Home Blog Page 113

दैनिक जनमत १४ डिसेंबर २०२२ E paper

अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह एक आरोपी अटक

 


उस्मानाबाद – शहरात अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह एक आरोपी अटक करण्यात आली आहे.स्था.गु.शा. च्या पथकास गुप्‍त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दि. 12 डिसेंबर रोजी उस्मानाबाद शहरातील बायपास रस्त्यालगतच्या हॉटेल साईकमलसमोर अंगावर पिवळसर सदरा व करड्या रंगाची विजार परिधान केलेला एक इसम अवैध पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. यावर स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव यांनी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांना सदर माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे एक पथक नमूद ठिकाणी सापळा लाउन होते. यावर सायंकाळी 19.00 वा. सु. नमूद हॉटेलसमारे बातमीतील नमूद वर्णनाचा एक इसम आल्याने पथकाने संशयावरुन त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव- किशोर लिंबराज माळी, वय 34 वर्षे, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद असे सांगीतले. तो पथकास पाहुन गांगरल्यासाखा झाल्याने पथकाने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे लोखंडी धातुचे पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे असा एकुण अंदाजे 17,400 ₹ किंमतीचे पिस्तुल व काडतुसे मिळाले. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील नमूद पिस्तुल व काडतुसे जप्त करुन त्याच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 361/2022 हा शस्त्र कायदा कलम- 3/25 अंतर्गत नोंदवण्यात आला असुन पुढील तपास आनंदनगर पो.ठा. चे सपोनि- खरड हे करत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक,  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव, पोउपनि- संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- समाधान वाघमारे, विनोद जानराव, फरहान पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर यांच्या पथकाने केली आहे.

उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक १४ ते १८ डिसेंबर, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ ते स्वच्छ राहून किमान तापमान १८ ते ११ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.


दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त दिव्यांग स्वावलंबन सन्मान सोहळा संपन्न

 

परंडा (प्रतिनिधी) परंडा येथे दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शना खाली पंचायत समीती सभाग्रहात परंडा येथे दि१०डिसेम्बंर रोजी दिव्यांग सन्मान सोहळा संपन्न झाला.

    या वेळी विविध क्षेत्रातील दिव्यांगांचा व पत्रकारांचा दिव्यांग उद्योग समुहाच्या वतीने शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ,ट्रॅफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

        या कार्यक्रमाला परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे,माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर,पै.नानासाहेब पवार,मा. सरपंच रावसाहेब खरसडे,दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मिसाळ,सचिव पांडुरंग चोबे, शहराध्यक्ष गोरख देशमाने उपस्थित होते.

         यावेळी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग पत्रकार प्रकाश काशीद,भजनदास गुडे, प्रशांत मिश्रा,मुजीब काझी,गोरख देशमाने,उदय साबळे यांना दिव्यांग स्वावलंबन सन्मान ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले    

       तसेच दिव्यांग आसूनही विवीध क्षत्रात उत्कृष्ट यश संपादन करणारे विद्यार्थी,उत्कृष्ट काम करणारे शेतकरी,महिला यांना सन्मानित करण्यात आले.   यावेळी दिव्यांग कोट्यातून शासकीय मेडीकल कॉलेज एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरलेला विद्यार्थी सुमित सतीश शिंदे,शासकीय इंजिनिअरीग आयटी साठी पात्र ठरलेला विद्यार्थी सुरज भजनदास गुडे यांच्यासह सीमा शिवाजी जाधव,संतोष कुलकर्णी,भारत झोंबाडे,सुरेखा उबरदंड,पांडुरंग मिसाळ या दिव्यांगांना दिव्यांग स्वावलंबन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये परंडा तहसीलच्या पुरवठा विभागाचे पेशाकार भांडवलकर व आशिष ठाकुर यांच्या हस्ते पात्र ५० दिव्यांगांना अंत्योदयच्या शिधा पत्रीकेचे वाटप करण्यात आले.

     तसेच ३० दिव्यांगांना दिव्यांग मानधन मंजुरी पत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी पुढाकार घेतला होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशाहीर शरद नवले सर यांनी केले.या कार्यक्रमावेळी अशोक भराडे,उत्तम मिसाळ,विठ्ठल शिरसागर,निवृत्ती वारे,गणेश बैरागी,सचिन जाधव,शुभम बैरागी,समाधान पन्हाळे,आविदा टाळके,तानाजी सांगडे,हंबीरराव मुळे आदी दिव्यांग उपस्थित होते.

