पोलीस पीकेट पोस्ट व रात्री ड्रोनद्वारे पॅट्रोलिंग करण्याच्या आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पोलीस अधीक्षक यांना सूचना
सारोळ्यात अवैध दारू विक्रीला ऊत; राज्य उत्पादन शुल्कची एकावर कारवाई
पारा( राहुल शेळके ): वाशी तालुक्यातील सर्वच अवैध ढाब्यांवर देशी व विदेशी दारू विक्रीला ऊत आला आहे. यामुळे परमिट रूम, देशी दारू दुकान यांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सर्वच अवैध दारू विक्री वर सध्या धाडसत्र सुरू आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिकारी सतर्क राहून सदर मोहिमेत भरीव कामगिरी करत आहेत.
यातच दिनांक 12 फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदार यामार्फत पथकाला मिळालेल्या माहितीनुसार वाशी तालुक्यातील सारोळा (मां) येथील होटेल योगेश मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क चे एका पथकाने हॉटेल योगेश वर छापा मारला असता आरोपी मेघराज शेषराव मोरे वय 30वर्ष या इसमाच्या ताब्यातून देशी व विदेशी ज्याची अंदाजे किंमत 18850 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सदर गुन्ह्यात मिळून आलेले आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून सदरची कार्यवाही विजय चिंचाळकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली भीमराव ओव्हाळ दुय्यम निरीक्षक भूम यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क पथक करत आहेत.
न्यायाधीशाने केला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान, कारवाईची मागणी
उस्मानाबाद – कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना पदावरून तात्काळ करण्यात यावे या मागणीचे निवेदन डॉ.बी.आर.आंबेडकर लाॅयर्स फोरम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्हा व सत्र न्यायालयात दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या जिल्हा व सत्र न्यायाधीश मलिकार्जुन गौडा हे ध्वजारोहणासाठी आले असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पाहताच प्रतिमा काढून टाका अन्यथा मी ध्वजारोहण करणार नाही असे उद्गार काढले आणि लगेच बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढून टाकली डॉ आंबेडकरांचा व राष्ट्रध्वजाचा अवमान केला त्यामुळे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांना संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोरम उस्मानाबाद च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून मल्लिकार्जुन गौडा यांना पदावरून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन दिले या निवेदनावर कॅड इंद्रजित शिंदे, ॲड. भास्कर गायकवाड,कॅड गणपती कांबळे,कॅड मायादेवी सरवदे,ॲड. पी.ए.माने,ॲड. ए.एस.चंदनशिवे,ॲड. अर्चना गवई,ॲड. आकांक्षा माने,ॲड. नंदकुमार जकाते,ॲड. ए व्ही धेंडे,ॲड. परवेज सुबदानी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उस्मानाबाद – हिजाब बंदीचा मुस्लिम समाजाने केला निषेध,राष्ट्रपतींना निवेदन
पाच राज्यांच्या निवडणुका, ध्रुवीकरण करण्यासाठी निर्णय असल्याचा आरोप
उस्मानाबाद –
कर्नाटक सरकारने शाळा व महाविद्यालयामध्ये ड्रेस कोड कायद्याअंतर्गत मुलींना शाळा व महाविद्यालयामध्ये परीधान करणेवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद मधील मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. तसेच पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने ध्रुवीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, मागील जानेवारी महिन्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये उडपी येथील पी.यु.काॅलेजमध्ये ड्रेस कोड च्या नावाखाली मुस्लिम मुलींना हिजाब घालून महाविद्यालयामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. कर्नाटक सरकारने ड्रेस कोड करून शाळा काॅलेजमध्ये प्रेवश करण्यास मनाई करणे हे घटनेच्या कलम २५ नुसार मिळालेल्या मूलभूत हक्काची पायमल्ली करणारा कायदा आहे.भारतीय घटनेनुसार मिळालेल्या अधिकारानुसार धार्मिक मूलभूत गोष्टी श्रद्धा व परंपरा जपण्याचा व आचरणात आणण्याचा अधिकार आहे त्यामुळेच इस्लाम धर्मानुसार व श्रद्धेनुसार हिजाब परिधान करणे सुद्धा हे मौलिक अधिकारात येते आणि ते कोणत्याही कायद्याद्वारे कोणत्याही राज्याला हिरावून घेऊ शकत नाही कर्नाटक मधील जातीवादी सरकारने विद्यार्थ्यांमध्ये हिजाबवरून विष पेरण्याचे काम केले आहे ते समाजाला व देशाला परवडणारे नाही याची तीव्रता वाढण्याआगोदर राष्ट्रपतींनी वेळीस कर्नाटक सरकारच्या या निर्णयामध्ये हास्तक्षेप करून येथील पारित करण्यात आलेला कायदा रद्द करून तेथील मुस्लिम मुलींना घटनेनुसार मिळालेल्या व मुस्लिम धर्मानुसार हिजाब परिधान करण्याचा अधिकार बहाल करण्यात यावा अशी मागणी केली आहे या निवेदनावर मसूद शेख,समीयोद्दीन मशायक,निजामोदीन मुजावर,वाजीदखान पठाण, मोहसीन शेख,जमीर शेख,जकर शेख,एजाज काझी,असलं पठाण,इमीयाज बागवान, इस्माईल शेख,खादर खान, अय्युब सय्यद,अमजद पठाण,साबेर शेख,मुजीब काझी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अवैध कत्तलखान्याविरोधात २५ संघटना एकवटल्या
भ्याड हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी
उस्मानाबाद –
समाज कंटकाकडून पोलिस बांधवासह पशूमानक अधिकारी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विविध २५ संघटनांकडून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शहरातील पोलीसं पथक कत्तल खान्यावर कारवाई करण्यासाठी गेले असता तेथील कसाई यांनी व त्यां माणसांनी पोलीसांवर व गोरक्षकावर हल्ला चढवला त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी एक पशु मानद कल्याण अधिकारी व अन्य एक असे चार जन गंभीर जखमी झाले पोलीस व पशु मानद अधिकारी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न यावेळी कसाईकडून झाला. वास्तविकतः जन रक्षण करण्यासाठी कटीबद्द असलेल्या व आपले कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना हल्ला होणे ही बाबच मुळात खुप गंभीर आहे. मागील काही दिवसात एका विशिष्ट समाजातील ठराविक लोकांकडून पोलीसांवर हा दुसऱ्यांदा हल्ला केला आहे. मागील हल्ल्यात देखील पोलीस बांधव गंभीर जखमी झाले होते. जनतेचे रक्षण करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे पोलीस बांधवांवर अशी परिस्थीती आहे. तर सामान्य नागरीक काय होईल याचाही विचार केला गेला पाहिजे. मागील काही दिवसांत शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला सर्व आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा अन्यथा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे अशीच परस्थिती कायम राहिल्यास शहरात व जिल्हाभरात व्यापक जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व संघटना दिला आहे.










