विठ्ठलाच्या चेअरमन पदी भगिरथ दादा भालके यांची बिनविरोध निवड करा – शिवाजी हुंगे-पाटील
मगरवाडी-( विठ्ठल जाधव )
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कै.भारत नाना भालके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदाकरिता विद्यमान आमदार तथा विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन भारत नाना भालके यांचे चिरंजीव व विठ्ठल सह साखर कारखान्याचे संचालक भगिरथ दादा भालके यांची बिनविरोध संचालक मंडळानी निवड करावी असे मत विठ्ठल परिवाराचे नेते शिवाजी हुंगे-पाटील यांनी दैनिक जनमत ला बोलताना हि माहिती दिली. आ.भारत नाना भालके यांनी विठ्ठल सह साखर कारखाना लवकर चालू व्हावा व सभासद बांधवांची एफ आर पी लवकरच देण्यासाठी शेवटच्या घटका प्रर्यत प्रयत्न केले. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटील यांना काही ही करा पण माझ्या शेतकर्याचा राजवाडा चालू झाला पाहिजे म्हणून अनेक वेळा मंञालयामध्ये फेरया मारत असताना अचानक आ. भारत नाना भालके यांची तब्येत ढासळला लागली होती .परंतु कारखाना अडचणीतून बाहेर काढणे महत्वाचे होते .म्हणून भारत नानांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता ते शेवटच्या क्षणापर्यंत कारखाना, सभासद ,कामगार यांचाच विचार करत होते .आणि नाना अचानक पुणे येथे रूबी हाॅस्पिटला अॅडमिट झाले आणि त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मावळली शेतकर्याच्या व कारखान्याच्या हिताचा निर्णय घेणार आमदार व चेअरमन भारत नाना भालके हे सर्वांना सोडून गेले आज विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन पदाची निवड होते जर आ. भारत नाना भालके यांचे चिरंजीव व विठ्ठल सह साखर कारखान्याचे संचालक मा भगिरथ दादा भालके यांना संचालक मंडळानी बिनविरोध चेअरमन केले तर खर्या अर्थानी भारत नानांना श्रद्धांजली अर्पण केले जाईल . भगिरथ दादा भालके हे भविष्यात चांगल्या प्रकारे कारखाना चालवून नावारूपाला आणतील त्यांत शंका नाही .आणि कारखान्याचा सिझन चालू आहे त्यामुळे सर्व संचालक मंडळानी कुठल्याही प्रकारची संकुचित भावना मनामध्ये निर्माण होऊ न देता .त्यांच्याच संचालक मंडळातील सहकार्याला आशिर्वाद व सात देऊन भगिरथ भालके यांना चेअरमन करावे आणि विठ्ठल सह साखर कारखाना सोलापूर जिल्हात नाही तर महाराष्ट्रात पुन्हा नावारुपाला आणावा भारत नानांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुसकान झालेले आहे .आता विठ्ठल परिवारातील नेत्यांनी व कार्यकर्तेनी एक मेकांच्या हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे .
एस.पी शुगर चे चेअरमन सुरेश पाटील यांच्यावर चौकशी करून गुन्हा नोंद करण्याचे प्रशासनाचे आदेश
उस्मानाबाद – एस.पी शुगर चे चेअरमन तथा तडवळा गावचे उपसरपंच सुरेश पाटील यांच्यावर अधिकार नसताना दोन बोगस वारसा प्रमाणपत्र दिले बाबत जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी करून गुन्हा नोंद करण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की सुरेश पाटील यांनी अधिकार नसताना मयत मुरलीधर कदम यांच्या नावाचे दोन वेगवेगळे वारसा प्रमाणपत्र दिगंबर कदम यांना दिले होते. याला आक्षेप घेत तडवळा येथील ग्रामस्थ सुभाष कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. तसेच तक्रारीची दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. आज उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा. पं) यांनी उपसरपंच सुरेश पाटील, लिपिक रवींद्र घोरपडे, आणि प्रमाणपत्र हस्तगत करणारे दिगंबर कदम यांची चौकशी करून गुन्हे नोंद करण्याचे पत्र गट विकास अधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे.
तासगाव नगरपालिकेचे आक्रमक माजी नगराध्यक्ष, लोकनियुक्त सरपंच व प.स.माजी उपसभापती शिवसेनेच्या गळाला?
खासदार संजयकाका पाटील गटाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता
तासगाव –
तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव नगरपालिकेचे एक आक्रमक माजी नगराध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक हे मुंबई येथे शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सोबत तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका मोठ्या गावातील लोकनियुक्त सरपंच व तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती हे तिघे व अन्य काही कार्यकर्ते खासदार संजय काका पाटील यांच्या गटाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे तासगाव शहरासह तालुक्यात एकच चर्चेला उधाण आले आहे. ग्रामपंचायत व तासगाव नगरपालिका च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय काका पाटील यांना हा धक्का मानला जाऊ शकतो, तासगावचे माजी नगराध्यक्ष हे मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या परंतु त्यांनी त्यावेळी प्रवेश केला नाही तर पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत या तीन नेत्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा उघड प्रचार करीत निवडणूक दिवशी तासगाव येथील बूथवर दिवसभर ठिय्या मांडला होता हे विशेष होय, भाजपच्या खासदार संजय काका पाटील यांच्या कट्टर नेते यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे यह तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असे म्हटले तर वावगे ठरू नये, या भाजपच्या तिन्ही नेत्यांचा भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचे किती नुकसान होणार व शिवसेनेच्या प्रवेशानंतर तासगाव शहर, तालुक्यातील शिवसेनेला किती फायदा होणार हा येणारा काळच ठरवेल तसेच तासगाव पालिकेची निवडणूक नऊ ते दहा महिन्यावर येऊन ठेपली आहे त्या पार्श्वभूमीवर कोणकोण नेते राज्याच्या सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत हे लवकरच तालुक्यातील व शहरातील जनतेला समजेल तासगाव तालुक्यात सत्ता असणाऱ्या पक्षात कार्यकर्ते व नेतेमंडळी प्रवेश करत असतात हे सर्वांना ज्ञात आहे. सदरच्या कार्यकर्त्यांच्या भाजप सोडचिट्टी मुळे भाजपला किती नुकसान तर शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला तालुक्यात व शहरात किती फायदा मिळणार याबद्दल सध्यातरी अंदाज बांधणे कठीण आहे.







































































