ऊसदर संघर्ष समितीचा सिना नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न
रिधोरे (अतुल गवळी) “ऊसाला पहिली उचल २५००रुपये मिळालीच पाहिजे”, “ऊस दर आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा” “ऊस दर संघर्ष समितीचा विजय असो…
“कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही” अशा घोषणा देत ऊसदर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व आंदोलकांनी आज दुपारी ३: ३०च्या सुमारास सिना नदीमध्ये उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळं मोठा अनर्थ टळला.
सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न निर्णय वळणांवर आला असून ऊस दरासाठी ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलकांनी थेट सिना नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिपक भोसले,बळीराम गायकवाड, सुहास गायकवाड,अण्णा जाधव,बापू गायकवाड,दत्ता पंडित,अनंत करळे, विकास गायकवाड, समाधान फाटे, यांच्यासह संघर्ष समितीच्या इतर सदस्यांनी नदीपात्रात आंदोलन केले.
यावेळी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरिक्षक विक्रांत बोधे,माढ्याचे सहा.पोलिस निरीक्षक श्याम बुवा,पोलिस निरीक्षक हनुमंत वाघमारे,पो.ह.घाडगे,बी.एस, पो.कॉ.दत्ता सोमवाड,जय नलवडे,शिवाजी कांबळे,व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेत नदीपात्रातील आंदोलनकर्त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलनकर्ते ऊसाला दर मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत नदीपात्रातून बाहेर आले.
भूम येथे लोक अदालत मध्ये जनसेवा नागरी सहकारी बँक तर्फे अन्नदान वाटप
भूम (प्रतिनिधी)-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने भूम येथे लोक आदालत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनसेवा नागरी सहकारी बँक भूम व मानव व्यसनमुक्ती केंद्र भूम यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान करण्यात आले. भूम येथे झालेल्या लोक आदालतीमध्ये सात प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.कार्यक्रमा प्रसंगी मा. श्री. एम.आर. उगले,जिल्हा न्यायाधीश साहेब मा. श्री. विश्वास माने सत्र न्यायाधीश साहेब, मा. श्री. चेंडके साहेब दिवाणी न्यायाधीश साहेब. मा.श्रीमती एस. के. पाटील दिवाणी न्यायाधीश साहेब व मुंडे साहेब अध्यक्ष विधिमंडळ भूम उपस्थित होते. जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीराम मुळे अभियोक्ता प्रवीण गाडे व बँकचे कर्मचारी उपस्थित होते.
गंधोरा जिल्हा परिषद शाळेत शिष्यवृत्ती पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सलगरा,दि.११(प्रतिक भोसले)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील जिल्हा परिषद शाळेचे ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाल्याने त्यांचा विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे यांच्या हस्ते काल दि.१० नोव्हेंबर रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यामध्ये वैष्णवी संतोष मुसळे (१७२), प्रथमेश संतोष भोसले (१३८), प्रणाली कृष्णाथ एकंडे (१३४) या सर्व पात्र विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. या वेळी विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे, सतीश हुंडेकरी, मुख्याध्यापक विश्वनाथ जट्टे, विजय माने, शंकर जिंदे, मोहनदास चव्हाण, हिरामन मोराळे, श्रीम. पुष्पलता करडे, श्रीम. आशा भोसले
संतोष मुसळे, विश्वनाथ एकंडे, मधुकर राठोड, संजय भोसले, गणेश राठोड, प्रवीण पाटील, प्रभाकर भोसले, तानाजी भोसले, कल्याण जाधव, विठ्ठल जेठीथोर यांच्या सह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
खा.संजय राऊत यांना जामिन मिळताच सलगरा येथे शिवसैनिकांनी केला आनंदोत्सव साजरा
सलगरा,दि.१०(प्रतिक भोसले)
खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिवसेनेच्या सध्याच्या कसोटी मध्ये संजय राऊतांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. पत्राचाळ घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता १०० दिवसांनी संजय राऊत यांना दि.९ नोव्हेंबर, बुधवार रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
संजय राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. आता तब्बल १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला असून पीएमएलए कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे.
संजय राऊत आणि त्यांचा भाऊ प्रवीण राऊत या दोघांनाही पीएमएलए कोर्टाने पत्राचाळ घोटाळ्यात जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत जेलमध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, अंधेरीची पोटनिवडणूक, सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, दसरा मेळावा या पेक्षा संजय राऊत यांचं बाहेर येणं महत्त्वाचं मानलं जातं आहे. त्या मुळे संजय राऊत आता पहिल्यासारखेच धडाडणार की काही दिवस शांत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाला मोठं बळ मिळालं आहे. त्यामुळे शिवसेनेतून आनंद व्यक्त केला जात असून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक जल्लोष करताना दिसत होते. त्या मध्ये असाच जल्लोष तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील शिवसैनिकांनी काल संध्याकाळी ०७ वा.सु. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, घोषणा देत पेढे वाटून साजरा केला.
