Home Blog Page 215

सुरतगाव ते काटी रस्ता नूतनीकरणाचे काम निकृष्ट ! सामाजिक कार्यकर्ते चंद्रोदन माळी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 

सुरतगाव ते काटी या निकृष्ट कामाबाबत निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेता निवेदनाला दाखवली केराची टोपली… 


सावरगाव (प्रतिनिधी)

तुळजापुर तालुक्यातील सुरतगांव ते काटी या १५ किमी लांबीच्या रस्ता कामाच्या दर्जा बाबत  वरीष्ठ कार्यालयाकडे तक्रार करूनही  दखल घेतली जात नाही ,या मार्गावर करण्यात येणाऱ्या पुलाचे बांधकाम वाळु ऐवजी दगडाचा डस्टमध्ये केले जात आहे,गेल्या मे महीन्यापासुन सुरतगांव ते काटी या१५ किमी मार्गाच्या कामाला ठेकेदाराने कामाला प्रारंभ केला आहे,साइटपट्टयाचे खोदकाम करून त्या भरण्यात येणारा मुरुम माती मिश्रीत लालसर भरला जात होता, त्यासंदर्भात सावरगावचे चंद्रोदन माळी  यांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांचे सह लोकप्रतिनिधीकडे केली मात्र त्या मुरूमाचा अहवाल प्रयोगशाळेने चांगल्या प्रतिचा दाखवला व तसे प्रमाणपत्र ठेकेदाराला बहाल केले, पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट पाईप आय एसआय प्रमाणित नाहीत, हे निदर्शनास आल्या नंतर ठेकेदाराने पाईप बदलले , सध्या पुलाचा बांधकाम साठी वाळुचा  वापर न करता डस्ट पावडर मधे काम पुर्ण करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडुन केला जात आहे, १५ कि मी लांबीच्या रस्त्याच्या कामात दर्जा तपासण्याची मागणी चंद्रोदन माळी यानी केली. तरी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत तर पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी चिखलाने  काळीमाती रोडवर आल्याने वहातुकीला मोठी अडचण ठरत आहे ,सध्या रस्त्यातुन  मार्ग शोधत प्रवाशी वाहतुक करीत आहेत 



वाळु ऐवजी  डस्टचा वापर का ?

रस्ता व पुलाचा अंदाजपत्रकात वाळु ऐवजी  क्रशन्ट  वापरण्याची परवानगी असताना  ठेकेदार हा ठरवुन दिलेल्या अटीप्रमाणे साहीत्याचा वापर न करता खडी क्रेशर वरील दगडी पावडरचा वापर करून बांधकामे उरकण्याचा प्रयत्न करीत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता झगडे गायकवाड हे याकडे  कानाडोळा करीत असल्याचा आरोप गावकऱ्यातुन केला जात आहे

चंद्रोदन माळी 

(सामाजिक कार्यकर्ता सावरगाव)

१५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  15 सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १०  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

       उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  १५ सप्टेंबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १० लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.तसेच ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दूसरा  डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

२) दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी १३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

४ हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत च्या जाळ्यात

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहायक उपनिरीक्षक गोकुळ बाबुराव गिरी,वय 58, यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की तक्रारदार , त्यांचे भाऊ व वडील यांचे विरूद्ध पोलिस स्टेशन तामलवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्य क्र.252/2021 मध्ये  तक्रारदार त्यांचा भाऊ व वडिल यांचेवर कारवाई न करण्यासाठी यातील गिरी यांनी 4000/रुपयांची मागणी करून 4000/रूपये स्वीकारण्याचे मान्य केले व पांचासमक्ष 4000/ रूपये स्वीकारले असता ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई – अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद रुपचंद वाघमारे–प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. औरंगाबाद प्रशांत संपते  — पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनात केली.त्यांना पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड, मधुकर जाधव, शिद्धेस्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी सहकार्य केले.

