Home Blog Page 257

सद्गुरु श्री श्री मध्ये विस्तारित नवीन बॉयलर अग्नि प्रदीपन शुभारंभ संपन्न

 विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी- 

सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या कृपाशीर्वादाने सांगली, सातारा,सोलापूर ,पुणे जिल्ह्यातील शेतकरी राजाला वरदायिनी ठरलेल्या सद्गुरु श्री श्री सा.का.लि. श्री श्रीनगर राजेवाडी या कारखान्याने बळीराजाच्या भवितव्याचा विचार करून चालू वर्षी ऊस उत्पादकांच्या आग्रहास्तव कारखान्याच्या विस्तारीकरणाचा अवलंब करून नवीन बॉयलर अग्नीप्रदीपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनोज कापरे गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली चेअरमन शेषागिरी राव,बाळासाहेब कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शनाने जनरल मॅनेजर व सर्व खातेप्रमुखांच्या वतीने संचालक श्री व सौ सतीश दडस यांचे हस्ते धार्मिक व विधीयुक्त पूजेने कार्यक्रमाचा सद्गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन एस के माळी, संचालक शहाजी नलावडे, सुरेश माळी, रामचंद्र जाधव, शिवदास गायकवाड,संजय फडतरे, तानाजी पवार या मान्यवरांच्या हस्ते चेअरमन एन शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालक श्रावण दादा वाकसे यांच्या समवेत बॉयलर अग्नि प्रदीपन शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. सदर प्रसंगी डी.जी.एम. शहाजी पाटील, केन मॅनेजर सुनील सावंत,चीफ इंजिनियर महंतेश लोकनवार, प्रोजेक्ट मॅनेजर सूर्यतेज नारा, एच आर व ॲडमिन मॅनेजर समीर सय्यद, डेप्युटी चीफ इंजिनियर तानाजी देवकते, सिव्हिल इंजिनियर अवधूत जमदाडे,डिस्टलरी मॅनेजर लालासाहेब पाटील, डेप्युटी इलेक्ट्रिक इंजिनीयर श्री कट्टी, वामने साहेब, चीफ अकौंटंट बी. के.वाडेकर,व्ही.एस. गुंजवटे,एच आर व एडमिन चे सचिन खटके, शेती अधिकारी शरद देवकर,दत्ता क्षीरसागर सचिन मुंडफणे,आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक राजेंद्र वाघमारे,सुरक्षा अधिकारी श्री बोडरे उपस्थित होते. सांगोला अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने कारखाना कामकाजाचे कौतुक करून सद्गुरु कारखान्यास हवे ते  सहकार्य देण्याचे मान्य केले.

दैनिक जनमत १३ डिसेंबर E पेपर

दैनिक जनमत १२ डिसेंबर E पेपर

 

ऑडिओ रेकॉर्डिंग वरून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची मुद्रांक विक्रेत्या वर कारवाई

वाशी (शहाजी चेडे )- मोबाईल संभाषणाच्या  ऑडिओ रेकॉर्डिंग वरून  वाशी येथील  मुद्रांक विक्रेत्या वर आज लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून मुद्रांक विक्रेता अशोक चेडे याच्यावर वाशी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदाराच्या भावाची जमीन नावे खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निबंधक वाशी या कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्री करणाऱ्या अशोक विनायक चेडे यांनी  २५ हजाराची मागणी केली होती आणि १८ हजार रुपयांमध्ये तडजोड झाली होती. ती रेकॉर्डिंग लाचलुचपत विभागाला सादर करण्यात आल्यानंतर लाचेची मागणी केली म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या देखरेखीखाली पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, विष्णु बेळे सिध्देश्वर तावस्कर आणि चालक करडे यांनी केली.

ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटमध्ये मराठी भाषेची मागणी..

कुर्डुवाडीत मनसेच्या वतीने प्रांताना निवेदन

कुर्डुवाडी दि.११(प्रतिनिधी) 

ॲमेझॉन कंपनीच्या वेबसाईट व अँँप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचा वापर नसल्याने मनसे कडून मराठी भाषेचा आग्रह करण्यात आला आहे याचे निवेदन प्रांताधिकारी यांना मनसे शहर संघटक आकाश लांडे यांनी दिले आहे.

