तासगाव प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांनी चार दिवसापूर्वी तासगाव तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुमनताई आर पाटील यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला व त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी तोफ डागून एकच खळबळ माजवून दिली. विशेष म्हणजे या मागणीला काँग्रेस पक्ष,शिवसेना,शे.का.प. स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन्ही. प्रहार संघटना इत्यादी पदाधिकाऱ्यांनी यावर सह्या केलेले आहेत असे निदर्शनास आले आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. तसेच काल आरपीआय आठवले गट चे तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे यांनीही पत्रक काढून वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर टीका करत तासगाव कवठेमहांकाळ च्या आमदार सुमनताई पाटील यांची उघडपणे पाठराखण केली आहे.
या सर्व टीकाटिपणी व उनी दुनी संदर्भात संभाजी ब्रिगेड चे तासगाव कवठेमंकाळ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शिवश्री अमोल कदम यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तासगाव शहरासह तालुक्यात जास्तीचा होताना दिसत आहेत रोजच्या रोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. तासगाव शहरात आतापर्यंत २३ कोरोना बाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि आज मितीस रोज शहरात दहापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. उद्यापासून (रविवार) एक आठवडा तासगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आपला व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोणा बाधित रुग्णांना सांगली येथे बेड मिळत नाहीत व उपचाराअभावी काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सर्वात महत्त्वाचे सर्वच राजकीय पक्षांनी आपण स्वतः काय केलं किंवा इतरांनी काय केलं या खोलात न जाता सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तासगाव शहरांमध्ये तातडीने कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर व अक्सिजन सहित ग्रामीण रुग्णालय येथे कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर कसे सुरू होईल यासाठी सामुदायिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. खासदार संजय काका पाटील हे सध्या कोविड हॉस्पिटल उभारणी संदर्भात प्रयत्न करताना दिसत आहेत.सध्या महाराष्ट्र मध्ये तीन पक्षाचे महा विकास आघाडीचे सरकार असून पक्षाच्या पदाधिकारी व आमदार सुमनताई पाटील यांनी आपली ताकद पणाला लावून कोविड हॉस्पिटल तातडीने सुरू करण्यासाठी आपले योगदान देणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यात ही जनता कोणत्याच पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांना माफ करणार नाही. राहता राहिला राजीनामा मागणे हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत मामला असतो त्यामुळे कोणत्या पक्षाचे अध्यक्ष अथवा ज्येष्ठ राज्य पातळीवरील नेतेमंडळी अशी टीकाटिपणी करण्यास कधीच परवानगी देत नाहीत.
उणीदुणी काढण्यापेक्षा सामुदायिकपणे कोरोना विरोधात हातात हात घालून काम केले पाहिजे -अमोल कदम
पत्नीसह सासुवर कुऱ्हाडीने सपासप वार करून दोघींचा पडला मुडदा
परंडा:-( दत्ता नरुटे )चरित्र्यांच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या तर सोडविण्यास गेलेल्या सासुची देखील हत्या करण्यात आल्याची घटना परंडा तालूक्यातील सरणवाडी येथे दि २८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपी हरिश्चंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे .
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की सणवाडी येथिल हरिश्चंद्र जाधव याचे लग्न सारीका हिच्याच्या १७ वर्षा पुर्वी झाले होते त्याना समाधान मुलगा व ऋतुजा मुलगी असे दोन आपत्ये आहेत .
मागील ३ ते ४ वर्षा पासुन हरिश्चंद्र जाधव हा पत्नी सारीकाच्या चरित्र्यावर संशय घेत असल्याने सतत भांडणे होत असल्याने गेल्या ७ ते ८ माहिण्या पासुन सारीका ही आई वडिला कडे पुणे येथे राहत होती . तर मुलगा , समाधान व मुलगी ऋतुजा हे सरणवाडी येथे राहत होते .
मुलांना पुणे येथे घेऊन जान्या साठी सारीका ही आई लक्ष्मी सह दि २८ रोजी सरणवाडी येथे आली होती मुलांना पाठविण्याच्या कारणा वरून हरिश्चंद्र व सारीका यांच्यात भांडणे झाली या वेळी हरिश्चंद्र जाधव याने पत्नी सारीका च्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला भांडण सोडवीण्या साठी सासू लक्ष्मी गेली असता त्यांच्या वर देखील कुऱ्हाडीचे हल्ला केला या मध्ये सारीका व लक्ष्मी दोघी जागीच ठार झाल्या .
