Home Blog Page 137

अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना आवाहन

उस्मानाबाद,दि.11(प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची जीवीतहानी झाली असल्याची बातमी प्रसार माध्यमाव्दारे समोर आली आहे. त्या ठिकाणी भारतीय सेना दल,NDRF व अन्य बचाव व प्रतिसाद दल यांच्या मार्फत मदत व बचाव कार्य सुरू आहे.परंतू अद्याप काही भाविक बेपत्ता असल्याचीही बातमी समोर आली आहे.
 त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयातील जे भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले आहेत आणि सद्यस्थितीत त्यांचा संपर्क होत नाही अशा भाविकांच्या निकट नातेवाईकांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृशाली तेलोरे यांना 9665031744 या क्रमांकावर संपर्क साधुन तशी माहिती द्यावी.त्याचप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद संपर्क 02472-225618 टोल फ्री क्रमांक 1077 या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती द्यावी.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.
 या दुर्घटनेच्या अनुषंगाने शासन स्तरावरून खालीलप्रमाणे हेल्प लाईन क्रमांक निर्गमित करण्यात आले आहेत.NDRF:011-23438252, 011-23438253.kashmir divisional help line No: 0194-2496240

चिमुकले झाले विठ्ठल रखुमाई

पाथरुड – (प्रतिनिधी)

 जि.प प्राथमीक शाळा वडाचीवाडी तालुका भूम या शाळेने आषाढी एकादशीचे औचित्य साधून ज्ञानसागर पायी प्रवास दिंडी गावातून काढली. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ टाळकरी वारकरी गावातील महिला यांनी सहभाग घेतला. गावात अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले होते. दिंडीतील वारकऱ्यांसाठी फराळाची सोय करण्यात आली होती. तसेच दिंडीत सहभागी गावचे सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, सर्व टाळकरी, भजनी मंडळ,सर्व महिला मंडळ शाळेचे मुख्याध्यापक श्री झणझणे सर व सहशिक्षक गिरी आणि गावचे सर्व ग्रामस्थ पुरुष महिला आदींची उपस्थिती होती. दिंडीच्या समारोपप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक झणझणे सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचे पंढरपूर आहे व सर्व गावकऱ्यांसाठी सुखाचे दिवस येऊ दे इडा पिडा दूर होऊ दे असे साकडे विठ्ठलाकडे घातले व दिंडीची सांगता करण्यात आली…

ईट महावितरण कार्यालयात मनमानी कारभार, तीन दिवस अर्धा गाव अंधारात

भूम (दत्ता आहिरे)

ईट येथील विद्युत वितरण कंपनीचे 33 के.वी. कार्यालय असून याकार्यालयातील कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मानमानी कारभार चालू आहे त्यामुळे याचा त्रास ईट परिसरातील सर्व विद्युत ग्राहकांना याचा त्रास होत आहे.

     ईट येथे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ असल्याने नागरिकांची कामासाठी नेहमी वर्दळ असते कामे लाईटवर अवलंबून असतात सध्या विमा कंपनीचे शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरवायचा आहे त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागत लागत आहे .ईट मधील अर्धा भाग अंधारात आहे तीन दिवसाला पासून लाईट नसताना देखील अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेत आहेत

      विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयासाठी सब इंजिनिअरिंग इंजिनियर म्हणून महिला अधिकारी काम पाहतात परंतु त्या कार्यालयात कधीच हजर राहत नाहीत त्यांचा फोन नियमित बंद असतो अशावेळी ग्राहकांना लाईन म्हणून कडे तक्रारी करावी लागते परंतु लाईनमन अधिकाऱ्यांच्याही पुढचे असल्याचे दिसून येते ग्राहकांनी लाईन मानला विचारले असता ते म्हणतात मॅडमला फोन करा इट विभागाचे लाईनमन खांडेकर यांना याबाबत विचारले असता तीन दिवसापासून लाईट नसल्याचे सांगताच त्यांच्याकडून ग्राहकांना कामकाजाबाबत उत्तर हवे असते परंतु सदर उत्तराऐवजी आम्ही पडलेला पोल उभा करण्याच काम आमचे नाही ते गुत्तेदाराचेआहे मॅडमला विचारा असे उत्तरे देऊन हात झटकातात ईट विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची मिलीभगत काम करत असून ग्राहकांना वेठीस धरत असल्याचे दिसून येते. वितरण कंपनीचे अधिकारी कामाकडे लक्ष न देता खाजगी कामाकडे जास्त तर सार्वजनिक कामाकडे दुर्लक्ष करताना दिसतात कर्मचारी वर्ग  खाजगी लोकांचे कामे करून हजारो रुपये ग्राहकाकडून उकळत असलेले दिसून येत आहे कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामाकडे वेळ नाही तर खाजगी कामाला प्राधान्य देत असतात मुख्य कार्यालय हजर नसतात या ठिकाणी कर्मचारी केव्हाही कधीही कार्यालयात ये जा करतात व थांबत नाहीत याचा सर्व त्रास ग्राहकांना बसत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०९ ते १३ जुलै, साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

उस्मानाबाद – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थ्यांचे ठिय्या व घेराव आंदोलन


 परीक्षा ऑनलाईन MCQ पद्धतीने घेण्याची मागणी

उस्मानाबाद – प्रतिनिधी 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात विद्यार्थ्यांणी ठिय्या करत घेराव आंदोलन केले. लॉ विधी विभागासह अन्य विषयांच्या परीक्षा ऑनलाईन MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थी यांनी केली आहे. संतप्त विद्यार्थी यांनी विद्यापीठ उपकेंद्रात प्रमुखांना घेराव घालत आंदोलन केले, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यार्थी यांच्या या आंदोलनास अनेक संघटनानी पाठिंबा दिला आहे. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी केली. अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसताना परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन पेटणार आहे.

LLB प्रथम वर्ष ( Three Year कोर्स ) व Pre Law प्रथम वर्षच्या परीक्षा MCQ (वस्तुनिष्ठ) ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी होत आहे. राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरसह अन्य विद्यापीठ यांनी MCQ परीक्षा पद्धत अवलंबली आहे त्यामुळे औरंगाबाद विद्यापीठाने MCQ बाबत सकारात्मक विचार करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.

LLB प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचा निकाल हा 27 जून 2022 रोजी लागला आहे, निकाल लागल्यानंतर दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम कालावधी हा किमान 3 महिने असणे अपेक्षित आहे मात्र अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने विद्यार्थीना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे

सध्या LLB प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राचे परीक्षेसाठीचे अर्ज भरणे सुरु असून त्याची कॉलेजस्तरावर मुदत 9 जुलै पर्यंत आहे त्यामुळे विद्यापीठ वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊ शकते, त्यास अजून उशीर झालेला नाही. वस्तुनिष्ठ पर्यायबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा कुलगुरू यांना आहे. औरंगाबाद विभागातील सर्व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता मागणी मान्य करावी अशी विनंती केली आहे.