भारता मधली ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटमध्ये मराठी भाषा चा पर्याय नाही सदर मराठी भाषा यांच्या वेब पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये असावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन करण्यात आले असून अद्याप सदर एकाही कंपनीचे मराठी भाषेचा पर्याय त्याच्या वेब पोर्टलमध्ये दिसला नाही

यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुर्डुवाडी शहराच्या वतीने आज रोजी पासून कुर्डुवाडी व माढा तालुका परिसरातील सर्व ऑनलाईन शॉपिंगच्या डिलिव्हरी बंद करण्यात येतील जोपर्यंत मराठी भाषेचा वापर या वेबवरील पोर्टलमध्ये होत नाही तो पर्यंत सर्व  डिलिव्हरी बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी शहराध्यक्ष सागर बंदपट्टे उपाध्यक्ष गणेश चैधरी सागर लोकरे शहर सचिव विनायक सांतव ओमराज लांडे उपस्थित होते

सर्वपक्षीय जनआंदोलन संघर्ष समितीचा कडकडीत बंद राहणार भाजीपाला, दूध व मेडिकल सुविधांना वगळण्यात येणार

 

उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) –  केंद्र सरकारने कोणालाही विचारात न घेता जे तीन कृषी कायदे लागू केले आहेत. त्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा जन आंदोलन संघर्ष समितीच्यावतीने दि. ८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. मात्र या बंद दरम्यान दूध, भाजीपाला व मेडिकल या सुविधांना वगळण्यात आले आहे.
 महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटना तसेच विविध पक्ष संघटना व शेतकरी संघटनांनी दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला व्यापक पाठबळ देण्यासाठी आंदोलन हाती घेतले आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान व महाराष्ट्र आदी राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे एकवटले असून सुरुवातीला केंद्रसरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीत देखील त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे, अश्रू धुराच्या‌नळकांड्या फोडीत लाठीहल्ला करीत अमानुषपणे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तरीही निराधाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून मुळातच देशभरातील शेतकऱ्यांच्या मताचा विचार न करता, त्यांना विश्‍वासात न घेता व न जुमानता ही विधेयके मंजूर केलेली आहेत. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील व जमिनीच्या तुकड्यावर आपली गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्याबरोबरच भारतीय अन्न महामंडळ देखील निष्क्रिय केले जाईल व अन्नसुरक्षा कायदा, रेशन व्यवस्था मोडीत काढली जाईल ही रास्त भीती देखील त्यांच्या मनामध्ये आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांची सन्मान जनक संवाद करण्याचे दायित्व देखील हे सरकार पार पाडत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने या शेतकऱ्यांची संवाद साधावा व शेतकरी विरोधी संमत केलेले तीन्ही कायदे  तात्काळ मागे घ्याव्यात यासाठी दि. ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय व संघटनांच्यावतीने दि.८ डिसेंबर रोजी बंद पाळण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी या आंदोलनात उतरून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी दि.७ डिसेंबर रोजी छत्रपती हायस्कूल येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली असून या बैठकीस प्रा. अर्जुन जाधव (स्वराज इंडिया), सतीशकुमार सोमाणी (शिवसेना) भाई धनंजय पाटील, संभाजी गायकवाड (शेकाप), नितीन बागल (राष्ट्रवादी काँग्रेस), राजाभाऊ शेरखाने,   ॲड. जावेद काझी, मेहराज शेख(काँग्रेस आय), कॉम्रेड पंकज चव्हाण(भाकप), कृष्णा जगताप, अमोल घोगरे, बाळासाहेब बरकसे, शिवदास पवार, हनुमान हुंबे, आर.जे. बोबडे, आशिष पाटील, ॲड. तानाजी चौधरी, दिनेश चौगुले (संभाजी ब्रिगेड) व अरुण निटूरे (राष्ट्रीय बहुजन किसान पार्टी) आदीसह विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.