Home Blog Page 160

दैनिक जनमत २८ एप्रिल २०२२ E paper

 

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण



तुळजापूर :

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ यांच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिरातील विविध विषयांबाबत मंदीर परिसरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. श्री तुळजाभवानी आईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारी अनावश्यक खर्चिक मोफत दर्शन पास सेवा बंद करावी, कोरोनाचे सर्व नियम शासनाने शिथिल केल्यामुळे प्रथेप्रमाणे देवीचे सर्व धार्मिक विधी पुन्हा चालू करावे, मंदीर प्रशासनाने भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाविकांच्या सोयी-सुविधांचा विचार करावा. या सह विविध मागण्यासाठी हे उपोषण करण्यात आले होते. या लाक्षणिक उपोषणास भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सह पुजारी बांधवांनी आणि विविध संघटनांनी पाठिंबा दाखवला होता.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होतंय उस्मानाबाद ला अन धुर निघतोय नेरुळ मधून


शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांचा पलटवार


उस्मानाबाद (प्रतिनिधी) –

उस्मानाबाद (धाराशिव) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह जागा हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्याआधीच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग भारतीय जनता पार्टीचे आमदार करत आहेत. तुम्हाला प्रसिद्धीच हवी असेल तर इतरही उद्योग आहेत. केवळ श्रेय लाटण्यासाठी सातत्याने जनतेची दिशाभूल का करता? असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

भाजपा आमदारांचे म्हणणे आहे की, सहा दिवसांपूर्वी भाजपा आमदारांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेली आहे.  सामंजस्य करारावर स्वाक्षरी तर होणारच आहे. परंतु त्याआधीच केवळ श्रेय लाटण्यासाठी प्रसिद्धीचा हा खटाटोप बरा नव्हे, याची जाणीव ठेवा. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद  येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केल्यानंतर 2019 मध्येच समितीने पाहणी करुन अहवाल दिलेला होता. त्यावेळेसच मंत्रिमंडळात  ठराव घेऊन शासननिर्णय का काढला नाही. यापूर्वी उस्मानाबाद येथे मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तुमच्या आताच्या नेत्याने नेरुळला पळविले. आता पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला होत आहे, ते आपल्या संस्थेला मिळावे यासाठी तुम्ही भाजपामध्ये गेला. पण आता हे महाविद्यालय शासकीयच राहणार आहे, हेच तुमचे दुखणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद येथे होत आहे, परंतु नेरुळमधून धूर का निघत आहे? याचे उत्तर जनतेला द्यावे.


उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याकरिता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील हे महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन येथील सर्वसामान्य जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि उपचार मिळावेत ही आमची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठीचे श्रेय तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या, पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सतत प्रसिद्धी पत्रके काढून जनतेची दिशाभूल करणे भाजपा आमदारांनी थांबवावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी केले आहे.

जिग्नेश मेवानी यांना अटक; काँग्रेसने केला निषेध


उस्मानाबाद –  जिग्नेश मेवानी यांच्या अटकेचा काँग्रेस ने निषेध केला असून जिल्हा काँग्रेस कमिटी उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की गुजरात मधील वडगाम काँग्रेस पक्षाचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी गुजरात मधील पालनपुर सर्किट हाऊस येथून तीन दिवसापूर्वी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास बेकायदेशीरपणे अटक करून आमदार जिग्नेश मेवाणी यांना पोलिस कोठडीत पाठविण्यात आलेले आहे मा. पंतप्रधानांच्या नावाने एक ट्विट  केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे समजते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने देशाच्या पंतप्रधानांच्या नावाने काही उपेक्षा करणारे ट्विट हा अपराध नाही लोकशाही व संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. सरकारने मनमानीपणे सर्व नियम धाब्यावर बसवून यांच्यावर कारवाई केलेली आहे ही अटक बेकायदेशीर असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे आहे आमदार जिग्नेश मेवाणी यांची त्वरित सुटका करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, अग्निवेश शिंदे, मधूकर तावडे, सिध्दार्थ बनसोडे, राजाभाऊ शेरखाने,रोहित पडवळ, विश्वजित शिंदे, हरिश्चंद्र शेळके,मेहराज शेख, धनंजय राऊत,आयुब पठाण,विनोद वीर, प्रशांत पाटील,शहाजी मुंडे,अशोक बनसोडे,प्रभाकर लोंढे,उमेशराजे निंबाळकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत


मनोज आव्हाड खूण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची सकल मातंग समाजाची मागणी

उस्मानाबाद – औरंगाबाद येथील मातंग समाजातील तरुण मनोज आव्हाड यांच्या मारेक-यास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की दि.२० एप्रिल रोजी मनोज शेषेराव आव्हाड या तरुणाने मांगीरबाबा यांच्या यात्रेला जाण्यासाठी मारेक-यास २०००/-  रूपयाची मागणी केली होती  दलित असून यात्रा वगरे करतोस जय लहुजी म्हणतोस हा राग मनात धरून मनोज यास मारेक-यांनी चोरीचा आरोप घालुन यांनी लाठ्याकाठ्यांनी गुराप्रमाणे मारहाण केली एवढी निर्दयी मारहान करण्यात आली की आठ-दहा जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत मनोज याचा जागीच मृत्यु झाला. आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

कावड मिरवणुकीने कंडारी यात्रेस सुरुवात

 


कंडारी (शंकर घोगरे)

 भैरोबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत कावडीची मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात आली. यावेळी अनेकांनी नवसाचे तोरण बांधले पायघड्या घातल्या . महाराष्ट्रासह आंध्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या परंडा तालुक्यातील कंडारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रेस काल दिनांक 23 रोजी कावड मिरवणुकीने सुरुवात झाली आहे.

