Home Blog Page 276

दैनिक जनमत ३० जुलै E पेपर

बेंबळी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. ए. खतीब निलंबित

कनगरा/प्रतिनिधी
          उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ माजवणारी ठरली कारण या तारखे दिवशी बरेच १० वी चे विद्यार्थी पास तर बेंबळी येथील मुख्याध्यापक ए.ए.खतीब हे ड्युटी करण्यात नापास झाले आहेत. तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक ए. ए. खतीब यांच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. कोरोना कक्षामध्ये ड्युटी न करता गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये महानगर व अन्य शहरातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन कक्ष सुरू करण्यात आला होता. या कक्षामध्ये खतीब यांना 19 मे रोजी नियुक्त करण्यात आले होते. परंतु ते गैरहजर राहिले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेचे नेते श्यामसुंदर पाटील,  नितीन खापरे पाटील, युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष किरण चव्हाण, विशाल शहा यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. तहसीलदारांनी तातडीने पथक पाठवून ऑन द स्पॉट पंचनामा केला. यामध्ये खतीब गैरहजर राहिले असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या प्रकरणी शिक्षण विभागाने व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते गालिब पठाण,
 नितीन खापरे पाटील यांच्या मार्गदर्शनात श्यामसुंदर पाटील यांनी चौकशी समितीसमोर पुरावे सादर केले. या पुराव्याच्या आधारे तसेच तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांनी खतीब यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
सदरील आदेशामध्ये नमूद केल्यानुसार उस्मानाबाद तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू आहे त्याअनुषंगे अतितात्काळ कामकाज चालू असून अश्या परिस्थितीत वेळोवेळी आदेशीत केल्यानुसार कामकाज करणे अपेक्षित आहे.पण दि.१९/०५/२०२० रोजी मंडळ अधिकाऱ्यांनी बेंबळी येथील कोरोना सहाय्यता कक्षास भेट दिली असता कक्ष बंद असल्याचे दिसून आले.त्यावेळी तिथे मुख्याध्यापक ए.ए.खतीब यांची ड्युटी होती त्यानुसार सदरील शिक्षकास कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला.व खतीब यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचे सदरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद केले आहे.त्यामुळे जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मुख्याध्यापक श्री ए.ए.खतीब यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
त्यांना परंडा येथे धारण अधिकार बहाल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कोरोना कक्षात काम न करता कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक जनमत २९ जुलै E पेपर

सोलापूरचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या योग्य नियोजनामुळे बार्शीकरांना दिलासा

बार्शी प्रतिनिधी – गणेश घोलप
कोरोना या महाभयंकर विषाणूं आजारामुळे संपुर्ण जगभरात आहाकार असताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुकातही वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे बार्शी शहर व तालुका सर्वत्र चर्चेत आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी यात स्वत: लक्ष घातल्यानंतर बार्शीसाठी सोलापूरचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या कडे बार्शी शहर व तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या अटोक्यात आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वतः प्रांताधिकारी हे बार्शी येथे मुक्कामी असून त्यांनी शहरातील विविध भागात व वैराग येथे भेटी देऊन क्वारंटाईन केलेल्या रुग्णांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाय काढत त्यांचे समाधान केले. शहरातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याशी बैठक घेऊन अडचणी जाणून घेतल्या तसेच आढावा घेतला. बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेत कोरोना आजार नियंत्रणासाठी नगरसेवकांनी मदतीचे आश्वासन दिले.

प्रातांधिकारी हेमंत निकम यांनी स्वतः शहरातील ग्रामीण रुग्णालय, डॉ. जगदाळे मामा हॉस्पीटल, डॉ. अंधारे हॉस्पीटल,कॅन्सर हॉस्पीटल, सोमाणी हॉस्पीटल, शहरातील विविध कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर आदींना प्रत्यक्ष भेटी देऊन हॉस्पीटल व सेंटर ना सुचना देऊन आढावा घेतला.