तासगाव तालुका क्रीडा संकुलासाठी राज्य क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून ३ कोटी निधी उपलब्ध – आम. सुमनताई पाटील यांची माहिती

क्रीडासंकुलासाठी ६१ कोटी १६ लाख रु. च्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता

तासगाव प्रतिनिधी ता १३:
 तासगाव येथील तासगाव तालुका  क्रीडा संकुलासाठी राज्य  क्रीडा व युवक कल्याण  विभागाने ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आमदार सुमनताई पाटील यांनी दिली.  क्रीडा संकुलासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव दिला असुन त्याला प्रशासकिय  मान्यता मिळाली असलयाचेही त्यांनी सांगितले. 
     राज्य  क्रीडा व युवक कल्याण विभागाने राज्यातील ३५ तालुक्यात तालुका क्रीडा संकुल योजनेतून निधी दिला आहे त्यामध्ये तासगाव तालुका  क्रीडा संकुल साठी सर्वाधिक ३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. हा निधी देण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आले  आहेत.  निधीची उपलब्धता होताच कामाचे भूमिपूजन करण्यात येईल असे आमदार श्रीमती पाटील यांनी सांगितले.
       तासगाव शहरात सद्या असलेल्या क्रीडा संकुल मध्ये ८ एकर जागेमध्ये  सद्या या ठिकाणी ४०० मिटर्सचा ट्रॅक तयार असून 
यावर्षी या क्रीडा संकुलासाठी  आणखी ३ कोटी निधी उपलब्ध झाला आहे.  लवकरच या कामाला सुरुवात करत असल्याची माहिती त्यांनी दिली. 
     राज्य शासनाने ६१ कोटी १६ लाख ११ हजार रुपये खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये तासगाव तालुका क्रीडा संकुलात ४०० मीटर्स धावनपथ ( सिंथेटिक ट्रॅक) व फुटबॉल ग्रास मैदानासह, २ व्हॅलीबॉल कोर्ट आसन व्यवस्थेसह, ३ मजली वस्तीगृह, इनडोअर जिम्नॅशिअम हॉल, प्रसाधनगृह, चेंजिग रुम, व्हीआयपी लांउज, प्रेक्षा गॅलरी,कमर्शियल गाळे, यांचा समावेश आहे.

सोनपावलांनी गौराईचे घरोघरी उत्साहात आगमन

 

सलगरा,दि.१३(प्रतिनिधी)तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) सह परिसरात गणेशोत्सवा नंतर दोन दिवसांनी म्हणजेच १२ सप्टेंबर (रविवार) रोजी गौराईचे घरोघरी आगमन झाले आहे. गंधोरा, किलज, वडगाव, वाणेगाव व जवळगा आदी परिसरातील गावांमध्ये गौरी आणण्यासाठी सुवासिनींची लगबग दिसुन आली. या वर्षीही कोरोनाचे सावट असले तरी गणपती पाठोपाठ महिलांनी गौरीपूजन हा महत्वाचा सण घराघरातून मोठ्या भक्तिभावाने मंगलमय वातावरणात गौराईंचे स्वागत करत साजरा केला आहे.

 पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी या गौरींना घरात आणले जाते. या वेळी

गौरी आली, सोन्याच्या पावली,

गौरी आली, चांदीच्या पावली,

गौरी आली, गाई वासराच्या पावली,

गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली

असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. अशा प्रकारे विधिवत गौरी घरात आणून घरात आल्यावर गौरीला संपुर्ण घर दाखवले जाते व गणेशाच्या शेजारी तीची विधिवत प्राण प्रतिष्ठापना केली जाते.आता घरोघरी गौराईचे आगमन झाले असुन तिची विधिवत पुजा करून तिला एक दिवस गोडा व एक दिवस तिखटाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. घरोघरी गौरीचे उत्साहात आगमन झाल्यानंतर सुंदर भरजरी साड्यांनी व दागीन्यांनी साजशृंगार केला, घरोघरी सुंदर आरास करण्यात आली, काही ठिकाणी गौरीला विविध प्रकारच्या पक्वानांचा नैवेद्य दाखविण्यात आला. फराळाचे विविध पदार्थ मांडण्यात आले, या दिवशी महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, या वेळी शक्तिचे प्रतिक म्हणून पूजल्या जाणार्‍या या गौरीकडे कोरोना बरोबरच शेतकऱ्यांवर येणाऱ्या विविध संकटाचे निवारण व्हावे या साठी प्रार्थना करण्यात आली.परंपरेनुसार प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. गणेशचतुर्थीला गणपतीची स्थापना केल्यानंतर महालक्ष्मीचे आगमन होत असते. अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरीची पूजा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेची सुरुवात भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीपासून होते. या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजन करून नैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमीला विसर्जन होते.

१४ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  १४   सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १२  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक  १४ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


) दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील ११ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस


उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १४ सप्टेंबर २०२१ रोजी ११ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

ॲड. अमोल रणदिवे यांची राज्य अध्यक्षपदी निवड, ग्रामस्थांनी केला सत्कार


उस्मानाबाद – राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य बीज उत्पादक संघाची स्थापना केली आहे या संघाच्या अध्यक्षपदी उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा बु येथील ॲड.अमोल रणदिवे यांची झाली आहे अमोल रणदिवे यांनी कमी वयात कार्याची ओळख निर्माण केली आहे .त्यांची अध्यक्षपदी निवड होताच गावातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ॲड. अमोल रणदिवे यांचा ग्रामपंचायत व राजे छत्रपती सांस्कृतिक क्रिडा मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गावाचे सरपंच प्रशांत रणदिवे, हणूमंत गाढवे, धनंजय साठे,तात्याराम कुदळे, सुधाकर देवगिरे,दादा गाढवे,बापू कासार,विकी रणदिवे, जितेंद्र रणदिवे,सचिन देवगिरे, नामदेव खरे,दिपक रणदिवे, अविनाश रणदिवे, बालाजी देवगिरे, पांडूरंग रणदिवे,बालाजी कापसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करू – जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार


उस्मानाबाद प्रतिनिधी :   उस्मानाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व मागास जिल्ह्याचा शिक्का पुसून काढण्यासाठी  नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत सत्ता स्थापन करावी . असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या उस्मानाबाद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले .
                उस्मानाबाद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका संदर्भात शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष प्रा  बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली दि .११ रोजी आढावा बैठक संपन्न झाली .


                  या बैठकीला माजी आमदार राहुल मोटे ,जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर पाटील, प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील ज्येष्ठ नेते संपत डोके, संजय निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, वाजिद पठाण, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, प्रतापसिंह पाटील, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती .
                          पुढे बोलताना  मा . शरदचंद्र पवार साहेबांच्या आग्रही भुमिकेने उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले . तसेच आपल्या शहरासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या भुयारी गटारीसाठी नीधी उपलब्ध करूण देण्याचा उस्मानाबादकरांना दिलेला शब्द उपमुख्यमंत्री अजितदादांनी पुर्ण केला आहे .ही निश्चितच आपल्या कार्यकर्त्यासाठी अभिमानाची बाब आहे.असे मत यावेळी बोलताना बिराजदार यांनी व्यक्त केले.
                                पक्षाच्या बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार व पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामे आणि भूमिका तळागाळापर्यंत पर्यंत पोहोचवावेत असे मत माजी आ. राहुल मोटे यांनी व्यक्त केले . या वेळी शहरातील ज्येष्ठ, युवक, विद्यार्थी व विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                       यावेळी शहरअध्यक्ष आयाज शेख, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, अनिकेत पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष खलील पठाण, सांस्कृतिक विभाग जिल्हा अध्यक्ष विशाल शिंगाडे,न प गटनेते गणेश खोचरे, नगरसेवक प्रदीप मुंडे, खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, इस्माईल शेख, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा मगर, महिला जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा पाटील, मिनील काकडे, रणधीर इंगळे, इलियास पिरजादे, मृत्युंजय बनसोडे,अन्वर शेख, बिलाल तांबोळी, वैभव मोरे, अमोल सुरवसे, इस्माईल काजी, सोशल मीडिया लतीफ पटेल, संग्राम बनसोडे, रतन बनसोडे, अतुल आदमाने, शेखर घोडके,शहर प्रवक्ता अभिजीत व्हटकर, विद्यार्थी शहराध्यक्ष सौरभ देशमुख, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष चैतन्य माने यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .