तासगाव प्रतिनिधी
लोकांच्या सुरक्षिततेसाठी व गर्दी झाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये ही भूमिका लक्षात घेऊन घरगुती व साध्या पध्दतीने उत्सव साजरे करत आहोत. याबाबत अधिक सतर्क रहाण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम सुरळीतपणे, साध्या पध्दतीने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व कोणत्याही पध्दतीने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होण्यास वाव मिळेल अशा पध्दतीने होणार नाहीत, ते काळजीपूर्वक केले जातील, असे काटेकोर नियोजन केले आहे, असे प्रतिपादन गृह (गामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा बैठक शासकीय विश्रामगृह तासगाव येथे झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्यासह पोलीस विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केलेल्या मंडळापैकी यावर्षी ६० ते ६५ टक्के गणेशोत्सव मंडळानी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना सुध्दा राबविली आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व सर्व पोलीस अधिकारी यांनी गणेशोत्सवाच्या अगोदरच लोकांच्यामध्ये जनजागृती केल्यामुळे तसेच नागरिकांनी छोट्या स्वरूपात व घरगुती गणेशोत्सव साजरा करावा ही भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्यामुळे गणेश मंडळांचा, गणेश भक्तांचा, गावांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काल गणेशोत्सव सुरू झाला पण कोठेही मोठ्या प्रमाणावर मिरवणुका झाल्या नाहीत. जी कार्यपध्दती गणेशोत्सवासाठी ठेवली आहे तीच कार्यपध्दती मोहरमसाठी सुध्दा ठेवली आहे. यासाठी मुस्मीम बांधवांचेही चांगले सहकार्य मिळाले असून त्यांनी सुध्दा गणेशोत्सवाप्रमाणे मोहरम सुध्दा घरगुतीच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मिरवणूका व उत्सवाचा फारसा ताण पोलीस दलावर येणार नाही. तरीसुध्दा पोलीस दल सतर्क आहे. सर्व अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव घरगुती पध्दतीने व साध्या पध्दतीने साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतल्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एक महिन्यापूर्वीच ऑनलाईन बैठक घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव मंडळानी शासन जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असे सांगितले होते. त्याप्रमाणे पूर्ण राज्यात कोठेही मोठे उत्सव, मंडप, डेकोरेशन नसून घरगुती पध्दतीने गणेशोत्सव साजरा होत असल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहाण्याच्या अनुषंगाने केलेले नियोजन, बंदोबस्त, विसर्जन मिरवणूका याबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली.
गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होणार नाही अशापध्दतीने साजरे करण्यासाठी काटेकोर नियोजन – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई
३० बेडचे ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन सहित हॉस्पिटल कार्यान्वित, खासदार खासदार संजय काका यांच्या प्रयत्न सह सर्वपक्षीय कृती समितीस यश
तासगाव :-
सध्या तासगाव शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचे संक्रमण जोरदारपणे सुरू आहे दिवसेंदिवस कोरोणा बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे याची चिंता तासगावकर नागरिकांना भेडसावत आहे त्यामुळे तासगाव शहर 23 ऑगस्ट ते १.सप्टेंबर पर्यंत लाॅकडाऊन करण्याचे सर्वपक्षीय कृती समितीने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते त्याअनुषंगाने तहसीलदार मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक तासगाव यांना त्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले होते. त्या संदर्भात खासदार संजय काका पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या समवेत नगरपालिका येथे बैठक आयोजित केली होती यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार कल्पना ढवळे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व नगराध्यक्ष डॉक्टर सावंत व सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते यावेळी तातडीने 30 बेडचे हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय येथे सुरू करणे व 200 बेडचे महिला तंत्रनिकेतन तासगाव येथील हॉस्पिटल चार चार ते पाच दिवसात सुरू करण्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केली होती.