होय मी साधा आमदार तुमची ओळख मात्र गद्दार म्हणूनच राहणार; आदित्य ठाकरेंचा मंत्री तानाजी सावंत यांच्यावर पलटवार
जनतेच्या आशिर्वादावरच नवा महाराष्ट्र घडवायचा आहे – ठाकरे
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी
उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी) –
होय मी साधा आमदार आहे, साधा आमदार म्हणून महाराष्ट्राची सेवा करणार आहे. तुमची ओळख गद्दार म्हणून राहणार असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी ईट येथील शेतकरी संवादा दरम्यान केला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोण आदित्य ठाकरे? माझ्यासाठी तो एक साधा आमदार आहे असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते त्याचे उत्तर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याच मतदारसंघात येऊन दिले आहे. भूम तालुक्यातील ईट येथील जाहीर सभेत शेतकरी व जनतेशी संवाद साधताना दि.८ नोव्हेंबर रोजी दिला. दरम्यान, त्यांनी पारगाव, पिंपळगाव, गिरवली येथील पिकांची पाहणी केली. तर ठिकठिकाणी शिवसैनिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
संपूर्ण महाराष्ट्रात गोगलगाय, अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र हे गद्दार सरकार गद्दार मंत्री व गद्दार आमदार पाहणी करून शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देण्यासाठी साधी फिरकले देखील नाहीत. या गद्दारांना धडा शिकवून जनतेच्या आशीर्वादावरच पुन्हा नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
युवा शिवसेना सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधित त्यांना धीर दिला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा गौतम लटके, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, शिवाजी कापसे, विकास मोळवणे, अनिल गवारे, ज्ञानेश्वर पाटील, नायक तांबोळी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आघाडी सरकारच्या माध्यमातून आघाडी सरकारने ६५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणून उद्योग उभारले. मात्र गद्दार सरकारच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातला स्थलांतरित झाले. त्यामुळे लोखो तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र यासाठी खोके सरकार व या गद्दारांचे प्रमुख एकनाथ शिंदे हे काहीही करू शकले नाहीत. स्वतःच्या फायद्यासाठी ते आजपर्यंत १५ वेळा दिल्लीला जाऊन आले. मात्र हे उद्योग महाराष्ट्रात उभा करण्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केले नसल्याचा गंभीर आरोपी केला. तसेच जनतेने तुम्हाला निवडून दिले असून त्यांची सेवा करा असे म्हणत शेतकरी, तरुण व उपस्थित महिलांना त्यांनी सर्व ओके आहे का ? असे म्हणत या खोके सरकारची खोकेगिरी चव्हाट्यावर आणली. मी संपूर्ण राज्याचा पाहणी दौरा करीत असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेले असून शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आम्ही या सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. परंतू सरकारने गांभीर्याने घेतले नसून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशी भयानक व विदारक परिस्थिती असताना देखील काही शेतकऱ्यांचे पंचनामे केली नाहीत तर ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत मदत देण्याची घोषणा केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झाली नसल्याचे सांगत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमदार कैलास पाटील यांनी उपोषण केल्यानंतर सरकारने आश्वासन दिले मात्र आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी सरकारने अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली नाही. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल गद्दार असा उल्लेख करीत महिलांचा अपमान करणाऱ्या अब्दुल सत्तारांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
——————————————
३ महिन्यांमध्ये सरकार कोसळणारच
आम्ही लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी आम्ही आघाडी करुन सरकार स्थापन केले होते. मात्र विश्वासघात व गद्दारी करुन सत्तेवर आलेले असंवैधानिक खोके सरकार कोणत्याही परिस्थितीत येत्या ३ महिन्यात कोसळणार असल्याचा ठाम दावा त्यांनी केला. या वक्तव्यामुळे सत्तेतील भाजप किंवा शिंदे गटाचे किती आमदार फुटणार ? अशी चर्चा सुरु झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात नेमकी कशी व कोणती उलथापालथ होईल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.























