मयत लक्ष्मी यांचा मुलगा राहुल दादा क्षिरसागर यांच्या फिर्यादी वरून आरोपी हरिश्चंद्र जाधव याच्या विरूध्द परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.निरिक्षक सय्यद हे करीत आहेत
डोमगाव येथे कोरोना रुग्णांची संख्या ७ वर
रोसा(समीर ओव्हाळ )
कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून परंडा तालुक्यातील डोमगाव येथे कोरोना ने एन्ट्री केले असून येथे ७ व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंडा तालुक्यातील कोरोना चा प्रभाव रोखण्यासाठी महसूल तसेच आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून तरीदेखील परंडा तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात कोरूना रोगाची संख्या वाढत आहे परंडा तालुक्यातील डोमगाव येथे आज पर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता मात्र दिनांक 23 ऑगस्ट रोजी एक व्यक्ती रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याच बरोबर 27 ऑगस्ट रोजी पाच व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे एकाच घरातील सात व्यक्ती पॉझिटिव निघाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेजारी-पाजारी गावातील लोकांना या गावात जायचे की नाही जायचं हा प्रश्न पडत आहे. डोंमगाव ग्रामपंचायत मार्फत जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.
गावातील ग्रामस्थांनी आपली व आपल्या कुटुंबाची कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे नेहमी मास्क चा वापर करून दररोज हात साबणाने स्वच्छ धुवावेत कामानिमित्त बाहेर पडल्यास विनाकरण कुठल्याही वस्तूला हात लावू नका प्रशासनाने दिलेल्या अशा सर्व नियमांचे आपण काटेकोर पालन केले तर आपण नक्कीच कोरोना पासून दूर राहू यामुळे आपल्या कुटुंबाला व आपले गावाला कायम स्वरूपी कोरोना पासून दूर राहण्यास नक्कीच मदत होणार घाबरू नका काळजी घ्या असे ग्रामसेवक बालाजी कांबळे जनमत बोलताना सांगितले
मानेवाडी ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामसेवकाविरूद्ध तक्रार; दखल घेईना प्रशासन
उस्मानाबाद :- तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारविरोधात एकत्र येत तक्रार देऊनही अद्याप पर्यंत ग्रामसेवकाची बदली न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, मानेवाडी येथील एकूण सात सदस्यांपैकी सहा सदस्यांनी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मानेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री दीपक होळकर यांच्या मनमानी कारभार व ग्रामपंचायत मधील सदस्यास विश्वासात न घेणे, ग्रामपंचायतच्या कोणत्याही योजनेबद्दल ग्रामस्थांना माहिती न देणे, सर्व सामान्या नागरिकांची आडीअडचणी सोडवत नाहीत उलट उद्धट बोलणे, सरपंच व उपसरपंच यांना हाताशी धरून मौजे मानेवाडी येथील गावठाण मध्ये बेकायदेशीर प्लॉट पाडून त्याची परस्पर विक्री करणे, त्यांच्या ठरलेल्या वाराप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये न येणे दहा पंधरा दिवसाला एकदा येतात, रूजू झाल्यापासून एकदाही राष्ट्रीय सणाला न येणे ,दाखला व सही घेण्यासाठी तुळजापूर ला व त्याच्या मुळ गावी उस्मानाबादला जावे लागते, ग्रामसेवक दिपक होळकर यांना गावच्या विकास कामात जराही रस नाही, अश्या आशयाच्या तक्रारीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिले आहे. तसेच मानेवाडी येथे बेकायदेशीर प्लाॅट पाडुन विक्री केल्या प्रकरणी ग्रामसेवकावर कार्यवाहीचा आहवाल आला आसता त्याच्यावर कारवाई ही केली नाही उलट संबधित ग्रामसेवकांना पाठीशी घातले जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे या संदर्भात गेल्या सहा ते सात महिन्यापासून गटविकास आधिकारी प्रशांतसिग मोरोड याना चार ते सहा वेळेस अर्ज करूनही कारवाई तर नाहीच त्याची बदली ही केली अशी सदस्यांची तक्रार आहे निवेदनावर शहाजी ज्ञानोबा हाक्के, महावीर रामा सगट, स्वाती सुरेश माने, विजया शिवाजी देवकर, शालुबाई शरणाप्पा बर्वे, कविता तुकाराम हाके या सर्व या सदस्यांच्या सह्या आहेत.































