त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे तीस ,बेडचे ऑक्सिजन सहित तातडीने हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात तासगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी व कोरोणा बाधित रुग्णांनी याची दखल घ्यावी, हे सर्व अंशता यश सर्वपक्षीय कृती समितीचे आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करू नये यासाठी व्यापारी असोसिएशन यांनी तहसीलदार यांची भेट घेतली होती त्या अनुषंगाने आज तातडीने सर्वपक्षीय कृती समितीला बैठकीसाठी तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनी समितीच्या सदस्यांना पाचारण केले होते यावेळी त्यांनी कृती समितीस सर्व गोष्टी व हॉस्पिटल संदर्भात माहिती नमूद केली आपण सध्या लाॅक डाऊन आमरण उपोषण थांबवण्याची विनंती केली त्या विनंतीवरून सर्व कृती समितीच्या सदस्यांनी एकमताने मान्यता दिली व हे सदरचे आंदोलन लाॅक डाऊन स्थगित करण्यात आल्याचे घोषित केले यावेळी माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिवसेनेचे शहरप्रमुख संजय दाजी चव्हाण, राहुल शिंदे, विशाल शिंदे, डॉ. विवेक गुरव, रवींद्र साळुंखे यांनीकाही मुद्दे उपस्थित केले त्याचे समाधान तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनी केले होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अर्जुन थोरात, संभाजी ब्रिगेडचे अमोल कदम, राष्ट्रवादीचे खंडू कदम, राजू मुल्ला व सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.सुरुवातीच्या काळात सर्व पक्षीय कृती समिती स्थापन झाली त्यामध्ये तासगाव शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सामील होते. परंतु आज या बैठकीकडे बैठकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वात महत्त्वाचे उद्या कोरणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या कारणावरून तासगाव येथे २३० बेडचे तातडीचे हॉस्पिटल सुरू करण्यासंदर्भात महा विकास आघाडीचे आरोग्य राज्यमंत्री व इतर काही मंत्री यांची तासगाव मध्ये तातडीची बैठक व पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
*तासगाव तालुका प्रतिनिधी राहुल कांबळे*
सांगली महापालिकेने एका आठवड्यात उभारले १२० खाटांचे अद्ययावत कोविड रुग्णालय
आज लोकार्पण, आयुक्त नितीन कापडणीस यांची संकल्पना
सांगली- प्रतिनिधी
करोना महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा व बाधितांवर यशस्वी उपचार करता यावेत, यासाठी सांगली महापालिकेच्यावतीने तब्बल १२० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून अवघ्या सात दिवसात उभारलेल्या या रुग्णालयाचे उद्या गुरुवारी लोकार्पण करण्यात येत आहे.
नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, मुख्य अभियंता आप्पा हलकुडे व शाखा अभियंता वैभव वाघमारे यांच्या टीमने रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न करुन या रुग्णालयाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले. या रुग्णालयात मनपा क्षेत्रातील रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मनपा क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या करोना बाधित रुग्णांना उपचारासाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालयात खाटाच मिळत नसल्याची ओरड होत असतानाच नितीन कापडणीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनपाचे कोविड रुग्णालय उभारण्याचे शिवधनुष्य उचलले होते. त्यासाठी सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील आदिसागर सांस्कृतिक भवनाची जागा निश्चित करुन प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात केली होती. या कोविड रुग्णालयात १०० ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था असून २० खाट हे कोविड संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या कोविड रुग्णालयात मनपा कर्मचारी २४ तास तैनात राहणार असून १४ फिजिशन, सात मानसोपचार तज्ञ, २४ निवासी वैद्यकीय अधिकारी व ठराविक तासाला २२ जीएमएम वार्ड बॉय, लॅब व एक्स- रे टेक्निशियन, सहा स्वच्छता कर्मचारी व एक स्वच्छता निरीक्षक यासह २४ तास ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका सज्ज असणार आहे. या रुग्णालयातील कोविड रुग्णांची केंद्र व राज्य शासनाच्या सर्व संकेतस्थळावर नोंद राहणार आहे. या रुग्णालयासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व विविध सामाजिक संस्था- संघटना यांनी रोख स्वरुपात आठ लाख रुपयांची, तर १५ लाख रुपये किंमतीची वस्तूरुपी मदत केली आहे. मनपाचे सर्व सदस्यही आपले मानधन देण्याच्या विचारात असून अधिकारी- कर्मचारी व शिक्षकांनी आपला एक दिवसाचा असा १८ लाख रुपयांची मदत या रुग्णालयासाठी देऊ केली आहे. या रुग्णालयात दाखल रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. याशिवाय या रुग्णांची भोजन व्यवस्थाही मोफतच असणार आहे. या पत्रकार बैठकीस आदिसागर सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष शशिकांत पाटील व सचिव अजितकुमार पाटील आदी उपस्थित होते.
तासगाव ते पाचवा मैल रस्ता रहदारी योग्य करा-संजय दादा पाटील
खराब रस्त्याचा संदर्भात तासगाव तालुका राष्ट्रवादी आक्रमक होण्याचा मार्गावर
तासगाव प्रतिनिधी १८
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तासगाव ते पाचवा मैल हा NH4-266 या रस्त्याचे एका बाजूने खुदाई काम सुरू असून दुसरी बाजू रहदारी साठी योग्य असणे गरजेचे असताना हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. परिणामी वाहतूक करताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.म्हणून हा रस्ता रहदारी योग्य व्हावा यासाठी तहसिलदार कल्पना ढवळे यांना निवेदन दिले.