मंत्रीपदासाठी गद्दारी करणाऱ्या सावंताना धडा शिकवा

महाप्रबोधन यात्रेत शिवसेना उपनेत्या सुषमा आंधारे यांचे उपस्थित जनसमुदायाला  आवाहन

परंडा – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व परंडा विधानसभा विधानसभा मतदारसंघातील जनतेशी आ. तानाजी सावंत यांनी मंत्रीपदा साठी गद्दारी केली आहे.याचा हिशोब येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चुकता करा असे अहवान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले,
  परंडा येथील आठवडी बाजार मैदानावर दि ६ डिसेम्बर रोजी सायंकाळी ९ च्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या,परंडा  विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा आरोग्यमंत्री  तानाजी सावंत यांना ( भाऊ ) म्हणुन त्यांच्यावर सडकून टीका केली,
      सुषमा आंधारे यांच्या सभेला रात्री उशीर झाला तरी सभा ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय  उपस्थित होता,जनसमुदया समोर सुषमाआंधारे यांनी आपल्या शैलीतुन सावंत यांची खिल्ली उडवली,सावंत हे वाचाळ बोलतात त्यांना कोठे काय बोलायचे याचे ज्ञान नाही,त्यांनी कधी हफकिन,तर कधी धरण खेकड्याने फोडले,तर महाराष्ट्र भिकारी होईल पण सावंत होणार नाही,आरक्षणाची खाज आमची आल्यावर आली का असे अज्ञानपणाची वक्तव्य केले आहेत.ते पैशाने अरबोपत्ती, खरबोपती असल्याने त्यांना पैशाचा माज आहे,पैशाच्या जोरावर गद्दारी केली आहे असा अरोप केला.
       त्या पुढे म्हणाल्या की सध्या राज्यात महापुरुषांची बदनामी करून घाणेरडे राजकारण केले जात आहे,आशा राजकारणामुळे  जनतेत तीव्र संताप आहे, सरकारला धडा  शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असा इशारा अंधारे यांनी दिला,शिवसेनाला संपवायला निघालेले संपतील परंतु शिवसेना कधीच संपणार नाही, इतर पक्षात असताना ते भ्रष्टाचारी होते मात्र भाजपमध्ये गेल्यावर त्यांना भ्रष्टाचारी नसल्याचे प्रमाणपत्र भाजपवाले देतात असा टोला अंधारे यांनी लगावला.
    खासदार ओमराजे निबांळ्कर, जोतीताई ठाकरे,शरद कोळी, दिलीप शाळु,मेघराज पाटील यांनी उपस्थीत जनसमुदायाला संबोधीत कले.
       या वेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, ज्योती ठाकरे,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,जिल्हा संपर्क प्रमुख शंकर बोरकर,युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी, शिवसेना जिल्हा आघाडी प्रमुख शामल वडणे,दिलीप शाळू,परंडा शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील,भूम शिवसेना तालूका प्रमूख श्रीनिवास जाधवर,वाशी शिवसेना तालूका प्रमुख विकास मिळवणे,शिवसेना युवा नेते रणजीत पाटील,शिवसेना शहर प्रमुख इरफान शेख,माजी नगरसेवक इस्माईल कुरेशी, मकरंद जोशी,मैनुद्दीन तुटके, सत्तार पठाण,महादेव वारे,शंकर इतापे,शंकर जाधव,सुभाष शिंदे, दिलीप रणभोर,मधुकर गायकवाड,संतोष गायकवाड, प्रशांत गायकवाड,तुकाराम गायकवाड,रामलीग गायकवाड, अदि उपस्थित होते,
———————————————-
सोशल मिडीयावर बोलणाऱ्यांनी समोर यावे 
मा.आ.ज्ञानेश्वर पाटील
      शहराच्या मध्यभागी ग्रामीन सह शहरातील जनतेला सोयीचे असलेले बसस्थानक स्थलांतर करण्याचा सल्ला पालकमंत्र्यांना देणाऱ्यांनी विचार करून द्यावा, व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात परंडा शहरात बंद पुकारला या बंदला सर्व राजकीय पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला होता. तरीही मंत्री सावंत यांचे सल्लागार,पदाधिकारी व चेल्यांनी स्थलांतराच्या विरोधात पुकारलेल्या बंद मध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होऊ नये, जर कोणी बळजबरीने दुकाने बंद करण्याच्या प्रर्यत्न केला तर पोलीसांना कळवा असे घरी बसुन सोशल मिडीयावर बोलणारे बंद दिवशी दुकानदारांच्या बाजुने का आले नाहीत असा सवाल उपस्थीत करुन हा बंद जर उद्धव बाळासाहेब ठावरे शिवसेनेचा असता तर सोशल मिडीयावर बोलणाऱ्यांना दाखवले असते असे पाटील म्हणाले तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले आज सल्लागार बस स्थांनक हलवण्याचा सल्ला देत आहेत उद्या किल्ला हलवीण्याचा सल्ला देतील.मदार संघात अनेक प्रस्न आहेत ते सोडवीण्याचे सल्ले द्यावेत असे मा.आ.ज्ञानेश्वर पाटिल यांनी सांगीतले,