परंडा तालुक्यातील अवैध १० स्टोन क्रशर सिल
उस्मानाबाद – जिल्ह्यात अवैधरीत्या सुरू आलेल्या स्टोन क्रशरवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने मोहीम आखली आहे.
तहसीलदार, नायब तहसिलदार ,मंडळ अधिकारी तलाठी यांच्या पथकाने परांडा तालुक्यातील कुंभेजा, कोकरवाडी, काटेवाडी, आनाळा, इनगोंदा, उंडेगाव, जामगाव येथील अवैधरित्या चालू असलेले स्टोन क्रशर सील केले आहेत.
सील केलेले स्टोन क्रशर
खडके स्टोन क्रेशर, परंडा
मोरे स्टोन क्रेशर, कुंभेजा
शनैश्वर स्टोन क्रेशर आवारपिंपरी
जेकटे स्टोन क्रशर आनाळा
साई स्टोन क्रेशर, आवारपिंपरी
माऊली स्टोन क्रेशर, जामगाव
सुर्योदय स्टोन क्रेशर काटेवाडी
जाधव स्टोन क्रशर कोकरवाडी
यश स्टोन क्रशर, इनगोंदा
जेकटे स्टोन क्रशर उंडेगाव
दैनिक जनमत २५ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २० लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २१ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
२४ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागातील रुग्नालायांतर्गत १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २१ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २१ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
टिप :- उप जिल्हा रुग्णालय कळंब येथील कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र या पुढे विद्या भवन हायस्कूल ऐवजी फुले आंबेडकर वाचनालय , कळंब या ठिकाणी होईल..
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी ५ वाजेपर्यंत आहे. दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कामगारांचे साखळी उपोषण
उस्मानाबाद –
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण केलं आहे. महाराष्ट्रात वीज कंपन्याच्या मंडळ कार्यालयासमोर दि.२२ नोव्हेंबर पासून हे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. तिन्ही कंपन्यात बदली धोरण एकसारखे करावे,निश्चित केलेल्या बदली धोरणाचे अमंलबजावणी करावी,रजा रोखीकरणाचे पैसे तात्काळ द्यावे,पागरवाढ फरकाचा तिसरा हप्ता तात्काळ द्यावा.० ते ४० युनिट चेक रेडींग आणण्याची जबाबदारी संबंधित रेडींग एजन्सी वर टाकावी,५००० वरील विज बिल थकबाकीची वसुली चर्चे ठरल्याप्रमाणे जबाबदारी निश्चित करणारे परिपत्रक काढावे,मुख्य कार्यालय येथे फिल्ड वरील तांत्रिक व लेखा प्रवर्गातील पदोन्नतीतील सर्व त्यांनी तात्काळ करावे या मागण्या करता हे उपोषण करण्यात येत आहे. यावेळी संयुक्त सचिव बी एस काळे, कॉम्रेड परवेज पठाण ,झोन सचिव कॉम्रेड एबी माळी ,श्रीकांत गिरी,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य एस आर गंगावणे मंडळ सचिव कॉम्रेड जकाते कॉम्रेड एस जे बळवंत नितीन मोटे इत्यादी कामगार या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.
जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उस्मानाबाद ते मुंबई सायकल प्रवास
उस्मानाबाद – २६ /११ च्या हल्ल्या शहीद झालेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील एक युवक उस्मानाबाद ते मुंबई असा प्रवास करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मानवी हक्क विभाग उस्मानाबाद च्या वतीने २६/११ शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली येथील अमोल चव्हाण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उस्मानाबाद ते मुंबई हा प्रवास सायकलीवरून करणार आहेत. आज उस्मानाबाद येथून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. यावेळी ॲड विश्वजीत शिंदे, खलिल सय्यद, बालाजी नायकल, प्रभाकर लोंढे आदी उपस्थित होते.
अमोल चव्हाण यांनी यापूर्वी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आरोग्य लाभन्यासाठी उस्मानाबाद ते मुंबई प्रवास केला आहे.
तिजोरीत ६०० कोटींचा कोरोना साह्यनिधी जनता मात्र मदतीपासून वंचितच! लोकायुक्त चौकशीची भाजपची मागणी!
मुंबई – मास्कपासून व्हेंटिलेटरपर्यंत प्रत्येक मदतीसाठी केंद्र सरकारसमोर हात पसरून केंद्राच्या नावाने खडे फोडणाऱ्या ठाकरे सरकारच्या कोविड सहाय्यता निधीत सहाशे कोटींचा बेहिशेबी निधी पडून असतानाही राज्यातील कोरोना योद्ध्यांचे आणि कोरोना मृतांचे वारस मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. निधी उपलब्ध नसल्याची खोटी कारणे देत ठाकरे सरकारने जनतेस वाऱ्यावर सोडले असून, सहाशे कोटींचा साह्य निधी दाबून न ठेवता तातडीने कोरोना मृतांच्या वारसांना मदत द्या अशी मागणी महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाकाळात ठाकरे सरकारने केवळ वसुलीचे काम केले. कोरोना साह्य निधीच्या नावाने लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले, मात्र त्यापैकी जेमतेम २५ टक्के निधीचाच विनियोग केल्याची कबुली सरकारनेच दिली आहे. उर्वरित सहाशे कोटींचा निधी वापराविना पडून आहे, आणि कोरोनाचा फटका बसलेली जनता मात्र, आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त आहे. ऊठसूठ पीएम केअर फंडावर डोळा ठेवून मदतीची याचना करणाऱ्या ठाकरे सरकारने हा पैसा दडवून कशासाठी ठेवला याची लोकायुक्तामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी उपाध्ये यांनी केली. ठाकरे सरकारने या निधीतून खर्च केलेल्या पैशांपैकी तब्बल १५ कोटी रुपये जाहिरातबाजीवर उधळले असल्याचेही स्पष्ट झाले असून, संकटकाळातील सरकारी कर्तव्याचा गाजावाजा करून प्रत्यक्षात मात्र हा निधी वापराविना तिजोरीत दडवून ठेवला असा आरोपही उपाध्ये यांनी केला.
याच काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. बीकेसी कोविड केंद्रातील भ्रष्टाचाराच्या आरोपाची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या चौकशीचे पुढे काय झाले, भ्रष्टाचारविरोधी कारवायाच्या फायली दाबून टाकल्या का, असा सवालही त्यांनी केला.
कोविडसंबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचा निर्णय आघाडी सरकारने ४ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केला, मात्र, अद्यापही हे वारस अनुदानापासून वंचितच आहेत. वारेमाप घोषणा करून सवंग लोकप्रियता मिळविण्याच्या हव्यासापोटी ठाकरे सरकार गरीब कोरोनाग्रस्त कुटुंबांची फसवणूक करत आहे. मुख्यमंत्री कोविड साह्य निधीत पडून असलेल्या ६०० कोटींचा निदी वापराविना पडून असल्याचे उघड झाल्याने लोकांकडून मदतनिधीच्या नावाने जमा केलेल्या या पैशाचा आता तरी गरजूंच्या मदतीसाठी वापर करावा, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना कोणतेही पुरस्कार स्वीकारता येणार नाहीत
पुरस्कारासंबंधी मार्गदर्शक सूचना
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना कोणतेही पुरस्कार स्वीकारता येणार नाहीत त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) नियम, १९६८ च्या नियम १२ मध्ये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी खाजगी नामांकित संस्थेकडून पुरस्कार स्विकारण्यास परवानगी देण्यासंदर्भात तरतूदी नमूद करण्यात आल्या आहेत. सदर तरतूदीनुसार, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या संबंधातील गौरवपर भाषण समारंभ किंवा निरोप समारंभ स्विकारणार नाही किंवा कोणतेही प्रशस्तीपत्र स्विकारणार नाही किंवा त्याच्यासाठी अथवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या सन्मानाकरिता आयोजित मनोरंजनपर कार्यक्रमास किंवा सभेस उपस्थित राहणार नाही.