दादांनी या रस्ताच काम पाहणाऱ्या अभियंता सौ. बारटक्के मॅडम यांना तात्काळ बोलावून घेतले व या रस्त्याच्या कामाच्या दुरवस्थेबद्दल विचारणा केली असता सात दिवसात हा रस्ता रहदारी योग्य करू असे बारटक्के यांनी सांगितले …
यावर सात दिवसात रस्ता रहदारी योग्य न केलेस कॉन्ट्रॅक्टर रहदारीचा रस्ता करण्याचे बिल अदा करेल आणि कार्यकर्ते रस्ता करून घेतील त्यापुढे ठेकेदार रद्द करणेची कार्यवाही करून घ्यावी अशी सूचना राष्ट्रवादीचे नूतन कार्याध्यक्ष संजय दादा पाटील वडगांवकर यांचे वतीने देणेत आली आहे याबाबत मान बारटक्के मॅडम यांनी तहसीलदार मॅडम यांच्यासमोर याबाबत हमी दिली आहे.
यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत शेळके, निमणी उपसरपंच दिनकर पाटील, अनिल सदामते, चंद्रकांत लोंढे, मदन पाटील,डी ए पाटील, सुशांत पाटील,गणेश जाधव निमणी पाचवा मैल परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
तासगाव शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, शहरात सोशल डिस्टन्सिंगचा पुरा फज्जा
तासगाव नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील व सर्व स्टाफ रस्त्यावर हजारो रुपये दंड वसूल
तासगाव प्रतिनिधी दि.१८
तासगाव संपूर्ण शहरांमध्ये सोशल डिस्टंसिंग चा पुरा फज्जा उडाल्याचे चित्र रोजच पाहावयास मिळते,आजही तेपाहावयास मिळाले आहे.नागरिकांना कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. शहरात कोरोनामुळे आतापर्यंत ७० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने व आत्तापर्यंत नऊ ते दहा जणांचा कोरोणा मुळे मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ माजली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हालचाल करीत. ज्या भागांमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे त्या भागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी जंतुनाशक औषधाची फवारणी केली आहे.आज अचानक तासगाव नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, अधिकारी सर्व कर्मचारी सिद्धेश्वर चौक, वंदे मातरम चौक, बागणे चौक व एस.टी स्टँड चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, विटा नाका व सांगली नाका येथे दुचाकी स्वार,चार चाकी, , तसेच चालत फिरणारे विना मास्क नागरिकांच्या वर तासगाव नगरपालिकेच्या वतीने कर्तव्यदक्ष नूतन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, श्वेता कुंडले कार्यालयीन अधिक्षक, धनश्री पाटील कर निरीक्षक, आस्थापना विभागाच्या प्रियांका भोसले, बागवान लेखापाल, सुरेश कुलकर्णी अंतर्गत लेखापरीक्षण, महादेव लुगडे, अनिल कोळी राजू काळे, राजू माळी , आयुब मनेर, संतोष गायकवाड, दिलीप घाडगे, उत्तम पवार, प्रवीण धाबुगडे, बनसोडे, स्वामी, अवताडे, . सध्या कोरणा चा प्रादुर्भाव तासगाव शहरांमध्ये वाढताना दिसत आहे मार्च महिन्यामध्ये एकही रुग्ण नसणारे तासगाव शहर आज सत्तरीच्या पुढे कोरोना बाधित रुग्णांची संख्या तासगाव शहरात आहे खरं वास्तविक कोरोनाचा प्रादुर्भाव शहरासह तालुक्यात व सर्व जिल्हाभर वाढत असताना नागरिकांनी सुद्धा एक आपली राष्ट्रीय जबाबदारी समजून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्व नागरिकांनी मास्क वापरणे व हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे आत्ता काळाची गरज आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. सदरच्या तासगाव नगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईच्या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ही अशी कारवाई सतत होणे आवश्यक आहे महिन्यापूर्वी ही कारवाई केली त्यानंतर तासगाव प्रशासन शांत होते त्यानंतर पुन्हा नूतन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव नगरपालिका सर्व कर्मचाऱ्यांनी उचलले पाऊल ते अभिनंदनास पात्र आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.तासगाव नगरपालिकेच्या कारवाई वेळी तासगाव पोलिसांनी सहकार्य केले आहे. सध्या तासगाव पोलीस प्रशासन शांत राहण्याची भूमिका घेत आहे. परंतु नगरपालिका प्रमाणे पोलिस प्रशासनाने सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यासाठी तासगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत सावंत्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके,उपनिरीक्षक विश्राम मदने, उपनिरीक्षक रत्नदीप साळुंखे, गुप्ताचे वंडे दादा व सर्व स्टाफ पोलीस यांनीही तातडीने पावले उचलून शहरात ज्याप्रमाणे मार्च-एप्रिलमध्ये आक्रमकपणे पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्याप्रमाणे इथून पुढे त्या पद्धतीने पावले उचलणे ही काळाची गरज आहे. तासगावकर नागरिकांनीही नगरपालिकेस व पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांनी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.






















































