Home Blog Page 103

दैनिक जनमत ०८ मार्च २०२३ E paper

 

दैनिक जनमत ०६ मार्च २०२३ E paper

 

६७ लाखाच्या मुद्देमालासह दारु जप्त एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई

 

कोल्हापूर, दि. ४ (अमोल कुरणे) राज्य उत्पादन शुल्क एक्साइजचे कोल्हापूर जिल्हा अधीक्षक रविंद्र आवळे, उपअधीक्षक आर.एल. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने उचगाव, ता. करवीर हद्दीत हायवे क्र. ४ तावडे हॉटेल चौका मध्ये एका संशयित आयशर चालकास पकडून आयशर कंटेनर नं. एम.एच.०८ ए. पी. ५०८० ची तपासणी केली असता, आयशर कंटेनरमध्ये गोवा बनावटीची विदेशी मद्याने भरलेले १८० व ७५० मिलीचे ५०० बॉक्स आणि बीअरचे १२० बॉक्स असे एकूण ६२० बॉक्स मद्य मिळुन आले.

या प्रकरणी सुरेश रामजीवन बिश्नोई वय २४ रा. ढाणी धोरिमाना, जि. बारमेर, राजस्थान याला अटक करण्यात आली आहे.  ५२,०३,२०० चे मद्य व आयशर वाहनासह एकूण मुद्देमाल ६७,०३,२०० चा आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथक प्रमुख निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, दुय्यम निरीक्षक एस. एल. नलवडे, जवान सचिन काळेल, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.

व्वा रे निवडीची पद्धत, नेत्यांच्या सुपुत्रांना आणि सामान्यांना वेगळा न्याय?

धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप का केला जातो याचा प्रत्यय जिल्ह्यातील एका सभेत नुकताच आला, निमित्त होते शरद युवा संवाद यात्रेचे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख या संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यात आले होते. गेले अनेक महिने युवक काँग्रेसचे पद रिक्त आहे. अनेकांनी जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा देखील व्यक्त केली. त्यानंतर मेहबूब शेख यांनी भाषण संपताना काही इच्छुकांची नावे घेत त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींना हात वरती करून कोणी किती माणसे आणली याची खातरजमा केली. मग यापूर्वी जे जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकारी  नेमले गेले त्यांची निवड करण्यापूर्वी अशीच पद्धत वापरली गेली होती का? की राष्ट्रवादीत फक्त सामान्य कार्यकर्त्यांना अग्निपरीक्षेला समोर जावे लागते. ज्यांची पोहोच, वशिला मोठा आहे त्यांना ताबडतोब पदे दिली जातात का हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत. जिल्ह्यातील बडा नेता पक्ष सोडून गेल्यानंतर सुरू झालेली गळती अद्याप का थांबली नाही? प्रमुख पदावर आमचाच माणूस असायला हवा असा हट्ट कोण धरत आहे? गेल्या काही काळात पक्ष सोडून गेलेले पदाधिकारी कोणाच्या कार्यपद्धतीला सोडून गेले? यावर मंथन होणार की सामान्य कार्यकर्त्यांना वेट अँड वॉच वर ठेवले जाणार हा येणारा काळच सांगणार आहे.