बार्शी शहरातील व वैराग येथील कोविड सेंटर,क्वारंटाईन सेंटर येथील रुग्णांच्या समस्या मार्गी लावीत त्यांचे प्रश्न सोडविले.

बार्शी शहरात दोन व वैराग येथे स्वतंत्र एक पथकामार्फत स्वॅब घेण्याची व्यवस्था चालू केली. बार्शी शहरात व वैराग येथे  नागरिकांच्या अँटीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात येत आहेत त्यामुळे रिपोर्ट लवकर मिळत आहेत. प्रत्येक कोवीड व क्वारंटाईन सेंटरला अधिकाऱ्यांच्या व डॉक्टरांनी दररोज भेटी देण्याच्या सूचना  दिल्या व आढावा घेतला जात आहे. बार्शी शहरात व वैराग येथे नव्याने शाळा व मंगल कार्यालये ताब्यात घेतल्या असून यात रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरवठा होतो का नाही यासाठी ठेकेदार यांच्या भोजन कक्षास स्वतः भेट देऊन मालाच्या दर्जाची तपासणी केली.

दवाखान्यातील आरोग्य कचऱ्याची विल्हेवाट साठी स्वतंत्र यंत्रणा लावली आहे.रूग्णांच्या करमणूकी व मनोरंजनासाठी टीव्ही, साऊंड सिस्टीम आदींची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

विलगीकरण कक्षांत शौचालयांची संख्या कमी असेल त्या ठिकाणी फिरते शौचालय चा वापर करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेच्या २० टीम, आशावर्कर आणि अंगणवाडी , सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम वेगात सुरू असून शहरातील स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचे आदेश नगर पालिकेला दिले आहेत.

या कामात तहसिलदार कुंभार,मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.व्ही. होनमुटे,तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड, वैद्यकिय अधिकारी शितल बोपलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, बार्शी तालुका पोलिसचे शिवाजी जायपात्रे, वैरागचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर,वैरागचे वैद्यकिय अधिकारी डॉ.जयवंत गुंड,डॉ.अजित सपाटे, न.पा.चे आरोग्य अधिकारी विजय गोदेपुरे व आरोग्य विभाग व पोलिस विभाग आदींचे सहकार्य मिळत आहे.

माळशिरस तालुक्यात कोरोना ने ओलांडली शंभरी

माळशिरस तालुक्यात अकलूज, संग्रामनगर ,यशवंनगर व माळीनगर येथे आज प्रत्येकी एक कोरोना चे रुग्ण आढळल्याने प्रशासनाला अडचणीत आणणारे ठरले आहे. गेले तीन दिवस अकलुज मधील नागरिकांनी स्वतःहून बंद पाळून करोनाला अडवण्याचा प्रयत्न केला पण करोना अकलूजच्या शहरी भागात निघाल्याने नागरिक व प्रशासनात घबराट पसरली आहे. यामुळे आलेल्या पॉझिटिव्ह केस मुळे अजून किती जण संपर्कात आहेत हे आता पहावे लागेल .बोरगाव तालुका माळशिरस येथे काल सापडलेल्या पेशंटचे संपर्क बराच मोठा असल्याने प्रशासन तिकडे पळत असताना अकलूज परिसरात आज निघालेल्या चार कोरोना बाधित यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. प्रशासन आधीच अकलूजचा अनेक भाग सिल  केले आहेत आता यशवंनगर चा भाग सील करण्याविषयी आदेश काढले ने जनतेत घबराट पसरली आहे. उद्यापासून सुरु होणारे दैनंदिन व्यवहार आता पुन्हा बंद होतील काय या विचाराने व्यापारी व नागरिक धास्तावले आहेत घरातील शिल्लक संपत आली आहे आता कोणी कोणाला मदत करण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे जर व्यापारी पेठ बंद झाली तर व्यापाऱ्यांनी बरोबर सामान्य माणूसही बेजार होणार आहे त्यामुळे प्रशासनाने या बाधित व्यक्तींना दूर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कडक उपाय करावेत अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे.