Home Blog Page 200

जिल्ह्यात एक नोव्हेंबरपासून नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम

उस्मानाबाद,दि.28(प्रतिनिधी):- जिल्ह्यात एक नोव्हेंबर 2021 पासून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिल्ली येथील भारत निडणूक आयोग आणि मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी  यांनी दि.एक जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्तं पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे . त्यामुळे एक नोव्हेंबर 2021 पासून जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे त्याअनुषंगाने दि. एक जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी दि.01 नोव्हेंबर,2021 (सोमवार) रोजी प्रसिध्दी करण्यात येईल. दावे आणि  हरकती स्वीकारण्याचा कालावधी सोमवार दि.एक  ते मंगळवार दि.30 नोव्हेंबर,2021 असेल.  विशेष  कालावधी शनिवार, दि.13 आणि   रविवार  दि.14 नोव्हेंबर,2021 असेल. शनिवार, दि.27 आणि  रविवार, 28 नोव्हेंबर, 2021 रोजी  दावे तसेच  हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. सोमवार,दि. 20 डिसेंबर 2021  पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे .    त्याअनुषंगाने दि.एक जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणा-या तरुण पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना सहा चा अर्ज (सोबत आवश्यक कागदपत्रासह ) आणि  ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, पत्ता किंवा  इतर दुरुस्ती असल्यास नमुना आठ चा अर्ज भरुन सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालयात  किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे पुराव्यासह जमा करण्याचे आवाहन येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर  यांनी केले आहे. 

  तसेच ग्राम विकास विभागाच्या शासन परित्रक दि.25 ऑक्टोबर 2021 प्रमाणे  मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी तसेच नवीन नोंदणी इत्यादी प्रकीया गावातील नागरिकांपर्यत सुलभतेने पोहोचण्याकरिता  दि.16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही  श्री . दिवेगावकर यांनी कळविले आहे. 

****

दैनिक जनमत २९ ऑक्टोबर २०२१ E paper

दैनिक जनमत २८ ऑक्टोबर २०२१ E paper

एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ; २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून होणार लागू

 


– तिकिटात किमान ५ रूपयांची वाढ

– साध्या बसचा रात्रीचा प्रवास झाला स्वस्त 

मुंबई दि. २५ ऑक्टोबर – इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ,  टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.

गेल्या ३ वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र  स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत असून २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून (२५ व २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री) लागू होणार आहे. 

२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून वा तद्नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. तथापि, रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (जी सेवा सायंकाळी ७ वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा.पर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकिट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकिट दराच्या तुलनेत  १८ टक्के जास्त होते. उदयापासून सदर अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.

बळीराजा पार्टी करणार टाळे ठोको आंदोलन

उस्मानाबाद

बळीराजा पार्टीच्या वतीने २५ ऑक्टोबर रोजी विमा कंपनीच्या उस्मानाबाद शाखेस ताळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. सन २०२० मधील पिक विमा मोबदला बजाज इन्शुरंन्स कंपनी हा मोबदला देण्यास टाळाटाळ करत आहे बळीराजा पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी ही निवेदने देण्यात आली आहेत या निवेदनाची दखल घेतली नसल्याने हे आंदोलन करण्यात  येणार आहे. या टाळे ठोक आंदोलनास रामचंद्र पाटील प्रणित शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी, भारतीय एकता पार्टीने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे

२५ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  २५ ऑक्टोबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये  १३ लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २५ ऑक्टोबर  २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .

टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल.. 

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २० लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

         उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी २० लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी विक्रमी ३८७ अर्ज दाखल

 


चेअरमन दिलीपतात्या पाटील, खासदार संजय काका पाटील व सुरेश भाऊ पाटील यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

तासगाव/ सांगली प्रतिनिधी

सांगली  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक तथा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आदींसह १३४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर विद्यमान संचालक तथा माजी अध्यक्ष बी.के. पाटील, उदयसिंह देशमुख, झुंझारराव शिंदे या तिघांनी अर्ज दाखल न करता निवडणूक रिंगणातून माघार घेतली. तर कालच खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे तासगाव कवठेमहांकाळ चे नेते संचालक सुरेशभाऊ पाटील, डॉ. प्रताप नाना पाटील, कमलताई पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील भाऊ पाटील, कवठेमहांकाळ तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या श्रीमती अनिता ताई सगरे, शिवसेनेचे नेते अरुण नाना खरमाटे, त्यांच्या पत्नी सौ खरमाटे इत्यादी दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत बँकेच्या आज अखेरच्या इतिहासात विक्रमी संख्येने एकुण ३८७ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (ता.२५) छाननी असून माघारीसाठी ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.


बँकेच्या २१ जागांच्या निवडणुकीत दुसऱ्या दिवशी ७, तिसऱ्या दिवशी ४२, चौथ्या दिवशी २०४ तर आज शेवटच्या दिवशी १३४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज शेवटच्या दिवशी अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक विशाल पाटील, संचालक बाळासाहेब होनमोरे, संचालक श्रद्धा चरापले, सांगली चे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आटपाडी पंचायत सभापती हर्षवर्धन देशमुख, तानाजी पाटील, मनोज शिंदे, ऋषिकेश लाड, सुयोग सुतार, नगरसेवक राजेंद्र कुंभार, वैभव शिंदे, वैभव पवार, अमित पाटील, सुरेश खोलकुंबे, योजना शिंदे, अलकादेवी पवार, जमील बागवान, भक्तराज ठिगळे, मन्सूर खतीब, आकाराम मासाळ, प्रेमलाताई साळी, जयकर कदम, गजेंद्र कुल्लोळी आदींचे १३४ अर्ज दाखल झाले. विद्यमान संचालक बी.के. पाटील, उदयसिंह देशमुख, झुंझारराव शिंदे यांनी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे सध्या तरी विद्यमान २१ संचालकांपैकी १८ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. माघारीपर्यंत आणखी काही संचालकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिवाळीनंतर ९ नोव्हेंबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.


 *निवडणुकीसाठी दाखल अर्ज* 


गट एकुण अर्ज


विकास संस्था गट ‘अ’ १०७


महिला राखीव गट ‘ब’ ३६


अनुसूचित जाती-जमाती गट ‘ब’ २२


इतर मागासवर्ग गट ‘ब’ ३२


विमुक्त जाती, भ.ज. गट ‘ब’ २७


शेती संस्था ‘क’ १ २८


कृषी पणन प्रक्रिया ‘क’ २ १३


नागरी बँका, पतसंस्था ‘क’ ३- ७०


इतर संस्था, व्यक्ती सभासद ‘क’ ४ -५२


एकुण ३८७

सदरची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व शिवसेना एकत्रित येत भा.ज.प च्या विरुद्ध निवडणूक लढणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.