२. शासनाचे कार्यक्रम विस्तृत क्षेत्रांना लागू असून त्यापैकी काही कार्यक्रमांना चांगली प्रसिध्दी मिळते तर इतर कार्यक्रमांना मिळत नाही. त्यामुळे, पहिल्या प्रकारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अकारण पसंती दिली जाऊ शकते, ही बाब इष्ट नाही. शासनाच्या कार्यक्रमात समावेश असलेल्या एखाद्या संस्थेकडून पुरस्कार देण्यात येत असल्यास ती बाब शासनास अडचणीची ठरु शकते. याखेरीज, शासनाकडून आखून देण्यात आलेल्या धोरणाच्या चौकटीत न्याय्य रितीने काम करणे हे शासकीय कर्मचाऱ्याचे कर्तव्य असल्याने त्याने प्रसिध्दी किंवा सार्वजनिक मान्यता मिळविण्याच्या हेतूने खाजगी संस्थेकडून पुरस्कार मिळविण्याचा प्रयत्न करणे ही बाब त्याच्या कर्तव्यात बाधा आणू शकते. तसेच, एखाद्या कार्यक्रमाचे यश हे एकाच व्यक्तीची कामगिरी नसून अनेक व्यक्तींचे समन्वित प्रयत्न आणि विचारांचा परिणाम असतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे, खाजगी संस्थांकडून शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांना उत्तेजन देण्याची आवश्यकता नाही.
३. सामान्यत: एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने कोणतेही उल्लेखनीय कार्य केले असेल तर, त्याची दखल घेऊन त्याच्या गुणवत्तेला आणि सेवेला मान्यता देण्याच्या विविध पध्दती शासनाकडे असल्याने खाजगी संस्थेकडून पुरस्कार स्विकारणे उचित ठरत नाही. तथापि, काही विवक्षित प्रकरणी पुरस्कार देणारी संस्था ही अत्यंत प्रतिष्ठित असून पुरस्कारात कोणत्याही आर्थिक लाभाचा समावेश नसतो. अशा परिस्थितीत, एखाद्या अधिकाऱ्याने केलेल्या शासनातील त्याच्या कामाच्या कार्यकक्षेबाहेरील गुणवत्तापूर्ण कामासाठी पुरस्कार देण्याच्या अपवादात्मक परिस्थितीत किंवा एखादा कर्मचारी पुरस्कार मिळण्यास पात्र आहे असे शासनास अन्यथा वाटत असेल तेव्हा अशा बाबींवर प्रकरणपरत्वे वाजवी आणि विवेकशील रितीने निर्णय घेण्याची बाब ही सक्षम प्राधिकाऱ्यांच्या स्वेच्छानिर्णयावर राहील.
४. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन अनेक खाजगी /शासकीय संस्थांकडून पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन केले जाते. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडून पुरस्कार स्विकारण्यास परवानगी देण्यासंदर्भात अनेक प्रस्ताव या विभागास प्राप्त होतात. याअनुषंगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना पुरस्कार स्विकारण्यास परवानगी देण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
परिपत्रकात नेमके काय म्हटले आहे:-
महाराष्ट्र राज्य संवर्गातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना पुरस्कार स्विकारण्यास परवानगी देण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) नियम, १९६८ च्या नियम १२ मधील तरतुदीस अनुसरुन, पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत:
१) भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडून केवळ शासकीय/नामांकित खाजगी संस्थेकडून पुरस्कार स्विकारण्याकरिता प्राप्त झालेल्या अर्जाचा शासनाकडून विचार केला जाईल.
२) पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे स्वरुप अराजकीय आणि असांप्रदायिक असावे. अशी संस्था ही राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील नावलौकीक असलेली असावी. संस्थेची कार्ये ही शासनाच्या प्रचलित ध्येयधोरणांच्या विरोधात नसावीत.
३) खाजगी संस्थेकडून पुरस्कार स्विकारण्याकरिता भा.प्र.से. अधिकाऱ्यास पत्र प्राप्त झाल्यास संबंधित संस्था नोंदणीकृत आहे का? संस्थेचा दर्जा, संस्थेचे कार्यक्षेत्र, संबंधित संस्थेतील कार्यरत पदाधिकारी, पदाधिकाऱ्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्यास त्याबाबतची माहिती, संस्थेचा आर्थिक स्रोत, संस्थेने यापूर्वी सन्मानित केलेल्या व्यक्ती तसेच सदर संस्थेशी संबंधित भा.प्र.से अधिकाऱ्यांचे कार्यालयीन संबंध आले होते किंवा भविष्यात येण्याची शक्यता आहे किंवा कसे या सर्व बाबींची माहिती प्राप्त करुन घेऊन सदर माहितीसह संबंधित अधिकाऱ्याने पुरस्कार स्विकारण्यासाठी पूर्वपरवानगीस्तव शासनाकडे अर्ज सादर करावा.
४) पुरस्कार स्विकारण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्जासोबत मुद्दा क्र. २ व ३ मध्ये नमूद खाजगी संस्थेशी संबंधित बाबीची शहानिशा केली असल्याची व सदर संस्था नामांकित असल्याची बाब पत्रात नमूद करावी. तसेच, त्याबाबतची सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्यात यावी.
५) पुरस्कार प्रदान दिनांकाच्या १५ दिवस आधी उपरोक्तप्रमाणे परिपूर्ण अर्ज शासनास पोहोच होतील याची दक्षता घेण्यास यावी.
६) शासकीय व नामांकित खाजगी संस्थेकडून प्राप्त पुरस्कार केवळ प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह स्वरुपात स्विकारता येईल.
७) शासकीय व नामांकित खाजगी संस्थेकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सोने, चांदी वा इतर कोणत्याही मौल्यवान धातू स्वरुपातील सन्मानचिन्ह तसेच कोणतीही मौल्यवान वस्तू स्विकारता येणार नाही.
८) पुरस्कार स्विकारण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) नियम, १९६८ मधील तरतूदीचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे म्हटले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय
विरोधी भाजप आघाडी चा दारुण पराभव, चार उमेदवार विजयी
तासगाव प्रतिनिधी
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकासआघाडी व विरोधात भाजप असा सरळ सामना रंगला होता यामध्ये यापूर्वीच महाविकास आघाडीच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या उर्वरित १८ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले होते त्याचा आज निकाल जाहीर करण्यात आला होता यामध्ये राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी, समाज कल्याण राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई आर आर पाटील, आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती,आज जाहीर झालेल्या निकाला पैकी महा विकास आघाडीचे १४ तर भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
विजयी उमेदवार
१)विशाल पाटील काँग्रेस/मिरज सोसायटी गट
२)आ.मोहनराव कदम काँग्रेस/कडेगाव सोसायटी गट
३)महेंद्र लाड काँग्रेस/पलूस सोसायटी गट (बिनविरोध)
४)जयश्री मदन पाटील काँग्रेस /महिला गट
५)अनिता सगरे राष्ट्रवादी/महिला गट
६)दिलीप पाटील राष्ट्रवादी/वाळवा सोसायटी गट
७)आ.मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी/शिराळा सोसायटी गट (बिनविरोध)
८)बी एस पाटील राष्ट्रवादी/तासगाव सोसायटी गट
९)प्रकाश जमदाडे भाजपा/जत सोसायटी गट
१०)तानाजी पाटील शिवसेना/आटपाडी सोसायटी गट
११)आ.अनिलभाऊ बाबर शिवसेना/खानापूर सोसायटी गट (बिनविरोध)
१२)अजितराव घोरपडे शिवसेना/कवठेमहांकाळ सोसायटी गट
१३)वैभव शिंदे राष्ट्रवादी/पाणीसंस्था गट
१४)मन्सूर खतीब राष्ट्रवादी/ओबीसी गट
१५)बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादी /अनुसुचित जाती जमाती गट
१६)राजेंद्र उर्फ चिमण डांगे राष्ट्रवादी/भटक्या जमाती
१७)सुरेश पाटील राष्ट्रवादी/प्रक्रिया गट
१८)पृथ्वीराज पाटील काँग्रेस/पतसंस्था
१९)राहुल महाडिक भाजपा/पतसंस्था
२०)संग्रामसिह देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट
२१)सत्यजित देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट




























