Home Blog Page 104

वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप

सलगरा,दि.२०(प्रतिक भोसले)

वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र जेवणावळी घालण्याच्या प्रथा आपण बहुतांशी ठिकाणी पहातो. माञ त्या सोबतच वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून आगळी वेगळी श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. वडिलांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त जेवणावळी कार्यक्रमा बरोबरच शामराव (आण्णा) मुसळे, रामराव (बापु) मुसळे, आणि सचिन मुसळे या भावांनी आपल्या वडिलांच्या म्हणजेच कै.विजयकुमार (काका) शामराव मुसळे यांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त दि.२० फेब्रुवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरणारी आहे. मात्र अलिकडच्या काळात हे प्रसंगही मोठे इव्हेंट म्हणुन साजरे केले जातात. फ्लेक्सबाजी, जाहिराती, भोजनाच्या मोठमोठया पंगती मात्र या गोष्टी बाजूला सारत अवाजवी खर्च टाळुन सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटप आणि ह.भ.प. गोपाळ (आण्णा) वासकर महराज यांची किर्तनसेवा या माध्यमातून वडिलांच्या स्मृती वेगळ्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न तालुक्यातील गंधोरा येथील मुसळे परिवाराकडुन करण्यात आला आहे. 

अशा प्रकारे शालेय साहित्याचे वाटप करून एक वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. या वेळी सरपंच बबिता राठोड, तंटामुक्त अध्यक्ष संतोष मुसळे, माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शामराव (आण्णा) मुसळे, पोलीस पाटील गजेंद्र कोनाळे, सुरेश मुसळे, रामराव (बापु) मुसळे, सचिन मुसळे, सुधीर पाटील, महेश पाटील, संभाजी मुसळे, अरुण पौळ, मोजम मुल्ला, लक्ष्मीकांत कुलकर्णी, मुख्याध्यापक जट्टे, श्रीमती करडे, श्रीमती भोसले, चव्हाण, प्रवीण पाटील, प्रवीण भोसले, बालाजी पाटील, महादेव भोसले, सुनील सोनटक्के यांच्या सह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

परंडा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

मराठा सेवासंघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने ३९३ दिप प्रज्वलीत

परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ जयंती उत्साहात साजरी ……

शिवजयंती निमीत्त वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धेती विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण.

परंडा ( भजनदास गुडे)मराठा सेवासंघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड व शिवप्रेमीच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी परंडा येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

       यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून पुजन करण्यात आले.

          यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,पोलिस निरिक्षक अमोद भुजबळ,पोलीस उपनिरीक्षक कविता मुसळे,माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सIद्देवाल,माजी नगरध्यक्ष जाकीर सौदागर,आरपीआय चे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे, तुकाराम साळूंके,ॲड.नुरोद्दीन चौधरी,ॲड.देवकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.संदिप पाटील,मा.नगरशेवक सुबोधसिह ठाकूर,विकास कुलकर्णी, बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे,राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,ॲड सुभाष वेताळ, नवनाथ जाताप,पंचायत समितीचे माजी उप सभापती मेघराज पाटील,माजी नगरअध्यक्ष शिवाजी मेहेर,उद्योजक हनुमंत पाटील,रणजित पाटील, आशोक वेताळ,रमेश परदेशी,अमर साळुंके,संतोष भांडवलकर, भारत घोगरे,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष वाजीद दखणी,शिवसेना शहर प्रमुख इरफान शेख,गोविंद जाधव,शिवाजीराव कदम,ॲड. घोगरे,नानासाहेब पवार,धनंजय सोनटक्के,पोलिस पाटील संजय कदम,जाधव सर,हनुमंत यादव सर,शफी पटेल सर,बाबूराव काळे सर,मतीन जिनेरी,दिपक थोरबोले,मकसुद पल्ला,गणेश चव्हाण,विशाल पवार,आप्पा बनसोडे, शरीफ तांबोळी, बाबासाहेब जाधव, आतूल गोफणे,नाना मांडवे, भाऊसाहेब खरसडे,हरिचंद्र मिस्कीन रवि दादा मोरे,कानिफनाथ सरपणे, आप्पा काशीद,बाळासाहेब पाटील,महेश ठोंगे,शाम मोरे, दिगंबर गुडे,तानाजी बनसोडे, गणेश कोकाटे,राजू सोनवणे, रत्नकांत शिंदे,पप्पू पठाण, सुधाकर कोकाटे, तुकाराम गायकवाड,पोपट गटकुळ, यांच्या सह शिवप्रेमी मोठया संखेने उपस्थित होते .

        छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीच्या पुर्वं संधेला जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्षा आशाताई मोरजकर यांच्या मार्गदर्शना खाली ३९३ दिप प्रज्वलीत करून शिवजन्मोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.तसेच छत्रपती शिवाजी महाराज या नावावर ३९३ पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्याने छ्त्रपती शिवाजी महाराजाचे नाव दिव्यात उजळून निघाले होते.

      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने दोन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विजेत्यांना तुकाराम महाराज यांची गाथा, ट्रॅपी,प्रमानपत्र व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले.

