किलज मध्ये कोरोना योद्ध्यांचा करण्यात आला सन्मान
सलगरा,दि.१७(प्रतिक भोसले)
तुळजापूर तालुक्यातील किलज येथील बळीराजा चॅरिटेबल ट्रस्ट आणि खंडूराज शिंदे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने किलज येथील कोरोना संकट काळात गेल्या दोन वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या गावातील सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कोरोनाच्या काळात निस्वार्थी भावनेने सामाजिक कर्तव्य व जबाबदारी समजून गावासाठी कार्य केलेल्या, कर्तव्य बजावलेल्या एकूण २६ जणांना कोरोना योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दसरा सणाचे औचीत्य साधत हा कार्यक्रम घेण्यात आला, या वेळी कोरोना योद्धांनी कार्यक्रमात आपली मते मांडली, कार्यक्रमात कोरोना योद्धे म्हणून किलज गावच्या सरपंच अर्चना शिंदे, उपसरपंच दिक्षा गवळी, पोलीस पाटील सुनीता मर्डे, तंटामुक्त अध्यक्ष नागनाथ शिंदे, आशा कार्यकर्त्या छाया गवळी, निर्मला निर्मळे, सारिका शिंदे, प्रभावती भोईटे, किलज ग्रामपंचायत क्लर्क गोविंद शिंदे, संगणक परिचालक प्रदीप शिंदे, पत्रकार राम जळकोटे, वैभव मर्डे, ग्रामपंचायत कर्मचारी इरणा स्वामी, दत्ता सोमवंशी, जाकीर पटेल, शरद शिंदे, किरण शिंदे, अशोक शेळके, उमेश पवार, धनराज येलुरे, सुदर्शन शिंदे, किलज गावचे तलाठी माने, किलज ग्रामपंचायत ग्रामसेवक सचिन चौधरी, जि.प.शाळा किलज येथील सहशिक्षक मोरे, मसेकर आदींना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी उपस्थित बळीराजा ट्रस्टचे अध्यक्षा संगीता राठोड, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, सचिव आनंद निर्मळे, पंचायत समिती सदस्य खंडेराव शिंदे, शिवाजी पांचाळ, संजय सोनटक्के, अमोल शिंदे, सचिन बिडवे, उमेश भोईटे, महेश माने, नामदेव गायकवाड, विलास मर्डे, विश्वनाथ बिडवे, यांच्या सह ग्रामस्थ, महिला तसेच युवक वर्ग उपस्थित होते.
१८ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
१७ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
२) दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील १६ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी १६ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठात रद्दबातल
न्यायालयाच्या निर्णयाने सत्याचा विजय झाला — शरण पाटील
उमरगा :उमरगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ प्रेमलता टोपगे यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अपात्र ठरवले होते. या आदेशाविरुद्ध नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (दि. १४) नगरविकास मंत्र्याचा आदेश रद्दबातल ठरवला आहे. हा शहरवासीयांचा व सत्याचा विजय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले.
गुरुवारी (दि.१४) जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, उमरगा नगरपालिकेत काॅग्रेसच्या नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी साडेचार वर्षांच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून शहरात विकासकामे केली आहेत. हा विकास विरोधकांना खुपत असल्याने नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या नगरसेविकांनी जिल्हाधिका-याकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत असल्याचा अहवाल मंत्रालयाला पाठवला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कांही मित्र पक्षांच्या राजकीय दबावाखाली व त्यांचे राजकीय हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून नगरविकास मंत्र्यांनी नगराध्यक्षांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. गुरुवारी (दि. १४) न्यायालयाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निकाल रद्दबातल ठरवला आहे. हा शहरवासीयांचा व सत्याचा विजय आहे. टोपगे त्यांच्या वतीने ॲड. व्ही. डी. सपकाळ व ॲड. लक्ष्मीकांत पाटील यांनी काम पाहिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, उमरगा बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, माजी नगराध्यक्ष प्रेमलताताई टोपगे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, प्राचार्य दिलीप गरूड, ॲड. व्ही. एस. आळंगे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाअध्यक्ष याकुब लदाफ, नगरसेवक विक्रम मस्के, महेश माशाळकर, एम.ओ.पाटील, विजय वाघमारे, परमेश्वर टोपगे, अनिल सगर यांच्यासह काॅग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष लेखापरीक्षणात सेना, भाजपा, राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक दोषी आढळून आले आहेत. त्यांचे विरुद्ध जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्र्याकडे तक्रार दिली पण याची दखल त्यांनी घेतली नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात दोषी ९ नगरसेवकाविरुध्द गुन्हा दाखल करणेसाठी याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी २५ आक्टोबर रोजी होणार असुन त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होईल.
— सौ. प्रेमलता टोपगे, नगराध्यक्षा
पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार
राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई :-
पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली.
मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालावर देखील आज चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे –
1. राज्यघटनेच्या अनुच्छेद 16 (4) (ए) द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही असे राज्याचे मत असल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना पदोन्नती मध्ये आरक्षण देता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अपुरे प्रतिनिधित्व व प्रशासकीय कार्यक्षमता या दोन निकषांची पूर्तता होत असल्यामुळे राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देता येईल.
2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रमाणेच विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड), व विशेष मागास प्रवर्ग यांचे देखील पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही,असे उक्त समितीच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड), व विशेष मागास प्रवर्ग यांनादेखील पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आरक्षण अधिनियम 2001 प्रमाणे अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) व विशेष मागास प्रवर्ग यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. ते कायम ठेवण्यात यावे,असे मत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमध्ये राज्यातर्फे मांडण्यात यावे.
3. वरील बाबी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यात यावे.
4. सदर प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आवश्यकतेनुसार ज्येष्ठ विधिज्ञांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्यात यावी.
येरमाळा पो.स्टे. चे सहाय्यक पो.निरीक्षक गणेश मुंढे व इतर एकावर ए सी बी ची कारवाई
उस्मानाबाद – येरमाळा पो.स्टे. चे सहाय्यक पो.निरीक्षक गणेश मुंढे व इतर एकावर निनावी अर्जावर कार्रवाई न करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक, उस्मानाबाद विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी आरोपी लोकसेवक गणेश मुंढे, स.पो.नि. पो.स्टे. येरमाळा यांनी रत्नापुर येथील पोलीस पाटील सुशन जाधवर यांचे मार्फ़तीने तक्रारदार यांच्याकडे दि.22/8/2021 रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी करून तड़जोडी अंती दोन्ही आरोपी यांनी 70000/- रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे पंचांसमक्ष मान्य केले होते.आरोपी यांची लाचमागणी पडताळणी केल्यानंतर आज रोजी त्यांच्या विरुद्ध पो.स्टे. येरमाळा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.सदरची कार्यवाही डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद व प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अशोक हुलगे, पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड,विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली.लाचेसंबंधी तक्रार असल्यास प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद यांच्याकडे मोबाइल क्र.95279 43100 ,कार्यालय क्र.02472 222879 किंवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.















































