Home Blog Page 162

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल

उस्मानाबाद – श्री येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक निवा जैन यांनी आदेश काढले आहेत.

किरीट सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार – खा. संजय राऊत

 

मुंबई – किरीट सोमय्यांनी टॉयलेट घोटाळा केला असून तो लवकरच बाहेर काढणार असल्याचे शिवसेना नेते यांनी सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे नवे आव्हान दिले आहे. आज किरीट सोमय्या मुंबई येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचा नवा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहेत तत्पूर्वीच संजय राऊत यांनी नव्या घोटाळ्याबाबत जाहीर करून सोमय्या यांच्या समोर नवे आव्हान उभे केले आहे. टॉयलेट घोटाळ्यात युवा प्रतिष्ठान आणि सोमय्या यांच्या पत्नी यांचा सहभाग असल्याचेही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच हा घोटाळा १०० कोटींपेक्षा अधिक असल्याचेही ते म्हणाले. 

आय एन विक्रांत घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या यांना अंतरिम जामीन मिळाला असला तरी या नव्या घोटाळ्यात नेमके काय समोर येते ते पाहावे लागेल.

दैनिक जनमत १५ एप्रिल २०२२ E paper

तुम्ही खाता त्या भाकरीवर….

 


उस्मानाबाद -तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं…हे गायिका कडूबाई खरात यांच्या अवाजातल हे गाणं महाराष्ट्रात सुपरिचित आहे. गाण्याचा मतितार्थ दिन दलितांना न्याय मिळवून त्यांचे हक्क मिळवून देऊन खाण्या पिण्याची भ्रांत मिटवून त्यांचे जीवन सुखकर करण्याबद्दल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध माध्यमातून अभिवादन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबादेतील शिराढोण येथील कलाकार कृष्णा पांचाळ याने भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची थेट पेंटिंग साकारली आहे.

गायिका कडूबाई खरात यांचे गाणे नेहमीच कुणी ना कुणी गुणगुणत असतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्साहात साजरी केली जाते आहे. त्याच अनुषंगाने कृष्णा याने भाकरीवर बाबासाहेबांची प्रतिमा साकारली आहे.


४८ चौरस फूट रांगोळीतून महामानवास अभिवादन


उस्मानाबाद येथील कलायोगी आर्ट्स च्या  माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून बाबासाहेब आंबेडकर यांची ४८ चौरस फूट अशा भव्य आकाराची रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी पाच तासाच्या कालावधीत पूर्ण केली असून त्यासाठी १५ किलो रंगीत रांगोळी चा वापर करण्यात आला आहे.या रांगोळीत बाबासाहेबांच्या प्रतिमे सोबत एक लहान मुलगी दिव्याच्या प्रकाशात शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचे रांगोळीतून चित्रित केले आहे.स्त्री शिक्षणाचा आधारस्तंभ म्हणून उभे असलेले बाबासाहेब या रांगोळीतून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी झगडणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रांगोळीच्या माध्यमातून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे ही रांगोळी कलायोगी आर्टचे राजकुमार कुंभार आणि त्यांचे विद्यार्थी जय प्रवीण पंडित  ओम प्रवीण पंडित यांनी पाच तास परिश्रम घेऊन रांगोळी पूर्णत्वास नेली आहे.

नुकसानग्रस्त भागाची खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी


सलगरा,दि.१२ (प्रतिनिधी) – 

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा – किलज येथे दि.१० एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणी दौर्‍यासाठी दि.११ एप्रिल रोजी तालुक्यातील सर्व महसूल, कृषी आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह खासदार ओमराजे निंबाळकर हे आले होते. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त प्रत्येकाला मदत मिळण्याच्या अनुषंगाने पंचनामे करणेबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.


त्यामुळे ह्या सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि जनावरे मृत्युमुखी पडलेल्या पशुधन मालकांना पूर्वपदावर येण्यासाठी तत्काळ मदत मिळण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार, महावितरण विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी आदींनी नुकसानग्रस्त भागात स्वतः जाऊन नुकसान झालेला एकही व्यक्ती मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून पंचनामे करावेत आणि तात्काळ मदत मिळण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करावा अशा सूचना या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबतच महावितरणच्या अधिकार्‍यांनी अवकाळी वाऱ्यामध्ये पडझड झालेले पोल आणि त्यामुळे विस्कळीत झालेली विद्युत व्यवस्था तात्काळ दुरुस्त करून अवकाळी वाऱ्यांचा प्रभाव असलेल्या संपूर्ण भागांमध्ये वीज व्यवस्था पूर्वपदावर सुरळीत करावी अशा सूचना दिल्या. या वेळी तहसीलदार, महसूल, कृषी, महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामसेवक, सरपंच तलाठी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नुकसानग्रस्त भागाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी




सलगरा,दि.१२(प्रतिनिधी) – 


तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे दि.१० एप्रिल रोजी सांयकाळी झालेल्या अवकाळी पावसासह मेघगर्जनेबरोबर झालेल्या जोरदार वाऱ्याने गावातील नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते. गावातील अनेकांच्या घरांची पडझड झाली होती तर काही जणांच्या घरावरील पत्रे हे उडून गेले होते, तर शेतातील पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गंधोरा येथे आज दि.१२ एप्रिल रोजी भेट देऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या ग्रामस्थांना धीर देण्यासाठी आ. पाटील यांनी शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत समस्या जाणुन घेत त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठीचा धीर दिला. नुकसानग्रस्त भगांची पाहणी करून पंचनामे कारावेत असे आ. पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला निर्देशित केले. गावात झालेल्या घरांच्या पडझडीची पाहणी करून पंचनामा करून शासन नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे सुध्दा सांगितले. तसेच गंधोरा येथील हनुमान मंदिरासमोर जोरदार वाऱ्यामुळे सप्ताहाचा मंडप कोसळला होता. या मध्ये लाऊड स्पीकर, मशनरी यांचे नुकसान झाले होते. हि झालेली नुकसान लक्षात घेऊन तुम्ही मला पत्र पाठवा मी तुम्हाला आर्थिक हातभार लावतो असे म्हणाले. या वेळी तहसीलदार, महसूल, कृषी, महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामसेवक, सरपंच तलाठी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पाच लाखांची लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 


गारगोटी. – प्रतिनिधी. 


गारगोटी येथील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या सेपरेट नोंदी करण्यासाठी ग्रामसेवकास ५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) दुपारी रंगेहाथ पकडले. अमृत गणपती देसाई (सध्या रा. गडहिंग्लज, मुळगाव पेरणोली, ता. आजरा ) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.

गारगोटी कोल्हापूर रोडवरील गोंजारी हॉस्पिटलसमोरील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या सेपरेट नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडून चालढकल सुरू होती. ग्रामसेवक अमृत देसाई याने सयाजी देसाई यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून वेळ काढू‌पणाचे धोरण अवलंबिले होते. नोंदणीकरिता २० लाख रुपये किंवा कमर्शियल गाळा देण्याची मागणी केली होती.तडजोडी अंती हा व्यवहार १४ लाख रुपयांना ठरला होता. सयाजी देसाई यांनी याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानंतर सापळा रचला होता. आज दुपारच्या सुमारास सयाजी कॉम्प्लेक्स मधील ऑफिसमध्ये ग्रामसेवक अमृत देसाई यास ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.