    गेली दोन वर्ष करोनामुळे भैरवनाथ   यात्रेवर निर्बंध लादले होते. यावर्षी करोना रुग्णांत लक्षणीय घट झाल्याने यंदा  यात्रेवरील सर्व निर्बंध हटवले असल्याने यात्रा संपन्न होत आहे.

परंपरेनुसार दुपारी साडेबारा वाजता सुतार नेटवरून सनई चौघड्याच्या स्वरात ढोल-ताशांच्या गजरात हलगीच्या तालावर भैरवनाथाच्या कावडीची मिरवणूक काढण्यात आली. मुख्य रस्त्यावरून गणपती मंदिर, मारुती मंदिर, मार्गे भैरवनाथ मंदिरास प्रदक्षिणा घालून मंदिरा समोर ठेवण्यात आली. यावेळी देवाच्या नावानं चांगभलं चा गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली . त्यानंतर गावकऱ्यांनी देवास आंबील पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. परंपरेनुसार रात्री ठीक बारा वाजता भैरवनाथ जोगेश्वरी विवाह संपन्न झाला. लग्न सोहळ्यासाठी बीड आंबेजोगाई लातूर उस्मानाबाद इतर भागातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

 दरवर्षी यात्रेत लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा करोनाचे संकट दूर झाले असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. कावड मिरवणुकीच्या वेळी बाळासाहेब पडघन, भैरवनाथ शिंदे, मा. जि प सदस्य धनंजय मोरे, माजी सरपंच विश्वास मोरे ,उपसरपंच राहुल डोके, विशाल देवकर, दिलीप मोरजकर, आदेश निंबोळे ,दादासाहेब घोगरे, सारंग घोगरे, भाऊसाहेब तीबोळे ,नवनाथ तीबोळे, हरी घोगरे, यांचे सह, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ ,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आज दिनांक 24 रोजी दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान होणार असून कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अनेक दिवसापासुन गायब?




पाझर तलाव दुरुस्तीच्या कामावर अभियांत्यांची देखरेख नसल्यामुळे कामाचा दर्जा खालावला 

अभियंता गायब बिले कोण रेकॉर्ड करणार ठेकेदारांचा टाहो


पाझर तलाव दुरुस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे केले जात असल्याची मलकापुर च्या सरपंचा सह ग्रामस्थांची तक्रार


परंडा (भजनदास गुडे ) – जिल्हा परिषद लघूपाटबंधारे उप विभाग परंडा कार्यालया मार्फत पाझर तलाव दुरुस्ती,कोल्हापुरी बंधारे दुरूस्तीची कामे करण्यात येत असुन कनिष्ठ अभियंता हनुवते गेल्या अनेक दिवसा पासुन गायब असल्यामुळे मलकापुर येथिल पाझर तलावाचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याची तक्रार सरपंचा सह ग्रामस्थांच्यां वतीने निवेदना द्वारे करण्यात आली आहे.

      दि २२ एप्रील रोजी जिल्हा परिषद लघू पाटबंधारे उप विभाग  कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा तालुक्यातील मलकापुर येथिल पाझर तलाव क्र ३च्या दुरुस्तीचे काम करन्यात येत असुन कामावर अभियंता फिरकलेच नसल्याने ठेकेदारा कडून निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात येत आहे .

     भरावाचे खोदकाम अरूंद व कमी खोलीचे करून निकृष्ठ दर्जाची काळी माती भरण्यात येत आहे.तसेच दबाई साठी रोलींग व पाणी मारण्यात येत नाही .

   या प्रकरणी सबंधीत आधिकारी यांनी दखल घेऊन केलेल्या  कामाची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी करन्यात आली आहे.

या प्रकरणी जलसंधारण आधिकारी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता अंदाजपत्रका नुसार काम करण्यच्या सुचना ठेकेदार यांना पुर्वीच दिलेल्या असून,कनिष्ठ अभियंता हनुवते विना परवाना गैरहजर असल्याची माहिती वरिष्ठ आधिकारी यांना .देण्यात आली असून सदरील कामाची पाहणी करण्यात येईल असे सांगीतले.


या कार्यालया अतंर्गत नवीन कोल्हापूरी बंधाऱ्यांची व पाझर तलाव दुरूस्तीची करोडो रुपयांची कामे सुरु आहेत. यातील काही कामे अंतीम टप्यात आहेत मात्र या कामाची साईट पाहाणारे कनिष्ठ अभियंता मागील काही दिवसापासुन गायब असल्यामुळे या कमाची साईट कोण पाहाणार व अंतीम टप्यात असलेल्या कामाचे बीले कोण रेकॉर्ड करणार असा प्रश्न समंधीत ठेकेदाराना सतावत आहे.

       मलकापुर सरपंच व ग्रामस्थ यांच्या तक्रारी वर अधिकारी काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे .

    निवेदनावर मलकापुर च्या सरपंच सुक्षाला कुतवळ,लक्ष्मण खोसे पाटील,मारूती हिवरे, बाबुराव हिवरे,अर्जुन जरे,महादेव तेरकर, लक्ष्मण वरपे,गोपाळ खोसे भालचंद्र हिवरे,तुकाराम तेरकर, दत्ता ढवळे, प्रविण भोगील,ओंकार खोसे, संदिप हिवरे,कृष्णा चौगुले, रंगराव खोसे, दिगंबर भोसले,मारूती चव्हाण, महादेव चव्हाण,पांडूरंग तेरकर, भाऊराव बिडवे,रामदेव तेरकर आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.