कारखान्याचा विस्तार करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करून बजेट मिळवण्याचा प्रयत्न करणार – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
कुर्डुवाडी दि.४(प्रतिनिधी)
येथील रेल्वे कारखाना बंद करण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी मिळाली असताना संसदेत तीन वेळा या कारखान्याबात प्रश्न उपस्थित करुन हा कारखाना वाचवण्यात यश आल्याचा आनंद आज अधिक होत आहे चिंकहिल येथील सुरक्षाबलाचे प्रशिक्षण केंद्र हलविण्याचा प्रस्ताव पूर्वीच झाला असल्यामुळ ते वाचवता आले नाही कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपमध्ये नव्याने मंजूर झालेल्या ५११ पदाची भरती बरोबरच येत्या अधिवेशनात या कारखान्याचा आणखी विस्तार करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करून बजेट मध्ये मंजुरी मिळवण्यासाठी माझा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
भारतीय रेल्वे तर्फे लातूर येथे रेल्वे प्रवासी कोच कारखानाची उभारणी केली जात आहे त्यापेक्षा चिंकहिल येथील रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राच्या १२० एकर रेल्वेच्या जमिनीवर जर संयुक्तीक ठरत असेल तर चिंकहिल येथे रेल्वे प्रवासी कोच कारखान्याची मागणी करणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले तर बंद झालेल्या रेल्वे हायस्कूलच्या ठिकाणी सीबीएससी पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात यावे अशीही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कुर्डुवाडी शहरातील मंजूर ट्रामा केअर र सेंटर व टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालय, दोन न्यायमूर्तींचे बेंच कुर्डुवाडी येथे स्थापन करणे, कुर्डुवाडी शहरातील गेट नं ३८ येथे सब- वे ऐवजी उड्डाणपूल करावा,मुंबई -विजापूर-मुंबई आठवड्यातील सर्व सातही दिवस धावावी मुंबई – विशाखापट्ट्णम् या गाडीस कुर्डुवाडी येथे थांबा मिळावा कुर्डुवाडी येथील रेल्वे ड्रायव्हर व गार्ड यांची लाॅबी लातूरला हलविण्याचा षडयंत्र सुरु आहे तरी ते कुर्डुवाडीतच कायम रहावे आदी प्रलंबित प्रश्न व मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,तालुका अध्यक्ष योगेश बोबडे,माजी शहराध्यक्ष विजयसिंह परबत आदी उपस्थित होते.
संत श्रेष्ठ श्री. संत गोरोबा काका यांच्या प्राचीन घराच्या दुरुस्तीच्या कामाची फेर तपासणी करा – आ.राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद – संत श्रेष्ठ श्री. संत गोरोबा काका यांच्या प्राचीन घराच्या दुरुस्तीच्या कामाची फेर तपासणी करुन गुणवत्ते नुसार काम झाले नसल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई करुन कोसळलेल्या छताची तातडीने दुरुस्ती करुन घेण्याच्या सुचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांना केल्या आहेत. त्याच प्रमाणे तेर नगरीचा एकात्मिक विकास आराखडा बनविण्याच्या अनुषंगाने देखील यावेळी चर्चा झाली.
दैनिक जनमतचे बाबाफरीद पठाण उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित
सोलापूर दि.०३(प्रतिनिधी) कुर्डूवाडी(ता.माढा) येथील पत्रकार बाबाफरीद पठाण यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून अविरतपणे सेवा बजावली या कार्याची दखल घेत बहुजन समाज परिषद महाराष्ट्र राज्य संचलित जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप देवकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व विद्युत अभियंता युवराज मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
कुर्डूवाडी येथील कै.विठ्ठलराव शिंदे सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात सन्मानपत्र शाल फेटा,पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देवकुळे,आबासाहेब खंडाळे,सुनील देवकर राणेश्वर हानवते,अंकुश गोरवे,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले गेल्या अडीच वर्षापासून ते वृत्तलेखन करीत आहे सध्या ते विधी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे कोरोना महायोद्धा पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर,दि. २ (प्रतिनिधी) कोरोना काळापासून अविरत कार्यरत असणारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या कोरोना काळातील आरोग्य सेवेतील कार्याची दखल घेऊन त्यांना कोल्हापूरकर नागरिक तसेच बहुजन,परिवर्तनवादी समाज,पक्ष,संघटनांच्या वतीने कोरोना महायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमन मित्तल उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब बेलेकर यांच्या हस्ते कोरोना महायोद्धा स्मृतिचिन्ह, शाॅल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन दोहोंचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन दैनिक जनमतचे पञकार व परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे यांनी केले होते.
यावेळी रविसागर हाळवणकर,मुबारक आत्तार,रविराज कोल्हटकर, रि पा इं एकतावादीचे अनिल धनवडे,पृथ्वीराज कटके, अभिजीत शिरोशी आदी उपस्थित होते.
रोसा अंधारातून उजेडाकडे; दैनिक जनमत इफेक्ट
(रोसा – समीर ओव्हाळ)
परंडा तालुक्यातील रोसा या गावचे गेले दहा दिवसांपासून वीज गेलेली होती दैनिक जनमत हे 27ऑक्टोबर रोजी दैनिक जनमत ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर झोपी गेलेली महावितरण कंपनी खडबडून जागी झाली आणि अवघ्या दोनच दिवसात गावातील वीज सुरळीत करून दिली. हेळसांड होऊन देखील गावातील नागरिकांनी महावितरण कंपनीचे आभार व्यक्त केले आहेत. गेल्या दहा दिवसापासून लाईट नसल्यामुळे गावात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता
गेल्या १० दिवसापासून रोसा गावामध्ये विद्युत पुरवठा होत नसल्याने जन जिवन विस्कळीत झाले होते पाठपुरावा करून विद्युत पुरवठा चालू केल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो
-दिलीप ओव्हाळ ग्रामस्थ




















