  शिव जन्मोत्सव सोहळा व शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे तालूका अध्यक्ष गोरख मोरजकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे,संभाजी ब्रिगेडचे तालूकाध्यक्ष समाधान खुळे,अंगद धुमाळ,शशिकांत जाधव,देवानंद टकले,महेश शिंदे सर,शरद नवले सर,रविकापसे सर,दैवान पाटील सर,रविदादा मोरे,मलीक सय्यद, आनंत सुर्यवंशी,निशिकांत क्षिरसागर,राजकुमार देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती आशाताई मोरजकर,जि.प.च्या मा.महिला व बालकल्याण सभापती शिवमती पुष्पा मोरे,जिजाऊ ब्रिग्रेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती प्रियका क्षीरसागर,शिवमती तेजस्विनी करळे,शिवमती मनिषा जगताप, शिवमती अपेक्षा पाटील,शिवमती राणीताई कोळगे,सारिका मोरे, ज्योती हजारे,निता जाधव, आश्विनी लोखंडे,जान्हवी कुलकर्णी,आकांक्षा देशमुख यांनी परिश्रम घेतले.

——————————————

पप्पू पठाण यांच्या वतीने शिवभक्तांना शरबतचे वाटप

     परंडा येथील सामाजीक कार्यक्रत्ये पप्पू पठाण यांच्या वतीने शिवजयंती निमीत्त छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थीत शिवभक्ताना शरबतचे वाटप करण्यात आले.

——————————————

वक्तृत्व स्पर्धेतील गट क्र. १ विजेते स्पर्धक

    प्रथम क्र.अक्षरा धनंजय गोरे, द्वितीय क्र. ईश्वरी दयानंद पाटील, तृतीय क्र.अपेक्षा प्रमोद बोबलट.

गट क्र.२ विजेते स्पर्धक प्रथम क्र.समर्था संतोष सुर्यवंशी, विद्वतीय क्र.सई सचिन पाटील, तृतीय क्र.सिमा विजय पाटील.

    

भक्तीशक्ती मॅरेथॉन स्पर्धेतील गट क्र.१ मधील विजेते स्पर्धक

      पथम क्र.अतिश शामराव शिरगिरे,द्वितीस क्र.शुभम लक्ष्मण भांडवलकर,तृतीय क्र.अनंत धोडीराम विटकर.

    गट क्र.२ मधील विजेते स्पर्धक

प्रथम क्र.सायराज नितीन गावडे, द्वितीय क्र.ज्ञानेश्वर बालाजी नाईकनवरे,तृतीय क्र.प्रथमेश चंद्रकांत कुदळे या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषीक देऊन सन्मानीत करण्यात आले.

दैनिक जनमत १९ फेब्रुवारी २०२३ E paper

पालकमंत्री आणि भाजप आमदारांमध्ये सुप्तसंघर्ष?

 

उस्मानाबाद – जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि तुळजापूर चे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये सध्या सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा जोर धरत आहे. या संघर्षाची सुरुवात पालकमंत्री सावंत यांनी जिल्हा परिषद मधील कामांना स्थगिती देण्याची मागणी केल्याच्या पत्रानंतर सुरू झाली. जिल्हा परिषदेत भाजप आणि सावंत गट यांची सत्ता असताना त्याच काळातील कामांना स्थगितीची मागणी केल्याने उलट सुलट चर्चाना उधाण आले होते. त्यानंतर या सुप्त संघर्षाचा दुसरा टप्पा आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या बैठकीचा त्यात देखील पालकमंत्र्यांच्या मतदार संघात अधिकची कामे नेण्यात आल्याची देखील चर्चा होती. सुप्त संघर्षाचा तिसरा टप्पा नुकताच घडला असून तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या नियोजन विभाग प्रधान सचिवांना पत्र लिहीत जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत निधी वाटपात असमतोल असल्याचे म्हटले आहे. या पत्रानंतर मात्र हा सुप्त संघर्ष थोडा पुढे गेला आहे. दोन्ही नेत्यांनी अद्याप याबद्द्ल जाहीर विधान केलेले नाही. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील कोणत्याही कार्यक्रमात एकत्र देखील दिसलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात दोन्ही नेत्यात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील येत नाही. त्यामुळे हा सुप्त संघर्ष आहे की खुला विरोध आहे की सारं काही आलबेल आहे हे उभयतांनी जाहीर केल्यानंतर समजेल.

आज दि १४ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे निर्णय

मुंबई – आज दि १४ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले ते संक्षिप्त स्वरूपात खालीलप्रमाणे

* राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित केल्या जातील.

* धान शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. १ हजार कोटी निधीस मान्यता दिली असून त्याचा ५ लाख शेतकऱ्यांना लाभ होईल.


*महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्यात आली. औषधी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होईल.

*पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती दिली जाईल. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

* पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख, जेजुरी तीर्थक्षेत्रासाठी १२७ कोटी २७ लाख तसेच सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण.

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्यात येईल. यासंदर्भात अध्यादेश काढला जाणार आहे.

*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन केले. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला.