागण  अर्धे तासगाव सिल होण्याची शक्यता शहरात  प्रंचड खळबळ

तासगाव प्रतिनिधी/राहुल कांबळे

     तालुक्यातील वाघापूर येथील एका २२ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी तिच्यावर सावळज व तासगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिच्या संपर्कातून तासगाव येथील ‘त्या’ हॉस्पिटलमधील पाच कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सावळज व तासगाव येथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
     याबाबत माहिती अशी, पनवेलमधून आलेले   आमणापूर (ता. पलूस) येथे क्वारंटाईन झाले होते. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर ६ जणांपैकी मूळची वाघापूर येथील २२ वर्षीय एक महिला आपल्या गावाकडे (वाघापुरला) आली. त्याठिकाणी तिला अंगदुखी व कणकण जाणवू लागल्याने प्रथम तिला सावळज येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी तिला गूण न आल्याने नंतर तिला तासगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

     उपचारादरम्यान तिला कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने तिचा स्त्राव तपासण्यासाठी घेण्यात आला होता. तपासणीनंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामळे आमणापूर, वाघापूर, सावळज व तासगाव येथे खळबळ उडाली.

     यानंतर बाधित महिलेच्या दसंपर्कातील ३० जणांचे स्त्राव तपासण्यासाठी घेण्यात आले होते. याशिवाय राजापूर येथील बाधित पुरुषाच्या संपर्कातील लोकांचेही स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच तालुक्यातील अन्य काही लोकांचेही स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. कालपासून संबंधित लोकांचे अहवाल प्रलंबित होते.
      त्यातील ५५ लोकांचे अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाले. पैकी 50 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर तासगाव येथील ‘त्या’ दवाखान्यातील  पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी दिली.
      दरम्यान, तासगाव येथील ‘ते’ हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या पाच पैकी ब्रदर व सिस्टर यांना मंगळवारीच संध्याकाळी  मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे: तर इतर तिन कर्मचारी कोण आहेत याची माहिती प्रशासनाकडून लवकरच प्राप्त होईल..काल संध्याकाळी हॉस्पिटल मधून दोन जणांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. एकूणच तासगाव शहरात एकाच वेळी पाच कोऱना बाधित रुग्ण आढळल्याने तेंही बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे संपूर्ण तासगावकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. कारण पाचजणांमुळे निम्मे तासगाव सिल होण्याची शक्यता आहे..